शनिवार, २७ जून, २०२०

मुलाखत - कथा

बीएड पास झालो, शिक्षक म्हणून एखाद्या शाळेत रुजू होण्याचे वेध मला लागले. आम्ही खोकडपुऱ्यात जुन्या थोरात निवास वाडयात नागेश आणि मी भाड़याच्या कळकट अन मळकट  रूममधे राहत होतो.  चांगली रूम करने परवड़नारं नव्हतं. मित्र नागेश संस्कार विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झालेला होता. रूम माळवदाची वरच्या मजल्यावर होती. जातांना अंधरया बोलीतून वाट काढत जावं लागायचं. तेथे एखादा बल्ब असावा तेव्हा कधीच वाटलं नाही.जवळ फारसे पैसेही असायचे नाही पण जगनं उत्सव वाटायचं. रोज आम्ही बलवंत वाचनालय, वाकडी लायब्ररी,  विवेकानंद कॉलेजमधे जाऊन सर्व मराठी पेपर जाहिरातीचे पान नजरेखालून घालायचो. आम्हाला कोणत्या पेपरला कोणत्या वारी जाहिरात पान असत पाठ झालं होतं. नोकरीची मला अत्यंत निकड होती. नागेश मला धीर द्यायचा. अत्यंत जीवाभावाचं नातं आम्हा दोघात खुप कमी काळात निर्माण झाले होते. आम्ही एकमेकांना म्हणायचो 'हे ही दिवस जातील' कधी कधी रात्री फिरुन आल्यावर स्वयंपाक करण्याचा खुप कंटाला यायचा. पण पोटातील कावले चुप बसु द्यायचे नाही. स्टोव्हवर ठेवून ठेवून खालून कालिकुट्ट झालेली कढ़ई आम्ही आतूनच धुवुन घ्यायचो. आमचा प्रसिद्ध मेनू खिचडी करायचो. एकाच ताटलित घेऊन खायचो. देविदास आमच्या मित्र आमच्या अघोषित पार्टनरच होता. तो जवळच मोठे बंधु सुभाष सरांकडे राहायचा. त्याने आम्हास खुप मदत केलेली आहे.
एके दिवशी लोकमत दैनिकात छोट्या जाहिराती सदरात जाहिरात शिक्षक पाहिजे म्हणून वाचली. दुसऱ्या दिवसी मुलाखत सातारा परिसरात असलेल्या अजिंक्य शिक्षण संस्थेत पत्ता शोधत साइकल वर पोहचलो.   शाळा  आठवी ते दहावी पर्यंतची होती. अनेकजन मुलाखतीला आलेले होते. तसं मुलाखत देण्याचा तिसरा चौथा अनुभव होता. भीती वाटत नव्हती. सर्व कागदपत्रे मूल व झेरॉक्स प्रतिसह घेऊन मी वेळेवर हजर  झालेलो होतो. मुलाखतीला आलेले मी सोडून सर्व लेडीज उमेदवार होते. आजही आपला नंबर लागत नाही असे वाटले कारण याआधी जेथेही मुलाखतीला मी गेलो तेथे महिला शिक्षिकेचा विचार व्हायचा कारण त्या कमी पगारात नोकरी पत्कारायच्या. तसेच जवळच्या परिसरातीलच असायच्या.
मुलाखत घेण्यापुर्वीच वर्गावर जावून एक पंधरा मिनिट शिकवायचे होते. त्यात उत्तीर्ण झाले की, मुलाखत घेणार होते. नागेश संस्कार विद्यालयात आधीच नोकरी करीत होता. त्याचे असे सांगणे होते की, शिकविण्याची वेळ आलीच तर व्याकरण घ्यायचे. तीन महिला शिक्षकेचे शिकविणे पाच पाच मिनिटात संपले. आता माझे नाव पुकारले अन मी ठेवलेले पुस्तक न घेता वर्गावर आत्मविश्वासाने व आनंदाने गेलो. वर्ग भरगच्च  होता. एका बाकावर तीन तीन मुलमूली बसलेल्या होत्या. माझ्या वेळीच लक्षात आले की, तिन्ही वर्गाची मुले एकत्र करून बसविली होती. मी मराठी व्याकरणातील अलंकार विचारांची हसत खेळत चर्चा केली. मुलाखतीत प्रश्ननास उत्तरे दिली. जेव्हा पगाराबाबत विचारले तेव्हा आढ़ेओढ़े घेत हजार रुपये महीना ठरले. जाउदया एकदाचि नोकरी तर मिळाली , पुन्हा दूसरी पहाता येईल असा विचार करून दुसऱ्या दिवसांपासून शाळेत रुजू झालो. मुलखतीचा अनुभव अविस्मरणीय राहिला.त्या राजर्षी शाहू विद्यालयाने नोकरी दिली. खुप नवे अनुभव दिले, हजार रूपयात भागात नव्हते, नागेशचे वडील विनायक पप्पा मात्र आमच्यासाठी आठवडयातून भाकरी, पोळया, बेसन, सिधा, प्रसाद, खारीक खोब्र्याचा कुट्टा घेऊन यायचे. आज ते नाहीत पण आमच्या घड़णीत त्याचा वाटा कायमच आहे.
प्रल्हाद भोपे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामस्वच्छता व ग्रामआरोग्याबाबत विचार प्रस्तावना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे युगदृष्टे पुरुष होते. एकूण ...