मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

स्वाध्याय- अक्षरलेणी SL

स्वाध्यायासाठी प्रश्न
१. स्वामी चक्रधरांच्या उदारवृत्तीचे दर्शन 'ससीक रक्षण' या लीळेतून  कशाप्रकारे होते ते लिहा.
२. 'ससीक रक्षण' या लीळेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
३.  रामचंद्र अमात्य यांनी साहूकारांचे महत्व कशाप्रकारे विशद केले आहे?
४.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एलफिस्टन महाविद्यालयात आपल्या भाषणातून शिक्षणविषयक कोणते विचार मांडले ते स्पष्ट करा.
५. डॉ. मंदाकिनी आमटे यांनी साधनाताईच्या कोणत्या आठवणी सांगितल्या आहेत ते लिहा.
६. पायेंग जादव यास 'फॉरेस्ट मॅन'  का म्हटले गेले ते सविस्तर लिहा.
७. संत सावता महाराजांच्या 'समयाशी सावध व्हावे' या अभंगाचा भावार्थ लिहा.
८.माधव जुलियन यांनी आईच्या विरहव्याकुळ आठवणी कशा प्रकट केल्या आहेत?
९.मानवी जीवनातील व्यवहार ज्ञानाचा उत्कृष्ट नमुना शाहीर अनंत फांदीचा फटका हा काव्यप्रकार ठरतो. विशद करा.
१०. कवी वामनदादा कर्डकांनी कवितेतून मानवतेचा संदेश कशाप्रकारे दिलेला आहे?
११. प्रमाण मराठी लेखनाचे अनुस्वारविषयक नियम लिहा.
१२. विकारी शब्दांची माहीती सविस्तर लिहा.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भंगु दे काठीन्य माझे - कवी बा.सी.मर्ढेकर

भंगु दे काठीन्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे येऊ दे वाणीत माझ्या सुर तुझ्या आवडीचे, राहू दे स्वातंत्र्य माझे, फक्त उच्चारांतले गा, अक्षरां आकार त...