बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

समयासी सादर व्हावे - सावता माळी

https://youtu.be/BxeaHixPcWk 




अभंग अर्थ

ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान' यासाठी आधी संदर्भ पाहुयात.

तुकाराम महाराज म्हणतात मनुष्याचे 'जन्माला येणे' किंवा 'यावे लागणे' यासाठी त्याचे पूर्वकर्मच कारण असून म्हणजे पूर्वजन्मातील पातकाचेच हे फळ असून ते भोगण्यासाठीच त्याला ह्या संसारात जन्म घ्यावा लागतो आणि म्हणून जन्माला आल्यावर वाट्याला आलेले भोग भोगतेवेळी त्याने ते समाधान चित्ताने भोगावे, कारण मनुष्याने त्यातून कितीही सुटण्याचा प्रयत्न केला तरीही मनुष्याची प्रारब्ध भोगून झाल्याशिवाय त्यातून सुटका होत नाही आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात की जेव्हा जेव्हा आपल्या वाट्याला भोग येतात तेव्हा तेव्हा त्याने ते आनंदाने भोगावे आणि त्या त्या परिस्थितीत देवाने आपल्याला जसे ठेवले आहे त्यातच समाधान मानावे किंबहुना कोणालाही त्याचा दोष न देता ते शांतपणे आणि समाधानाने भोगावेत...

जन्मा येणे घडे पातकाचे मूळ । संचिताचे फळ आपुलिया ।।

मग वायावीण दुःख वाहू नये । रुसोनीयां काय देवावरी ।।

ठाऊकाची आहे संसार दुःखाचा । चित्ती सीण याचा वाहू नये ।।

तुका म्हणे त्याचे नाव आठवावे । तेणे विसरावे जन्मदुःख ।।


बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुपासी- संत जनाबाई

जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या. संत जनाबाई जन्म अंदाजे इ.स. १२५८ गंगाखेड मृत्यू अंदाजे इ.स. १३५० राष्ट्रीयत्व...