रविवार, २ नोव्हेंबर, २०२५
स्वप्नाची समाप्ती - कुसुमाग्रज
शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५
आमुची मायबोली- माधव ज्युलियन
बुधवार, १० सप्टेंबर, २०२५
सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५
शीगवाला / नारायण सुर्वे
शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५
कोलंबसचे गर्वगीत
कुसुमाग्रजांचा कोलंबस !
- Dr. Vishvadhar Deshmukh
अजूनही लक्षात आहे ती तारीख. 08 जानेवारी 2004. सकाळची 7 वाजून 50 मिनिटे झाली होती. कोचिंग क्लासमधला पहिला तास सुरू होता. तास सुरू होऊन वीस मिनिटे झालेली; तास चांगलाच रंगात आला होता. तितक्यात निरोप आला,‘आई गेली!’ जवळपास सहा वर्षांपासून तिच्या कर्करोगावर उपचार सुरू होते; पण सहा महिन्यांपूर्वीपासून तिचे उपचाराला प्रतिसाद देणे मंदावत गेले म्हणजे ती आता फार काळ जगू शकणार नाही, हे तसे स्पष्टच होते…तरीही ‘ती होती’ हा आधार खूप मोठा होता आणि आता ‘आई नाही’ ही गोष्ट पोटात हजारो फुटांचा खड्डा पाडून गेली. तीव्र अशा वेदनेचा उमाळा दाटून आला आणि गहिवरून गेल्याने सगळे पाश तोडून हुंदका ओठापर्यंत वेगाने आला. पण मी रडलो नाही, साडेआठ वाजेपर्यंत रडलो नाही. न दुःख दिसू दिले न हुंदक्याला ओठाबाहेर वाट मोकळी करून दिली…हे कसे घडले? आई या साध्या शब्दाने जिथे माझ्या भावनेचा बर्फ वितळतो तिथे पाऊन तास मी माझे दुःख गोठवून ठेवले ते कुणाच्या बळावर?
याचे उत्तर आहे कोलंबस! त्या दिवशी दहावीच्या वर्गात कुसुमाग्रजांची ‘कोलंबसाचे गर्वगीत’ ही कविता शिकवत होतो. संकट असो वा दुःख, ते भले आपल्यावर हजार जिव्हांनी चाल करून येईल…पण आपण मात्र डगमगायचे नाही हा लढाऊ बाणा शिकवणारा ‘प्रेरणापुरुष’ माझ्यासोबत होता, म्हणून बहुदा आई गेल्याच्या वेदनेनंतरही माझ्या भावनेचा बांध फुटला नाही.
…कोलंबस. पूर्ण नाव ख्रिस्तोफर कोलंबस. जन्मगाव जिनोवा. मध्य व दक्षिण अमेरिका शोधणारा दर्यावर्दी. इसवी सन 1451 ते 1506 हा त्याचा कालखंड. साध्या वीणकराचा मुलगा. आर्थिकदृष्ठ्या यथातथा. शिक्षण घेता-घेता वडिलांना व्यवसायात मदत करणे ही त्याची दिनचर्या; पण लहानपणापासूनच वृत्तीने धाडसी, बुद्धीने चौकस. समुद्राचे अपार आकर्षण आणि सतत काहीतरी शोधण्याची ओढ…. यातून त्याने नौकानयनाचे शिक्षण घेण्यासाठीची धडपड सुरू केली. अगदी वयाच्या चौदाव्या वर्षी फ्रेंच चाच्यांसोबत तो बोटींवर जायला लागला.
समुद्राचे आकर्षण आणि अज्ञात गोष्टींचा वेध घेण्याची त्याची वृत्ती त्याला स्वस्थ बसू देईना; म्हणून मग आपली प्रेयसी फिलीपाच्या गव्हर्नर असलेल्या वडिलांना मध्ये घालून त्याने पोर्तुगालच्या राजदरबारात प्रवेश मिळवला आणि त्यांच्यासमोर त्याने 1484 मध्ये भारतात जाण्याची कल्पना मांडली. पण मध्ययुगीन मानसिकतेच्या दृष्टीने ही कल्पनाच इतकी अजब होती की ती राजाच्या सल्लागारांच्या काही पचनी पडली नाही आणि त्यांनी कोलंबस व त्याची ही अजब कल्पना दोघांचीही यथेच्छ टर उडवली.
पण प्रतिकुलतेने निराश होईल,तो कोलंबस कसला? पुन्हा एकदा या कल्पनेचे बारीसारीक तपशील त्याने जमा केले आणि आता स्पेनचा राजा फेर्दिनांद व राणी इसाबेला या दोघांपुढे आपल्या धाडसी मोहिमेची कल्पना नव्याने मांडली. खरेतर ही कल्पना राजा-राणीच्या गळी नीटपणे उतरली नव्हती, पण कोलंबसाचे झपाटलेपण इतके दिपून टाकणारे होते की, त्यामुळे या मोहिमेला त्यांनी हिरवा कंदील दाखवला.
या झपाटलेपणातून कोलंबसने 3 ऑगस्ट 1492 ते 1504 या काळात चार महत्वाकांक्षी मोहिमा आखल्या. काही नवी बेटे आणि काही नवे भूप्रदेशही शोधून काढले. आणि अखेर इस.1506 मध्ये संधीवाताच्या आजाराने अवघ्या पंचावन्नाव्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.
इतिहासाच्या पुस्तकात त्याची माहिती मिळते ती इतकीच. पण कुसुमाग्रजांनी मात्र आपल्या कवितेतून इतिहासातील निर्जीव तपशीलांत जणू नवे प्राण फुंकून विलक्षण जिद्दी, करारी, धाडसी अशी कोलंबसाची व्यक्तिरेखा उभी केली आहे.
मराठी कवितेच्या इतिहासात कुसुमाग्रजांची ओळख ‘क्रांतिकवी’, ‘अग्निसंप्रदायाचे प्रवर्तक’ अशी आहे. नारायण सुर्वे यांनी आपल्या या समकालीन कवीचे मोठेपण नोंदवताना म्हटले आहे, ‘…कुसुमाग्रजांच्या कवितेचा केंद्रबिंदू माणूस हाच आहे. माणसावर आणि त्याच्या कर्तृत्वावर इतका अदम्य विश्वास असलेला कवी मराठीत दुसरा नाही.’ संकटांनी वेढलेल्या, दुःख-दैन्याने ग्रासलेल्या माणसाच्या ऐहिक जीवनाला सतत भव्यतेची आणि दिव्यत्वाची ओढ असायला हवी, हा भाव त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. विशेषतः ‘विशाखा’ या संग्रहातील त्यांची कविता अशा अलौकिकत्वाचे सूक्त आळविणारी आहे.
कुसुमाग्रजांचा कोलंबस आकाराला आला आहे तो कर्तृत्वावरील याच अदम्य विश्वासातून. म्हणून तर ज्या समुद्राचे त्याला लहानपणापासून अपार आकर्षण आहे, तोच जेव्हा त्याच्या रोरावणार्या लाटांनी कोलंबसाच्या मोहिमेचा मार्ग अडविण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या लाटांच्या उंचीपेक्षा नव्या वाटा शोधण्याची माणसाची जिद्द मोठी असते, तेव्हा त्याला ठणकावून सांगतो,
‘हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या
समुद्रा, डळमळू दे तारे
विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे
ढळू दे दिशाकोन सारे’
एकवेळ आकाशातले तारे डळमळू दे, किंवा वाटेत विराट वादळाने पाण्याचे पर्वत उभे करू देत, मी ही मोहीम अर्ध्यावर टाकून परत फिरणार नाही. एकीकडे खवळलेला समुद्र आणि दुसरीकडे आकाशातून विजांच्या कडकडाटांसह प्रमत्त सैतानासारखा तांडव करणारा पाऊस भल्याभल्यांची पाचावर धारण बसायला ही परिस्थिती पुरेशी, पण छे, कोलंबस कशाचा विचलित होतोय, उलट उधाणलेल्या समुद्राच्या डोळ्यांशी डोळा भिडवून तो विचारतो,
‘ताम्रसुरा प्राशुनी मातु दे दैत्य नभामधले
दडू द्या पाताळी सविता
आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला
कराया पाजळू दे पलिता’
माथ्यावर नभ फुटू दे, नाहीतर उल्का कोसळू दे, आपल्या ध्येयपथावरून बाजूला हटायचे नाही, यासाठी स्वतःवर किती दृढविश्वास असावा लागतो. बरे इथे प्रश्न फक्त कोलंबसाचा एकट्याचा नाही. तो काही एकटा ‘आउटिंग’ करण्यासाठी बाहेर पडलेला नाही. तो या मोहिमेचा कर्णधार आहे, चार प्रवासी जहाजे आणि नव्वद खलाशांना सोबत घेऊन नवीन प्रदेशाच्या शोधासाठी तो या सफरीवर निघालाय. हा मध्ययुगीन कालखंड आहे. ना दळणवळणाची साधने आहेत, ना संपर्काची माध्यमे. आणि त्या काळात 3 ऑगस्ट 1492 ला कोलंबस या मोहिमेवर निघालाय, पण ऑगस्ट आणि सप्टेंबर संपला तरी नवा भूप्रदेश काही नजरेच्या टप्प्यात यायला तयार नाही. तेव्हा सोबतचे खलाशी हताश झाले. त्यांना यात यशाची शक्यता दिसेना. त्यांची चलबिचल सुरु झाली, परतीच्या प्रवासाचे खयाल त्यांच्या मनात गर्दी करायला लागले.
इथे कोलंबसाच्या समोर निर्वाणीचा पेच निर्माण झाला. समुद्र खवळलाय,आकाश फाटावे तसा सैतानी पाऊस कोसळतोय, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यांनी वातावरण भेसूर झालंय आणि त्यात आपले सहकारी गर्भगळीत होऊन परतीची भाषा बोलताहेत. अशावेळी समुद्राशी झटापट करणार्या कोलंबसाची ‘लीड फ्रॉम फर्स्ट’च्या जातकुळीतली लिडरशीपच नजरेत भरते.
निराश, खिन्न आणि निरुत्साही झालेल्या आपल्या सहकार्यांमधले ‘लढाऊपणाचे स्पिरीट’ तो ज्या भाषेत जागे करतो, ती भाषा आपणाला रोमांचित करते. तो त्यांना थेट त्यांच्या जन्मप्रयोजनाचे स्मरण करून देतो. आपला बाणा काय आहे, याची आठवण करून देतो आणि इथून अपयश हाती घेऊन परत आपल्या देशी गेलो तर जो अपमान सोसावा लागेल, त्याचे चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर उभे करतो. पराभूत होऊन परत फिरण्यापेक्षा जलसमाधी घेऊन स्वतःला समर्पित करण्यामध्ये ‘खरा पुरुषार्थ’ असल्याचे सांगून त्यांच्या कर्तृत्वाला आवाहन करतो,
‘काय सागरी तारू लोटले परताया मागे
असे का हा अपुला बाणा
त्याहून घेवू जळी समाधी सुखे, कशासाठी
जपावे पराभूत प्राणा.’
मध्य समुद्रात आपल्या सहकार्यांना ‘नाविकधर्मा’ची स्मृती करुन देणारा कोलंबस आणि कुरुक्षेत्रात अर्जुनाला ‘क्षात्रधर्मा’ची आठवण करून देणारा कृष्ण या दोघांचा देश, काळ आणि परिस्थिती भले वेगळी असली तरी आपल्या सहकार्यांतले ‘फायटिंग स्पिरीट’ जागृत करण्याची दोघांची शैली मात्र सारखीच !
लढाऊ बाणा न दाखवता आपण परत फिरलो तर कोट्यवधी किडामुंगींसारखे क्षुद्र होऊन मरण येण्याची पाहत जगत राहणे आपल्या वाट्याला येईल. उलट आपल्या ‘कर्तव्या’चे भान ठेऊन लढण्याचा पर्याय निवडला तर मात्र ‘नवी क्षितिजे निर्माण करण्याचे’ कर्तृत्व आपल्या नावावर नोंदविले जाईल.
‘आपण स्वतःच्या क्षमतेला कसे मोजतो?’ ही आयुष्यातली सगळ्यात मूलभूत निवड असते. खरेतर ध्येयमार्गावर चालण्यापासून आपणाला पैसा, पत्नी किंवा उंबरठा…हे क्षणभरीचे मोह आपणाला अडवणारे नसतात. आपल्यातली सगळ्यांत मोठी ताकद आपणच असतो आणि वाटेतला सगळ्यात मोठा गतिरोधकही आपण स्वतःच असतो. म्हणून स्वतःला धोंडा मानायचे की ध्वज ते आपले आपणालाच ठरवायचे असते.
‘आधी केले आणि मग सांगितले’ या कॅटेगरीतले हे कोलंबसाचे तत्वज्ञान. वयाच्या चौदाव्या वर्षांपासून त्याने विक्राळ समुद्राला आपल्या अंगाखांद्यावरून खेळविले. नव्या प्रदेशाच्या ओढीने हजारो रात्री कुर्बान केल्या. मोहिमेच्या स्वप्नाला शेकडो लोकांसोबत वाटून घेतले. आणि आता तब्बल साठ दिवस खर्चून मोहीम ऐन भरात असताना समुद्राने सामोरे येण्याची आणि सहकार्यांनी पळून जाण्याची भाषा करावी, हे कोलंबसाच्या प्रकृतीला पचनी पडणारे नाही. म्हणून तर तो एकीकडे रोरावत अंगावर चाल करून येणार्या समुद्राला शड्डू ठोकून आव्हान देतो तर दुसरीकडे सहकार्यांना त्यांच्या कर्तव्याचे स्मरण करून देऊन लढत राहण्याचे आवाहन करतो :
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला !
समुद्र असेल वा अन्य कोणतेही संकट, ते थेट पुढे येऊन उभे ठाकले की भयानक भासायला लागते. पण माणसाची ध्येयासक्ती आणि आशावाद यांच्या चष्म्यातून त्याच्याकडे पाहिले की ते त्याचे छोटेपण लक्षात यायला लागते.
कोलंबसाने प्रत्येक संकटाकडे असे आशावादाचा दीप हाती धरून ध्येयाच्या ध्यासाने पाहिले आणि ही ‘दर्यावर्दी दृष्टी’ आपल्या सहकार्यांमध्येही संक्रमित केली म्हणून तर आपल्या पंचावन्न वर्षांच्या अल्प आयुष्यातही ‘सॅन साल्वादोर’,‘क्युबा’,‘डॉमिनिका’,‘माँटेसराट’,‘अँन्टिग्वा’,‘रेडोंडा’, ‘नेवीस’,‘सेंट कीट्स’,‘मार्टिनिक’ अशी बेटे आणि ‘इसाबेला’,‘होन्डुरास’,‘निकाराग्वा’,‘कोस्टारिका’ आणि ‘पनामा’ असे प्रदेश शोधले.
आपल्याच मर्यादेत कैद होऊन खितपत पडलेले कितीतरी ‘चौकट राजे’ आपण सभोवताली पाहत असतो; म्हणून ‘अनंत अमुची ध्येयासक्ती,अनंत अन् आशा’ हे सांगून क्षितिजापलीकडचे अज्ञात प्रदेश शोधण्याची प्रेरणा देणारा कोलंबस स्पेनसारख्या एका देशापुरता मर्यादित राहत नाही, तर पाहतापाहता स्वतःच्या स्वप्नांसारखाच असीम आणि अनंत होत जातो आणि कधी कुसुमाग्रजांसारखा क्रांतिकवी तर कधी माझ्यासारखा शांत शिक्षक यांना अखंड प्रेरणा देत राहतो.
असे म्हणतात की जवळपास अडीच महिन्यांनंतरच्या कष्टप्राय मोहिमेनंतर जेंव्हा पहिल्यांदा ‘नवा प्रदेश’ दिसला तेव्हा जणू समुद्राची भरती कोलंबसच्या डोळ्यांत दाटून आली …..
गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५
सत्य सर्वांचे आदी घर - महात्मा जोतीराव फुले
बुधवार, २० ऑगस्ट, २०२५
' माझी कन्या '
'माझी कन्या' कवितेचा भावार्थ
कवी बी यांचा परिचय
नारायण मुरलीधर गुप्ते (१८७२-१९४७) 'बी' या टोपणनावाने काव्यलेखन. अव्वल इंग्रज काळातील मराठीतील एक महत्त्वाचे कवी. त्यांचा जन्म विदर्भातील मलकापूर या गावी झाला. सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक अशा विविध विषयांवर त्यांनी काव्यलेखन केले. कवी केशवसुतांनंतरचे एक महत्त्वाचे कवी म्हणून त्यांची ओळख आहे. तेज आणि स्फूर्तीने भरलेली त्यांची कविता नव्याजुन्या रचनावैशिष्ट्यांनी समृद्ध झालेली आहे. 'फुलांची ओंजळ', 'पिकले पान' हे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध. त्यांनी कवितेसोबतच गद्यलेखनही केले आहे. काव्यरसिकांना मंत्रमुग्ध करण्याचे सामर्थ्य त्यांच्या काव्यात आहे. ऐतिहासिक कथाकाव्य लोकप्रिय करणारे, दीर्घ कविता लिहिणारे कवी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. शालेय व विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या कवितांचा समावेश झाला आहे. तत्त्वचिंतन, आध्यात्मिक दृष्टी, विचारशीलता, शब्दवैपुल्य व रचनावैविध्य हे त्यांच्या कवितेचे विशेष होत. गरिबीमुळे अपमानित झालेल्या मुलीची समजूत काढताना पितृहृदयातील वात्सल्यभाव प्रस्तुत कवितेत प्रकट झाला आहे. पिता आणि मुलगी यांच्यातील हा भावनिक नातेबंध लक्ष वेधून घेणारा आहे.
कवी बी यांच्या गाजलेल्या रचनेतील एक कविता म्हणजे माझी कन्या होय. ही कविता गेल्या तीनेक पिढ्यांना तरी चांगलीच ठाऊक आहे. एका छोट्याशा मुलीला तिच्या वर्गातील काही मुली 'भिकारीण' म्हणून चिडवतात. त्यामुळे ती घरी येऊन स्फुंदूनस्फुंदून रडते आहे आणि तिचे वडील तिची समजूत काढताहेत, अशा कल्पनेतून कविने ही कविता लिहिलेली आहे. थोडक्यात हा स्वानुभव नसून कवीची नित्याच्या अवलोकनातून जन्मलेली प्रतिभा आहे.
शोकाने रडणाऱ्या आपल्या लहानग्या मुलीला पाहून पिता तिला विचारतो,
गाइ पाण्यावर काय म्हणुनि आल्या?
का ग गंगायमुनाहि या मिळाल्या?
उभय पितरांच्या चित्त चोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला?
खरेतर मुलीने घरी आल्याआल्याच वर्गात काय घडले? कोण काय बोलले? ते सांगितलेले असणार. जसे लहान बाळाला काही लागले की, आपण माहीत असताना त्याचे लक्ष वळविण्यासाठी विचारतो की, 'काय लागले? कोठे लागले?' हेतू हाच की बाळाचे लक्ष इतरत्र वळवून रडणे थांबवावे. तसेच कवितेतील वडील मुलीला विचारतात. त्या बोलण्यात मिश्किलतेची नाजूक छटा ही आहे. म्हणूनच तू का रडतेस असे सरळ न विचारता? डोळ्यातून ओघळणाऱ्या आसुंना तो गंगायमुना संबोधतो. सोबतच ती मातापित्याची चित्तचोरणारी आहे, असे सांगत तिचे नि त्याचे लडिवाळ नाते व्यक्त करतो. येथे तो तिला गोरटी असे म्हणतो. कारण प्रत्येक माता पित्याना आपली मुलं कशी का असेना सुंदरच वाटत असतात. हा भाव कळत नकळत त्यातून व्यक्त होतो. त्याच तंद्रीत तो तिला बोलतो, ' नाकातून उष्ण वारे वाहताहेत, लाल झालेल्या गालावर ओघळून ते अश्रू सुकलेले आहेत. कोण माझ्या छबेलीला बोलले बरे?' असे पुन्हा विचारतो. या कडव्यात कविने नाक व गाल यांना अनुलक्षून वापरलेले नासिक व काश्मीरचे रूपक केवळ मनोहर नि चित्तवेधकच नाही तर मराठी कवितेचे लेणे ठरलेले आहे.
लिहितो,
"गावि जातो" ऐकता त्याच काली,
पार बदलुनि ती बाल सृष्टी गेली!
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येते मी" पोर अज्ञवाचा !
या अत्यंत मधूरतम पंक्ती कवी लिहितो. यात रेशमाचा करपाश ही कल्पनाच अद्भुत आहे. ह्या शेवटच्या कडव्यात कविने बाल मनाची निर्व्याज्यता सहज पकडत बाल मानसशास्त्राची जाण अचूक टिपली आहे.
ह्या कवितेकडे पाहताना कित्येकांना वाटत असते, ही कवीच्या घरात घडलेली, कविने अनुभवलेली घटना असावी. पण ते खरे नाही. हा कवीचा केवळ कल्पनाविलास आहे, अनुभव नाही. अनुभवाविण जर कोणी कवी इतकी उंच तरीही सत्य वाटणारी झेप घेत असेल तर त्यांच्या काव्याची प्रत अत्युच्च दर्जाची आहे असेच म्हणावे लागेल.
जाता जाता हे ही सांगावेसे वाटते की, कवीच्या ही कविता त्याच्या इतर कविता प्रमाणे मत मतांतरात अडकलेली नसून अर्थदृष्ट्या अत्यंत सरळ, सुगम, सहज असून ही अत्यंत उच्च कोटीची ठरलेली आहे.
तिच्या डोळ्यातून घळघळ गळणाऱ्या अश्रूचे टपोरे थेंब पाहून तो त्यांना नक्षत्रांची सुरेख उपमा देतो. ते जमिनीवर पडल्याने उत्पात घडून येईल, असे म्हणत तिचे लक्ष पुन्हा एकदा इतरत्र वळवू पाहतो. आणि मग स्वत: च मूळ कारणावर येत तो बोलतो, 'तुझ्या वर्गातील विभा, विमला या श्रीमंताच्या मुली सजून धजून वर्गात आल्या आणि तुला साध्या कपड्यात, बिना अलंकाराच्या पाहून 'अहा ! आली ही पहा भिकारीण !' बोलल्या एवढेच ना? अगं, त्यांचे बोलणे एवढे का मनावर घ्यायचे? शाळेतल्या मुली चटोरच असतात. एकमेकींना भीडभाड न बाळगता काहीही कठोर बोलून टाकतात. पण त्यांचे बोलणे मनात धरायचे नसते. त्यातला त्यात समजदार मुलांनी तरी त्या बोलण्याला किंमत द्यायची नसते.' बापाचे मुलीला हे सांगणे नीट बघितले तर लक्षात येते, तो त्या मुलींना नावं ठेवत नाही, मी त्यांना पाहून घेईल अशी भाषा वापरत नाही, तर आपल्या मुलीची सहनशीलता वाढविण्यावर भर देतो. हे त्याच्यातील समंजस पालकाचे दर्शन घडविणारे आहे.
पुढल्या कडव्यात तिला समजाविताना तो म्हणतो..'रत्न सोने मातीतून मिळतात पण त्याला मोठे मोठे राजे महाराजे मस्तकावर धारण करतात. कमळ चिखलात जन्मते, पण सत्कारप्रसंगी तेच वापरले जाते. अर्थात् मूळ पाहिले जात नाही तर कोण किती मोठे ते त्याच्या कर्तृत्वावर नि गुणवत्तेवर अवलंबून असते. हे सांगतानाच चिखलामुळे कमळाची किंमत कमी होत नसते, धुळीत जन्मलेल्या हिऱ्याची किंमत कमी होत नसते. मग माझ्यामुळे तुझी किमंत थोडीच कमी होणार आहे?' असे समजावत तो तिला मौल्यवान तर स्वतःला क; पदार्थ गणतो. तुझ्या नशीबाची कमान चढतीच राहणार आहे. तुझ्यासारख्या मुलामुलीतूनच उद्याचे महान नरनारी उदयाला येणार आहेत, याची निश्चिती देतो.
तो तिला सांगतो तुझ्याकडे रूप अन् गुण या गंगायमुना आहेत. ज्याप्रमाणे गंगा यमुनाच्या संगमात सरस्वती गुप्त रूपाने वास करत असते. तसेच जिथे रूप गुणांचा संगम असतो, तेथे भाग्य हमखास वास करत असते असा आशावाद व्यक्त करतो.
नकळत त्याला आपल्या छोट्या मुलीच्या रुपसौंदर्याची जाणीव होऊ लागते, व तो म्हणतो, 'तुझ्या नेत्रगोलातून जेंव्हा जिज्ञासा दाखविणारे बालकिरण येऊन मुखावर आनंदाचे भाव उठवतात. तेंव्हा ते त्यांच्यापुढे हिरे मोती ही फिके वाटतात. हसताना तुझ्या गालावर जी खळी पडते त्यातून तुझे सौंदर्यच उसळून वर येते.' हे वर्णिताना कवी लिहितो,
लाट उसळओनि जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हसता तुझ्या व्हावे,
उचंबळूनी लावण्य वर वहावे !
कवीच्या या पंक्ती हदयंगम आहेत. निष्पाप लावण्याचे असे तंतोतंत वर्णन क्वचितच कोणी केले असेल. पिता कन्येला म्हणतो, की जिथे निसर्गानेच तुला एवढे अलंकार दिलेले आहेत. तेथे कृत्रिम अलंकाराची तुला गरजच पडू नाही. पण त्याला अचानक स्मरते, नटण्या थटण्याची नैसर्गिक आवडच स्त्रियात असते. अगदी आदिमाये पासून ती आहे. त्यामुळेच नश्वर जग सुंदर झालेले आहे. याच नैसर्गिक ओढीतून तुला अलंकारादिचा सोस वाटत असणे स्वाभाविक आहे. मला वाटते भविष्यात तू विलासाची मोगरी होशील अर्थात् शाश्वत सुख भोगशील. कारण आज जरी तू माझी कन्या असलीस, तरी भविष्यात तू कोणाचे तरी भाग्य असणार आहेस. हे वर्णन करताना कवी लिहितो,
नाही ही विवश भावना त्याला सतावते हे आहे. म्हणून कवी समर्पक शब्दात लिहितो,
प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे,
कोड किंचित् पुरविता न ये त्यांचे;
तदा बापाचे हृदय कसे होते,
न ये वदता, अनुभवी जाणती ते !
आपल्या मुलांचे लाड आपल्याला किंचित् ही पुरविता येत नसतील तर जीवाला काय वेदना होतात. ते अनुभवानेच कळते. येथे कवी 'किंचित् लाड' म्हणतो. याचाच अर्थ मुलांचे सर्वच लाड पुरवावे, असे त्याला वाटत नाही हे चाणाक्ष वाचकांच्या नजरेत आलेच असेल.
पिता मनाशीच बोलताना म्हणतो, गरीब असूनही मी कधी लाचार झालो नाही, माझा अभिमान सोडला नाही. पण जेंव्हा असे प्रसंग येतात तेंव्हा हृदय दुभंगल्याचे दुःख होते. देव सद्गुणी बालकांना सर्व काही देतो. मग माझ्या सारख्या करण्ट्याच्या पोटी एवढे गुणी रत्न त्याने का घातले असावे?
याच तंद्रीत तो म्हणतो,
लांब त्याच्या गावास जाऊनिया
गूढ घेतो हे त्यास पुसोनिया!
देव खूप लांब राहतो असे आपण लहान बाळांना सांगत असतो. त्या लांब असणाऱ्या देवाच्या गावी जाऊन हे रहस्य मी विचारून येतो. असे उद्वेगाने पिता म्हणतो. त्यातील 'गावी जातो' शब्द ऐकताच स्फुंदून स्फुंदून रडणारी, इतक्या वेळ विविध प्रकारे समजावून सांगितल्यावर ही शांत न होणारी त्याची निरागस कन्या सारे काही विसरून पित्याच्या गळ्याला मिठी मारून' मी पण येते तुमच्या सोबत' म्हणत सारे काही विसरत त्याच्या मागे लागते. या मधूर प्रसंगाचे वर्णन करताना कवी लिहितो,
"गावि जातो" ऐकता त्याच काली,
पार बदलुनि ती बाल सृष्टी गेली!
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येते मी" पोर अज्ञवाचा !
या अत्यंत मधूरतम पंक्ती कवी लिहितो. यात रेशमाचा करपाश ही कल्पनाच अद्भुत आहे. ह्या शेवटच्या कडव्यात कविने बाल मनाची निर्व्याज्यता सहज पकडत बाल मानसशास्त्राची जाण अचूक टिपली आहे.
जाज्वल्य देशभक्तीचे प्रतीक : वीर सावरकर
ह्या कवितेकडे पाहताना कित्येकांना वाटत असते, ही कवीच्या घरात घडलेली, कविने अनुभवलेली घटना असावी. पण ते खरे नाही. हा कवीचा केवळ कल्पनाविलास आहे, अनुभव नाही. अनुभवाविण जर कोणी कवी इतकी उंच तरीही सत्य वाटणारी झेप घेत असेल तर त्यांच्या काव्याची प्रत अत्युच्च दर्जाची आहे असेच म्हणावे लागेल.
जाता जाता हे ही सांगावेसे वाटते की, कवीच्या ही कविता त्याच्या इतर कविता प्रमाणे मत मतांतरात अडकलेली नसून अर्थदृष्ट्या अत्यंत सरळ, सुगम, सहज असून ही अत्यंत उच्च कोटीची ठरलेली आहे.
सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५
संविधान सभेतील बाबासाहेबांचे अंतिम भाषण
"जर यापुढे गोष्टी चुकीच्या झाल्या, तर आपल्याला कोणीही दोषी ठरवणार नाही", संविधान सभेतील डॉ. आंबेडकरांचे शेवटचे भाषण

भारतीय राष्ट्राच्या पायाभूत सुरुवातीमध्ये डॉ. बी.आर. आंबेडकरांनी दिलेले योगदान निश्चितच या वस्तुस्थितीची साक्ष देते की भारतीय संविधानाचे जनक या मानकांनुसार जगले.
या वर्षी आपण आंबेडकर जयंती साजरी करत असताना, आपण २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. आंबेडकरांच्या शेवटच्या भाषणावर एक नजर टाकूया.
या भाषणात, डॉ. आंबेडकर संविधानाचे समर्थन, त्याचा मसुदा तयार करण्यासाठी केलेल्या प्रक्रियेच्या संदर्भात तसेच त्याच्या अंतिम स्वरूपाच्या संदर्भात मांडतात.
उल्लेखनीय म्हणजे, डॉ. आंबेडकर पुढे काही मानके देखील मांडतात ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे जर भारताला एक राष्ट्र म्हणून प्रगती करायची असेल तर आवश्यक आहे. या भाषणाच्या आशयावरून एका दूरदर्शीचे चित्र समोर येते, जो देशाला त्याचे स्वातंत्र्य गृहीत धरण्याच्या धोक्यांपासून सावध करण्यासाठी पुरेसा शहाणा होता.
कार्यरत संसदीय लोकशाहीचे महत्त्व
या पैलूवर थेट चर्चा होत नसली तरी, संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी झालेल्या उत्पादक चर्चेवरील आंबेडकरांचे विचार समकालीन महत्त्व प्राप्त करतात, विशेषतः संसदीय कामकाज तहकूब करणे हे आजकालचे सामान्य काम असल्याचे दिसून येते.
" जर ही संविधान सभा केवळ एक विविधरंगी गर्दी, सिमेंटशिवाय एक तुकडा असलेला फरसबंदी, येथे एक काळा दगड आणि तेथे एक पांढरा दगड असता तर मसुदा समितीचे काम खूप कठीण झाले असते, ज्याचा प्रत्येक सदस्य किंवा प्रत्येक गट स्वतःसाठी एक कायदा असता. तर अराजकतेशिवाय काहीही झाले नसते..."
… जर सर्व सदस्यांनी पक्षाच्या शिस्तीच्या नियमांना बळी पडले असते तर या संविधान सभेचे कामकाज खूपच कंटाळवाणे झाले असते. पक्ष शिस्तीने, तिच्या सर्व कडकपणासह, या सभेला होकारार्थींच्या मेळाव्यात रूपांतरित केले असते. ”
आंबेडकर खरं तर विधानसभेच्या मजल्यावरील चर्चेला समृद्ध केल्याबद्दल मतभेद असलेल्या आवाजांचे आभार मानतात.
"सुदैवाने, काही बंडखोर होते," आंबेडकर म्हणतात. " ते होते श्री. कामत, डॉ. पी. एस. देशमुख, श्री. सिधवा, प्रो. सक्सेना आणि पंडित ठाकूर, दास भार्गव आणि त्यांच्यासोबत मी प्रो. के. टी. शाह आणि पंडित हिरदयनाथ कुंजरू यांचा उल्लेख करायलाच हवा. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे बहुतेक वैचारिक होते."
ज्या काळात विरोधी पक्षाची भूमिका अनेकदा आंधळेपणाने निषेध करण्याइतकीच कमी केली जाते किंवा आवाज म्हणून नाकारली जाते, अशा काळात आंबेडकरांची भूमिका अनुकरणीय आहे.
" मी त्यांच्या सूचना स्वीकारण्यास तयार नव्हतो म्हणून त्यांच्या सूचनांचे मूल्य कमी होत नाही किंवा विधानसभेच्या कामकाजाला चैतन्य देण्यासाठी त्यांनी दिलेल्या सेवेला कमी करत नाही. मी त्यांचा आभारी आहे. परंतु त्यांच्याशिवाय, संविधानातील तत्वे स्पष्ट करण्याची संधी मला मिळाली नसती जी संविधान मंजूर करण्याच्या केवळ यांत्रिक कामापेक्षा जास्त महत्त्वाची होती. "
संविधान हे अंमलात आणण्यासाठी बोलावलेल्यांवर अवलंबून आहे.
आंबेडकरांनी आपल्या भाषणात इशारा दिला आहे की संविधानाचे कार्य हे त्या दस्तऐवजावर अवलंबून नसते, तर शेवटी त्याचा परिणाम त्याच्या अंमलबजावणीचे काम करणाऱ्यांवर अवलंबून असतो.
" ... संविधान कितीही चांगले असले तरी ते वाईट ठरणारच कारण ज्यांना ते अंमलात आणण्यासाठी बोलावले जाते ते वाईट असतात. संविधान कितीही वाईट असले तरी, ज्यांना ते अंमलात आणण्यासाठी बोलावले जाते ते चांगले असल्यास ते चांगले ठरू शकते."
…राज्यघटना फक्त कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यासारख्या राज्याच्या अवयवांची तरतूद करू शकते. राज्याच्या त्या अवयवांचे कामकाज ज्या घटकांवर अवलंबून असते ते म्हणजे लोक आणि त्यांच्या इच्छा आणि राजकारण पूर्ण करण्यासाठी ते स्थापन करणार असलेले राजकीय पक्ष. ”
राष्ट्रावर धर्मप्रथा ठेवण्याचे धोके
१८५७ मध्ये मोहम्मद-बिन-कासीमचे सिंधवरील आक्रमण, पृथ्वीराज चौहानविरुद्ध लढण्यासाठी मोहम्मद घोरीचे आक्रमण, तसेच ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्धच्या लढाईत भारतीयांमध्ये निर्माण झालेला फूट यासारख्या ऐतिहासिक घटनांचा उल्लेख करताना आंबेडकरांनी नमूद केले आहे की,
" ... भारताने केवळ एकदाच आपले स्वातंत्र्य गमावले नाही, तर तिच्याच काही लोकांच्या बेवफाई आणि विश्वासघातामुळे ते गमावले ."
या संदर्भात, तो पुढे म्हणतो,
" इतिहासाची पुनरावृत्ती होईल का? हाच विचार मला चिंतेत टाकतो. जाती आणि पंथांच्या स्वरूपात आपल्या जुन्या शत्रूंव्यतिरिक्त, आपल्याकडे विविध आणि विरोधी राजकीय विचारसरणी असलेले अनेक राजकीय पक्ष असतील या वस्तुस्थितीची जाणीव झाल्यामुळे ही चिंता आणखी वाढली आहे."
भारतीय लोक देशाला त्यांच्या पंथांपेक्षा वर ठेवतील की पंथांना देशापेक्षा वर ठेवतील?
मला माहित नाही. पण एवढे मात्र निश्चित आहे की जर पक्षांनी देशापेक्षा धर्माला प्राधान्य दिले तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि कदाचित कायमचे नष्ट होईल. या घटनेपासून आपण सर्वांनी दृढनिश्चयाने सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबाने आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा आपण दृढनिश्चय केला पाहिजे. ”
सत्याग्रह, क्रांती म्हणजेच अराजकतेचे व्याकरण विरुद्धचा खटला
" जर आपल्याला लोकशाही केवळ स्वरूपातच नव्हे तर प्रत्यक्षातही टिकवायची असेल, तर आपण काय केले पाहिजे? माझ्या मते, आपण पहिली गोष्ट म्हणजे आपली सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संवैधानिक पद्धतींना घट्ट धरून राहणे."
याचा अर्थ असा की आपण क्रांतीच्या रक्तरंजित पद्धती सोडून दिल्या पाहिजेत. याचा अर्थ असा की आपण सविनय कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या पद्धती सोडून दिल्या पाहिजेत.
जेव्हा आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संवैधानिक पद्धतींचा कोणताही मार्ग उरला नव्हता, तेव्हा असंवैधानिक पद्धतींचे समर्थन मोठ्या प्रमाणात होते. परंतु जिथे संवैधानिक पद्धती खुल्या आहेत, तिथे या असंवैधानिक पद्धतींचे समर्थन होऊ शकत नाही. या पद्धती अराजकतेच्या व्याकरणाशिवाय दुसरे काहीही नाहीत आणि जितक्या लवकर त्या सोडून दिल्या जातील तितके आपल्यासाठी चांगले. ”
राजकारणात नायकपूजा, भक्ती हा हुकूमशाहीचा निश्चित मार्ग आहे.
" देशासाठी आयुष्यभर सेवा देणाऱ्या महापुरुषांबद्दल कृतज्ञ राहण्यात काहीही गैर नाही. परंतु कृतज्ञतेलाही काही मर्यादा आहेत, जसे आयरीश देशभक्त डॅनियल ओ'कॉनेल यांनी चांगले म्हटले आहे, कोणताही पुरुष त्याच्या सन्मानाच्या किंमतीवर कृतज्ञ असू शकत नाही, कोणतीही स्त्री तिच्या पवित्रतेच्या किंमतीवर कृतज्ञ असू शकत नाही आणि कोणतेही राष्ट्र त्याच्या स्वातंत्र्याच्या किंमतीवर कृतज्ञ असू शकत नाही."
इतर कोणत्याही देशापेक्षा भारताच्या बाबतीत ही खबरदारी खूपच आवश्यक आहे. कारण भारतात, भक्ती किंवा ज्याला भक्ती किंवा नायक-पूजेचा मार्ग म्हणता येईल, ती त्याच्या राजकारणात अशी भूमिका बजावते जी जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात घेतलेल्या भूमिकेपेक्षा मोठी आहे. धर्मात भक्ती हा आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकतो. परंतु राजकारणात, भक्ती किंवा नायक-पूजा हा अधोगती आणि शेवटी हुकूमशाहीकडे जाण्याचा निश्चित मार्ग आहे. ”
सामाजिक लोकशाहीचा मुद्दा
डॉ. आंबेडकर शेवटी यावर भर देतात की लोकांनी केवळ राजकीय लोकशाहीवर समाधान मानू नये, तर समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांसह सामाजिक लोकशाहीसाठी प्रयत्न करावेत.
"सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही. सामाजिक लोकशाहीचा अर्थ काय? याचा अर्थ असा जीवनपद्धती आहे जी स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांना जीवनाची तत्वे म्हणून ओळखते..."
… ते त्रिमूर्तीचे एक संघटन करतात या अर्थाने की एकमेकांपासून वेगळे होणे म्हणजे लोकशाहीचा उद्देशच नष्ट करणे आहे …
समानतेशिवाय, स्वातंत्र्यामुळे काही लोकांचे अनेकांवर वर्चस्व निर्माण होईल.
बंधुत्वाशिवाय, स्वातंत्र्य अनेकांवर काही लोकांचे वर्चस्व निर्माण करेल.
बंधुत्वाशिवाय, स्वातंत्र्य आणि समानता ही नैसर्गिक प्रक्रिया होऊ शकत नाही. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी एका हवालदाराची आवश्यकता असेल .
खऱ्या राष्ट्राचा मार्ग मोकळा करण्यावर
भारतासारखा विविधतापूर्ण देश आपोआप एक राष्ट्र बनेल हे गृहीत धरण्याविरुद्ध आंबेडकर इशारा देतात . अमेरिकन नागरिकांनी त्यांच्या देशाला संयुक्त राष्ट्रांऐवजी अमेरिका असे संबोधण्याच्या जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ देत , आंबेडकर म्हणतात,
" जर अमेरिकेतील लोकांना आपण एक राष्ट्र आहोत असे वाटत नसेल, तर भारतीयांना आपण एक राष्ट्र आहोत असे वाटणे किती कठीण आहे. मला ते दिवस आठवतात जेव्हा राजकीयदृष्ट्या विचारसरणीचे भारतीय 'भारताचे लोक' या अभिव्यक्तीला नाराज करायचे. त्यांना 'भारतीय राष्ट्र' ही अभिव्यक्ती जास्त आवडायची."
आपण एक राष्ट्र आहोत असे मानून आपण एक मोठा भ्रम बाळगत आहोत असे माझे मत आहे. हजारो जातींमध्ये विभागलेले लोक एक राष्ट्र कसे असू शकतात?
जगाच्या सामाजिक आणि मानसिक अर्थाने आपण अद्याप एक राष्ट्र नाही हे जितक्या लवकर आपल्याला कळेल तितके आपल्यासाठी चांगले. तरच आपल्याला एक राष्ट्र बनण्याची आवश्यकता कळेल आणि ध्येय साध्य करण्याचे मार्ग आणि मार्गांचा गांभीर्याने विचार करता येईल .
या ध्येयाची पूर्तता करणे खूप कठीण होणार आहे - अमेरिकेपेक्षा कितीतरी जास्त कठीण. अमेरिकेत जातीची समस्या नाही. भारतात जाती आहेत ... परंतु जर आपल्याला प्रत्यक्षात एक राष्ट्र बनायचे असेल तर आपल्याला या सर्व अडचणींवर मात करावी लागेल. कारण बंधुता ही एक वस्तुस्थिती तेव्हाच असू शकते जेव्हा एक राष्ट्र असेल. बंधुत्वाशिवाय, समानता आणि स्वातंत्र्य रंगाच्या थरापेक्षा खोलवर राहणार नाही .
जर गोष्टी चुकीच्या झाल्या, तर आपल्याला स्वतःशिवाय कोणीही दोषी राहणार नाही.
आंबेडकरांचे या विषयावरील शेवटचे शब्द संविधानात नमूद केल्याप्रमाणे भारताची कल्पना जपण्यासाठी किती जबाबदारी आहे याबद्दलचे त्यांचे विचार सारांशित करतात.
"... आपण हे विसरू नये की या स्वातंत्र्याने आपल्यावर मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. स्वातंत्र्यामुळे, कोणत्याही चुकीसाठी ब्रिटिशांना दोष देण्याचे निमित्त आपण गमावले आहे. जर यापुढे काही चूक झाली तर आपल्याला दोष देण्यासाठी कोणीही राहणार नाही. स्वतःशिवाय..."
…जर आपल्याला संविधान जपायचे असेल ज्यामध्ये आपण लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांद्वारे चालणारे सरकार हे तत्व समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, तर आपण आपल्या मार्गात असलेल्या आणि लोकांना लोकांद्वारे चालणाऱ्या सरकारपेक्षा लोकांसाठी चालणारे सरकार पसंत करण्यास प्रवृत्त करणाऱ्या वाईट गोष्टी ओळखण्यात उशीर न करण्याचा आणि त्या दूर करण्याच्या आपल्या पुढाकारात कमकुवत न होण्याचा संकल्प करूया.
देशाची सेवा करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. मला यापेक्षा चांगला मार्ग माहित नाही .
आंधळ्यांची रात्रशाळा
न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता
या जेव्हा कविता होतात
आणि संविधान खेळणे होते
तेव्हा लोक गुलाम आणि सत्ताधारी मालक होतात.
जेव्हा संसद सरकारची बटिक होते
आणि पक्ष सत्तेचे झेंडे खांद्यावर घेतो
तेव्हा देशातली लोकशाही मरते
आणि हुकूमशहा तिचे हत्यारे होतात.
जेव्हा सत्ता कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही
आणि विरोधक हतबल होताना दिसतात
तेव्हा जनता अनाथ होते
आणि सत्ताधारी अनाथालयाचे संचालक होतात.
जेव्हा प्रशासन निष्क्रिय आणि
संरक्षक यंत्रणा निकामी होतात
तेव्हा स्त्रीवरचे बलात्कार हे सत्तेचे सन्मान होतात.
आणि गरिबांची दुर्दशा हे धनवंतांचे भूषण होते.
श्रीमंतांचे वर्ग जेव्हा अरण्ये उध्वस्त करतात
तेव्हा ते गरिबांचे विस्थापन
आणि श्रीमंतांचे उत्पादन होते
या विध्वंसात मरण स्वस्त
आणि जीवन महागडे होते.
जेव्हा उद्योगवंत एकत्र येतात
आणि श्रमवंत जातीवर्गात विभागले जातात
तेव्हा समाजवाद हे स्वप्न होते
आणि धर्माचा अंतकाळ जवळ येतो.
जेव्हा देशभक्ती अपराध होते
आणि अंधश्रद्धा हाच धर्म होतो
तेव्हा ज्ञानाचा अंत होतो
आणि माणसांची मेंढरे होतात.
जेव्हा अधिकार विस्मरणात जातात
आणि आज्ञापालन हाच संस्कार होतो
तेव्हा समाज माणसांचा रहात नाही
तो गुराढोरांचा कळप होतो.
जेव्हा दारिद्र्याहून जात
आणि अभावाहून कूळ मोठे होते
तेव्हा पुढाऱ्यांची दैवते होतात
आणि विद्यापीठांची अज्ञानपीठे होतात.
विचारांची आराधना संपते आणि
आराधनाच जेव्हा विचार होतो
तेव्हा फक्त दैवते धनवान होतात
आणि भक्त भिकेला लागतात.
वर्तमान विषाक्त झाले
की माणसे इतिहासाच्या शस्त्रागारात शिरतात
आणि त्यातल्या शस्त्रांचा शोध हिंसेसाठी घेतात
त्यात वर्तमानाचा विसर पडतो
आणि भविष्याचे भान उरत नाही.
जेव्हा पक्षांच्या जाती
आणि धर्मांचे समाज बनतात
तेव्हा माणसांची बुद्धी हरवते
आणि ते सत्तेचे पुजारी होतात.
जेव्हा पुजारी आणि पुरोहित राजकारणी होतात
तेव्हा राजकारण लोककारण विसरते
आणि सत्ताधाऱ्यांच्या दारात
जनतेची श्रद्धास्थाने उभी होतात.
जेव्हा विचारांना आंधळेपण येते
तेव्हा सॉक्रेटिस आणि गांधी मारले जातात
आणि त्यांच्या खुन्यांची देवळे बांधून
त्यांच्या पूजांचा आरंभ होतो.
जात आणि धर्म, अंत आणि अनंत
यात माणसे विभागली जातात तेव्हा
देश राष्ट्र रहात नाही
ती केवळ माणसांची गर्दी होते.
मतदार जेव्हा मते विकतात
आणि उद्योगपती त्यांची श्रद्धास्थाने पळवितात
तेव्हा त्यांच्यातले वैर कायम राहिले तरी
त्यांचे आंधळेपण एक होते.
जेव्हा पुढाऱ्याचा शब्द धर्माज्ञा होतो
आणि अनुयायी विचारावाचून तो स्वीकारतात
तेव्हा पक्षांचे कळप होतात.
आणि नेते गुराखी व सदस्य पाळीव होतात.
शाळा विषाक्त आणि देवळे बलात्कारी होतात
तेव्हा ज्ञान बेपत्ता आणि ईश्वर बेपर्वा होतो
मात्र विषाला अमृत मानले
आणि बलात्कारच व्यवसाय ठरविले गेले तर....
शिवाय आता हे समाजमान्य होत आहे
त्याला कायद्याचे संरक्षण लाभत आहे.
संविधान जाळू म्हणणाऱ्यांच्या मनात
हीच उद्याची दिशा असेल तर
तशी वाटचालही आता सुरू झाली आहे.
-प्रा. सुरेश द्वादशीवार
शोभायात्रा नाटक
नवा शिपाई - कवितेचा भावार्थ
नवा शिपाई ही कवी केशवसुतांची प्रसिद्ध कविता आहे. 'केशवसुत" या टोपण नावाने कृष्णाजी केशव दामले यांनी काव्य लेखन केलेले आ...
-
सांस्कृतिक कार्यक्रम सुत्र संचलन चारोळ्या यात दिलेली माहीती ही संग्रहीत आहे, चारोळ्या अनेकांनी लिहलेल्या आहेत, त्या माझ्या नाहीत मी फक्...
-
नवा शिपाई ही कवी केशवसुतांची प्रसिद्ध कविता आहे. 'केशवसुत" या टोपण नावाने कृष्णाजी केशव दामले यांनी काव्य लेखन केलेले आ...
