मराठी रंगभूमी दिवस
मराठी नाटक प्रारंभ ते १९९५
०५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्ताने मराठी नाट्य लेखक व नाट्य कलावंतांना मनःपूर्वक शुभेच्छा !!
या दिवसाचे औचित्य साधून आपण आजच्या ब्लॉगमध्ये मराठी रंगभूमीचा किंबहुना मराठी नाट्य वाङ्मयाचा आढावा घेणार आहोत.
⭐नाटक आणि रंगभूमी
नाटक आणि रंगभूमी या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. नाटक हे नाट्यसंहितेशी निगडित आहे, तर रंगभूमी ही नाटकाच्या प्रयोगाशी निगडित आहे. नाट्यसंहितेचा प्रयोग रंगभूमीवर होत असतो. नाटककार नाटक लिहितो म्हणजेच तो संहिता तयार करतो आणि त्या संहितेचा प्रयोग हा रंगभूमीवर सादर होत असतो. तसेच रंगभूमीवर प्रयोग सादर होतो म्हणून नाटककार नाट्यसंहिता लिहितो असेही आपल्याला म्हणता येते. या अनुषंगाने विचार केला तर नाटक आणि रंगभूमीचा संबंध आणि इतिहास हा खूप प्राचीन आणि नाटक संहिता आधी की रंगभूमी आधी या वादग्रस्त प्रश्नावर जाऊन संपू शकतो. या प्रश्नाचा फारसा विचार न करता आपण रंगभूमी म्हणजे नाटक हा रूढ झालेला अर्थ गृहीत धरून आणि उपलब्ध संदर्भ ग्रंथांच्या आधारे मराठी नाट्य इतिहासाचा आढावा घेणार आहोत.
मराठी नाट्य वाङ्मयाचा इतिहास हा कालखंडानुसार आरंभ ते १८८०, १८८० ते १९२०, १९२० ते १९५०, १९५० ते १९९० असा केला जातो. आपणही याच पद्धतीने नाट्य वाङ्मयाचा इतिहास तपासणार आहोत.
वर्तमान पातळीवर प्रादेशिक अंगाने विचार केला तर मराठी नाटक हे आज स्वतंत्रपणे विकसित झालेले असले तरी मराठी नाटकांच्या पूर्वीही आपल्याला भारतात नाट्य परंपरा दिसून येते. साधारणपणे इसवी सन पूर्व २०० ते इसवी सन २०० हा कालखंड भरतमुनीच्या नाट्यशास्त्राच्या जडणघडणीचा कालखंड मानला जातो. आपल्या नाट्यशास्त्रात भरतमुनींनी नाटकाविषयीचे अतिशय सविस्तर आणि दीर्घ विवेचन केलेले आहे. रंगभूमी अस्तित्वात होती त्यातूनच हे विवेचन अस्तित्वात आलेले असावे किंबहुना नाट्यपरंपरेचा इतिहास आणि मागोवा घेऊन भरतमुनींनी नाट्यशास्त्राची रचना केली आहे. असे आपल्याला म्हणता येते. कारण आधी भाषा येते नंतर व्याकरण तोच संबंध येथेही लावता येतो.
“अंगी कलांचा व्यक्तिशः किंवा समुदायाने अविष्कार करण्याची भूमी किंवा स्थान म्हणजे रंगभूमी” विश्वकोशात असलेली ही रंगभूमीची व्याख्या लक्षात घेतली तर केवळ संस्कृत नाटकच नव्हे तर रंगभूमीशी निगडित असलेले विविध लोक कलाप्रकार आपल्याला दिसतात. यात गोंधळ, दशावतारी खेळ, लळीते, दंडार, भारुड, बहुरूपी आणि तमाशा या लोककला प्रकारात आपल्याला मराठी रंगभूमीची बीजे दिसून येतात. संस्कृत रंगभूमीच्या आधीही हे लोक कलाप्रकार अस्तित्वात होते आणि आज मराठी रंगभूमी विकसित झाल्यावर ही हे लोककलाप्रकार जीवनामध्ये अस्तित्वात आहेत.
⭐मराठीतले ‘पहिले नाटक’
मराठी रंगभूमीच्या आरंभाविषयी मराठी समीक्षकांमध्ये मतभेद दिसून येतात. “कै. विष्णुदास भावे यांनी ५ नोव्हेंबर १८४३ रोजी सांगली येथे सांगलीचे संस्थानिक अप्पासाहेब पटवर्धन यांच्या उपस्थितीत ‘सीता स्वयंवर’ या नावाचा दशावतारी ‘खेळ’ सादर केला. या घटनेच्या आधारे सांगली हे मराठी नाटकाचे ‘माहेरघर’ कै. विष्णुदास भावे हे मराठी नाटकाचे ‘जनक’ आणि ‘सीता स्वयंवर’ हे मराठीतले ‘पहिले नाटक’ ही समजूत रूढ झाली आहे. ही समजूत दृढ व्हावी म्हणून ५ नोव्हेंबर हा मराठी रंगभूमीचा वर्धापन दिन आहे असे गृहीत धरून हा दिवस साजरा करण्याची प्रथा ही रूढ झालेली आहे.”( प्रा. दत्ता भगत, मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास, पृ.२९) प्रा. दत्ता भगत यांनी अतिशय सविस्तरपणे मराठी रंगभूमीच्या आद्यत्वाविषयीची चर्चा केलेली आहे. यासाठी त्यांनी काही कसोट्याही लावलेल्या आहेत त्यात कालप्रमाण आणि नाट्यसंहिता या दोन कसोट्यांचा विचार केला तर त्यांनी पुढील प्रश्न उपस्थित करून मराठी नाटकाचे आद्यत्व ठरवायचे कसे यासंदर्भातील विवेचन केले आहे. त्यांच्या मते
१. लक्ष्मीनारायण कल्याण इ स.१६८४
२. सं. सीता स्वयंवर इ. स.१८४३
३. प्रबोध चंद्रोदय इ.स. १८५१
४. तृतीय रत्न इ. स.१८५५
५. व्यवहारोपयोगी नाटक इ स १८५६
६. नाटक थोरले माधवराव पेशवे याजवर इ. स.१८६१.
वरीलपैकी कोणते नाटक पहिले नाटक होय ? असा ते प्रश्न उपस्थित करतात आणि त्या प्रश्नाचे उत्तरही अतिशय तार्किकपणे देतात. त्यांच्या मते
⭐'लक्ष्मीनारायण कल्याण 'मराठी रंगभूमीवरील उपलब्ध पहिले नाटक कारण या नाटकाचे हस्तलिखित उपलब्ध आहे. परंतु याचा प्रयोग झालेला आहे किंवा नाही याविषयीची
वि. वा. शिरवाडकर यांनी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने काव्यलेखन केले आणि त्या नावानेच ते प्रसिद्धही झाले. त्यांनी नाटके मात्र वि. वा. शिरवाडकर या नावानेच लिहिली. राजमुकुट, दूरचे दिवे, दुसरा पेशवा, कौंतेय, ययाती आणि देवयानी, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, चंद्र जिथे उगवत नाही इत्यादी त्यांची लोकप्रिय नाटके आहेत. यातील ‘नटसम्राट’ या नाटकाने तर इतिहासच असलेला आहे याच नाटकासाठी त्यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळाला.
⭐महेश एलकुंचवार
महेश एलकुंचवार साधारणपणे १९६५ नंतर लिखाण करणारे महत्त्वाचे नाटककार आहेत. त्यांनी गार्बो, वासनाकांड, वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, युगांत ही नाटके लिहिली आहे. यातील वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत या तीन नाटकांच्या संचाला आज मराठी प्रेक्षक नाट्यत्रयी म्हणून ओळखतो.
⭐गो.पु. देशपांडे
गो.पु. देशपांडे यांची उध्वस्त धर्मशाळा, अंधारयात्रा, विष्णूगुप्त चाणक्य, सत्यशोधक ही लोकप्रिय आणि प्रसिद्ध नाटके आहेत. विचार प्रवर्तक नाटककार म्हणून देशपांडे यांचा उल्लेख होतो.
⭐सतीश आळेकर
सतीश आळेकर यांचे मिकी आणि मेमसाहेब, महानिर्वाण, बेगम बर्वे, महापूर इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत.
⭐दलित रंगभूमी
१९७० ते ९० या दोन दशकात दलित साहित्याने आपली मुद्रा मराठी साहित्यावर नोंदवली. त्यातच दलित रंगभूमी ही आघाडीवर होती. यात प्रा. दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी, संजय पवार, रामनाथ चव्हाण, प्रकाश त्रिभुवन इत्यादी लेखकांनी महत्त्वाचे नाट्य लेखन केले आहे.
⭐दत्ता भगत यांचे वाटा पळवाटा, खेळीया,जहाज फुटल आहे आणि इतर एकांकिका, अश्मक इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत.
![]() |
| दत्ता भगत |
⭐प्रेमानंद गज्वी यांचे तनमाजोरी, किरवंत, गांधी आंबेडकर इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत तर त्यांच्या ‘घोटभर पाणी’ या एकांकिकेने महाराष्ट्रभर ख्याती मिळवलेली आहे.
⭐रामनाथ चव्हाण यांचे साक्षीपुरम, बामणवाडा इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत.
⭐प्रकाश त्रिभुवन यांचं ‘थांबा रामराज्य येतंय’ या नाटकानेही इतिहास घडवला.
⭐संजय पवार यांचे ‘कोण म्हणतं टक्का दिला ?’ हे एक प्रसिद्ध नाटक आहे.
.png)
.png)
1 टिप्पणी:
https://pradnyechimulakshar.blogspot.com/
टिप्पणी पोस्ट करा