शनिवार, २९ डिसेंबर, २०१८

जयंत पवार - परिचय

जयंत पवार हे एक मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक आहेत.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. तेच नाटक नंतर निर्माते संतोष कोचरेकर यांनी कल्पना कोठारी आणि उदय कुलकर्णी यांस सहनिर्माता म्हणून घेऊन आपल्या ‘महाराष्ट्र रंगभूमी’तर्फे व्यावसायिक रंगभूमीवर आणले.
२०१४ सालच्या जानेवारी महिन्यात १० ते १२ या तारखांना महाड येथे झालेल्या १५व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे जयंत पवार हे अध्यक्ष होते.
जयंत पवार यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ’फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी मिळाला.

जयंत पवार यांनी लिहिलेली नाटकेसंपादन करा

  • अधांतर
  • काय डेंजर वारा सुटलाय
  • टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन
  • दरवेशी (एकांकिका)
  • पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप)
  • फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)
  • माझे घर
  • होड्या (एकांकिका)

आनंदीबाई शिर्के-परिचय



लेखिका, बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के या त्यांच्या ‘सांजवात’ या आत्मचरित्रामुळे प्रसिद्ध झाल्या. त्यांचा जन्म ३ जून १८९२ रोजी झाला. आनंदीबाईंनी ‘सांजवात’या पुस्तकातून जुन्या काळातील स्त्रीजीवनाचं वास्तव आणि प्रांजळ चित्रण केलं आहे. एकत्र कुटुंबपद्धती, मुलींवर आणि स्त्रियांवर असलेली बंधनं, समाजातल्या रूढी, अशा अनेक गोष्टींचा वेध त्यांनी घेतला आहे.


आनंदीबाईंचं माहेरचं नाव अनसूया होतं. त्यांचे वडील पुण्यातले. पण त्यांनी बडोदे संस्थानात सयाजीराव गायकवाडांकडे नोकरी घेतली व ते तिथे राहायला गेले. आनंदीबाई तेव्हा तशा लहान होत्या. १९१० मध्ये मासिक मनोरंजनमध्ये कु. आनंदी या नावानं एक कथा छापून आली. अनेकांचं या नव्या नावाने लक्ष वेधून घेतलं. कथेचं नाव होतं ‘शारदाबाईंचे संसारचित्र’ या नावातच सारं काही समजतं.मात्र १९१२ मध्ये ‘मराठा मित्र’ ने याच लेखिकेची ‘बेगम दिलआरा’ ही एक मोगल काळातील प्रेमकथा छापली. आणि या लेखिकेला खूप मान्यता मिळवून दिली. प्रसिद्ध लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी संपादकांकडे विचारणा केली. ‘या कथेचे रचनाकौशल्य, पात्रांचे स्वभाव रेखाटन इतके वाखाणण्यासारखे आहे, एखाद्या पुरुष लेखकानेच टोपण नावाने ही कथा लिहिली नाही ना?’ आणि मग आनंदीबाई लिहीतच राहिल्या. सर्व महत्त्वाच्या आणि सामाजिक भान असणा-या पत्रांमधून लेखन करत राहिल्या. शिकणा-या, नोकरी करू पाहणा-या, अर्थार्जनानं येणा-या स्वातंत्र्याची चव चाखू पाहणा-या स्त्रियांची चित्रं, त्यांचे प्रश्न आनंदीबाईंच्या कथांमधून उमटायला लागले. प्रत्यक्ष आयुष्यातही आनंदी एक धाडसी, कणखर, आधुनिक विचारांची तरुणी होती. घरातच त्यांच्यातलं वेगळेपण आणि तेज जाणवू लागलं होतं. परिचाचरिकेचं प्रशिक्षण घेऊन, तोच व्यवसाय पत्करणार आणि वडिलांना हातभार लावणार असा निश्चय करून त्या एकविसाव्या वर्षापर्यंत विवाहापासून दूर राहिल्या. त्या काळात ही बंडखोरीच होती. आपला परिचारिकेचा व्यवसाय निष्ठेने सुरू करून आनंदीबाईंनी लेखनालाही प्रारंभ केला.
आनंदीबाईंचा विवाह म्हणजे त्या काळात लेखिका आणि संपादक यांचे भावबंध जुळून प्रेमविवाह होण्याचं हे दुर्मीळ उदाहरण आहे. पण शिवराम शिर्के हे मराठा मित्रचे कार्यकारी संपादक होते. कोकणातील खानदानी मराठा. ते विचारांनी पुरोगामी, पण देशावरल्या मराठा मुलीशी लग्न ठरवल्याबद्दल शिर्के यांच्या कुटुंबाला त्यावेळी फार त्रासातून जावं लागलं. आनंदीबाई आणि शिवरामपंत दोघांनीही खूप संयमानं अनेक गोष्टी सहन केल्या. वडील लवकर निवृत्ती घेऊन मुंबईला आल्यानंतर सारेजण मुंबईत राहिले. मुलींची लग्नं उरकणं हा वडिलांसमोरचा एककलमी कार्यक्रम होता. विवाहाच्या संदर्भात लिहिताना आनंदीबाईंनी मराठा समाजाच्या एकूण मानसिकतेवर प्रकाश टाकला आहे. स्वतःच्या कुटुंबाच्या, घराण्याच्या जुनाट परंपरांच्या अभिमानापुढे इतर हितकर बाबींकडे दुर्लक्ष करण्याया या समाजाच्या प्रवृत्तीवर त्यांनी बोट ठेवलं आहे. आनंदीबाईंना शिकण्याची आवड होती, पण उत्तमप्रकारे शिक्षण घेणं त्यांना परिस्थितीमुळे जमलं नाही. शिकता न आल्याने नोकरी मिळवणं कठीण बनलं. नर्सिंग शिकून ते काम करता येईल असं त्यांना वाटत होतं, पण या गोष्टीला घरातून विरोध झाला. पुस्तकांची सोबत आणि वाचनाची आवड मात्र त्यांनी मनापासून जोपासली. वाचनातूनच त्यांना लिहायची प्रेरणा मिळाली. नर्सिंगला जाता आलं नाही, तरी त्या चंद्राबाई नावाच्या सुईणीबरोबर जाऊन बाळंतपणाच्या केसेस बघत. त्या कथालेखन करत आणि लेखनामुळे त्यांचा परिचय ‘मराठामित्र’चे सहसंपादक शिवराम शिर्के यांच्याशी झाला. परिचयाचं रूपांतर पुढे प्रेमात आणि त्यानंतर लग्नात झालं. दोघेही मराठा समाजातले असले तरी शिर्के हे कोकणस्थ मराठा आणि शिंदे देशस्थ मराठा असा फरक असल्यामुळे माहेरून या लग्नाला विरोध झाला. कारण त्याकाळी असे विवाह होत नसत. लग्नाची ही गोष्ट सांगताना आनंदीबाईंनी मराठा समाजातील बंदिस्त व झापडबंद रूढींकडे निर्देश केला आहे. या सा-या लिखाणात कमालीचा मोकळेपणा आहे.
विवाहोत्तर जीवनाबद्दल लिहिताना आपल्या सहजीवनातील अनेक तपशील त्या देतात. त्या स्वतः अत्यंत थेट बोलणा-या अन् परखड स्वभावाच्या होत्या, तर पती शिवराम शिर्के स्वभावाने नरम, सरळपणे सगळ्या गोष्टीकडे बघणारे. दुस-याला नावं न ठेवता आपल्या मार्गाने जाणारे. संसारातले अनेक बरेवाईट प्रसंग यामुळे निभावले गेले. दुस-यामुळे स्वतःला नुकसानीत जायची पाळी आली तरी शिर्के काही न बोलता शांतपणे वागत, त्यामुळे आनंदीबाई चिडत. एकमेकावरील प्रेमाने आणि विश्वासाने त्यांचा संसार खूपच उत्तम झाला.
आनंदीबाई लिखाण करता करता, कौटुंबिक वर्तुळाच्या पलीकडे गेल्याच होत्या. पुढे तर त्या समाजकारण व राजकारणातही सक्रिय बनल्या हा सारा अनुभव त्यांच्या जीवनाला एक नवं भान देणारा ठरला. सतत स्थलांतर करतच त्यांचा संसार झाला. पुणं, मुंबई, सातारा, खानदेश अशा विविध ठिकाणी नवं घर मांडण्याचा आणि ते चालवण्याचा खटाटोप आनंदीबाई हिमतीने करत. जळगावला राहत असताना स्कूल बोर्डावर सदस्य म्हणून त्या गेल्या आणि त्यांना यामुळे सभेत बोलण्याचा सराव झाला. १९३५ साली जळगावला माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यसंमेलन झालं तेव्हा त्यांची निवड स्वागताध्यक्ष म्हणून झाली होती. साहित्यक्षेत्रात त्यांचा अनेक मोठ्या लेखकांशी परिचय झाला. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर त्यांना आपली मुलगीच मानत असत. मा.आनंदीबाई शिर्के यांचे ३१ ऑक्टोबर १९८६ रोजी निधन झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेबांचे स्मृती जागरण!

*बाबासाहेबांचे स्मृती जागरण ...!*

"बाबासाहेबांनी आग्रहानं सांगितलेल्या अनेक गोष्टी राजरोस पायदळी तुडवून, बाबासाहेबांचा वारसा जपत असल्याची मिजास मिळवण्याचा उद्योग करणारे दलित नेते हेच दलित जनतेच्या शिरावरील बोजे आहेत. हातापायातल्या बेड्या आहेत. दलितांचे नेतृत्व करीत असल्याचा त्यांचा दावा ही स्वतःला गि-हाईक शोधण्याची त्यांची धडपड आहे. समाजालाच नव्हे, तर स्वतःलाही विकायला सदैव सिद्ध असणारे हे नेते बाबासाहेबांच्या विचारांचे आणि बाबासाहेबांच्या जनतेनेही दुश्मन आहेत. राजकारण दूर ठेवून या समाजासाठी खूप काही करता येतं हे या तथाकथित नेत्यांना मान्य नाही. दलित तरुणांच्याही लक्षात ही गोष्ट आली आहे. राजकारणात काही करायचं असेल तर या नेत्यांच्या कळपात शिरावं लागणार. हे कळू लागल्यानं सगळ्या गटापासून दूर राहून आवश्यक समाजकार्यात गुंतवून घेणाऱ्या दलित तरुणांची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे."
---------------------------------------------

*स*हा डिसेंबर.....
आंबेडकरी जनतेच्या श्रद्धेचा दिवस! महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या दिवशी उभ्या देशातून लोक चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. एवढ्या मोठ्या संख्येनं येणाऱ्या या आंबेडकरी जनतेला सोयी, सुविधा फारशा मिळतच नाहीत. त्यामुळं चैत्यभूमीच्या परिसरात अस्वच्छता पसरते. या प्रकाराबद्धल कांहीं लोक वृत्तपत्रातून नाराजी व्यक्त करतात. जवळपास दरवर्षी हे चित्र दिसतं. या अस्वच्छतेबाबत जी नाराजी व्यक्त होत असते त्याचा सगळ्याच पक्षांनी, संघटनांनी विचार करायला हवाय. ज्यांना खरोखरच समरसता निर्माण करायची आहे त्यांना आपली सच्चाई दाखविण्याची संधी सहा डिसेंबरचा मुहूर्त साधून करता येईल. वेगवेगळ्या गोष्टींसाठी सप्ताह पाळले जातात. बसवाले सौजन्य सप्ताह पाळतात. बँकवाले बचत सप्ताह पाळतात. दलितांना पिढ्यानपिढ्या सवर्ण लोकांनी सर्व सेवांसाठी राबवून घेतलं. घाण साफ करण्याचा धर्म त्यांच्यावर लादला आणि ते घसन साफ करतात म्हणून त्यांनाच घाण मानून अस्पृश्य ठरविलं गेलं. या सगळ्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणा, परतफेड करण्यासाठी म्हणा अथवा आम्ही बदललो हे दाखविण्यासाठी म्हणा, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यस्मरण दिना आधी तीन दिवस आणि नंतर तीन दिवस असा समरसता सप्ताह अथवा बंधुभाव सप्ताह अथवा स्वशुद्धी सप्ताह पाळला आज चैत्यभूमी परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सामूहिकपणे स्वीकारली तर? साने गुरुजी, सेनापती बापट स्वच्छता फेऱ्या काढत, रस्ते झाडत, गटार साफ करीत. गाडगे महाराज काँग्रेस अधिवेशनात झाडू हातात घेऊन  एक प्रकारे काँग्रेसवाल्यांना 'तुम्ही घाण करा आम्ही सफाई करतो' असं सांगत सेवा धर्माचं शिक्षण देत. जिथं दलितच प्रामुख्यानं येतात, तिथं आम्ही तुमच्या सेवेसाठी सज्ज आहोत असं सांगणारे आणि वागणारे सवर्ण लोकांचे जथ्थे हजर झाले तर?...तर या समाजातील पुष्कळ घाण संपेल. दुरावा संपेल. सहकार्याचे, सहजीवनाचे नवे पर्वही कदाचित सुरू होईल आणि बाबासाहेबांची चैत्यभूमी कोट्यवधी खर्चून जेवढी सुशोभित होणार नाही तेवढी, किंबहुना त्याहून अधिक सुशोभित या समरसतेनं होईल. चैत्यभूमीचा परिसर स्वच्छ राखण्यासाठी काही करण्याचे राज्य शासनाला, महापालिकेला सुचायला हवे होते. चैत्यभूमीच्या परिसरात मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान जिथं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभं राहणार आहे ते, ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, छत्रपती शिवरायांचा पुतळा, सेनापती बापट, मीनाताई ठाकरे यांचे पुतळे, साने गुरुजी विद्यालय शिवाय शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शक्तीस्थळ येते. शिवछत्रपती, सावरकर, साने गुरुजी, शिवसेनाप्रमुख आणि आंबेडकर यांना मानणाऱ्यांनी मनावर घेतलं तर नुसत्या चैत्यभूमीचाच नव्हे, तर साऱ्या महाराष्ट्रातील घाण साफ होऊ शकते. त्यासाठी स्वच्छता अभियान करायची गरज भासणार नाही.

*आयुष्यभर घाणीविरुद्ध संघर्ष*
आंबेडकरांनी आयुष्यभर घाणीविरुद्ध संघर्ष केला. हिंदू धर्मातली, हिंदू मनातली, हिंदू समाजातली, घाण दूर करण्यासाठी त्यांनी केवळ ब्राह्मणांवरच शस्त्र धरले नाही. आपल्या समाजातल्या असलेल्या गैरगोष्टी-गैरसमज यावरही त्यांनी प्रखरपणाने हल्ले चढविले.'तव्याचा जाय बुरसा मग तो सहजच आरसा' असं बाबासाहेब आपल्या भाषणातुन, लिखाणातून नेहमी म्हणायचे. तव्यावरचा बुरसा काढला की, तवा आरश्याप्रमाणे लखलखु लागतो. हे त्यांनी बघितलं होतं. घासूनपुसून भांडीकुंडी चकचकीत करणाऱ्या दलित स्त्रियांना बाबासाहेबांचं हे म्हणणं चटकन समजायचं, पटायचं. तव्याचा बुरसा जसा घासून पुसून घालवतो तसाच माणसाचा बुरसा घालवायचा. चांगलं राहायचं, चांगलं वागायचं, चांगले कपडे घालायचे, आपण चांगले आहोत हे अंतरबाह्य ठसवायचं. बाबासाहेबांनी केलेला हा उपदेश आत्मसात करून हजारोंनी आपल्याला बदलून टाकलंय. प्रत्येकाची काया, वाचा, मने अशी त्रिशुद्धी झाली पाहिजे. अशारीतीने पवित्र झालेल्या माणसाला अपवित्र कोण म्हणणार? असा सवाल बाबासाहेब करायचे. आणि त्यानुसार वागण्याचं व्रत दलित बांधव घ्यायचे. साध्या साध्या गोष्टीतून माणसाचा स्वाभिमान जागवला आणि बाबासाहेब गेल्यावर साध्या साध्या गोष्टींसाठी त्यांचे नाव घेत दलितांचे नेते बनलेल्यांनी स्वाभिमान विकून टाकला. परस्परांतले मतभेद, स्वार्थ, स्पर्धा, आणि खोटी प्रतिष्ठा यापायी दलित नेते आपसात झगडत राहिले आणि समाजाचा एकसंघपणाच त्यांनी संपवून टाकला. मग दुसऱ्याच्या आश्रयाला जाण्याची, गुलाम होण्याची वेळ नेत्यांवर आली. बाबासाहेबांनी जे कमविले होते ते गमावून दलित समाज कफल्लक झाला. एकमेकांवर कसा डाव टाकता येईल, याचा विचार करीत एकमेकांची उणीदुणी काढत एकमेकांना शिव्या देत आणि मिळेल ते हडप करीत हे नेते दिवस काढत आहेत. समाजाचे कुठलेही दुःख, कुठलेली प्रश्न सोडविण्याचं सोडाच; समजावून घेण्याचंही त्यातल्या अनेकांची कुवत नाही. राजकारण हा मोठे होण्याचा, पैसा मिळवण्याचा सोपा उद्योग आहे. असा त्यातल्या अनेकांचा समज आहे. आणि पैसा मिळविण्याचेच राजकारण स्वतःला, समाजाला विकण्याचा सोपा मार्ग धरून हे नेते करीत आहेत.

*बाबासाहेबांच्या विचारांचे दुश्मन*
दलितांचे दलितपण संपले तर आपले पुढारीपण संपेल, हे धूर्त दलितनेते ओळखून आहेत. तेव्हा दलित बांधवांनी समाजातल्या अन्य लोकांशी सदैव सात जन्माचा दावा मांडल्यासारखेच वागावं असाच उपदेश हे आत्मकेंद्रित नेते करणार. संघर्षाशिवाय मार्ग नाही असं सांगून, सदैव कसला ना कसला संघर्ष धुमसत ठेवणार आणि दलित जनतेला चटके बसले तरी आपलं साधण्यासाठी धडपडत राहणार. बाबासाहेबांनी आग्रहानं सांगितलेल्या अनेक गोष्टी राजरोस पायदळी तुडवून, बाबासाहेबांचा वारसा जपत असल्याची मिजास मिळवण्याचा उद्योग करणारे दलित नेते हेच दलित जनतेच्या शिरावरील बोजे आहेत. हातापायातल्या बेड्या आहेत. दलितांचे नेतृत्व करीत असल्याचा त्यांचा दावा ही स्वतःला गि-हाईक शोधण्याची त्यांची धडपड आहे. समाजालाच नव्हे, तर स्वतःलाही विकायला सदैव सिद्ध असणारे हे नेते बाबासाहेबांच्या विचारांचे आणि बाबासाहेबांच्या जनतेनेही दुश्मन आहेत. राजकारण दूर ठेवून या समाजासाठी खूप काही करता येतं हे या तथाकथित नेत्यांना मान्य नाही. दलित तरुणांच्याही लक्षात ही गोष्ट आली आहे. राजकारणात काही करायचं असेल तर या नेत्यांच्या कळपात शिरावं लागणार. हे कळू लागल्यानं सगळ्या गटापासून दूर राहून आवश्यक समाजकार्यात गुंतवून घेणाऱ्या दलित तरुणांची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे. राजकारणात मिळणारे फायदे समाजकारणात नाहीत. प्रसिद्धी-पैसा याचा लाभ झटपट होण्याची शक्यता नाही. हे दिसत असून देखील निष्ठेनं समाजसेवा करण्याचे त्यासाठी संघटनांचा मंत्र जपण्याचे आणि राजकारणापेक्षा इतर काही करण्यासारखं खूप काही आहे हे दाखवून देण्याचं काम हे तरुण करीत आहेत. अशा तरुणांना त्यांच्या संस्थांना बळ मिळायला हवं. राजकारण न करता आंबेडकरांना अभिप्रेत असलेला नवा माणूस कसा निर्माण करता येईल याची दिशा दाखविण्याच्या दृष्टीनं असे तरुण प्रयत्न करताहेत. म्हणून त्यांच्या पाठीवर थाप पडायला हवी.

*अशा तरुणांची समाजाला गरज*
शासनाशी सर्वंकष झुंजण्यासाठी दलित एकत्र येऊ शकत नाहीत हे आता स्पष्ट झालंय. दलितांच्या वेगवेगळ्या गटांचे ऐक्य ही नुसती फसवणूक असते. हे ही स्पष्ट झालंय. मग 'आता इतर समाजाच्या सर्व लोकांबरोबर काम करायला तुम्ही शिकलं पाहिजे' हे बाबासाहेबांचं सांगणं हाच आदेश मानून जनतेच्या मनात असलेले ग्रह-पूर्वग्रह विवेकाने, समंजसपणाने बोलून दूर करण्यासाठी एखाद्या ह्रदयपरिवर्तन पथकाची कल्पना सुशिक्षित दलित तरुणांनी प्रत्यक्षात का आणू नये? बुद्धांचे नांव घेऊन चीन, जपान, कोरिया, जावा, सुमात्रा, श्रीलंका अशा पूर्वेकडील अनेक देशात बौद्ध तरुण गेले, त्यांनी प्रेमाने तिथल्या माणसांना जिंकले, त्यांना बुद्धांचा धर्म दिला. मग बुद्धांचा धर्म हा आपला धर्म मानणाऱ्या बाबांच्या अनुयायांनी मने जिंकण्याचे आव्हान का स्वीकारू नये? गावोगावी जाऊ, होईल तिथं विरोध शांतपणे साहू. आमच्या हृदयीचे त्यांच्या हृदयी घालण्याचा प्रयत्न करू. प्रेमानं शांतीनं सौहार्दाचे वातावरण बनवू, अशा निर्धाराने तरुणांची पथके एका पाठोपाठ महाराष्ट्रात फिरली, आक्रस्ताळी पुढाऱ्यांनी लावलेल्या आगीवर आपल्या अमृतवाणीने प्रेमाचे बंधुभावाचे सिंचन करू लागली तर..... महाराष्ट्रातले समाजऐक्य सहज घडू शकेल. हे करण्याएवढ्या कुवतीचे तरुण दलितात नक्कीच आहेत. 'एखाद्या समाजाची उन्नती ही त्या समाजातील बुद्धिमान, होतकरू आणि उत्साही तरुणांच्या हाती असते' असे बाबासाहेब म्हणत. दलित समाजाच्या तरुणांना हे ठाऊक आहे ना! महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने तरुणांनी हे स्मृती जागरण आरंभलाय असं चित्र समाजापुढं यायला हवं!

*नवं नेतृत्व उदयाला येईल*
दलितांचे नेते म्हणता येईन एवढा लौकिक गेल्या वीस वर्षांत रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, रा.सु गवई, नामदेव ढसाळ यांनाच मिळाला. बाकीचे सारे नेते हे जिल्हा व शहरापुरतेच! आता या चौघांची सद्दी संपत आलीय, प्रभाव कमी होतोय. त्यांच्या जनाधाराला गळती लागली आहे. त्यामुळे आठवलेंपासून कुंभारे यांच्यापर्यंत आणि आंबेडकरांपासून कवाडेंपर्यंत सारे नेते आज भुईसपाट झाले आहेत. ते ज्या विचारांचा वारसा घेऊन आले आहेत, तिथं सत्ता हा विषय दुय्यम आहे. संघटना आणि उत्थानाची चळवळ महत्वाची! मात्र दलितांचे नेते सत्तेच्या व्यवहाराला प्राधान्य देतात. त्यामुळे आठवलेंपासून कुंभारेपर्यंत आणि आंबेडकरांपासून गंगाधर गाडे यांच्यापर्यंत अनेकजण पराभूत झाले आहेत. पण त्यांचं आंबेडकरी समाजाला, जातीला तेवढं दुःख झालेलं नाही. आज दलित नेते एकत्र येतात, तेव्हा त्याकडे अपेक्षेने नाही; तर करुणेच्या भावनेनं पाहिलं जातं. दलितांची मतं आता शहरात वाढली आहेत. त्या शहरी अस्मितेत दलित अस्मिता वाहून जाताना दिसतेय. सर्व महानगरे, शहरी मतदारसंघ इथे दलितांची संख्या पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहेत. दलितांचे प्रश्न तर कितीतरी जास्त संख्यने वाढले आहेत. मात्र ते प्रश्न कवेत घेणारं दलित नेतृत्व नाही. बसपाकडून अपेक्षा होती. मात्र त्यांचा आता फुगा फुटला आहे. त्यात कितीही हवा भरली, तरी ती पंक्चर निघणारा नाही. दलितांमध्ये नव्या धाटणीचं नेतृत्व तयार होण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्याला वेग नाही. विद्यमान नेत्यांचं कर्तृत्व तर दिसलंच आहे. अपकर्तुत्व जेवढं जास्त दिसेल, तेवढा नव्या दलित नेतृत्वाचा उदय नक्की होईल!

- हरीश केंची ९४२२३१०६०९


प्रभंजन साठीचा लेख.

मुलाखत-स्वरूप

 मुलाखत 
व्यक्तिने दुसऱ्या व्यक्तीचे मनोगत जाणण्यासाठी विचारलेले प्रश्न म्हणजेही मुलाखत होय. तसेच अधिकारी वर्गाने पदावर नेमण्याआधी योग्यता तपासण्यासाठी घेतलेली प्रश्नोत्तरे म्हणजेही मुलाखत होय.
प्रशिक्षित मुलाखतकार नेमले प्रश्न विचारुन व निरिक्षणे करून व्यक्तिमत्त्वाचे अनेकानेक पैलू लक्षात घेत असतात. चारचौघांमध्ये मिसळून ज्याला संवाद साधता येतो तो व्यक्ती सहजपणे मुलाखत देऊ शकतो.

मुलाखतीचे प्रकारसंपादन करा

नोकरी विषयकसंपादन करा

नोकरी विषयक मुलाखती म
  • हुशारी
  • चाणाक्षपणा
  • लवचिकता
  • इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती
  • भावनिक सक्षमता
या बाबी तपासल्या जातात. नेमलेल्याला कामाचे अधिकारपद देण्यापूर्वी उमेदवार ती भूमिका बजावण्यास लायक आहे की नाही हे जाणून घेतले जाते. बौद्धीक, मानसिक आणि कौशल्यवृद्धीची आवड मुलाखतीत दिसून आल्यास निवडीची शक्यता असते.

स्वरूपसंपादन करा

मुलाखत देतांना आपला नैसर्गिक स्वभाव जसा आहे तसेच वर्तन केलेले योग्य असते. या मुळे मुलाखतही सहजतेने होते. म्हणूनच आपला नैसर्गिक स्वभाव न दाबता जे उमेदवार मुलाखतीस सामोरे जातात त्यांना निकालाची कधीच काळजी नसते. मुलाखतीत बहुदा स्वतःबद्दल बोलावे लागते. त्यासाठी उत्तम आत्मविश्वास असावा लागतो. आपण कोणकोणत्या विषयात आणि कौशल्यांमध्ये पारंगत आहोत हे व्यवस्थित जाणणे आवश्यक असते. त्यासाठी योग्य ते चिंतन आणि मनन करणे आवश्यक आहे. उमेदवाराला ज्या कामासाठी अर्ज केला आहे त्या क्षेत्रात आपण कसे योग्य आहोत हे पटवून देता आले पाहिजे. मुलाखतीत संभ्रमीत करणारे प्रश्न येऊ शकतात. कोणत्याही प्रश्नांचे उत्तरे किती शांतपणे आणि विचारपुर्वक देतो त्यावर उमेदवाराची हुशारी दिसून येते. उमेदवाराचा स्वभाव आणि एकंदरीत वागण्याची पद्धत यांचे निरिक्षण मुलाखत घेणारा करत असतो. उमेदवाराची कठीण परिक्षा घेण्यापेक्षा रिक्त जागेकरिता सर्वात चांगला उमेदवार निवडण्याची जबाबदारी मुलाखतकर्त्यावर असते. म्हणून त्या जागेकरिता 'मीच कसा योग्य आणि उपयुक्त आहे' हे कळत नकळतपणे मुलाखत देणाऱ्याने दखावून द्यायचे असते.संदर्भ हवा ]

मुलाखतीमध्ये यश मिळवण्यासाठी तंत्रसंपादन करा

  • स्वतःबद्दल सांगण्याची तयारी आरशासमोर करा. हे वारंवार करून त्यात नैसर्गिकता आणा
  • हसरा चेहरा महत्त्वाचा असतो. चेहऱ्यावर प्रसन्नता असू द्या. हसऱ्या चेहऱ्याची सवय करा.
  • योग्य व्यावसायीक पेहराव तुम्हाला उठाव देणारा असावा. योग्य कोट व टाय असल्यास चांगले परिणाम साधले जातात. काळी विजार व पांढरा शर्ट असल्यास उत्तम अथवा निळसर, करडे कपडे चालतात.
  • ही मुलाखत माझ्यासाठीच आहे आणि मी त्यात यशस्वी होणारच आहे असाच विचार करा.
  • मुलाखतीच्या ठिकाणी जाणवणाऱ्या गंभीर वातावरणामुळे भांबावून जाऊ नका. आपण निवांत राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी संथ श्वसन करा ताण कमी होईल.
  • तुमच्या अवगत कौशल्यांबाबत सांगताना उत्साहाने त्यामध्ये केलेले कार्य सांगा. उदाहरणे द्या.
  • मुलाखतीत असत्य कधीही बोलू नका.
  • मुलाखतीत घाई गडबड न करता शांत चित्ताने प्रश्नांची उत्तरे द्या.
  • प्रश्न न समजल्यास विनयाने परत विचारा, यात काही चुकीचे नाही.
  • मुलाखतकर्त्याच्या अपेक्षांची जास्तीत जास्त पूर्तता करता येईल याची काळजी घ्या.
  • मुलाखती नंतर विनम्रतेने आभार माना
व्यावसायिक मुलाखतीत बसणे, बोलण्याची पद्धत, शिष्टाचार, निटनेटकेपणा आणि प्रथमदर्शनी प्रभाव यांचा विशेष भाग असतो हे लक्षात घ्या. स्पर्धात्मक युगात इतरांपेक्षा सरस ठरण्याकरिता स्वतःचे वेगळेपण आणि विशिष्ट चमक दिसणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतःचा बायोडाटा किंवा करिक्युलम व्हिटे वेळोवेळी वर्तमान करत राहणे गरजेचे असते.

मुलाखतीतले सामान्य प्रश्न्रसंपादन करा

  • तुमच्याबद्द्ल काही सांगा?
(टेल मी समथींग अबाऊट युअरसेल्फ) या विशेष प्रश्नाकरीता बायोडाटा व्यतिरिक्त या नोकरीकरिता उपयुक्त असणारे स्वतबद्दलचं तुम्ही काय सांगू शकता, हे पाहिले जाते. या प्रश्नाची तयारी करण्यासाठी वारंवार याचे उत्तर देण्याची तयारी करा.
  • इथे का काम करायचे आहे? नेमकी कारणे द्या. त्यात अजून चांगला अनुभव आणि संस्थेसोबत स्वतःची प्रगती असेही सांगता येते.
  • पगाराची काय अपेक्षा आहे? - मोकळेपणाने अपेक्षा सांगा. येथे लाजू नका.
  • तुमच्या खुबी आणि तुमच्या कमतरता कोणत्या? - कोणतेही काम वेळेवर आणि परिपूर्ण करणे, कामाकडे लक्ष देणे, नव नवीन गोष्टी शिकणे, कंपनीच्या पद्धतींचा अभ्यास करण्याची हातोटी असणे, साध्या भाषेत महत्त्वाच्या गोष्टी समजावता येणे, फोनवर सहजतेने बोलता येणे अशा गोष्टी तुम्ही सांगू शकता. कमतरता सांगताना त्यातही चलाखीने खुबीच सांगा - जसे की, 'मला कोणतेही काम पूर्ण करायला आवडते त्यामुळे मला पर्फेक्शनिस्ट मानले जाते. अर्थातच मी कामाचा जरा ताण घेतो.'
  • अगोदरची नोकरी का सोडत आहात? - जे कारण आहे ते स्पष्टपणे द्या. वेळ कुणावरही आलेली असते.
संस्थेला किंवा कंपनीकरिता तुमचे योगदान काय असेल हे योग्यपणे सांगितले तर चांगले गुण प्राप्त होतात.
वरील मुद्द्यांचा उपयोग केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग आदी परीक्षांमध्येही होऊ शकतो. अशा मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानापेक्षा त्यांचे समकालीन वास्तव, त्यातील घडामोडी व कळीचे मुद्दे या विषयक दृष्टिकोन व भूमिका तपासली जाते. विद्यार्थ्यांला समकालीन बाबींची जाण व स्वतःची स्पष्ट भूमिकादेखील असावी लागते. विद्यार्थी समन्यायी धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी संतुलित विचार करणारा आहे किंवा नाही ते पाहिले जाते. अर्थात विद्यार्थ्यांची देहबोली, भाषा, संवादकौशल्य, विचारातील स्पष्टता, आत्मविश्वास या बाबी मुलाखतीत महत्त्वाच्या ठरतात. बोलण्याचा भरपूर सराव, गटचर्चा, अधिकाधिक मॉक इंटरव्ह्यूद्वारे मुलाखतीची तयारी करता येते.
===दूरदर्शन वरील मुलाखत===सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा
Mulkhat.com ला भेेेट द्या.


जॉब साठी मुलाखत कशी द्यावी ?

जॉब साठी मुलाखत कशी द्यावी ?



मुलाखत कक्षात प्रवेश केल्यानंतरच्या सुरुवातीच्या दोन-चार मिनिटांतील तुमच्या हालचालींवरून, हावभावातून, तुमच्या देहबोलीतून मुलाखत मंडळाला तुमच्या मन:स्थितीविषयीचा पूर्ण अंदाज आलेला असतो.
मुलाखत कक्षात प्रवेश केल्यानंतरच्या सुरुवातीच्या दोन-चार मिनिटांतील तुमच्या हालचालींवरून, हावभावातून, तुमच्या देहबोलीतून मुलाखत मंडळाला तुमच्या मन:स्थितीविषयीचा पूर्ण अंदाज आलेला असतो. तुम्ही तणावात आहात, तुमच्यात आत्मविश्वास आहे, तुम्ही शांत आहात की घाबरलेल्या- गोंधळलेल्या मन:स्थितीत आहात याचा संदेश तुमच्या देहबोलीद्वारे समोरच्या मंडळींपर्यंत पोहोचत असतो.
केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांतील मुलाखतींना सामोरे गेलेल्या आमच्या अनेक विद्यार्थ्यांचा अनुभव असा आहे की, उमेदवार घाबरलेला किंवा तणावात दिसला की मुलाखत मंडळ उमेदवाराला सहकार्य करते. ‘तुम्ही शांतपणे आणि आरामात बसा. घाबरू नका. चहा, कॉफी, किंवा थंड पाणी घ्याल का?’ असे उमेदवाराला विचारले जाते. सुरुवातीपासूनच त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार न करता, उमेदवाराला रिलॅक्स करण्यासाठी नाव, गाव, शैक्षणिक पात्रता अशा वैयक्तिक माहितीवर आधारित साध्या, सोप्या प्रश्नांपासून मुलाखतीला सुरुवात होते. मुलाखत मंडळाकडून चहा किंवा पाण्याची ऑफर झालीच तर सकारात्मकपणे स्वीकारावी. अशा वेळी पाणी हळूहळू घोट- घोट प्यावे. घाईघाईत घटाघट संपवण्याचा प्रयत्न करू नये. मात्र मंडळासमोर बसून चहा/कॉफी घेताना अवघडलेपणा येईल असे वाटत असेल तर नम्रपणे ऑफर नाकारली तरीही हरकत नाही. कधी कधी मुलाखतीची १०-१५ मिनिटे झाल्यानंतर उमेदवाराला तहान लागू शकते. अशा वेळी सरळ समोरचा ग्लास उचलून पाणी प्यायला सुरुवात करू नये. मुलाखत मंडळाची ‘सर, मी पाणी पिऊ शकतो का / शकते का?’ अशा शब्दांत परवानगी घ्यावी. परवानगी मिळाल्यावर त्यांना धन्यवाद देऊन पाणी घ्यावे.
मुलाखत मंडळाकडून विचारले जाणारे प्रश्न लक्षपूर्वक ऐकावेत. प्रश्न विचारणाऱ्या सदस्याकडे पाहून उत्तर द्यावे. एखादा प्रश्न विचारला जात असताना पूर्णपणे ऐकून न घेता, मध्येच बोलू नये. पूर्ण प्रश्न ऐकल्यानंतरच उत्तराला सुरुवात करावी. सहमतीदर्शक प्रश्न विचारला गेल्यास, ‘होय सर! मी या मताशी सहमत आहे’ किंवा असहमती दर्शविताना नम्रपणे आपली असहमती नोंदवावी. लक्षात ठेवा, मुलाखतीतील प्रश्नांची उत्तरे चूक किंवा बरोबर अशी नसतात. तेव्हा प्रामाणिकपणे व पारदर्शीपणे उत्तर द्यावे. तुमची उत्तरे व्यवहार्य व तुमची स्वत:ची असावीत. त्यातून फाजील आत्मविश्वास दिसता कामा नये. उत्तरात धीटपणा असावा, पण अहंभाव किंवा अविचार असू नये.
विचारलेला प्रश्न नीट कळला नसेल तर नम्रपणे तसे सांगून अधिक तपशील विचारावा. असे केल्याने तुमचे मार्क्‍स कमी होत नाहीत, उलट तुमचा प्रामाणिकपणा दिसून येतो. कधी कधी विचारलेल्या प्रश्नाचे नेमके उत्तर उमेदवाराला ठाऊक नसते. अशा वेळी प्रश्नार्थक चेहऱ्याने हात हातावर चोळणे, वर पाहणे, डोके खाजवणे अशा कोणत्याही नकारात्मक भावमुद्रेचे प्रदर्शन करू नये. माहीत नसलेल्या उत्तराविषयी नम्रतापूर्वक मला याबाबत फारशी माहिती नाही, असे सांगावे.
आपण अनभिज्ञ असलेल्या विषयावर तर्क बांधून, ओढूनताणून उत्तर देण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. त्याऐवजी ‘मला याविषयी माहीत नाही,’ हे प्रांजळपणे कबूल केलेले उत्तम. कोणताही उमेदवार सर्वज्ञ नसतो, हे मुलाखत मंडळाला ठाऊक असते. त्यामुळे पारदर्शी असण्यातून उमेदवाराचा स्पष्टपणा व लवचीकता दिसून येते.
मुलाखत जशी ज्ञानाची परीक्षा आहे तशी तुमच्या व्यक्तिमत्त्वाचीही परीक्षा आहे. चांगल्या उत्तराची स्तुती किंवा उत्तर न देता येणारी स्थिती तुम्ही कशी हाताळता, कशा पद्धतीने सामोरे जाता, ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची परीक्षा आहे. मुलाखत मंडळाकडून तुमच्या दृष्टीने चांगल्या असलेल्या उत्तराबाबत प्रतिक्रियेची अपेक्षा करू नका. तुमच्या चांगल्या-वाईट कुठल्याही उत्तराबाबतची तुमची मन:स्थिती तुमच्या देहबोलीतून सामोरी येऊ देऊ नका.
मुलाखतीदरम्यान आपल्या कामगिरीबाबत विचार करायला सुरुवात करू नये. मुलाखत सुरू असतानाच, तुमच्या दृष्टीने चांगली कामगिरी झाली असेल तर चांगले गुण मिळणार किंवा तुमच्या दृष्टीने वाईट कामगिरी झाली असेल तर कमी गुण मिळणार अशा विचारांमध्ये गुरफटून गेल्यास अशा विचारांचा आपल्याही नकळत आपल्या देहबोलीवर परिणाम होत असतो.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुलाखत सर्वसाधारणपणे २५ ते ३५ मिनिटे तर राज्य लोकसेवा आयोगाची मुलाखत २० ते ३० मिनिटे चालते. उमेदवाराच्या कामगिरीनुसार हा वेळ वाढतो किंवा कमीसुद्धा होऊ शकतो. अशा वेळी संयम ठेवावा. मनगटावरील घडय़ाळात वेळ पाहण्यासारखा आततायीपणा तर अजिबात करू नये.
मुलाखत पूर्ण झाल्यानंतर उमेदवार कक्षाबाहेर येण्याची वेळ येते. पण अशा वेळी मुलाखत मंडळाने उमेदवाराला ‘मुलाखत संपली, तुम्ही आता बाहेर जाऊ शकता,’ असे सांगितल्याशिवाय उमेदवाराने आपल्या आसनावरून उठू नये किंवा समोर ठेवलेली कागदपत्रांची फाइल आवरायला घेऊ नये. मुलाखत मंडळाकडून सांगितल्यानंतर शांतपणे, कागदपत्रांचा जास्त आवाज न होऊ देता फाइल घ्यावी व सहजतेने आसन सोडावे. खुर्चीवरून उठल्यानंतर खुर्ची पूर्ववत ठेवावी. व्यवस्थित उभे राहून मुलाखत मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांना प्रसन्नतापूर्वक अभिवादन करावे. धन्यवाद / थँक यू म्हणायला विसरू नये. मुलाखत कक्षातून बाहेर येताना चालण्याचा, दरवाजा उघडण्याचा आवाज येणार नाही याची काळजी घ्यावी. बाहेर पडताना मागे वळून सदस्यांकडे पाहणे टाळावे. असे बारीकसारीक वर्तणुकीचे संकेत पाळले की मुलाखतीचा अनुभव चांगलाच ठरतो.


रेडियो वरील मुलाखतसंपादन करा

राजकिय मुलाखतसंपादन करा

गाजलेल्या मुलाखतीसंपादन करा

बेरोजगार युवक आणि कंपनी मालक यांच्यातील मुलाखत

गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

गोडवा मराठी भाषेचा

माझा मराठीची बोलू कौतुके।

गोडवा मराठी भाषेचा

मायमराठी आणि इंग्रजी

मराठी मातृभाषा असणाऱ्या मराठी भाषिक लोकांना एकूणच मराठी बद्दल प्रेम व अभिमान कमी आहे हे वास्तव आहे. विशेषतः इंग्रजीला इतके मानाचे स्थान खुद्द इंग्लंड मध्ये नसेल जितके महाराष्ट्रात आहे. मागची पिढी काही अंशी मराठी शाळांमधून शिकली तरी हल्ली आपला पाल्य मराठी शाळेत पाठवणे अप्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले आहे.  सध्या मराठी शाळांना अत्यंत वाईट दिवस आहेत. मराठी शाळांना विध्यार्थी मिळणे दिवसेंदिवस दुरापास्त होत चालले आहे. मराठी शाळांतील अनेक तुकड्या, वर्ग बंद पडून शिक्षक अतिरिक्त ठरत सरप्लस करून घरी बसवले जात आहेत. अनेक शाळा विद्यार्थाअभावी बंद पडत आहेत. मराठी भाषा हा मुद्दा बनवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्यांची मुले आणि ते स्वत: देखील इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच शिकलेले असतात. मराठी शाळांमध्ये दुय्यम प्रतीचे आणि निकृष्ट दर्जाचे शिक्षण मिळते हा सार्वत्रिक समज रूढ झाला आहे.

शाळांमध्ये जेव्हा जागा भरतीसाठी मुलाखती असतात तेव्हा मराठी विषयाच्या शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टीकोन देखील अत्यंत तुच्छतेचा असतो. संस्थापक शिक्षकांना शाळेत नोकरी देऊन त्यांच्यावर जे थोर उपकार करतात त्या उपकाराची परतफेड म्हणून शिक्षकांना डोनेशन द्यावे लागते. जर तुमचा विषय इंग्रजी असेल तर तुमची डोनेशनची रक्कम चालू ' बाजारभावाप्रमाणे ' १२ लाख ते १५ लाख असू शकते. जर तुमचा विषय गणित असेल तर तुमचे डोनेशन १० लाख ते १२ लाख असू शकते. मात्र जर तुमचा विषय मराठी असेल तर तुमच्या डोनेशनची बोली १५ लाखांच्या पुढे सुरु होते. ती २० लाख किंवा अधिकही असू शकते.

तुम्ही जर इंग्रजीत संभाषण करू शकत असाल तर तुम्ही उच्चविद्याविभूषित असणार यात कोणालाही संशय वाटत नाही. इंग्रजी बोलू शकणाऱ्या लोकांमध्ये इंग्रजी न जमणाऱ्या लोकांबद्दल एक कुत्सित भावना आढळते. भाषा आणि शिक्षण याविषयी अनेक गैरसमज आढळतात ते या सर्व सामाजिक वास्तवाच्या मुळाशी आहेत.

पहिला आणि सर्वात मोठा गैरसमज आहे की इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. वस्तुत: जगातील अनेकानेक देश असे आहेत जिथे औषधाला देखील इंग्रजी भाषा आढळत नाही. त्यांचे सर्व शैक्षणिक व्यवहार आणि सामाजिक सोपस्कार सुखनैव सुरु असतात. यामध्ये अनेक विकसनशील आणि विकसित देश समाविष्ट आहेत. सोबत एक नकाशा जोडत आहे त्यावरून जगाच्या किती मोठ्या भागात इंग्रजी नाममात्र आहे व किती भागात तिचे अस्तित्वदेखील नाही हे स्पष्ट होईल. अगदी इंग्लंडच्या शेजारील फ्रांस, इटली इ. युरोपीय  राष्ट्रातसुध्दा  तुम्हाला इंग्रजीत पत्ता विचारला तरी कोणी सांगणे मुश्कील असते.  इंग्रजी ही जागतिक भाषा नसून ती इंग्लंड अमेरिका आणि इंग्लंड अमेरिका धार्जिणी असणाऱ्या भांडवलशाही पुरस्कर्त्या मानसिक गुलाम देशांची भाषा आहे.

दुसरा मोठा गैरसमज म्हणजे अनेक वैज्ञानिक क्लिष्ट संकल्पना मराठीतून शिकवणे किंवा समजावणे कठीण आहे. अनेक वैज्ञानिक पारिभाषिक संकल्पनांना सुयोग्य मराठी पर्यायी शब्द नाहीत. त्यामुळे मराठीतून संपूर्ण शिक्षण शक्य नाही. हे मत असणारे मायमराठीचे पुत्रच मराठीचा सर्वाधिक अपमान करत असतात. चीन आणि जपान या दोन पौर्वात्य देशांची विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील प्रगती थक्क करणारी आहे. आणि या दोन्ही देशात अथ ते इति संपूर्ण शिक्षण मातृभाषेतून दिले जाते. मातृभाषेतून शिक्षण दिल्याने अनेक पायाभूत संकल्पना पक्क्या होण्यास प्रचंड मदत होते हे सर्व भाषातज्ञानी ठासून सांगितलेले वास्तव असताना आपण जाणून बुजून इंग्रजी प्रेमापोटी मातृभाषेला पायदळी तुडवत आहोत. सर्व वैज्ञानिक संकल्पनांना पर्यायी ताकदवान शब्द शोधणे जर जपानी भाषेत शक्य होते, चीनी भाषेत शक्य होते तर ते मराठीत का अशक्य असावे?

“माझा मऱ्हाटाची बोलू कवतुके, परी अमृताही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन " अस म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांचा वारसा मराठी भाषा हरवून बसली आहे का ?

मराठी ही आपली राजभाषा करून सर्व राजकीय व्यवहार मराठी भाषेत चालवण्याचा आदेश देणाऱ्या, मराठीवरील फारशी अरबी उर्दू भाषेचे आक्रमण रोखण्यासाठी व भाषाशुद्धी करण्यासाठी राजव्यवहारकोष हा ग्रंथ सिद्ध करवून घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात मराठी उपरी झाली आहे, इंग्रजी आणि हिंदीच्या आक्रमणापुढे हतबल झाली आहे हेच खरे.

मराठी भाषादिन आणि मराठी भाषा चिरायू होवो !!
©सुहास भुसे


मराठी भाषेचा प्रवास

आज मराठी भाषा दिन. त्यानिमित्त ...
दरी-खोर्‍यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी...मी मराठी!
कोणत्याही मराठी भाषकाला स्फुरण चढेल या ओळीतून. अशा मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला. मराठी भाषा मूळ आर्यांची भाषा आहे. जवळजवळ 1500 वर्षांचा इतिहास जपणारी मराठी भाषा आहे. उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला. प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात मराठी भाषा विकसित झाली. येथील सह्याद्री, सातपुडासारख्या डोंगररांगा, गड व किल्ले, दर्‍याखोर्‍यांचा परिसर म्हणजेच महाराष्ट्र भूमी. या भूमीपेक्षाही अधिक राकट, कणखर असा मराठी माणूस.
इ. सन 500-700 वर्षांपासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले. हे वाक्य शके 905 मधील असून 'श्री चामुण्डेराये करविले' असे आहे. त्यानंतर मुकुंदराज व ज्ञानेश्र्वर हे सर्वमान्य आद्य मराठी कवी मराठीची वैशिष्ट्ये तिच्या सामर्थ्यासह मांडताना दिसतात. शके 1110 मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधु हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. ज्ञानेश्र्वरांनी 'परि अृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरेचि रसिके मेळविन।' अशा शब्दात मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असे म्हटले आहे. भगवद्‌गीता सर्वसामान्यांना समजावी, यासाठी ज्ञानेश्र्वरी वा भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन मराठीत केले. त्याचप्रमाणे श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेले लीळाचरित्र म्हणजे मराठीतील पहिला मराठी पद्य चरित्रग्रंथ होय. तेव्हापासून पद्यलेखनाची परंपरा सुरू झाली. महानुभावपंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेल्या ग्रंथातील दृष्टांतावरून मराठीची गतिमानता, सहजसौंदर्य, नादमाधुर्य, गोडवा दिसून येतो. संत एकनाथांनी 'भागवत' ग्रंथाची रचना करून मराठीत भर घातली. यातील बोलीभाषेशी जवळीक साधणारा शब्दसंग्रह, छोटी छोटी लयबद्ध वाक्ये यामुळे 13 व्या शतकातील मराठी भाषा आजच्या वाचकालाही तितकीच आपलीशी वाटते.
कालानुक्रमे मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपात अनेक बदल झालेले दिसतात. या बदलाचे एक कारण म्हणजे मराठी मातीत राज्य केलेल निरनिराळ्या सत्ता होय. त्यापैकी 1250 ते 1350 या काळातील यादवी सत्ता, 1600 ते 1700 या काळातील शिवरायांचीसत्ता, 1700 ते 1818 पेशवाई सत्ता आणि 1818 पासून इंग्रजी सत्ता. यामुळे प्रत्येक काळात मराठी भाषेवर याचे परिणाम दिसून येतात. काळाप्रमाणेच स्थलानुसार मराठी भाषा बदलत गेली. त्यातूनच मुख्य मराठी, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वर्‍हाडी मराठी, कोल्हापुरी मराठी असे पोटप्रकार पडत गेले.
शिवछत्रपतींच्या काळात फारशी भाषेचा प्रभाव मराठीवर झालेला दिसून येतो. त्या काळात राजकीय पत्रव्यहार, बखरी लिहिणसाठी मराठीचा वापर केलेला दिसून येतो. या पत्रांचा समावेश 'मराठी रुमाल' किंवा 'पेशव दफ्तर' या सारख्या संग्रहातून करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'आज्ञापत्रात' मराठी भाषेची बदललेली शैली दिसून येते. तसेच यावरून तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थितीचा प्रभाव भाषेवर पडत असतो, हे सिद्ध होते.
पेशवेकाळात मराठी भाषेवर संस्कृतचे वर्चस्व प्रस्थापित झालेले दिसते. या कालखंडात संस्कृत काव्याचे अनुकरण करणारी पंडिती कविता लिहिल्या गेल्या. यातील कथाभाग, अलंकारिकता, अभिजात भाषावैभव या विशेषामुंळे पंडिती कवितेने मराठीला समृद्ध केले आहे. उदा. रघुनाथ पंडित यांनी रामदास वर्णन, गजेंद्र मोक्ष, दमयंती, स्वयंवर अशी अजरामर काव्ये लिहिली. यानंतरच्या काळात लोकजीवनाशी व लोककलांशी जवळीक साधणारी शाहिरी कविता आकाराला आली. भक्तीपासून ते शृंगारापर्यंतचे अनेक अनुभव खास मराठमोळ्या शैलीत साकार करणार्‍या शाहिरांच्या कविता हे मराठी कवितेचे एक भूषण आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे पोवाडा हा प्रकार होय.
यानंतर पेशवाईच्या अस्ताबरोबरच इंग्रजी भाषेच्या सत्तेत मराठी भाषेची संरचना काही प्रमाणात बदलली. इंग्रजांनी महाराष्ट्रात आपली सत्ता स्थापन केली. त्यामुळे इंग्रजी साहितच्या प्रभावामुळे मराठीत निबंध, कादंबरी, लघुकथा, शोकात्मिका असे अनेक नवे साहित्यप्रकार मराठीतून लिहिले जाऊ लागले. 'केशवसुत' हे या आधुनिक कवितेचे प्रवर्तक होते. आधुनिक कवितेमध्ये कवींच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांचा भावनांचा आविष्कार दिसून येतो. कवीचे भोवतालच्या जीवनाशी असलेले संबंधही महत्त्वाचे ठरत असल्याने सामाजिक जाणिवेने मराठी कवितेला नवे वळण देण्याचे कार्य मर्ढेकरांच्या कवितेने 1940-45च्या काळात केले. मानवी जीवनातील असंगतता, मल्यांची पडझड, एकाकीपणा या कवितेतून व्यक्त होताना दिसतो.
मराठी भाषेतील पद्य साहित्या आणि गद्य साहित्य हे भाषेच्या शास्त्रशुद्ध व्याकरणामुळे साकार झाले. आधुनिक काळातील महात्मा फुले यांचा 'शेतकर्‍यांचा आसूड' हा ग्रंथ इंग्रजांच्या काळातील नवीन बदल दाखवतो. यामध्ये इंग्रजी सत्तेमुळे शेतकरंचे झालेले हाल, नवीन शैलीने रेखाटले आहे. तनंतर वि. वा. शिरवाडकर, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी, कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, ना. सि. फडके यांसारख्या साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा मराठी मनामनातून जागृत ठेवली. आज सामाजिकशास्त्रे, तत्त्वज्ञान, चित्रकला, साहित्य, संगीत, नाटक यासारख्या कलांचे समीक्षा-विचार मराठीत मूळ धरू लागले आहेत. तर एकीकडे इंग्रजीच्या वाढत्या वापरामुळे मूळ मराठी भाषा बदलत आहे. दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे, मराठीचे सौंर्दय, खानदानीपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे.
प्रा. डॉ. वंदना भानप

गोडवा मराठी भाषेचा...


 'माझी मराठीची बोलू कवतिके 
परी अमृतातें ही पैजेसी जींके 
ऐसी अक्षरें चि रसिके 
मेळवीन'
   मराठी भाषेचा गौरव करताना संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला अमृताची उपमा देताना या ओवीचा वापर केला आहे . अमृत म्हणजे कधीही न मरणारा मराठी भाषा ही प्रत्येक अ- मृत म्हणजेच जिवंत प्राण्याला सहज समजेल प्रत्येक मानवाला मराठी भाषेची गोडी वाटेल अशी भाषा आहे .
   मराठी भाषेच्या सन्मानार्थ जगभरातील मराठी भाषिकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मराठी भाषा दिन साजरी करण्याची प्रथा सुरू झाली.
   मराठी भाषा आपल्यासाठी  फक्त एक भाषा नसून ममतेचे वाचण्याचे बोल आहेत.  जसे आईचे बोल हे तिच्या बाळासाठी प्रेमळ असतात,  प्रसंगी बाळाच्या भवितव्यासाठी ते शब्द कठोरही बनतात तशीच ही मराठी भाषा आहे . हळुवार , गोड,  लाघवी आणि प्रसंगी वज्राहून कठीण शब्दाने वार करणारी जेथे फक्त शब्द सगळं काम करतात कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही ,अशी ही मराठी भाषा आहे.
  'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी'  या कवितेच्या ओळींचा विचार केला तर खरंच आजच्या घडीला मराठी भाषेची अवस्था चांगली आहे असे आपल्या पैकी किती जण म्हणू शकतील. मराठीचा गोडवा गातांना आपल्या मनातल्या भावना सच्चेपणाने आपल्यापर्यंत पोहोचतात का ?
   मराठी भाषेचं शिक्षण देणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तो कितपत योग्य आहे ? मराठी भाषा टिकवायची असेल तर नक्की कुठला दृष्टिकोन हवा ? या सर्व प्रश्नांवर विचार करणे गरजेचे आहे . 'मोडेन पण वाकणार नाही' हा आपला मराठी बाणा  परंतु वेळेप्रसंगी एखादा वाईट प्रसंग उद्भवला तर कोणातरी समोर वाकल्याशिवाय पर्याय उरत नाही . मग त्यातून न्यूनगंड निर्माण होतो आणि या न्यूनगंडामुळे मराठी बाणा  कमकुवत व्हायला लागतो.
        आपल्याच मातृभाषेपासून आपण दुरावत आहोत.  भाषेच्या शुद्धतेला आपणच अशुद्ध करत आहोत.  एकीकडे इंग्रजी भाषा शिकवण्याचं आव्हान आणि त्याचबरोबर आपल्या भाषेचा प्रचार वापर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागते .मराठी भाषेचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचाही मोठं आव्हान सध्या आपल्यासमोर आहे .
    आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. हे युग  संपर्क क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते . अशा वेळी आपणच आपल्या बोलण्यात जास्तीत जास्त मराठी भाषेचे शब्द वापरले तर भाषेच्या संवर्धनासाठी एक अल्प कृती आपल्याकडून होऊ शकते. खरं तर आज मराठी भाषेच्या संवर्धनाचे वेगवेगळे मार्ग आहेत. संगणकीय तंत्रज्ञानही मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. विविध ज्ञानशाखांमधील उपयुक्त ज्ञान मराठी भाषेत येत आहे. या सगळ्याला उभारी देण्याचे काम आपणा सर्वांचे आहे.  मराठी भाषेचा अभिमान आणि तिची जोपासना करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यायला हवी.  भाषेच्या विविध बोली जोपासणे आणि वाढवनेही तितकेच गरजेचे आहे. मराठीचे संवर्धन करण्याकरिता प्रत्येक बोलीभाषेचा विकास झाला पाहिजे. मराठी विरुद्ध इंग्रजी असा वाद घालत न बसता मोकळ्या मनाने मराठी भाषेचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.  मराठी भाषा बोलणारे लोक फक्त महाराष्ट्रातच राहतात असं नाही,  तर महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यात म्हणजेच कर्नाटक, गोवा, गुजरात,  छत्तीसगड, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांतही राहतात. मराठी भाषेचा गोडवा इतरही राज्यांत पसरलेला आहे तरीही मराठी भाषेचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढाई का करावी लागते ? मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा त्याकरिता लढा द्यावा लागतो, अशी अवस्था तरी का निर्माण व्हावी ?
    मराठी भाषा खरोखरच समर्थ व्हायची  असेल तर तिच्याविषयीचा मराठी भाषिक समाजाचा दृष्टिकोन बदलायला हवा. मराठी भाषिकांची वृत्ती आधुनिक व्हायला हवी. मराठी आपली मातृभाषा आहे,  फक्त याच नजरेने मराठीकडे न बघता तिच्या अंतरंगात आपल्याला डोकावून बघता येईल का?  हा प्रयत्न आपण करायला हवा.
     मराठी साहित्य, वृत्तपत्रे, लोककला, नाटक, चित्रपट या माध्यमातून मराठी भाषा  चांगली लोकप्रिय होत आहे. हिंदी सिनेमांमध्ये, दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये मराठी शब्दांचा वापर केला जात आहे, मराठी चित्रपटाचा दर्जा उंचावत आहे.  चाकोरीबाहेर जाऊन बोलीभाषेतल्या चित्रपटांची निर्मिती होत आहे.  रटाळवाणे कथानक सोडून समाजाच्या विविध अंगांचा अभ्यास करून मराठी सिनेसृष्टी नवी उभारी घेत आहे.  सैराट, दुनियादारी, नटसम्राट, काकस्पर्श, दशक्रिया, गुलाबजाम अशा अनेक चित्रपटांच्या कथानकावरून  मराठी भाषेची प्रचिती सर्वांना आली आहे.
 मराठी भाषेचा  हाच गोडवा कायम राखण्यासाठी निव्वळ  गौरवाच्या भूमिकेतून तिच्याकडे न बघता उद्याच्या जबाबदारीसाठी ती समृद्ध कशी करता येईल याचा स्वच्छ विचार व्हायला हवा.
 संत तुकारामांनी म्हणूनच 'शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन'  असे म्हटले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी भाषेची पावित्र्यता  व प्रतिष्ठा सांभाळली पाहिजे.

माझा मराठीची बोलू कौतुके। 
परि अमृतातेहि पैजासी जिंके। 
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

असे मराठीचे भाषेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केले आहे.तर सुरेश भट यांनी आपल्या काव्यपंक्तीतून मराठीचा गोडवा पुढीलप्रमाणे गायला आहे. 

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ,जात एक ऐकतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी  

कविश्रेष्ठ कुसूमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी  सर्व जगभर मराठी बांधवाकडून मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि गोवा राज्याची राजभाषा असणारी मराठी भाषा जगभरातील सुमारे नऊ कोटी लोकांची मातृभाषा आहे.अगदी प्राचीन कालखंडापासून वेगवेगळ्या ग्रंथात,शिलालेखात मराठीचा उल्लेख आढळतो.सातवाहन साम्राज्याच्या कालखंडात(अंदाजे इ.स.पू.२२०-इ.स.२१८)मराठी भाषेची साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली.सतरावा सातवाहन राजा हाल याचे "गाथासप्तशती" हे प्राकृत भाषेतील महाकाव्य मराठी साहित्याला मोठी देणगी आहे.

देवगिरीच्या यादवांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला.याच कालखंडात मुकुंदराजनी विवेकसिंधु(शके १११०) या काव्य ग्रंथाची,तर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी(शके १२१२) या ग्रंथाची रचना केली.

मराठी भाषा वाढविण्याचे खरे श्रेय छत्रपती शिवरायांना आहे.त्यांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोश तयार केला.वारकरी संप्रदाय,महानुभाव संप्रदाय आदि अनेक संप्रदायांनी मराठी साहित्यात आपल्या भक्तीपर काव्याची मोलाची भर घातली आहे.

विसाव्या,एकविसाव्या शतकातील अनेक थोर लेखक,कवींनी आपल्या शब्दसामर्थ्यामधून मराठी भाषा समृध्द केली आहे.महाराष्ट्र शासनाने राज्य मराठी विकास संस्थेमार्फत मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न चालू केले आहेत त्याबद्दल शासनाचे आभार.पण सर्वसामान्य मराठी जनांनी आपल्या रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला तर या भाषेच्या प्रसारात मदत होईल.इंग्रजीऐवजी मराठी बोलल्याने ज्यांना कमीपणा वाटतो ते मुर्खांच्या नंदनवनात वावरत असतात.आपली मातृभाषाच सर्व भाषेमध्ये श्रेष्ठ असते.आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत पाठविणे आजकालच्या पालकांना कमीपणाचे वाटते.आपणच आपल्या भाषेबद्दल असा दुजाभाव ठेवला तर इतरांनी मराठीचे कौतुक गावे असे आपण कोणत्या तोंडानी म्हणावे.?





बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुपासी- संत जनाबाई

जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या. संत जनाबाई जन्म अंदाजे इ.स. १२५८ गंगाखेड मृत्यू अंदाजे इ.स. १३५० राष्ट्रीयत्व...