मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतीकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. 19 व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींव्दारा इंग्रज सरकार विरूध्द जनआंदोलने केली त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढयात हया आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसामुंडा यांनाच जाते.
आदिवासी जननायक बिरसामुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले गेले आहे. ते एकटेच क्रांतीकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे.
Birsa Munda

आदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा – Birsa Munda History In Marathi

बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्हयातील उलीहातू या गावी झाला. त्यांच्या पालकांचे ते प्रथम अपत्य होते त्यामुळे मुंडा जमातीच्या परंपरेनुसार त्यांचे नामकरण झाले. त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात व्यतीत झाले. त्यांचे वडील जनावरे चारण्याचे काम करायचे ते ही वडीलांसोबत रानात जावून धर्नुविद्या व नेमबाजीचा सराव करायचे.
बालपणीच त्यांचा नेम फार चांगला होता. त्यांचा लगाव ख्रिश्चन मिशनरीशींही होता. त्यांची प्रतिभा पाहुन एका पारधी नेत्यांनी शाळेत टाकण्याचा सल्ला दिला.
परंतू त्यासाठी ख्रिश्चन धर्म स्विकारावा लागणार होता त्यांच्या वडीलांनी त्यांचे धर्मांतरण करून त्याचे नाव डेविड केले त्याचा दाखला जर्मन मिशन स्कुल येथे झाला परंतू तेथे धार्मीक सक्तीमुळे त्यांनी शाळा सोडली व ते प्रसिध्द वैष्णव भक्त आनंदानंद पांडे यांच्या संपर्कात आले.
वाचन व लेखन येत असल्याने त्यांनी महाभारत रामायण व गिता असे अनेक हिन्दू धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. त्यांच्या सोबत राहून इंग्रजांच्या काळया धोरणाचा त्यांना फार तिरस्कार यायचा.
बिरसा मुंडा 1900 मध्ये इंग्रजांविरूध्द विद्रोह करण्याची घोषणा केली व म्हंटले ‘‘ आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वांविरूध्द विद्रोहाची घोषणा करतो. आम्ही कधीच ब्रिटिशांच्या कायदयांना मानणार नाही. आम्ही इंग्रजांचे अधिपत्य स्विकारत नाही. जो ही इंग्रज आमच्या विरूध्द उभा राहील त्यास आम्ही यमसदनी पाठवू. यामुळे संतप्त ब्रिटीश सरकारने आपली सेना पाठवून बिरसा मुंडा यास पकडण्यासाठी पाठविला, बिरसा मुंडास पकडून देणा-यास 500 रूपये बक्षिस जाहीर केले.
बिरसा मुंडा यांनी विविध जमातीच्या गटांना एकत्र आणले त्यांना इंग्रजांविरूध्द लढण्यास प्रेरित केले. इंग्रज सरकारने विद्रोहीचे दमन करण्यासाठी 3 फेब्रुवारी 1900 ला हल्ला करून विद्रोहीचे ठिकाणे उध्वस्त केले व बिरसामुंडा यास अटक केली. त्यांच्या सोबत 460 आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आली.
9 जुन 1900 रोजी रहस्यमयरित्या त्यांचा मृत्यु झाला होता. काहींच्या मते इंग्रजांनी त्यांना फासावर चढवले तसेच इंग्रजांनी त्यांच्या मृत्युचे कारण प्लेग सांगीतले.
3 फेब्रुवारी 1900 रोजी त्यांना इंग्रजांनी अटक केली होती. 15 नोव्हेंबरला बिरसा मुंडाची जयंती साजरी केली जाते. सध्याचे झारखंड राज्यात रांची येथे त्यांचे स्मारक बांधण्यात आले आहे. तेथे दरवर्षी जयंती निमित्त कार्यक्रम होतात.

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०

प्रश्न ----सहित्यशिल्प व आधुनिक मराठी कविता

प्रश्न  साहित्यशिल्प
1. जयरामचे व्यक्तिचित्र रेखाटा?
2. सये तुझे डोळे या कथेतील नात्यांची जबबदारीयुक्त गुंतागुंत तुमच्या शब्दात विशद करा.
3. सये तुझे डोळे या कथेच्या शीर्षकाची प्रतिकात्मकता स्पष्ट करा.
4.  साठीची गझलेचा भावार्थ लिहा.
5. आईच्या कोणत्या आठवणी लेखक राम शेवडीकर यांनी सांगितल्या आहेत त्या लिहा.


१. लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी झेल्या विद्यार्थ्याचे व्यक्तिचित्र कशाप्रकारे रेखाटले आहे ते लिहा.
 २.  शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील नात्याचा वेध झेल्या कथेच्या आधारे  घ्या.
 ३. खेडे गावातील शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गमतीजमती झेल्या कथेच्या आधारे स्पष्ट करा .
४.  कैलास सत्यार्थी यांना कोणकोणत्या गोष्टीचा राग आला ते तुमच्या शब्दात लिहा.
५.  कैलास सत्यार्थी यांनी आपणास आलेल्या रागाचा विधायक ऊर्जेत रूपांतर कसे केले ते सविस्तर लिहा.
६.  राग एक शक्ती आहे, ऊर्जा आहे असे कैलास सत्यार्थी का म्हणतात? ते लिहा .
७. 'सये तुझे डोळे ' या कथेतून  जयराम या       व्यक्तीचित्रावर भारत सासणे यांनी कसा प्रकाश टाकला आहे ते लिहा.
८. 'सये तुझे डोळे' या कथेच्या शीर्षकाची प्रतीकात्मकता स्पष्ट करा.
 ९. एकत्र कुटुंब पद्धतीतील नात्याची वीण भारत सासणे यांनी कशा प्रकारे प्रकट केलेली आहे ते लिहा.
 १०. चंद्राचे आणि चांदण्याचे विविध विभ्रम विजयकुमार मीठे यांनी कसे चित्रित केले आहेत ते लिहा.
 ११. नरेंद्र लांजेवार यांनी गोरफ़डाची दाहकता कशी चित्रित केली आहे ते लिहा.
१२. परिघावरील जगणं जगणाऱ्या एखाद्या समाजाच्या जगण्याचे चित्रण करा.
१३. कवी केशवकुमार यांनी आत्मप्रतिष्ठेसाठी काव्य लेखन करणाऱ्या कवींच्या कवितेची निर्मिती प्रक्रिया विडंबन काव्यातून कशी प्रकट केली ते लिहा.
१४.  कवी विंदा करंदीकर यांच्या 'साठीची गझल' या कवितेचा भावार्थ लिहा.
 १५. डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या काव्यावर कवी ज. वि. पवार यांनी कशाप्रकारे प्रकाश टाकला आहे ते लिहा.



मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

कवी ग्रेस - दान

माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस (१० मे, १९३७ – २६ मार्च, २०१२) हे मराठी कवी होते. मर्ढेकरोत्तरनवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. "वाऱ्याने हलते रान" ह्या त्यांच्या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि सात ललित लेखसंग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत.
माणिक गोडघाटे
Grace IMG 1263.jpeg
ग्रेस
जन्म नावमाणिक सीताराम गोडघाटे
टोपणनावग्रेस
जन्म१० मे, इ.स. १९३७
नागपूर
मृत्यू२६ मार्च, इ.स. २०१२
पुणे
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य, मराठीचे अध्यापन, विश्वकोश संपादक मंडळात समावेश.
भाषामराठी
साहित्य प्रकारकविता, ललितलेखन
कार्यकाळ१९६७-२०१२
प्रसिद्ध साहित्यकृतीसंध्याकाळच्या कविता, चर्चबेल
प्रभावअभिजात उर्दू परंपरा, रोमांचवादी इंग्रजी काव्य.
वडीलसीताराम
आईसुमित्रा
अपत्येमिथिला, माधवी आणि राघव
पुरस्कार
  • संध्याकाळच्या कविता ह्या संग्रहास महाराष्ट्र शासनाचे कवी केशवसुत पारितोषिक, १९६८
  • कविवर्य केशवसुत स्मृती काव्य पुरस्कार, २०१०
  • वाऱ्याने हलते रान ह्या ललित लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार, २०१२

सुरूवातीचे जीवन व शिक्षणसंपादन करा

१० मे, १९३७ रोजी नागपूरमध्ये ग्रेस यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लष्करी व्यवसायात होते. त्यांची रसिकता उल्लेखनीय होती.[माहितीज्ञान पोकळी] कर्नल बाग या नागपुरातील वस्तीत त्यांचे कुटुंब राहत होते. ग्रेस यांचे प्रारंभीचे जीवन कष्टमय होते. आईच्या अकाली मृत्यूमुळे विस्कळित झालेले घर त्यांना सांभाळावे लागले. नोकरी आणि शिक्षण यांच्याशी त्यांना झगडावे लागले. डॉ. लीला माटे यांच्याशी विवाह झाल्यानंतरही हा संघर्ष सुरूच राहिला. एम.ए. ची परीक्षा जवळ आलेली असताना त्यांना बसचा अपघात झाला. इ.स. १९६६ मध्ये मराठी विषयातील ना.के. बेहरे सुवर्णपदक जिंकून नागपूर विद्यापीठातून माणिक गोडघाटे एम.ए. झाले. प्लास्टर लावलेल्या हातांनी त्यांनी प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक घेतले.[१]
इ.स. १९६६ ते १९६८ या काळात नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केले. इ.स. १९६८ पासून ते नागपूरच्याच वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे अध्यापन करू लागले. प्राध्यापक म्हणून १९९७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर २००४ पर्यंत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात मराठी विभागात व ललित कला विभागात संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. 'सौंदर्यशास्त्र' या विषयाचे अध्यापनही या विद्यापीठात त्यांनी केले. इ.स. १९७१ ते १९७६ या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे १९८२ ते १९८६ या काळात ते सदस्य होते.

संपादनकार्यसंपादन करा

  • 'युगवाणी' या विदर्भ साहित्य संघाच्या मुखपत्राचे १९७१ ते १९७४ या काळात ग्रेस यांनी संपादन केले. मुंबईतील 'संदर्भ' या लेखक केंद्राचेही ते काही काळ संपादक होते.
  • १९७५ च्या सालात रामदास भटकळ यांनी रायटर्स सेंटर मुंबई या संस्थेचं 'संदर्भ' हे वाङ्मयीन द्वैमासिक सुरू केले. त्याचे संपादन कवी ग्रेस करत असत.' संदर्भ'चे अवघे दहाबारा अंक निघाले. ग्रेस एखादा विषय प्रत्येक कला क्षेत्रातल्या दिग्गजांना देऊन त्यावर त्यांचे टिपण किंवा लेख मागवत असत.

'ग्रेस' या नावाविषयीसंपादन करा

इ.स. १९५८ पासून माणिक गोडघाटे यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन गोडघाट्यांनी "ग्रेस" हे साहित्यिक नाव धारण केले. ''दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस'' या बोलपटात इन्ग्रिडसंबंधी शी इज इन ग्रेस असे वाक्य येते. हा बोलपट पाहत असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे, असे गोडघाट्यांना वाटले. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा-रूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इन्ग्रिडमध्ये झाला; तिचे ऋण आठवीत राहण्यासाठी आपण ग्रेस हे नाव धारण केले, असे गोडघाट्यांनी अक्षयकुमार काळे यांना दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे.[२] वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका आणि स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी छापण्याची पद्धत ह्या दोन खास गोष्टी संध्याकाळच्या कविता ह्या १९६७ साली प्रकाशित केलेल्या आपल्या पहिल्या काव्यसंग्रहात त्यांनी वाचकांना सादर केल्या, आणि ती परंपरा त्यांनी पुढेही चालू ठेवली.

दुर्बोधतेचा आरोपसंपादन करा

"कठीण भाषेत सांगितले तर ते दुर्बोध आणि सोप्या भाषेत सांगितले तर हे काय सांगता, असा लोक प्रश्न करतात पण, माझी जगण्याची एक तऱ्हा आहे आणि मी आपल्याच तऱ्हेने जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे. मी जे काव्य करतो ते माझे ‘स्वगत’ आहे, असे समजा. ‘स्वगता’मध्ये भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगतामध्ये श्रोता नसतो तर कवी स्वत: निर्माताच असतो. त्यामुळे कुणाची पर्वा करायची नसते पण, हे स्पष्ट करतो की, मी ज्ञानाचे सोंग करत नाही आणि अज्ञान मिरवत नाही, ज्ञानर्षीचा अवमान करत नाही. मी शब्दकोषांना नवे शब्द देणारा आहे," असे प्रतिपादन त्यांनी राळेगाव येथील भाषणात केले होते. [३] कविता दुर्बोध असल्याच्या आरोपांना उत्तर देताना "मी माझ्या कवितेचा प्रियकर नाही" असे त्यांनी अनेकदा म्हटले होते. [४] माझ्या कवितेने मराठीला काय दिले आहे व ती काय देत आहे याचा विचार मला स्वतःला करण्याचे अजिबात कारण नाही, असे ग्रेस यांनी 'दुर्बोधतेची बेसरबिंदी' या ललितलेखात म्हटलेले आहे. [५] याच लेखात पुढे त्यांनी "आपण दुर्बोधतेच्या आरोपाचे निराकरण करीत नाही," असेही म्हटलेले आहे.
श्रीनिवास हवालदार (निवृत्त अधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवाइंदूरमध्य प्रदेश) यांनी कविवर्य ग्रेस यांच्या प्रातिनिधिक कवितांचे विश्लेषण आणि त्यांना आकळलेले रसग्रहण करून ग्रेसच्या कविता 'दुर्बोध' आणि 'आत्मकेंद्रित' असल्याचा समज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. [६]

दुर्बोध गणल्या गेलेल्या/गाजलेल्या कवितासंपादन करा

१. असे रंग आणि ढगांच्या किनारी
२. अज्ञेयाहून गूढ गूढ दिसती झाडातली वर्तुळे
३. आठवण
४. ओळख
५. ओळखीच्या वार्‍या तुझे घर कुठे सांग?
६. ऊर्मिलेचा सर्पखेळ’
७. कंठात दिशांचे हार
८. कर्णभूल
९. कर्णधून
१०. क्षितिज जसे दिसते
११. ग्रेसची वृत्ती.
१२. घर थकलेले संन्यासी
१३. घनकंप मयूरा
१४. जे सोसत नाही असले
१५. डहाळी
१६. तुळशीतले बिल्वदल
१७. ती गेली तेव्हा रिमझिम
१८. तुला पाहिले मी नदीच्या किनारी
१९. .तांबे-सोन्याची नांदी
२०. तुझी बहार मंदशी तृषार्त जाग ये जरी...
२१. तुझ्यात नभवाहिनी कुठून रक्त गंधावले
२२. देखना कबीर
२३. देवी
२४. दुःख घराला आले
२५. दु:ख
२६. निनाद
२७. निरोप
२८. प्रणाली. (अपूर्ण यादी)

प्रसिद्ध कवितासंपादन करा

प्रकाशित साहित्यसंपादन करा

पुस्तकेसंपादन करा

नावसाहित्यप्रकारप्रकाशनप्रकाशन वर्ष (इ.स.)
ओल्या वेळूची बासरीललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. २०१२
कावळे उडाले स्वामीललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. २०१०चंद्रमाधवीचे प्रदेशकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. १९७७
चर्चबेलललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. १९७४
मितवाललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. १९८७
बाई! जोगिया पुरुषकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशनआगामी
मृगजळाचे बांधकामललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. २००३
राजपुत्र आणि डार्लिंगकवितासंग्रहअमेय प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशनइ.स. १९७४
वार्‍याने हलते रानललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. २००८
संध्याकाळच्या कविताकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. १९६७
संध्यामग्न पुरुषाची लक्षणेललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. २०००
सांजभयाच्या साजणीकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. २००६
सांध्यपर्वातील वैष्णवीकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशनइ.स. १९९५

इतर प्रकाशित साहित्यसंपादन करा

ध्वनिफितीसंपादन करा

  • संध्यासूक्तांचा यांत्रिक, फाऊंटन, मुंबई २००४
  • साजणवेळा, शब्दवेध, मुंबई १९९८
  • सांध्यपर्व, माधवी वैद्य, मुंबई

चित्रपटसंपादन करा

निवडुंग (१९८९) या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटात 'वाऱ्याने हलते रान' ही ग्रेस यांची रचना गीतबद्ध झालेली आहे.

मालिकासंपादन करा

दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या 'महाश्वेता' या मालिकेत ग्रेस यांच्या 'निष्पर्ण तरूंची राई' (चंद्रमाधवीचे प्रदेश) या कवितेचा शीर्षकगीत म्हणून (भय इथले संपत नाही) वापर करण्यात आला.

इतर भाषांमध्ये अनुवादसंपादन करा

डॉ. जया मेहता यांनी ग्रेस यांच्या चर्चबेल व मितवा या ललित लेखसंग्रहांचे गुजरातीत भाषांतर केले आहे. ग्रेस यांच्या निवडक कविता डॉ. उमाशंकर जेठालाल जोशी यांनी गुजरातीत अनुवादित केलेल्या आहेत.

रंगमंचीय सादरीकरणसंपादन करा

प्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत काव्यगायन आणि विवेचन अशा द्विदल कार्यक्रमाचे सादरीकरण कवी ग्रेस यांनी २००८ मध्ये सुरू केले. इचलकरंजी येथे 'मैत्र जीवाचे' या नावाने अशा द्विदल कार्यक्रमांचा पहिला प्रयोग झाला होता.

ग्रेस यांच्या साहित्यावरील समीक्षात्मक ग्रंथसंपादन करा

  • ग्रेस-अंबरफुलांचे दिवे (डॉ. चं.वि. जोशी) : या ग्रंथाला मसापचा २०१७ सालचा पुरस्कार मिळाला आहे.
  • ग्रेस आणि दुर्बोधता, डॉ. जयंत परांजपे (१९८६)
  • ग्रेसच्या कविता - धुक्यातून प्रकाशाकडे, श्रीनिवास हवालदार (२०१४, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे) या पुस्तकास मध्य प्रदेशातील मराठी साहित्य अकादमीच्या म.प्र.संस्कृति परिषद (भोपाळ)ने 'राजकवि भास्कर रामचन्द्र तांबे ' पुरस्कार दिला आहे.(४ जुलै २०१८)
  • ग्रेसच्या कविता - धुक्यातून प्रकाशाकडे" [उत्तरार्ध ][प्रकाशन वर्ष २०१६] लेखक-श्रीनिवास हवालदार [कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे]
  • ‘दूरस्थ ग्रेस- कवी ग्रेस यांना न लिहिलेली पत्रें ‘लेखक- श्रीनिवास हवालदार प्रकाशन वर्ष २०१८ [कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे]
  • धुके आणि शिल्प, त्र्यं. वि. सरदेशमुख (१९८५)
  • ग्रेसविषयी, डॉ. अक्षयकुमार काळे (२००९)
  • रचनेच्या खोल तळाशी, डॉ. नंदकुमार मुलमुले

पुरस्कार व गौरवसंपादन करा

  • गौरववृत्ती (फेलोशिप), महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, इ.स. २००५
  • जी. ए. कुलकर्णी सन्मान पुरस्कार, पुणे, इ.स. २०१०
  • जीवनव्रती पुरस्कार, विदर्भ साहित्य संघ, नागपूर, इ.स. १९९७
  • दमाणी पुरस्कार, सोलापूर, ‘संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (ललितबंध)साठी
  • नागभूषण पुरस्कार, नागभूषण फाऊंडेशन, नागपूर इ.स. २०१०
  • महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’साठी (काव्य)
  • महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, ‘चर्चबेल’साठी (ललितबंध)
  • महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, ‘राजपुत्र आणि डार्लिंग (काव्य)
  • महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, ‘संध्याकाळच्या कविता (काव्य)
  • मारवाडी सम्मेलन पुरस्कार, मुंबई, ‘मितवा’साठी (ललितबंध)
  • वाग्विलासिनी पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान, पुणे
  • विदर्भ गौरव पुरस्कार, कृषी विकास प्रतिष्ठान, नागपूर
  • विदर्भ भूषण पुरस्कार, इ.स. २०११[७]
  • सहकारमहर्षी साहित्य पुरस्कार, सोलापूर
  • साहित्य अकादमी पुरस्कारइ.स. २०११ - वार्‍याने हलते रान या ललितलेखसंग्रहासाठी.
  • कवी ग्रेस हे इ.स. २०१२ साली झालेल्या दुसर्‍या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

मृत्यूसंपादन करा

कर्करोगाशी सुमारे तीन वर्षे लढा दिल्यानंतर अखेर वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी २६ मार्च २०१२ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले.

संदर्भसंपादन करा

  1. ^ संध्याकाळच्या कविता : एक अभ्यास, प्रा. अजय आणि इतर, साहित्य सेवा प्रकाशन (सातारा).
  2. ^ काळे, अक्षयकुमार (इ.स. २००९). ग्रेसविषयी(मराठी मजकूर). विजय प्रकाशन. पान क्रमांक १९.}.
  3. ^ लोकसत्ताhttp://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=128277:2011-01-10-15-05-37&Itemid=1.[मृत दुवा]Sep 29, 2012
  4. ^ सकाळhttp://www.esakal.com/esakal/20101225/5432976455069330558.htm. Sep 29, 2012
  5. ^ मितवा (मराठी मजकूर). पॉप्युलर प्रकाशन. इ.स. १९८७. पान क्रमांक १९८.}.
  6. ^ A study and research centre for Marathi poet Grace on net
  7. ^ तरुण भारत http://tarunbharat.net/ftp/e-paper/2012-03-27/mpage6_20120327.htm[मृत दुवा]

बाई मी लिहिणे शिकले सद्गुरुपासी- संत जनाबाई

जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत-कवयित्री होत्या. संत जनाबाई जन्म अंदाजे इ.स. १२५८ गंगाखेड मृत्यू अंदाजे इ.स. १३५० राष्ट्रीयत्व...