रविवार, २० जुलै, २०२५

आण्णासाहेब हरी साळुंखे

 

आण्णासाहेब हरी साळुंखे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigationJump to search
आण्णासाहेब हरी साळुंखे
Dr .A. H. Salunkhe at Nagpur in 2012.jpg
डॉ. आ. ह. साळंखे २०१२ मध्ये
राष्ट्रीयत्वभारतीय Flag of India.svg

डॉ. आण्णासाहेब हरी साळुंखे (जन्म : खाडेवाडी-सांगली जिल्हा,14 ऑक्टोबर , १९४३) हे मराठीतले लेखक, महाराष्ट्रातील एक विचारवंत, व्याख्याते आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक आहेत. ते सातारा शहरातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात संस्कृत विषयाचे ३१-५-२००३पर्यंत विभागप्रमुख आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे विद्याशाखेचे अधिष्ठाता (फॅकल्टी ऑफ आर्ट्‌सचे डीन) व ॲकॅडमिक काउन्सिलचे सदस्य होते. त्यांना राष्ट्रभाषा पंडित म्हणून गौरवण्यात आले होते.संदर्भ हवा ]

डॉ. आ.ह. साळुंखे यांनी मराठी विश्वकोशात तुलनात्मक धर्मशास्त्र, संस्कृत इत्यादी विषयांत १००हून अधिक लेख लिहिले आहेत. १९५९ पासून जाहीर रीत्या सभांमधून भाषणे देत असले तरी त्यांची महाराष्ट्रभर भटकंती आणि व्याख्याने १९८०-८१पासून सुरू झाली. त्या सुमारास साळुंखे यांनी चार्वाकावर लिहिलेली लेखमाला वाईच्या नवभारत मासिकात प्रकाशित झाली आणि दुसर्‍या बाजूने किर्लोस्कर मासिकाच्या जून १९८१च्या अंकात मराठा समाजावरील आत्मनिरीक्षणात्मक स्वरूपाचा गाजलेला लेख प्रसिद्ध झाला. त्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून फक्त किर्लोस्करकडे तीन पोती भरतील एवढी पत्रे आली होती. तेव्हापासून आ.ह. साळुंखे यांना अखिल महाराष्ट्रातून व्याख्यानांची आमंत्रणांवर आमंत्रणे येऊ लागली.संदर्भ हवा ]

४ ऑगस्ट २००९ला महाराष्ट्र सरकारने डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी समिती नेमली होती. या समितीत डॉ.आ. ह. साळुंखेंखेरीज वि.वि.करमरकर, प्रा.डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शफाअत खान, गिरीश गांधी, डॉ.अरुण टिकेकर, अशोक नायगांवकर, आमदार उल्हास पवार, प्रा.दत्ता भगत हे सदस्य होते. समितीने तयार केलेला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा २२-१-२०१० रोजी महाराष्ट्र सरकारला सादर केला. संमत झालेल्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठीही आ.ह. साळुंखे यांची नेमणूक करण्यात आली आहे.संदर्भ हवा ]

जीवन[संपादन]

डॉ. साळुंखे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील खाडेवाडी या लहानशा गावी एका शेतकर्‍याच्या कुटुंबात झाला. संस्कृत विषयात पहिल्या वर्गात प्रथम येत त्यांनी आपली पदवी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून घेतली. एम.ए.मध्येही त्यांनी संस्कृत विषयात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी १९८६मध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर इथे चार्वाक दर्शनाचा चिकित्सक अभ्यास ह्या विषयावरील पीएचडीसाठीचा प्रबंध सादर केला.[१]

वैयक्तिक[संपादन]

  • आ.ह. साळुंखे यांच्या पत्‍नीचे नाव मधुश्री. त्यांचे २५ एप्रिल २००० रोजी कॅन्सरने निधन झाले.
  • आ.ह. साळुंके यांचे चिरंजीव नीरज साळुंखे हे प्राध्यापक आणि लेखक आहेत.
  • दुसरे चिरंजीव राकेश यांची लोकायत ही प्रकाशनसंस्था, आ.ह. साळुंखे यांची पुस्तके प्रकाशित करते.संदर्भ हवा ]

आ. ह. साळुंखे यांची ग्रंथसंपदा[संपादन]

  • अंधाराचे बुरुज ढासळतील !
  • अशी भेटत रहा तू!
  • अस्तिकशिरोमणी चार्वाक
  • आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल
  • प्राईड ऑफ स्वराज्य : उमाजीराजे नाईक
  • एकलव्य
  • एकलव्य, शंबूक आणि झलकारीबाई
  • ऐतरेय ब्राह्मण : एक चिकित्सा
  • गुढी आणि शंकरपार्वती
  • गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो (पुस्तिका)
  • चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !
  • चार्वाकदर्शन (पुस्तिका)
  • चिंतन - बळीराजा ते रवींद्रनाथ
  • जीवनाची लय वेदनेत
  • तुकारामांचा शेतकरी
  • विद्रोही तुकाराम
  • विद्रोही तुकाराम : समीक्षेची समीक्षा
  • संत तुकारामांचे अभंगशतक
  • न सरे ऐसे तुकोबांचे दान
  • तुझ्यासह आणि तुझ्याविना
  • तुळशीचे लग्न : एक समीक्षा
  • त्यांना सावलीत वाढवू नका!
  • धर्म की धर्मापलीकडे?
  • ना गुलाम, ना उद्दाम
  • परशुराम : जोडण्याचे प्रतीक, की तोडण्याचे
  • परिवर्तन : शास्त्रही, कलाही
  • पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर
  • पोकळ आक्षेप विरुद्ध भक्कम भूमिका (डॉ. आ. ह. साळुंखे यांची मुलाखत)
  • बळीवंश
  • बहुजनांसाठी जीवनवादी सुभाषिते
  • तथागत बुद्ध आणि संत तुकाराम
  • बुद्धस्तोत्र
  • सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध
  • सर्वोत्तम भूमिपुत्र : आक्षेप (डॉ. आंबेडकरांची विचारधारा आणि लेखकाची भूमिका)
  • बुद्धांचे मंगलसुत्त
  • मन निरभ्र व्हावं
  • मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती (पुस्तिका)
  • महात्मा फुले आणि धर्म
  • महात्मा फुले आणि शिक्षण
  • महाभारतातील स्त्रिया भाग १
  • महाभारतातील स्त्रिया भाग २
  • महाभारतातील स्त्रिया भाग ३ (ना गुलाम, ना उद्दाममधून)
  • मित्रांना शत्रू करू नका !
  • वादांची वादळे
  • वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (पुस्तिका)
  • शंबूकहत्या आणि सीतात्याग प्रक्षिप्त (पुस्तिका)
  • शंभर कोटी मेंदू, दोनशे कोटी हात
  • शिवराय : संस्कार आणि शिक्षण
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक
  • संवाद - सहृदय श्रोत्यांशी
  • हिंदू संस्कृती आणि स्त्री
  • हृदयातून हृदयाकडे
  • जिज्ञासापुरुष : ह्युएनत्संग

साळुंखे यांनी मराठीमध्ये अनुवादित केलिली पुस्तके[संपादन]

  • के. सच्चिदानंद यांचे नागार्जुन (मूळ संस्कृत) इंग्रजीमधून मराठीत
  • कर्तारसिंग दुग्गल यांचे शीख धर्मातील निरपेक्ष जाणिवा (मूळ इंग्रजी)
  • एरिख फ्रॉम याचे स्वातंत्र्याचे भय(मूळ इंग्रजी)
  • लाटकरशास्त्री यांचे शाहूचरतिम्(मूळ संस्कृत)

पुरस्कार, मानसन्मान, भेटवस्तू वगैरे[संपादन]

  • ७ फेब्रुवारी १९९९ रोजी बाबूराव बागूल यांच्या संमेलनाध्यक्षपदी मुबईत धारावी येथे झालेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक
  • रा.ना. चव्हाण प्रतिष्ठान(वाई)चा महर्षी वि.रा. शिंदे पुरस्कार (१०-४-१९९९)
  • जुलै १९९९मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे आयोजित केलेल्या यज्ञविरोधी परिषदेतील एक वक्ते. अन्य वक्ते डॉ. श्रीराम लागू व डॉ. नरेंद्र दाभोलकर.
  • सांगली जिल्ह्यातील वाळवे गावाचे क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी यांच्या हस्ते, कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनामध्ये कार्यकर्त्यांच्या पैशातून घेतलेल्या मारुती व्हॅनची भेट (१४-१०-१९९९). (या गाडीने डॉ. आ.ह. साळुंखे यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने देण्याच्या निमित्ताने २० वर्षांत ४० हजार किलोमीटर प्रवास केला.)
  • २४-२५ एप्रिल१९९९ या काळात जळगाव येथे गंगाधर पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिवर्तन साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक.
  • १७-१९ डिसेंबर १९९९ या काळात सातारा येथील आंबेडकर अकादमीतर्फे बेळगाव येथे आयोजित केलेल्या ’संस्कृती आणि इतिहास’ या विषयावरील विचारवेध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • ८-९ जुलै २००० या काळात मराठा सेवा संघाने अमरावती येथे आयोजित केलेल्या पहिल्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
  • छत्रपती प्रतापसिंहराजे महाराज (थोरले) यांच्या त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सातारा नगरपालिकेने दिलेला पुरस्कार (१९-१-२०१०)
  • मारवाडी फाउंडेशनच्यावतीने प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणारा 'प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार' (नोव्हेंबर २०११)
  • बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने बीड जिल्ह्यातील केज येथील पहिल्या बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२४-११-२०१२).
  • वाशीम येथे झालेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या तिसर्‍या राष्ट्रीय महिला अधिवेशनात प्रमुख वक्ते म्हणून सहभाग (२९-११-२०१२).
  • पुणे येथे झालेल्या ३र्‍या अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष (१६-१७ फेब्रुवारी २०१३).
  • पुण्यात झालेल्या पुणे महापालिका आयोजित पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. (२४-२-२०१३)
  • महाराष्ट्र शासनाचा दोनदा डॉ. आंबेडकर पुरस्कार
  • सामाजिक कृतज्ञता निधीचा डॉ. राम आपटे पुरस्कार
  • पंढरपूरच्या कैकाडी मठाचा पुरस्कार
  • बीड येथील पिंगळे वाचनालयाचा महात्मा फुले पुरस्कार
  • तीन वेळा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
  • शिवाजी विद्यापीठाचा पुरस्कार
  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य पुरस्कार
  • मुंबईच्या अश्वघोष आर्ट्‌स ॲन्ड कल्चरल फोरमतर्फे ‘महाकवी अश्वघोष जीवन गौरव पुरस्कार’ (मे २०१६)
  • १२ डिसेंबर २०१५ रोजी रहिमतपूर (ता. कोरेगाव जि. सातारा) येथे संपन्न झालेल्या रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 

मराठाभूषण डॉ.आ.ह.साळुंखे

प्राच्याविद्यापंडित विद्वान डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त प्रासंगिक लेख…

डॉ.आ.ह.साळुंखे सरांचा जन्म १ जून १९४३ रोजी शिवाजीनगर (खाडेवाडी) ता.तासगाव जि.सांगली येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून त्यांनी एम. ए. (मराठी), एम. ए. (संस्कृत) व पी. एच.डी. (संस्कृत) या पदव्या मिळवल्या.

कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद संस्थेच्या सातारा येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात ३२ वर्ष संस्कृत मराठीचे अध्यापन कार्य केले. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व वाङ्‌मय विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून दिलेले योगदान अत्यंत महत्वाचे आहे.

मानवी समूहाला दिशादर्शक ठरणाऱ्या साठ ग्रंथांचे लेखन करुन आह सरांनी इतिहास निर्माण केला आहे. त्यांनी अनेक ग्रंथांची भाषांतरेही केली आहेत. विचारवेध संमेलन (बेळगांव), सत्यशोधक साहित्य संमेलन (लातूर), विद्रोही साहित्य संमेलन (सोलापूर), सत्यशोधक समाजाचे ३५ वे अधिवेशन (गेवराई), शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेचे १३ वे अधिवेशन (आटपाडी) इत्यादी संमेलनाची अध्यक्षपदे त्यांनी भूषवली आहेत.

मराठी विश्वकोषात संस्कृत आणि तुलनात्मक धर्मशास्त्र या विषयावर सुमारे शंभर लेख लिहून सांस्कृतिक परिवर्तनाचा पाया त्यांनी घातला आहे.

डॉ.आ.ह.साळुंखे

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचे शिल्पकार, धर्म व संस्कृतीचे अभ्यासक, संतवाङ्‌मयाचे भाष्यकार, स्त्री सन्मानाचा संस्कार घडविणारे थोर शिक्षक, लालित्यपूर्ण व प्रासादिक भाषाशैली असलेले साहित्यिक इ. अनेक पैलू असलेले प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे.

भारतभर तसेच भारताबाहेरही असलेल्या बुद्ध विचारांच्या खुणा शोधून सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणून तथागत गौतम बुद्धाची ओळख करवून देणारे बुद्ध चरित्रकार, धर्म की धर्मापलिकडे हा संभ्रम नाहीसा करून आस्तिक शिरोमणी म्हणून चार्वाकांना संबोधणारे प्रबोधनकार, हिंदू संस्कृतीतील स्त्रियांचे स्थान शोधणारे संशोधक, मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती आणि वैदिक धर्मसूत्रांद्वारे बहुजनांची गुलामगिरीची केलेली कृती याविषयीची रहस्ये उलगडून दाखविणारे अभ्यासक, गुलामांचा आणि गुलाम करणाराचा धर्म एक नसतो हे ठणकावून सांगणारे स्वातंत्र्ययोद्धे, बळीवंशाची खरी ओळख समाजाला करवून देणारे इतिहासकार, जगतगुरु संत तुकारामांच्या विद्रोहाचे स्वरूप समजावून सांगणारे सत्यशोधक , भारतातील तात्विक संघर्षाचे सूत्र मांडणारे तत्त्वचिंतक इत्यादी नात्यांनी ते परिचित आहेत.

ऋजुता, नम्रता, प्रगल्भता, संयम इत्यादी गुणांचा संगम असलेले प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येकाला आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे सहजपणे सापडतात.

संस्कृत साहित्याचा सखोल व्यासंग असूनही पांडित्य प्रदर्शनाचा सोस नसणारे विद्वान म्हणून त्यांचा लौकिक आहे. महाराष्ट्रभर व्याख्यानांच्या निमित्ताने त्यांच्या प्रासादिक वाणीचा लाभ अनेकांना होत असतो. तसाच तो देशातील अनेक राज्यांतील तसाच देशांबाहेरील श्रोत्यांनाही होतो.

बुद्धाची परिव्राजक वृत्ती आणि तुकारामांची सहृदयता यांचा मेळ असलेल्या त्यांच्या व्यक्तित्वातून बुद्ध व तुकारामांमधील सामरस्य प्रतीत होत असते. वारकरी धर्मातील बुद्ध विचारांचा धागा त्यांनी स्पष्ट केल्यामुळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सामंजस्य संस्कृतीला उजाळा मिळालेला आहे.

लोकायत प्रकाशन सातारा

सामाजिक शोषणाच्या विरुद्ध दंड थोपटून उभे राहणारे महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या धर्मविचारांचे वारस म्हणून त्यांनी जसे त्यांचे नाते चार्वाकांशी जोडले तसेच कुलस्वामी बळीराजाशीही. शेतकाऱ्यांविषयी कळवला असणाऱ्या तुकोबारायांची तलमलयांनी त्यांच्या सशक्त शब्दांमधून अभिव्यक्त केली.

थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्फत सोन्याच्या नांगराने या पुण्यनगरीचे पुनर्निमान केलेले आहे.

आह सर छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा वैचारिक वारसा पुढे चालवत आहेत. त्यांनी केलेल्या उत्तमोत्तम लेखन व संशोधनाने एक पिढी घडवली आहे व प्रकाशित पुस्तकांच्या माध्यमातून पुढील पिढी घडत आहे. हे विशेष आनंदाचे आणि अभिमानाचे आहे.

आजच्या वर्तमानाच्या संदर्भाने आह सरांच्या ज्ञान व अनुभवांतून प्राप्त होणारे मार्गदर्शन तरुणांसाठी आदर्श आहे. वर्तमान सामाजिक परिस्थितीत त्यांचे विचार दिशादर्शक आहेत. समाजाला बुद्ध, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर या साखळीत जोडणारा दुवा म्हणुन त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. सरांनी चालविलेली ही माणसं जोडण्याची परंपरा कायम ठेवण्याची जबाबदारी आज आपल्यावर आहे.

साभार – मा.विकास पासलकर.

© लोकराज्य टीम.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

संविधान सभेतील बाबासाहेबांचे अंतिम भाषण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील अंतिम भाषण (२६ नोव्हेंबर १९४९) – सारा...