सोमवार, १५ जुलै, २०१९

कवी केशवसुत यांची *आम्ही कोण* ही कविता!या कवितेचे रसग्रहण मी करणार आहे.कवी केशवसुत या टोपणनावाने ओळखल्या जातात. त्यांचे संपूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले असे आहे. वडील केशव यांचा सुत म्हणजेच मुलगा म्हणून त्याना *केशवसुत*या नावाने ओळखल्या जातात. *तुतारी* ही त्यांची कविता अतिशय प्रसिद्ध आहे. थोर साहित्यिक म्हणून ख्याती मिळवलेले कवी म्हणजे केशवसुत!
     *आम्ही कोण* ही कविता म्हणजे साहित्यिकांचा महिमा वर्णन करणारी कविता आहे. कवीचा कल्पनाविलास किती अप्रतिम असू शकतो,हे त्यानी यात सांगितले आहे. कवी प्रतिभेच्या जोरावर कल्पनेनेच स्वर्ग,नरक या सगळ्या बाबी त्यानी निर्माण केल्या आहेत. कवीची दृष्टी दिशा आणि काळ यांच्या पलीकडे जाऊन पोहोचलेली असते. ते म्हणतात,देवाने आम्हास साहित्य रचण्यासाठी संपूर्ण पृथ्वी दिली आहे. एखाद्या वस्तूत अप्रतिम सौंदर्य भरणे,वस्तूतील फोलपणा ठरवणे,हे सर्व आमच्या पाणिस्पर्शाने म्हणजे हाताने होत असते. खरे तर राक्षस,देव  आहेत की नाहीत हे कोणाला खात्रीने माहीत नाही,पण आमच्या साहित्यातून आम्ही त्याला वास्तवरुप दिले आहे. आमच्या कृतीतून अमृत पाझरुन त्यातून सुंदर आणि मंगल आम्ही निर्माण करतो. म्हणून आम्ही देवाचे लाडके आहोत.आम्हाला जर जगातून वगळले तर या जगात सौंदर्यच उरणार नाही. लोकाना हे जीवन विरान वाटेल आणि त्यांचे जगणे हे कवडीमोल होईल,आकाशातील तारे हे निष्प्रभ  ठरतील. त्यामुळे आम्हा कलावंतांना आम्ही कोण असा प्रश्न विचारु नका. कलावंतांना वगळल्यावर या जगाला काहीही किंमत उरणार नाही,एवढे आम्ही अनमोल आहोत. कलावंतांचे श्रेष्ठत्व आणि अस्तित्व कवी केशवसुतानी अतिशय मार्मिक आणि प्रभावपूर्ण शब्दात वर्णिलेले आहे. कवीची स्वाभिमानी वृत्ती यातून आपणास प्रत्ययास येते. 
कवी आणि त्याची काव्यनिर्मितीबाबतचा सार्थ अभिमान कवी प्रस्तुत कवितेतून व्यक्त करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भंगु दे काठीन्य माझे - कवी बा.सी.मर्ढेकर

भंगु दे काठीन्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे येऊ दे वाणीत माझ्या सुर तुझ्या आवडीचे, राहू दे स्वातंत्र्य माझे, फक्त उच्चारांतले गा, अक्षरां आकार त...