सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

केशव कुमार

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे (ऑगस्ट १३इ.स. १८९८ - जून १३इ.स. १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. फार काय, आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते. त्यांचे बाळासाहेब यांच्या सी असलेले वाद ही फार चर्चेत होते
प्रल्हाद केशव अत्रे
जन्म नावप्रल्हाद केशव अत्रे
टोपणनावकेशवकुमार
जन्म१३ ऑगस्ट १८९८
सासवडमहाराष्ट्रभारत
मृत्यू१३ जून १९६९
वरळी ,(मुंबई),महाराष्ट्रभारत
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्रसाहित्यपत्रकारिताराजकारणचित्रपटशिक्षण
भाषामराठी
साहित्य प्रकारकथाकादंबरीनाटककविताचरित्र लेखन,वृत्तपत्र
प्रसिद्ध साहित्यकृतीडॉ. लागू, झेंडूची फुले, कर्‍हेचे पाणी (आत्मचरित्र)
वडीलकेशव विनायक अत्रे
आईअन्नपूर्णाबाई केशव अत्रे
अपत्येशिरीष पै, मीना देशपांडे

जन्म व बालपणसंपादन करा

प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे हे पुरंदर तालुक्यातील कोडीत खुर्द या गावात जन्मले.

कारकीर्दसंपादन करा

पत्रकारितासंपादन करा

इ.स. १९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. इ.स. १९२६ मध्ये 'रत्‍नाकर' व इ.स. १९२९ साली 'मनोरमा', आणि पुढे इ.स. १९३५ साली 'नवे अध्यापन' व इ.स. १९३९साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. जानेवारी १९इ.स. १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. जुलै ८इ.स. १९६२ पर्यंत ते चालू होते. जून २इ.स. १९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. नोव्हेंबर १५इ.स. १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते. २१ जानेवारी १९४० ला अत्रे यांनी नवयुग हे वृत्तपत्र सुरु केले. त्यावेळी अत्रे काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे काँग्रेसची विचारसरणी या वृत्तपत्रातून स्वातंत्र्य मिळेपर्यंत मांडली जात होती.

संस्थासंपादन करा

आचार्य अत्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव असलेल्या अनेक संस्था स्थापन झाल्या. त्यांतली काही या :-
  • आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली(पश्चिम), मुंबई
  • आचार्य अत्रे कट्टा सांस्कृतिक मंडळ, ठाणे
  • आचार्य अत्रे कन्या कॉलेज, पुरंदर (पुणे जिल्हा)
  • आचार्य अत्रे नाट्यगृह, पिंपरी (पुणे)
  • आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, सासवड (पुरंदर तालुका-पुणे जिल्हा)
  • आचार्य अत्रे (यांचा भव्य) पुतळा, वरळी (मुंबई) (पुतळ्याची उंची ३४ फूट)
  • आचार्य अत्रे यांचा पुतळा, आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा). हाच चार फूट उंचीचा पुतळा पूर्वी मुंबईत वरळी येथे होता.
  • आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुणे
  • आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुरंदर (पुणे जिल्हा)
  • आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी (पुणे)
  • आचार्य अत्रे सभागृह, पुणे (उद्‌घाटन २९ मार्च १९८१)
  • आचार्य अत्रे (वार्षिक) साहित्य संमेलन, सासवड
  • सासवड नगरपालिकेने बांधलेले आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा)
  • आचार्य अत्रे स्मारक समिती, मुंबई. (स्मारकाची सर्व नियोजित कामे पूर्ण झाल्याने फेब्रुवारी २०१२ मध्ये ही समिती बरखास्त करण्यात आली.)
  • आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, पुणे ४११०१६

चित्रपटसंपादन करा

इ.स. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी इ.स. १९३७साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. इ.स. १९३८ साली 'हंस' साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.
अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स' मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. इ.स. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले.
अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.

अध्यापनसंपादन करा

मुंबईत पहिले सहा महिने सँढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूलमध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल) मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. पुण्यालाकॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. त्यावेळी त्यांना फक्त ३५ रुपये पगार होता. ही शाळा अत्र्यांच्या नाट्यलेखनाची, समाजसेवेची प्रयोगशाळाच होती. जातिभेदाच्या भिंती फोडण्याचा मंत्र अत्र्यांना या शाळेतच मिळाला.
जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी. टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.

उणिवा आणि निष्ठासंपादन करा

आदर्शांची पायमल्ली, मनाविरुद्ध मते मांडली की तुटून पडणे, चारित्र्यहनन, माहितीची शहानिशा करून न घेता प्रहार करणे, अशा अत्र्यांच्या काही उणिवांवर बोट ठेवले जाते. असे असले तरी त्यांच्या काही निष्ठा पक्क्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे सामाजिक बांधिलकी. समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला.[१]

पुस्तकेसंपादन करा

शाळांसाठी क्रमिक पुस्तकेसंपादन करा

आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी आणि शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश) यांनी संपादित केलेली अरुण वाचनमाला नावाची मराठीची क्रमिक पुस्तके शाळेच्या इंग्रजी पहिली ते इंग्रजी पाचवी (हल्लीची पाचवी ते नववी) च्या अभ्यासक्रमांत होती, सन १९३४ साली निघालेल्या या क्रमिक पुस्तकांसारखी सुरेख पुस्तके त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीही निघाली नाहीत, असे शिक्षकांचे आणि पालकांचे मत आहे. ही पुस्तके पहायला मिळणेही अशक्यप्राय झाल्याने, डिंपल प्रकाशनाने या पुस्तकांची नवीन पुनर्मुद्रित आवृत्ती आचार्य अत्रे यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त १३ ऑगस्ट २०१७ रोजी बाजारात आणली आहे. आचार्य अत्रे यांचे नवयुग मराठा साप्ताहिकाचा पहिला अंक १९४० २१ जानेवारी रोजी प्रकाशित झाला.
आचार्य अत्रे आणि गिरीश दोघेही हाडाचे द्रष्टे शिक्षक होते. त्यावेळी ते अनुक्रमे कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे मराठीचे अध्यापक होते. अत्रे तर लंडनहून शिक्षणशास्त्रातील उच्च पदविका घेऊन परतले होते; आणि शाळेचे मुख्याध्यापक होते. तेव्हा अशा जाणकारांच्या अनुभवातून ही पुस्तके तयार झाली आणि एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अवघ्या शिक्षणक्षेत्राला दिशादर्शकाचे काम करू लागली. २०१७ सालीही या पुस्तकांतील कल्पना कालसुसंगत असल्याचे जाणवते. पुस्तकांच्या प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे ही पुस्तके आधुनिक भाषा-शिक्षणाची व अध्यापनशास्त्राची तत्त्वे लक्षात घेऊन तयार केली आहेत. पुस्तकांची रचना (Design) करताना कला आणि वाङ्मय हा मुख्य दृष्टिकोन ठेवला आहे. पुस्तके मनोरंजक करण्याच्या प्रयत्नात फार सोपी होतात आणि शैक्षणिकदृष्ट्या निरुपयोगी ठरतात. ‘मनोरंजकत्व म्हणजे सुलभत्व नव्हे!’ गद्य-पद्य लेखनातील विविध फुलोरे, छटा आणि तऱ्हा यांचा मनोज्ञ संगम या पुस्तकांत अनुभवायला मिळेल. सारांश, राष्ट्रीय, महाराष्ट्रीय आणि मानवी अशा तिहेरी दृष्टीने या पुस्तकांची केलेली रचना जाणकारांना प्रतीत होईल.’

नाटकेसंपादन करा

काव्यसंपादन करा

कथासंग्रहसंपादन करा

आत्मचरित्रसंपादन करा

कादंबऱ्यासंपादन करा

इतरसंपादन करा

न लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

आचार्य अत्रे हे 'महाकवी कालिदास’ आणि ‘गानअवलिया तानसेन’ अशी दोन नाटके बालगंधर्वांसाठी लिहिणार होते. ते ‘संत नामदेव’, ‘संत जनाबाई’ ही नाटके छोटा गंधर्व आणि जयमाला शिलेदार यांच्यासाठी आणि ‘शाहीर सगनभाऊ तुकाराम शिदे' व 'मेघमाला' संजीवनी बीडकरसाठी लिहिणार होते. दत्ता भट यांच्यासाठी ते ‘महात्मा फुले’ हे नाटक लिहिणार होते. चार्वाक या प्राचीन काळातल्या प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करून उठलेल्या एका तत्त्ववेत्त्यावरही त्यांना नाटक लिहायचे होतं. त्यासाठी त्यांनी माहिती गोळा करायलाही सुरुवात केली होती. अत्र्यांनी ‘तुकाराम’ नाटकही लिहायचे ठरवले होते. आचार्य अत्र्यांनी वासुदेव चंद्रचूड यांच्यासाठी ‘पुंडलिक’ ठरवला होता;. ‘शिवसमर्थ’ नाटकाचा तर एकदीड अंकही त्यांनी लिहिला होता.

पुरस्कार आणि सन्मानसंपादन करा

  • विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून विष्णुदास भावे पुरस्कार देत आली आहे. आचार्य अत्रे यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
  • आचार्य अत्रे यांना स्वतःला फारसे पुरस्कार मिळाले नसले तरी त्यांच्या नावाने आचार्य अत्रे प्रतिष्ठान (पुणे) यासारख्या अनेक संस्था आचार्य अत्रे पुरस्कार देतात.
  • अशोक हांडे यांची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन असलेला ‘अत्रे-अत्रे-सर्वत्रे’ हा अत्रे यांची संगीतमय जीवनकथा सांगणारा कार्यक्रम आहे.
  • ’मी अत्रे बोलतोय’ हा एकपात्री कार्यक्रम करणारे अनेकजण आहेत. सदानंद जोशी हे त्यांपैकी एक प्रमुख. डॉ.अनंत एस. परांजपे हेदेखील ’मी अत्रे बोलतोय’ करतात.
  • दरवर्षी आचार्य अत्र्यांच्या जन्मदिनी म्हणजे १३ ऑगस्ट रोजी सासवड येथे आचार्य अत्रे साहित्य संमेलन भरते. अनेक कार्यक्रमांसोबत त्या संमेलनात अत्र्यांच्या नावाचे काही पुरस्कार दिले जातात.
  • आचार्य अत्रे यांच्या संपूर्ण पुस्तकांचा दांडगा अभ्यास असलेले दिलीप देशपांडे हे आचार्य अत्रे यांच्यावर बेतलेला ‘अष्टपैलू अत्रे’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करतात.

आचार्य अत्र्यांसंबंधी लिहिली गेलेली पुस्तकेसंपादन करा

अत्रे वाङ्‌मय प्रदर्शन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भंगु दे काठीन्य माझे - कवी बा.सी.मर्ढेकर

भंगु दे काठीन्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे येऊ दे वाणीत माझ्या सुर तुझ्या आवडीचे, राहू दे स्वातंत्र्य माझे, फक्त उच्चारांतले गा, अक्षरां आकार त...