करांच्या बाबतीत पहिल्यांदा वाचताना येऊ शकतो.
मर्ढेकरांच्या बाबतीत अश्लीलतेचा आरोप अनेकांनी केला. तो धुरळा आता बर्यापैकी खाली बसलेला आहे. त्याबाबतीत मी जास्त काही लिहीत नाही. त्यांना बेधडक भाषा वापरून वाचकांना खडबडून जागे करायचे होते असे वाटते. 'हाडांचे सापळे' झालेले पुरूष, आणि 'किरटी हाडबंडले' झालेल्या बायका, ह्यांच्यातल्या अर्थहीन, यंत्रवत् समागम त्यांना भयावह वाटत होता.
'सोडवेना सोडवीतां
गेल्या रात्रींचा हा पाश
जागा आहें तरी आता
मेल्या इच्छा सावकाश.'
अशा ओळींवर त्या काळात लोक भडकले, वादविवाद घडले. अनेक मान्यवरांनी त्यात भाग घेतला. 'लिंग', 'स्तन'सारखे शब्द मर्ढेकरांच्या कवितेत आल्याने खळबळ माजली. मराठी कवितेला हे नवीन परिमाण मर्ढेकरांनी बहाल केले. तिची नवी अभिव्यक्ती मर्ढेकरांनी घडवली. अभिव्यक्तीच्या कल्पनांत भारतात अजूनही इतका गोंधळ जाणवतो, की हे काम त्या काळात मर्ढेकरांनी केले, हा मोठाच क्रांतिकारी बदल आहे.
मर्ढेकरांचा आशयच इतका संपन्न आहे, की त्यांच्या भाषाशैलीकडे बघायला लोकांना ताकद उरत नाही. बोरकरांसारख्या कवीकडे जे भाषेचे लेणे दिसते, ते मर्ढेकरांकडे दिसत नाही, हे मात्र मान्य केले पाहिजे. शब्दांच्या आविष्कारात, शैलीबाजपणात मर्ढेकर थोडे कमी पडतात की काय, असे वाटत राहते. परंतु मर्ढेकरांनी रुपक, उपमा, उत्प्रेक्षा ह्या अलंकारांचा प्रभावी वापर करून ही त्रुटी फार जाणवू दिली नाही. मर्ढेकरांची रुपके आणि प्रतिमा ह्यांना स्वतःचे एक अस्तित्व येते. त्या कळीचे फुलात रूपांतर व्हावे तशा स्वतःहूनच फुलायला लागतात. त्यांच्या प्रतिमा वाचकाशी भावनांचे नाते जोडून समानता दाखवतात. 'गोळ्यांचे पराग' ह्या वर आलेल्या उपहास करणार्या प्रतिमेमधून मर्ढेकर किती चटकन वैफल्य सांगतात! हे सर्वच खुल्या डोळ्यांनी, झापडे न लावता बघायला हवे.
मर्ढेकरांवर असंख्य पुस्तके, लेख लिहिले गेले आहेत. चर्चासत्रे, परिसंवाद ... काही विचारू नका. ह्या लेखात मी कितीसे सांगणार? त्यांच्या सौंदर्यशास्त्रविषयक लिखाणाला मी स्पर्शही करू शकलेलो नाही. माझा तेवढा काही अभ्यासही नाही. त्यांच्या कवितांबद्दल जे वाटलं, ते लिहीलं, एवढंच. दोन-चार आवडलेल्या ओळी वगैरे. मराठी भाषा दिनानिमित्त एका महाकवीबद्दल मराठी भाषेला दिलेला हा छोटासा नजराणा. शेवटी मर्ढेकरांबद्दल ते त्यांच्या देवाला किंवा आदिशक्तीला उद्देशून जे म्हणतात तेच लागू पडते.
'किती पायी लागूं तुझ्या
किती आठवूं गा तूंतें;
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनीं येतें.'
भंगू दे काठिन्य माझे या कवितेचा भावार्थ
केशवसुतानंतरचे मराठीतील एक प्रयोगशील कवी, कादंबरीकार आणि सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून कवी बा.सी. मर्ढेकर सर्वपरिचित आहेत. नवकाव्याचे प्रवर्तक, दुसरे केशवसुत, युगप्रवर्तक कवी इत्यादी शब्दांनी त्यांचा गौरव केला जातो. त्यामुळे मर्ढेकर म्हणजे नवकाव्य असे समीकरण ठरुन गेले आहे. मर्ढेकरांच्या कवितेतून यंत्रयुगाने मानवाला आलेली विफलता व्यक्त होते. तसेच ती आशावादी ठरते. बा सी मर्ढेकर यांचे पूर्ण नाव बाळ सिताराम मर्ढेकर असे होते मर्ढेकरांचे मूळ आडनाव गोसावी होते परंतु ते सातारा जिल्ह्यातील मरढे या गावचे असल्यामुळे गावाच्या नावावरून त्यांचे आडनाव मर्ढेकर असे रूढ झाले. त्यांचा जन्म 1909 मध्ये झाला. त्यांना मराठी नवकवितेचे जनक म्हटले जाते. दुसरी महायुद्ध व औद्योगिक कारणामुळे मानवी जीवन व अस्तित्व कसे धोक्यात आले. या बदलाचा मानवी जीवनावर काय परिणाम झाला याची नोंद त्यांनी आपल्या कवितेत घेतलेली आहे.
बा.सी. मर्ढेकरांची साहित्यसंपदा
शशिरागम, काही कविता, आणखी काही कविता हे त्यांचे प्रसिद्ध कवितासंग्रह आहेत. तांबडी माती, रात्रीचा दिवस, पाणी या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित आहेत. आर्ट्स अँड मॅन (कला आणि माणूस) वाडमयीन महात्मता, सौंदर्य आणि साहित्य, नटश्रेष्ठ आणि इतर सांगीतिका इत्यादी ग्रंथ प्रकाशित आहेत.
त्यांच्या काव्यातून निराशा व वैफल्य प्रकट होते. त्यांचे कारण दुसऱ्या महायुद्धात झालेल्या मांडवी संहार होय. अर्थपूर्ण असे आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद व नव्या प्रतिमांचा वापर त्यांनी कवितेत केला आहे इसवी सन 1956 साली त्यांच्या ' सौंदर्य आणि साहित्य' या ग्रंथात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. अभिनव भाषा प्रयोग हा त्यांच्या काव्याचा विशेष आहे.
भंगू दे काठिन्य माझे
आम्ल जाऊ दे मनीचे
येऊ दे वाणीत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे
प्रस्तुत कविता बा.सी. मर्ढेकर यांची अतिशय गहन व मनाला भिडणारी कविता आहे.
माझा ‘मी' पणा गळू दे. माझ्या मनातील वाईट विचार जाऊ दे. आणि माझ्या वाणीत तुला आवडतील असेच सूर येऊ दे.
ज्ञात हेतूतील माझ्या
दे गळू मालिन्य; आणि
माझिया अज्ञात टाकी
स्फूर्ति- केंद्री त्वदबियाणे
या चरणाच्या माध्यमातून कवी असे म्हणतात, “मला ज्या गोष्टी कळतात ज्या गोष्टी जाणवतात त्यातील मलिनता, त्यातील मालिन्य, त्यातील गढूळपणा गळून पडू दे.” माझ्या अंतर्मनात तुझ्या विचारांची बियाणी तू टाक. म्हणजे जेणेकरून तुझ्या विचारांची पेरणी समाज मनामध्ये करता येईल.
राहू दे स्वातंत्र्य माझे
फक्त उच्चारांतले गा;
अक्षरा आकार तुझ्या
फुफ्फूसाचा वाहू दे गा
माझ्या उच्चारापुरतेच स्वातंत्र्य फक्त शिल्लक ठेव; पण जे विचार माझ्या मुखातून बाहेर पडतील ते विचार तुझे असू दे. या विचारांची पेरणी समाजामध्ये करण्याचे सामर्थ्य मला दे.
लोभ जिभेचा जळू दे
हे ईश्वरा माझ्या जिभेवर चा लोभ जळू दे मनातील व जिभेवरील द्वेष नाहीसा होऊ दे आणि माझ्या मनाला फक्त तुझी लालसा निर्माण व्हावी मी मात्र डोळ्यांची पापणी जागी ठेवून मनाला तुझीच आठवण ठेवत राहील अशी इच्छा कवी व्यक्त करतो.
धैर्य दे आणि नम्रता दे
आयुष्यात जे जे वाट्याला येईल ते ती पाहण्याचे घरी माझ्या मनामध्ये असू दे. आणि ती धैर्य नम्रतेने माझ्या अंगी असू दे. माझी बुद्धी एखाद्या तापलेल्या पोलादाप्रमाणे वाकु दे. म्हणजे माझ्यातला ताठरपणा अहम, गर्व, ‘मी’पणा गळून पडू दे असे ईश्वराकडे प्रार्थना करतात.
घेऊ दे आघात तीते
कवितेच्या माध्यमातून कवी ईश्वराकडे अशी प्रार्थना करतात जगाचे आघात सोसायचे बळ दे लोकांकडून होणारा छळ सोसण्याचे बळ माझ्यामध्ये दे माझ्या हातून जे साहित्य सेवा होईल त्यातल्या आशयाचा तूच स्वामी आहे मी फक्त शब्द वाहणारा एक भिकारी मध्यस्थी आहे माझ्या मागण्याला अंत नाही अन तू सतत देणारा मुरारी आहे म्हणून मी काय मागावे करता धरता तर तूच आहेस देणारा आणि घेणारा तूच आहेस त्यामुळे ईश्वरा भंगू दे काठिण्य माझे माझे वाणी स्वच्छ होऊ दे व त्यातून साहित्य निर्मिती होऊ दे भाषेला द्रौपदी सारखे सत्व लाभू दे माझी भाषा सत्व टिकवणारी असू दे
जाऊ दे कार्पणनेमीचे दे धरु सर्वांशी पोटी
हे ईश्वरा माझ्या मनातील मीपणा नाहीसा होऊ दे सर्वांना आपलेसे करण्याची बुद्धी दे शास्त्राच्या कसोटीवर माझी भावना टिकू दे.
खांब दे इर्षेस
हे ईश्वरा माझ्या हिरसेस तुझा आधार असू दे तुझे ध्यान तुझे तप करण्याची इच्छा सतत माझ्यात वसु दे तुझे गुणगान करण्याची इच्छा सतत मनात टिकू दे माझ्या स्पंदनातून तुझ्या मुखाचे शब्द उमटू दे अशी इच्छा ते ईश्वराकडे व्यक्त करतात.
माझ्या हातातून जे काम होईल त्या कामा तून फक्त आणि फक्त तुझीच ओळख पटू दे माझे जे मन व चित्तवृत्ती नेहमी शांत असू दे अशा पद्धतीने ईश्वराकडे कवी प्रार्थना करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा