मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८

वामन रामराव कांत (ऑक्टोबर ६१९१३ - सप्टेंबर ८१९९१) हे मराठी कवी, गीतकार होते.
वा.रा. कांत
जन्म नाववामन रामराव कांत
टोपणनावरसाळ वामन, अभिजित, आणि कांत
जन्मऑक्टोबर ६१९१३
नांदेडमहाराष्ट्रभारत
मृत्यूसप्टेंबर ८१९९१
मुंबई ,महाराष्ट्र,भारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकवितासमीक्षा अनुवादनाट्यलेखन
अपत्ये३ मुले २ मुली

जीवनसंपादन करा

वामन रामराव कांत यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. वा.रा. कांत हे या नावाने लेखन करत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण १९३१ साली हैदराबाद येथे झाले. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचा विवाह सौ. लक्ष्मीबाई - पूर्वाश्रमीच्या गंगूबाई कुर्डूकर यांच्याशी १९३० मध्ये झाला.

नोकरी व्यवसायसंपादन करा

  1. 'विहंगमाला' या नियतकालिकाचे संपादक (१९२८) तसेच विहंग प्रेसचे व्यवस्थापन.
  2. निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून नोकरी (१९३३-१९४५)
  3. निजाम सरकारच्याच आकाशवाणी हैदराबाद व औरंगाबाद केंद्रांत मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९४५- १९६०)
  4. भारतीय आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९६०-१९७०)
  5. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सेवानिवृत्त (१९७०)

गाजलेल्या कविता/गाणीसंपादन करा

  • आज राणी पूर्विची ती प्रीत तू मागू नको
  • त्या तरुतळी विसरले गीत
  • बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात
  • राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे, भेट होती आपुली का ती खरी, की स्वप्‍न माझे ?
  • सखी शेजारिणी, तू हसत रहा; हास्यांत पळे गुंफीत रहा

काव्यसंग्रह(एकूण १० )संपादन करा

  • 'दोनुली'
  • ’पहाटतारा’
  • ’बगळ्यांची माळ’
  • 'मरणगंध' (नाट्यकाव्य)
  • 'मावळते शब्द'
  • 'रुद्रवीणा'
  • 'वाजली विजेची टाळी'
  • 'वेलांटी'
  • ’शततारका’ (१९५०)
  • ’सहज लिहिता लिहिता’

चरित्रसंपादन करा

वा.रा. कांत यांचे एक छोटेखानी चरित्र -’कविवर्य वा.रा.कांत’- कृ.मु. उजळंबकर यांनी लिहिले आहे. कालिंदी प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.

पुरस्कारसंपादन करा

  1. १९६२-६३ 'वेलांटी ' या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
  2. १९७७-७८ 'मरणगंध ' या नाट्यकाव्यास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
  3. १९७९-८० ' दोनुली' या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत ' पुरस्कार
  4. १९८९-९० 'मावळते शब्द' या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत' पुरस्कार

सन्मानसंपादन करा

  1. १९८८ महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
  2. १९८९ महाराष्ट्र साहित्य परिषद, हैदराबाद यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
  3. १९८९ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रदीर्घ वाङ्मयसेवेसाठी गौरववृत्ती देऊन सन्मान
.

प्रकाशित साहित्यसंपादन करा

नावसाहित्यप्रकारप्रकाशनप्रकाशन वर्ष (इ.स.)
पहाटताराकवितासंग्रहविचाराविहार मंडळ प्रकाशन, नांदेड१९३०
फटत्कारकवितासंग्रहविचाराविहार मंडळ प्रकाशन,नांदेड१९३३
रुद्रवीणाकवितासंग्रहप्रतिभा प्रकाशन , औरंगाबाद१९४७
शततारकाकवितासंग्रहधृव प्रकाशन, परभणी१९५०
वेलांटीकवितासंग्रहमौज प्रकाशन, मुंबई१९६२
वाजली विजेची टाळीकवितासंग्रहमौज प्रकाशन, मुंबई१९६५
मरणगंधनाट्यकाव्यकाँटिनेंटल प्रकाशन, मुंबई१९७६
दोनुलीकाव्यसंग्रहमौज प्रकाशन, मुंबई१९७९
मावळते शब्दकाव्यसंग्रहमौज प्रकाशन, मुंबई१९८८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भंगु दे काठीन्य माझे - कवी बा.सी.मर्ढेकर

भंगु दे काठीन्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे येऊ दे वाणीत माझ्या सुर तुझ्या आवडीचे, राहू दे स्वातंत्र्य माझे, फक्त उच्चारांतले गा, अक्षरां आकार त...