शनिवार, २६ जुलै, २०२५

माणसाने -कवी नामदेव ढसाळ

माणसाने पहिल्या प्रथम स्वतःलापुर्ण अंशाने उध्वस्त करून घ्यावेचरस गांजा ओढावा
अफ़ीम लालपरी खावी
मुबलक कंट्री प्यावी
याला त्याला कुणालाही आयभयणीवरूनगाली द्यावी, धरून पिदवावे
मर्डर करावा, झोपलेल्यांची कत्तल करावी
पोरीबाळीम्शी सइंद्रिय चाळे करावे
म्हातारी म्हनू नये,तरनी म्हणू नये
कवळी म्हणू नये,सर्वांना पासले पाडावे
व्यासपिठावर समग्र बलात्कार घडवून आणावे
येशुच्या,पैगंबराच्या, बुद्धाच्या विष्णुच्या वंशजांना फ़ाशी द्यावेमाणसाने
देवले मशिदी शिल्पे म्युझियम कुस्करून टाकावे
हे सारे विश्वव्यापी गळूप्रमाणे फुगू द्यावे
अनामवेळी फुटू द्यावे ,रिचू द्यावे.

नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये
काळा गोरा म्हणू नये
तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शुद्र असे हिणवू नये
अभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी माणून
त्यांच्या कुशीत गुण्यागोविंद्याने राहावे
चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे
एक तीळ सर्वांनी कांडून खावा
माणसावरच सुक्त रचावे
माणसाचेच गाणे गावे माणसाने.

सोमवार, २१ जुलै, २०२५

नवा शिपाई - कवितेचा भावार्थ

नवा शिपाई ही कवी केशवसुतांची प्रसिद्ध कविता आहे. 'केशवसुत" या टोपण नावाने कृष्णाजी केशव दामले यांनी काव्य लेखन केलेले आहे.  काव्यरत्नावली या मासिकाचे संपादक नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेवरून 'केशवसुत' या टोपणनावाचा त्यांनी स्वीकार केला. त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1866 रोजी रत्नागिरी नजीक मालगुंड या गावी झाला. त्यांचे शिक्षण मालगुंड या गावी खेड, बडोदे, वर्धा, नागपूर, पुणे या विविध ठिकाणी झाले.
त्यांचे वडील केशव दामले हे शिक्षक होते. केशवपंत स्वभावाने नि:स्पृही, बाणेदार आणि करारी होते. उत्तम शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र कधीच नांदत नाहीत असे म्हणतात, याचप्रमाणे त्यांचे सर्व आयुष्य दारिद्र्यात गेले. केशवसुत निश्चयी व कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांचे जेष्ठ बंधू श्रीधरपंत यांच्याकडून त्यांना कवितेची गोडी लागली. व त्यांनी कविता लिहावया सुरुवात केली.
संपूर्ण आयुष्य त्यांनी कवितेच्या सानिध्यात घालविले त्यांनी इंग्रजी साहित्याचा सखोल अभ्यास केला त्यांच्या आवडीचे कवी इमर्सन, शेले, किटस् वर्डस्वर्थ हे होते. त्यांच्या कवितेचा प्रभाव त्यांच्या कवितेवर दिसतो. संत तुकाराम महाराजांच्या साहित्याचाही त्यांच्यावर खूप प्रभाव होता. कवीने शब्दाबरोबर न वहावता कल्पनेशी झगडत राहिले पाहिजे. नुसत्या शब्दांच्या थाटाने कविता होत नसते. शब्दात काव्य नाही तर ते कल्पनेत आहे असे त्यांचे ठाम मत होते. कवितेचे बाह्यरूप कुठलेही असले तरी तिचे अंतरंग उदात्त कल्पनांनी व विचारांनी भरलेले पाहिजे तरच तिचे उज्वल स्वरूप प्रकट होईल, एरवी नाही असे ते म्हणायचे. 
कवी केशवसुतांच्या कविता सुरुवातीस करमणूक या नियतकालिकातून प्रकाशित होऊ लागल्या. पुढे त्या सुधारक मासिक मनोरंजन, काव्यरत्नावली यातून प्रसिद्ध झाल्या. कवी केशवसुत हे निसर्गतः कवी होते. हे त्यांच्या प्रत्येक कवितेतून प्रतीत होते. त्यांच्या सर्व कविता स्फूट आहेत. एखादे तरी मोठे काव्य लिहावे अशी त्यांची इच्छा होती, परंतु अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे ती त्यांना तडीस नेता आली नाही. त्यांनी आपल्या मातेसंदर्भात, प्रदेशासंदर्भात कविता लिहिल्या. प्रीती मिळेल काहो, समृद्धी, प्रणय कथन, मयुरासन, ताजमहल या त्यांच्या प्रेमाच्या कविता होत. कविता आणि कवी या त्यांच्या कवितेवरून ते जुन्या शृंखला तोडण्यात सिद्ध होते हे दिसते. ते म्हणतात, "युवा जैसे तो युवती समूह मोहे
तसा कवी हा कवितेस पाहे 
तिला जसा तो करितो विनंती
 तसा हिला हा करीत सुवृत्ती"
आत्मविष्कार हाच नेहमी काव्य निर्मितीचा प्रमुख आधार अशी त्यांची ठाम भूमिका होती. 1886 ते 1904 या काळात ते याच ध्यासात मग्न होते. काव्य, कला, प्रतिभा सौंदर्य, प्रेम, निसर्ग, संवेदना या सगळ्यावर त्यांनी कविता लिहिल्या. शाब्दिक कलाकुसरिने नटलेली कविता ही कृत्रिम काव्य आहे असे त्यांना वाटायचे. केशवसुतांचे शिक्षण हे पुण्यात झाले असले तरी त्यांचे मन नेहमी रमाईचे ते कोकणातच. निसर्गसौंदर्याचे वर्णन त्यांनी अत्यंत तन्मयतेने त्यांच्या कवितेतून केलेले आहे. केशवसुत म्हणजे स्वातंत्र्य, समता याची स्वप्न पाहणारा, तुतारी फुंकणारा नवा शिपाई. तुतारी व नवा शिपाई कवितेतून सगळ्या जुन्या अनिष्ट प्रथा सोडण्याचे आवाहन ते करतात. जुन्या रूढी, परंपरा ह्या कालबाह्य झालेल्या असून त्या त्यागल्याच पाहिजे अशी त्यांची भावना होती. 'नवा शिपाई' ही कविता तर अगदी स्फूर्तीने भरलेली आहे. कवितेमध्ये केलेल्या अमुलाग्र बदलामुळे त्यांना मराठी आधुनिक कवितेचे जनक म्हणून ओळखले जाते. वर्षानुवर्षे विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणाऱ्या कवितेला स्वच्छंद आणि मुक्तरूपात केशवसुतांनी प्रथम सर्वापुढे आणले. आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपूर्झा, हरपले श्रेय, मूर्तीभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता आहेत. कवी केशवसुतांनी इंग्रजी काव्य परंपरेतील रोमांटिक समजला जाणारा सौंदर्यवादी दृष्टिकोन प्रथम मराठी साहित्यात आणला. कवीच्या अंतः स्फूर्ती खेरीज ती अन्यबाह्य प्रभावात ती असू नये असे त्यांचे म्हणणे होते. काव्य हुकमानुसार नसते, नसावे हा वास्तववाद मराठीत त्यांनीच आधुनिक परिभाषेत मांडला. इंग्रजी कवीचा प्रभाव त्यांच्या कवितेवर असला तरी त्यांची अविष्कार शैली भारतीय होती. इंग्रजी काव्यातील 14 ओळीचा सॉनेट हा काव्यप्रकार सुनीत या नावाने मराठीत रूढ करण्याचे श्रेय केशवसुतांना जाते. त्यांनी रचलेल्या कवितांपैकी 135 कविता आज उपलब्ध आहेत. या कविता महाराष्ट्र सरकारने 'केशवसुतांची कविता' या नावाने प्रकाशित केलेले आहेत. समीक्षक स.गं.मालसे यांनी केशवसुतांच्या कवितांचे हस्तलिखित संपादित केलेले आहे. त्यांच्या अल्पसंख्य कवितांमध्ये अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, मानवतावाद, राष्ट्रीयत्व, गुढ अनुभवांचे प्रगटीकरण आणि निसर्ग असे अनेक विषय सहज आलेले आहेत. आधुनिक कवितेची सर्व वैशिष्ट्ये प्रथमच त्यांच्या कवितेमध्ये येतात. त्यामुळे त्यांना जनकत्वाचा मान दिला जातो. त्यांचे समकालीन कवी कवी गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे),कवी रेंदाळकर, कवी सेवाळकर, काव्यविहारी यासारखे सुप्रसिद्ध कवी सुद्धा स्वतःला  केशवसुतांचे शिष्य म्हणून घेत असत. तुतारी मंडळ या नावाचे एक मंडळ ही स्थापन झाले होते.  
केशवसुतांच्या सामाजिक विचारांची मुख्यतत्वे स्वातंत्र्य, समता, बंधुता व विशाल मानवतावाद ही होती. विशेष म्हणजे पृथ्वीला 'सुरलोकसाम्य' प्राप्त करून देण्याचे एक महान स्वप्न त्यांच्या क्रांतीदर्शी प्रतिभेने पाहिले होते. त्याचाही निर्देश त्यांच्या काही कवितातून आढळतो. झपूर्झा (1893), म्हातारी (1901) व हरपले श्रेय (1905) या त्यांच्या गुढ अनुभूती व नाविन्यपूर्ण अनुभूतीची प्रचिती देणाऱ्या कविता आहेत. शैलीच्या दृष्टीने केशवसुतांच्या काव्यात लालित्य कमी आहे पण काहीशी राकट आणि रांगडी अभिव्यक्ती त्यांच्या काव्य प्रवृत्तीशी सुसंगत ठरते. केशवसुतांचा काव्यसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर हरि नारायण आपटे यांनी 1916 मध्ये प्रकाशित केला. अर्वाचीन मराठीत सामाजिक संकल्पनांना भेदून एवढं निर्भीड लेखन करणारा हा कवी 7 नोव्हेंबर 1905 रोजी हुबळी येथे प्लेगने वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी अनंतात विलीन झाला. 

नवा शिपाई - कविता
नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें,
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !
ब्राह्मण नाहीं, हिंदुहि नाहीं, न मी एक पंथाचा,
तेचि पतित की जे आंखडिती प्रदेश साकल्याचा !
खादाड असे माझी भूक;
चतकोरानें मला न सुख;
कूपांतिल मी नच मंडूक;
मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदीं न मला साहे !
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !


जिकडे जावें तिकडे माझीं भांवडें आहेत,
सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत;
कोठेंही जा---पायांखालीं तृणावृता भू दिसते;
कोठेंही जा---डोईवरतें दिसतें नीलांबर तें !

सांवलींत गोजिरीं मुलें,
उन्हांत दिसतो गोड फुलें,
बघतां मन हर्षून डुलें;
तीं माझीं, मी त्यांचा,---एकच ओघ अम्हांतुनि वाहे !
नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें !

पूजितसें मी कवणाला ?--- तर मी पूजीं अपुल्याला,
आपल्यामधें विश्व पाहुनी पूजीं मी विश्वाला;
‘ मी ’ हा शब्दच मजला नलगे; संपुष्टीं हे लोक
आणुनि तो, निजशिरीं ओढिती अनर्थ भलते देख !

लहान---मोठें मज न कळे,
साधु---अधम हें द्वयहि गळे,
दूर---जवळ हा भाव पळे;
सर्वच मोठे---साधु---जवळ, त्या सकलीं मी भरुनी राहें ! कोण मला वठणीला आणूं शकतों तें मी पाहें !


हलवा करितां तिळावर जसे कण चढती पाकाचे,
अहंस्फूर्तिच्या केन्द्राभंवतें वेष्टन तेंवि जडाचें;
आंत समचि निर्गुण तिलक, वरी सदृश सगुण तो पाक,
परि अन्यां बोंचाया घरितो कांटे कीं प्रत्येंक !
अशी स्थिती ही असे जनीं !

कलह कसा जाइल मिटुनी ?
चिंता वागे हीच मनीं.
शान्तीचें साम्राज्य स्थापूं बघत काळ जो आहे,
प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूर शिपाई 
आहे !

प्रस्तुत 'नवा शिपाई' ही केशवसुतांची कविता सुधारणावादी, सामाजिक जाणिवेची कविता आहे.
ही कविता ज्या काळामध्ये लिहिली तो काळ लक्षात घेणे गरजेचे आहे. इंग्रजी सत्तेचा अंमल भारतामध्ये होता. त्यामुळे इंग्रजी भाषेचा प्रभाव पडणं साहजिक आहे. आधुनिक जीवनमूल्ये इंग्रजी साहित्यामधून घेऊन भारावलेली पहिली पिढी त्यामध्ये कवी केशवसुत आहेत. निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर आहेत. लोकहितवादी आहेत. कथा, कादंबरीकार हरि नारायण आपटे आहेत.
'नवा शिपाई' ही कविता विश्वबंधुत्व, समता आणि शांतीचे साम्राज्य मानवतावादाच्या मूलभूत प्रेरणावर आधारलेली कविता आहे. केशवसुत स्वतः नवा शिपाई संबोधतात.
 "नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई" म्हणजे
आधुनिक विचार मूल्य अंगीकारलेला, नवीन विचारसरणी असलेला, नव्या युगाचा, नव्या विचारधारेचा प्रतिनिधी, धाडसी आणि जाज्वल्य आत्मा असलेला युवक, तरुण होय. जो जुन्या रूढींना आव्हान देतो.
 कोण मला वाठणीला आणू शकतो ते मी पाहे"
 "मला कोणी आवर घालू शकतं, मला रोखू शकतं का – ते मी पाहतो!"
या ओळीत स्वाभिमान, आत्मविश्वास आणि विद्रोही वृत्ती आहे.
ही कविता पुराणमतवादी समाजव्यवस्थेवर टोकाची टीका करणारी आहे.
या ओळीत एक क्रांतिकारी वृत्तीचा, नव्या विचारांनी भारलेला तरुण बोलतो आहे. तो जुने नियम, रूढी, बंधनं, भेदभाव झुगारून देण्यास सज्ज आहे. "माझ्यात ती ताकद आहे, आणि मला कोणी थांबवू शकत नाही" – अशी गर्जना आहे.
ही कविता स्वातंत्र्यपूर्वकाळातील, पण विचार मात्र आजही ज्वलंत आणि प्रेरणादायी आहेत.
ही ओळ म्हणजे नवचैतन्याचा नाद आहे, जिथे शिपाई म्हणजे विचारांचा योद्धा आहे!
"ब्राह्मण नाही हिंदूही नाही, न मी एक पंथाचा
तेच पतीत जे आखडिती ती प्रदेश साकल्याचा
मानवतावादी विचार कवी पेरतो. विश्वबंधुत्वाची मांडणी कवी या ठिकाणी करतो. जात, धर्म, पंथ व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन सर्व माझेच आहेत ही भावना कवी व्यक्त करतो. मी ब्राह्मण नाही, हिंदूही नाही. या ठिकाणी ब्राह्मण हा शब्द समूहा पुरता (विविध जाती) येतो. मी कोणत्याही जातीचा नाही. मी कोणत्याही धर्माचा नाही. मी कोणत्याही पंथाचा नाही. मी संपूर्ण मानवतेचा आहे. वसुधैव कुटुम्बकम, हे विश्वची माझे घर ही भावना कवी व्यक्त करतो.
जे कोणी मला विशिष्ट जात, धर्म, पंथ यामध्ये समाविष्ट करतील ते पापी ठरतील. माझी व्याप्ती ही मर्यादित नाही. जे कोणी मला आखडीत आहेत. ते संकुचित विचाराचे आहेत. 
पुढे कवी म्हणतो, 
खादाड असे माझी भूक;
चतकोरानें मला न सुख;
कूपांतिल मी नच मंडूक;
मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदीं न मला साहे !
कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !
प्रस्थापित जात, धर्म, पंथ, वर्ण मला दोन चार लोकांचे मत परिवर्तन करायचे नाही तर संपूर्ण विश्वातील मानवाचे परिवर्तन कवीला करावयाचे आहे.
ही कविता बंडखोर वृत्ती, नव्या विचारांचा आविष्कार व जुने-पुराणे बंधनं झुगारून देण्याची मानसिकता व्यक्त करते. चला ओळीनुसार भावार्थ पाहूया—


"नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें, कोण मला वठणीला आणू शकतो तें मी पाहें !"
👉 कवी सांगतो की तो नवीन युगाचा, नव्या विचारांचा योद्धा आहे. त्याला कोणीही जुनी परंपरा, रूढी, बंधनं वठणीला आणू शकत नाहीत.

"ब्राह्मण नाहीं, हिंदुहि नाहीं, न मी एक पंथाचा, तेच पतित कीं जे आखडिती प्रदेश साकल्याचा !"
👉 तो कोणत्याही जाती-पंथाशी बांधलेला नाही. जो मनुष्य समाजाला बंधनांत ठेवतो, विचारांना रोखतो तोच खरा पतित आहे, असं कवी म्हणतो.

"खादाड असे माझी भूक, चतकोरानें मला न सुख;"
👉 त्याची भूक म्हणजे फक्त पोटभर अन्नाची नाही, तर ज्ञान, अनुभव, प्रगती यांची अखंड भूक आहे. थोडक्यात समाधान होणारी ती नाही.

"कूपातिल मी नच मंडूक;"
👉 तो मर्यादित चौकटीत, जुन्या विचारांत, एका ठिकाणी अडकून बसलेला 'कूपमंडूक' नाही.

"मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदीं न मला साहे !"
👉 त्याच्या जीवनावर, विचारांवर कोणतेही बंधन (कुंपण) येणे त्याला अजिबात सहन होत नाही.

"कोण मला वठणीला आणू शकतो तें मी पाहें !"
👉 शेवटी तो पुन्हा ठामपणे सांगतो – त्याला कोणीही वश करू शकत नाही.
थोडक्यात,
कवी स्वतःला नव्या युगाचा धाडसी सैनिक मानतो. तो कोणत्याही जाती-पंथाच्या चौकटीत बांधलेला नाही. त्याला ज्ञान व प्रगतीची अखंड भूक आहे. तो अरुंद विचारांच्या चौकटीत बसणारा नाही. बंधनं, परंपरा, जुने कुंपण त्याला सहन होत नाही. त्यामुळे समाजातील कोणत्याही शक्तीला त्याला वठणीला आणता येणार नाही, हीच त्याची बंडखोर घोषणा आहे.
प्रस्तुत कविता बंडखोर पण एकात्म भावनेचा विचार मांडते. यात कवी स्वतःला "नव्या युगाचा शिपाई" म्हणतो आणि जगाकडे पाहण्याचा त्याचा व्यापक, निर्भेळ, मुक्त दृष्टिकोन दाखवतो. 

"जिकडे जावें तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत;"
👉 संपूर्ण विश्व कवीला आपलंच घर वाटतं. जगातील प्रत्येक जीव त्याचा भाऊ-बहिण आहे.

"कोठेही जा-पायांखालीं तृणावृता भू दिसते, कोठेही जा-डोईवरतें दिसतें नीलांबर तें;"
👉 जिथे जाईल तिथे त्याला एकच पृथ्वी, एकच आकाश दिसते. एकात्मता व समानता हा भाव यातून प्रकटतो.

"सांवलींत गोजिरीं मुलें, उन्हांत दिसती गोड फुलें, बघतां मन हर्षन डुलें,
ती माझीं, मी त्यांचा, एकच ओघ अम्हांतुनी वाहे !"
👉 बालकांची निरागसता, फुलांची गोडी पाहून कवीच्या मनात आनंद भरतो. तो स्वतःला आणि सृष्टीला वेगळं मानत नाही; सगळ्यांतून एकच जीवनशक्ती वाहतेय, असं त्याला जाणवतं.

"पूजितसें मीं कवणाला तर मी पूजीं अपुल्याला, आपल्यामधें विश्व पाहुनी पूजीं मी विश्वाला;"
👉 कवी बाहेरच्या देवाला न पूजता, स्वतःतील आणि प्रत्येक प्राण्यातील विश्वाला पूजतो. त्याला 'मी' आणि 'तू' यात फरक वाटत नाही.

"'मी' हा शब्दच मजला नलगे; संपुष्टीं हे लोक आणुनी तो, निजशिरी ओढिती अनर्थ भलते देख !"
👉 कवीला अहंकाराचा 'मी' हा शब्द नकोसा वाटतो. लोक 'मी' 'माझं' याच्या पलीकडे जात नाहीत, त्यामुळे समाजात अनर्थ घडतो.

"लहान-मोठें मज न कळे, साधु-अधम हैं द्वयहि गळे, दूर-जवळ हा भाव पळे;
सर्वच मोठें-साधु जवळ, त्या सकलीं मी भरुंनी राहें !"
👉 कवीच्या नजरेत लहान-मोठं, साधू-अधम, जवळ-दूर असा फरकच नाही. सगळेच त्याला आपले वाटतात.

"हलवा करितां तिळावरी जसे कण चढती पाकाचे, अहंस्फूर्तिच्या केंद्राभवतें वेष्टन तेंवि जडाचें;"
👉 जसं तिळाला साखरेचा पाक चढवला की बाहेरून सुंदर गोड थर दिसतो पण आत तो तिळाच असतो, तसंच माणसाच्या अंतरात्म्याचा निर्गुण सत्यरूप आणि बाहेरचं सगुण रूप वेगळं दिसतं.

"आंत समचि निर्गुण तिलक, वरी सदृश सगुण तो पाक, परी अन्यां बोंचाया धरीती कांटे कीं प्रत्येक !"
👉 आत सगळ्यांत सारखाच निर्गुण आत्मा आहे, बाहेर मात्र रूपं-भेद दिसतात. पण लोक एकमेकांना वेगळं समजून टोचतात, भेदभाव करतात.
सारांशाने 
हा उतारा विश्वबंधुत्वाचा आणि आत्मज्ञानाचा संदेश देतो. कवी म्हणतो —

माझं खरं घर म्हणजे संपूर्ण विश्व आहे.

सृष्टीतील प्रत्येक प्राणी, फुलं, मुलं, माणसं — हे सारे माझेच आहेत.

देव म्हणजे कुठे बाहेर नाही, तर माझ्यात आणि सर्वांमध्ये आहे.

'मी-तु', लहान-मोठं, श्रेष्ठ-कनिष्ठ हे भेद तो मानत नाही.

मुळात सर्व जीवांच्या आत एकच आत्मा आहे, बाहेर रूपं वेगळी दिसतात.
म्हणून तो स्वतःला नव्या युगाचा, नव्या विचारांचा शिपाई म्हणतो, ज्याला कोणतेही बंधन, जाती-पंथाचे भेद, किंवा अहंकार वश करू शकत नाही.
"अशी स्थिती ही असे जनीं ! कलह कसा जाइल मिटुनी ? चिंता वाटे हीच मनीं."
👉 जगात सतत भांडणं, वाद, कलह सुरू आहेत. समाजात भेदभाव, अन्याय, संघर्ष यामुळे शांतता नाही. कवीच्या मनात एकच प्रश्न आहे — हा कलह कसा संपणार?

"शांतीचे साम्राज्य स्थापूं बघत काळ जो आहे, प्रेषित त्याचा, नव्या दमाचा शूर शिपाई आहे!"
👉 पण काळ पुढे जात आहे, बदल घडतो आहे. या बदलत्या काळाचा हेतू म्हणजे जगात शांतीचं साम्राज्य प्रस्थापित करणे. त्या शांतीच्या कार्यासाठी जो नवा विचार घेऊन लढतो, जुनी बंधनं तोडतो, तोच या युगाचा शूर शिपाई आहे.

कवी सांगतो की जगात वाद, भांडणं, कलह आहेत. त्यातून बाहेर पडून शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे. आजचा नवा काळ हा शांतीचं साम्राज्य उभारण्यासाठी येत आहे, आणि त्या कार्याचा सैनिक म्हणजेच "नव्या दमाचा शूर शिपाई" होय.
अशाप्रकारे कवी केशवसुत यांनी प्रस्तुत नवा शिपाई कवितेतून सामाजिक जाणीव व्यक्त करणाऱ्या माणुसकीची पताका खांद्यावर घेऊन निघालेल्या समतेच्या शिलेदाराचा  प्रवास कवितेतून चित्रीत केलेला आहे.
आहे, पाहे 
पंथाचा, साकल्याचा,
भूक, सुख 
मुले, फुले, डुले 
लोक, देख
विश्वाला, आपुल्याला
कळे,गळे, पळे 
राहे, पाहे
पाकाचे, जडाचे 
जनी, मनी यमकादि शब्दांची सुरेख रचना कवीने केलेली असून त्यामुळे कविता नादवती, ओघवती व गेय स्वरूपाची बनते.
एक प्रेरणा गीत वाटावे अशी सुरेख रचना कवी केशवसुत यांची आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता, मानवता आदि मूल्यांचे दर्शन प्रस्तुत रचनेतून घडते.








संदर्भ - 
1. Marathi vishwakosh.org/36425/केशवसुत - लेखक रा.श्री. जोग 
2. दैनिक प्रभात मधील 20 मार्च 2022 चा आधुनिक मराठी काव्याचे जनक केशवसुत -डॉ. गणेश काकांडीकर यांचा लेख
3.


रविवार, २० जुलै, २०२५

आण्णासाहेब हरी साळुंखे

 

आण्णासाहेब हरी साळुंखे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigationJump to search
आण्णासाहेब हरी साळुंखे
Dr .A. H. Salunkhe at Nagpur in 2012.jpg
डॉ. आ. ह. साळंखे २०१२ मध्ये
राष्ट्रीयत्वभारतीय Flag of India.svg

डॉ. आण्णासाहेब हरी साळुंखे (जन्म : खाडेवाडी-सांगली जिल्हा,14 ऑक्टोबर , १९४३) हे मराठीतले लेखक, महाराष्ट्रातील एक विचारवंत, व्याख्याते आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक आहेत. ते सातारा शहरातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात संस्कृत विषयाचे ३१-५-२००३पर्यंत विभागप्रमुख आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे विद्याशाखेचे अधिष्ठाता (फॅकल्टी ऑफ आर्ट्‌सचे डीन) व ॲकॅडमिक काउन्सिलचे सदस्य होते. त्यांना राष्ट्रभाषा पंडित म्हणून गौरवण्यात आले होते.संदर्भ हवा ]

डॉ. आ.ह. साळुंखे यांनी मराठी विश्वकोशात तुलनात्मक धर्मशास्त्र, संस्कृत इत्यादी विषयांत १००हून अधिक लेख लिहिले आहेत. १९५९ पासून जाहीर रीत्या सभांमधून भाषणे देत असले तरी त्यांची महाराष्ट्रभर भटकंती आणि व्याख्याने १९८०-८१पासून सुरू झाली. त्या सुमारास साळुंखे यांनी चार्वाकावर लिहिलेली लेखमाला वाईच्या नवभारत मासिकात प्रकाशित झाली आणि दुसर्‍या बाजूने किर्लोस्कर मासिकाच्या जून १९८१च्या अंकात मराठा समाजावरील आत्मनिरीक्षणात्मक स्वरूपाचा गाजलेला लेख प्रसिद्ध झाला. त्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून फक्त किर्लोस्करकडे तीन पोती भरतील एवढी पत्रे आली होती. तेव्हापासून आ.ह. साळुंखे यांना अखिल महाराष्ट्रातून व्याख्यानांची आमंत्रणांवर आमंत्रणे येऊ लागली.संदर्भ हवा ]

४ ऑगस्ट २००९ला महाराष्ट्र सरकारने डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी समिती नेमली होती. या समितीत डॉ.आ. ह. साळुंखेंखेरीज वि.वि.करमरकर, प्रा.डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शफाअत खान, गिरीश गांधी, डॉ.अरुण टिकेकर, अशोक नायगांवकर, आमदार उल्हास पवार, प्रा.दत्ता भगत हे सदस्य होते. समितीने तयार केलेला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा २२-१-२०१० रोजी महाराष्ट्र सरकारला सादर केला. संमत झालेल्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठीही आ.ह. साळुंखे यांची नेमणूक करण्यात आली आहे.संदर्भ हवा ]

जीवन[संपादन]

डॉ. साळुंखे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील खाडेवाडी या लहानशा गावी एका शेतकर्‍याच्या कुटुंबात झाला. संस्कृत विषयात पहिल्या वर्गात प्रथम येत त्यांनी आपली पदवी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून घेतली. एम.ए.मध्येही त्यांनी संस्कृत विषयात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी १९८६मध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर इथे चार्वाक दर्शनाचा चिकित्सक अभ्यास ह्या विषयावरील पीएचडीसाठीचा प्रबंध सादर केला.[१]

वैयक्तिक[संपादन]

  • आ.ह. साळुंखे यांच्या पत्‍नीचे नाव मधुश्री. त्यांचे २५ एप्रिल २००० रोजी कॅन्सरने निधन झाले.
  • आ.ह. साळुंके यांचे चिरंजीव नीरज साळुंखे हे प्राध्यापक आणि लेखक आहेत.
  • दुसरे चिरंजीव राकेश यांची लोकायत ही प्रकाशनसंस्था, आ.ह. साळुंखे यांची पुस्तके प्रकाशित करते.संदर्भ हवा ]

आ. ह. साळुंखे यांची ग्रंथसंपदा[संपादन]

  • अंधाराचे बुरुज ढासळतील !
  • अशी भेटत रहा तू!
  • अस्तिकशिरोमणी चार्वाक
  • आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल
  • प्राईड ऑफ स्वराज्य : उमाजीराजे नाईक
  • एकलव्य
  • एकलव्य, शंबूक आणि झलकारीबाई
  • ऐतरेय ब्राह्मण : एक चिकित्सा
  • गुढी आणि शंकरपार्वती
  • गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो (पुस्तिका)
  • चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !
  • चार्वाकदर्शन (पुस्तिका)
  • चिंतन - बळीराजा ते रवींद्रनाथ
  • जीवनाची लय वेदनेत
  • तुकारामांचा शेतकरी
  • विद्रोही तुकाराम
  • विद्रोही तुकाराम : समीक्षेची समीक्षा
  • संत तुकारामांचे अभंगशतक
  • न सरे ऐसे तुकोबांचे दान
  • तुझ्यासह आणि तुझ्याविना
  • तुळशीचे लग्न : एक समीक्षा
  • त्यांना सावलीत वाढवू नका!
  • धर्म की धर्मापलीकडे?
  • ना गुलाम, ना उद्दाम
  • परशुराम : जोडण्याचे प्रतीक, की तोडण्याचे
  • परिवर्तन : शास्त्रही, कलाही
  • पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर
  • पोकळ आक्षेप विरुद्ध भक्कम भूमिका (डॉ. आ. ह. साळुंखे यांची मुलाखत)
  • बळीवंश
  • बहुजनांसाठी जीवनवादी सुभाषिते
  • तथागत बुद्ध आणि संत तुकाराम
  • बुद्धस्तोत्र
  • सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध
  • सर्वोत्तम भूमिपुत्र : आक्षेप (डॉ. आंबेडकरांची विचारधारा आणि लेखकाची भूमिका)
  • बुद्धांचे मंगलसुत्त
  • मन निरभ्र व्हावं
  • मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती (पुस्तिका)
  • महात्मा फुले आणि धर्म
  • महात्मा फुले आणि शिक्षण
  • महाभारतातील स्त्रिया भाग १
  • महाभारतातील स्त्रिया भाग २
  • महाभारतातील स्त्रिया भाग ३ (ना गुलाम, ना उद्दाममधून)
  • मित्रांना शत्रू करू नका !
  • वादांची वादळे
  • वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (पुस्तिका)
  • शंबूकहत्या आणि सीतात्याग प्रक्षिप्त (पुस्तिका)
  • शंभर कोटी मेंदू, दोनशे कोटी हात
  • शिवराय : संस्कार आणि शिक्षण
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक
  • संवाद - सहृदय श्रोत्यांशी
  • हिंदू संस्कृती आणि स्त्री
  • हृदयातून हृदयाकडे
  • जिज्ञासापुरुष : ह्युएनत्संग

साळुंखे यांनी मराठीमध्ये अनुवादित केलिली पुस्तके[संपादन]

  • के. सच्चिदानंद यांचे नागार्जुन (मूळ संस्कृत) इंग्रजीमधून मराठीत
  • कर्तारसिंग दुग्गल यांचे शीख धर्मातील निरपेक्ष जाणिवा (मूळ इंग्रजी)
  • एरिख फ्रॉम याचे स्वातंत्र्याचे भय(मूळ इंग्रजी)
  • लाटकरशास्त्री यांचे शाहूचरतिम्(मूळ संस्कृत)

पुरस्कार, मानसन्मान, भेटवस्तू वगैरे[संपादन]

  • ७ फेब्रुवारी १९९९ रोजी बाबूराव बागूल यांच्या संमेलनाध्यक्षपदी मुबईत धारावी येथे झालेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक
  • रा.ना. चव्हाण प्रतिष्ठान(वाई)चा महर्षी वि.रा. शिंदे पुरस्कार (१०-४-१९९९)
  • जुलै १९९९मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे आयोजित केलेल्या यज्ञविरोधी परिषदेतील एक वक्ते. अन्य वक्ते डॉ. श्रीराम लागू व डॉ. नरेंद्र दाभोलकर.
  • सांगली जिल्ह्यातील वाळवे गावाचे क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी यांच्या हस्ते, कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनामध्ये कार्यकर्त्यांच्या पैशातून घेतलेल्या मारुती व्हॅनची भेट (१४-१०-१९९९). (या गाडीने डॉ. आ.ह. साळुंखे यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने देण्याच्या निमित्ताने २० वर्षांत ४० हजार किलोमीटर प्रवास केला.)
  • २४-२५ एप्रिल१९९९ या काळात जळगाव येथे गंगाधर पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिवर्तन साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक.
  • १७-१९ डिसेंबर १९९९ या काळात सातारा येथील आंबेडकर अकादमीतर्फे बेळगाव येथे आयोजित केलेल्या ’संस्कृती आणि इतिहास’ या विषयावरील विचारवेध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • ८-९ जुलै २००० या काळात मराठा सेवा संघाने अमरावती येथे आयोजित केलेल्या पहिल्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
  • छत्रपती प्रतापसिंहराजे महाराज (थोरले) यांच्या त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सातारा नगरपालिकेने दिलेला पुरस्कार (१९-१-२०१०)
  • मारवाडी फाउंडेशनच्यावतीने प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणारा 'प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार' (नोव्हेंबर २०११)
  • बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने बीड जिल्ह्यातील केज येथील पहिल्या बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२४-११-२०१२).
  • वाशीम येथे झालेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या तिसर्‍या राष्ट्रीय महिला अधिवेशनात प्रमुख वक्ते म्हणून सहभाग (२९-११-२०१२).
  • पुणे येथे झालेल्या ३र्‍या अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष (१६-१७ फेब्रुवारी २०१३).
  • पुण्यात झालेल्या पुणे महापालिका आयोजित पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. (२४-२-२०१३)
  • महाराष्ट्र शासनाचा दोनदा डॉ. आंबेडकर पुरस्कार
  • सामाजिक कृतज्ञता निधीचा डॉ. राम आपटे पुरस्कार
  • पंढरपूरच्या कैकाडी मठाचा पुरस्कार
  • बीड येथील पिंगळे वाचनालयाचा महात्मा फुले पुरस्कार
  • तीन वेळा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
  • शिवाजी विद्यापीठाचा पुरस्कार
  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य पुरस्कार
  • मुंबईच्या अश्वघोष आर्ट्‌स ॲन्ड कल्चरल फोरमतर्फे ‘महाकवी अश्वघोष जीवन गौरव पुरस्कार’ (मे २०१६)
  • १२ डिसेंबर २०१५ रोजी रहिमतपूर (ता. कोरेगाव जि. सातारा) येथे संपन्न झालेल्या रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 

मराठाभूषण डॉ.आ.ह.साळुंखे

प्राच्याविद्यापंडित विद्वान डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त प्रासंगिक लेख…

डॉ.आ.ह.साळुंखे सरांचा जन्म १ जून १९४३ रोजी शिवाजीनगर (खाडेवाडी) ता.तासगाव जि.सांगली येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून त्यांनी एम. ए. (मराठी), एम. ए. (संस्कृत) व पी. एच.डी. (संस्कृत) या पदव्या मिळवल्या.

कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद संस्थेच्या सातारा येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात ३२ वर्ष संस्कृत मराठीचे अध्यापन कार्य केले. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व वाङ्‌मय विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून दिलेले योगदान अत्यंत महत्वाचे आहे.

मानवी समूहाला दिशादर्शक ठरणाऱ्या साठ ग्रंथांचे लेखन करुन आह सरांनी इतिहास निर्माण केला आहे. त्यांनी अनेक ग्रंथांची भाषांतरेही केली आहेत. विचारवेध संमेलन (बेळगांव), सत्यशोधक साहित्य संमेलन (लातूर), विद्रोही साहित्य संमेलन (सोलापूर), सत्यशोधक समाजाचे ३५ वे अधिवेशन (गेवराई), शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेचे १३ वे अधिवेशन (आटपाडी) इत्यादी संमेलनाची अध्यक्षपदे त्यांनी भूषवली आहेत.

मराठी विश्वकोषात संस्कृत आणि तुलनात्मक धर्मशास्त्र या विषयावर सुमारे शंभर लेख लिहून सांस्कृतिक परिवर्तनाचा पाया त्यांनी घातला आहे.

डॉ.आ.ह.साळुंखे

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचे शिल्पकार, धर्म व संस्कृतीचे अभ्यासक, संतवाङ्‌मयाचे भाष्यकार, स्त्री सन्मानाचा संस्कार घडविणारे थोर शिक्षक, लालित्यपूर्ण व प्रासादिक भाषाशैली असलेले साहित्यिक इ. अनेक पैलू असलेले प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे.

भारतभर तसेच भारताबाहेरही असलेल्या बुद्ध विचारांच्या खुणा शोधून सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणून तथागत गौतम बुद्धाची ओळख करवून देणारे बुद्ध चरित्रकार, धर्म की धर्मापलिकडे हा संभ्रम नाहीसा करून आस्तिक शिरोमणी म्हणून चार्वाकांना संबोधणारे प्रबोधनकार, हिंदू संस्कृतीतील स्त्रियांचे स्थान शोधणारे संशोधक, मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती आणि वैदिक धर्मसूत्रांद्वारे बहुजनांची गुलामगिरीची केलेली कृती याविषयीची रहस्ये उलगडून दाखविणारे अभ्यासक, गुलामांचा आणि गुलाम करणाराचा धर्म एक नसतो हे ठणकावून सांगणारे स्वातंत्र्ययोद्धे, बळीवंशाची खरी ओळख समाजाला करवून देणारे इतिहासकार, जगतगुरु संत तुकारामांच्या विद्रोहाचे स्वरूप समजावून सांगणारे सत्यशोधक , भारतातील तात्विक संघर्षाचे सूत्र मांडणारे तत्त्वचिंतक इत्यादी नात्यांनी ते परिचित आहेत.

ऋजुता, नम्रता, प्रगल्भता, संयम इत्यादी गुणांचा संगम असलेले प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येकाला आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे सहजपणे सापडतात.

संस्कृत साहित्याचा सखोल व्यासंग असूनही पांडित्य प्रदर्शनाचा सोस नसणारे विद्वान म्हणून त्यांचा लौकिक आहे. महाराष्ट्रभर व्याख्यानांच्या निमित्ताने त्यांच्या प्रासादिक वाणीचा लाभ अनेकांना होत असतो. तसाच तो देशातील अनेक राज्यांतील तसाच देशांबाहेरील श्रोत्यांनाही होतो.

बुद्धाची परिव्राजक वृत्ती आणि तुकारामांची सहृदयता यांचा मेळ असलेल्या त्यांच्या व्यक्तित्वातून बुद्ध व तुकारामांमधील सामरस्य प्रतीत होत असते. वारकरी धर्मातील बुद्ध विचारांचा धागा त्यांनी स्पष्ट केल्यामुळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सामंजस्य संस्कृतीला उजाळा मिळालेला आहे.

लोकायत प्रकाशन सातारा

सामाजिक शोषणाच्या विरुद्ध दंड थोपटून उभे राहणारे महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या धर्मविचारांचे वारस म्हणून त्यांनी जसे त्यांचे नाते चार्वाकांशी जोडले तसेच कुलस्वामी बळीराजाशीही. शेतकाऱ्यांविषयी कळवला असणाऱ्या तुकोबारायांची तलमलयांनी त्यांच्या सशक्त शब्दांमधून अभिव्यक्त केली.

थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्फत सोन्याच्या नांगराने या पुण्यनगरीचे पुनर्निमान केलेले आहे.

आह सर छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा वैचारिक वारसा पुढे चालवत आहेत. त्यांनी केलेल्या उत्तमोत्तम लेखन व संशोधनाने एक पिढी घडवली आहे व प्रकाशित पुस्तकांच्या माध्यमातून पुढील पिढी घडत आहे. हे विशेष आनंदाचे आणि अभिमानाचे आहे.

आजच्या वर्तमानाच्या संदर्भाने आह सरांच्या ज्ञान व अनुभवांतून प्राप्त होणारे मार्गदर्शन तरुणांसाठी आदर्श आहे. वर्तमान सामाजिक परिस्थितीत त्यांचे विचार दिशादर्शक आहेत. समाजाला बुद्ध, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर या साखळीत जोडणारा दुवा म्हणुन त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. सरांनी चालविलेली ही माणसं जोडण्याची परंपरा कायम ठेवण्याची जबाबदारी आज आपल्यावर आहे.

साभार – मा.विकास पासलकर.

© लोकराज्य टीम.


सोमवार, १४ जुलै, २०२५

मरीआईचा गाडा

"मरीआईचा गाडा" ही कथा प्रसिद्ध दलित साहित्यिक अनाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांची आहे. ही कथा ग्रामीण जीवनातील अंधश्रद्धा, धार्मिक श्रद्धा, आणि वर्गविवेक यांवर अत्यंत परिणामकारक भाष्य करते.

✍️ कथेबद्दल माहिती – "मरीआईचा गाडा" (aanaa साठे)

आणाभाऊ साठे हे क्रांतिकारी विचारांचे साहित्यिक होते. त्यांनी आपल्या लेखनातून दलित, शोषित, कष्टकरी वर्गाचे जीवन अत्यंत जिवंत आणि तडफदार शैलीत मांडले. "मरीआईचा गाडा" ही कथा त्यांच्या अशाच वास्तववादी आणि सामाजिक आशय असलेल्या कथांपैकी एक आहे.


---

📚 कथेचा आशय:

"मरीआईचा गाडा" ही कथा म्हणजे धार्मिक अंधश्रद्धा आणि सामान्य जनतेच्या भोळ्या श्रद्धेचा उपयोग करून समाजात होणाऱ्या शोषणाचे वास्तवचित्रण आहे.

कथेतील मरीआईचा गाडा म्हणजे एक धार्मिक परंपरा, जिथे गावोगाव फिरून देवीची पालखी (गाडा) नेतात, आणि गावकरी भक्तिभावाने त्याचे पूजन करतात, अन्न देतात, चढावे चढवतात.

परंतु कथेतून हेही दिसून येते की,

काही लोक देवीच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधतात,

गरीब आणि अशिक्षित लोक भीतीपोटी सर्वस्व अर्पण करतात,

आणि समाजातील वर्गभेद, जातिभेद, आणि अज्ञान यांचा उपयोग करून वरचढ लोक जनतेवर सत्ता ठेवतात.
🔍 प्रमुख मुद्दे:

1. धार्मिक शोषण:
देवीच्या नावाने भोळ्या भक्तांकडून पैसा, अन्न, इतर गोष्टी गोळा केल्या जातात.


2. अंधश्रद्धेवर टीका:
लोक भीतीपोटी देवीच्या गाड्याला अडवायला घाबरतात, कारण त्यांना वाटते की काही केलं नाही तर देवी रागावेल.


3. वास्तवदर्शी चित्रण:
अनाभाऊ साठेंनी ही कथा रेखाटताना ग्रामीण भाषाशैली, स्थानिक बोली, आणि जगण्याचा अस्सल अनुभव वापरला आहे.


4. दलित दृष्टिकोन:
साठेंच्या लेखनात दलित समाजाचा अनुभव, त्यांचं दुःख, त्यांची लढाई आणि जागरूकता यांचा ठसा असतो.




---

🧠 थोडक्यात आशय:

"मरीआईचा गाडा" ही कथा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा दाखवते.
भोळ्या-भाबड्या लोकांच्या धार्मिक भावना आणि त्याचा गैरफायदा घेणारी व्यवस्था यावर ही कथा उपरोधाने घणाघात करते.


गुरुवार, १० जुलै, २०२५

अखंडकार क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले


आधुनिक महाराष्ट्राचे जनक म्हणून 
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. महाराष्ट्राची माती आधुनिक विचाराने व समाज प्रबोधनाच्या शिंपणाने त्यांनी सुजलाम सुफलाम केली आहे. 

पद्यलेखनात महात्मा फुले यांनी विविध प्रकार हाताळले असून यात अखंड ही रचना प्रसिद्ध आहे. अखंड रचना करताना त्यांचा मूळ उद्देश हा सामान्य जणांना आपल्या हक्काबद्दल जागृत करणे, त्यांची होणारी पिळवणूक समोर आणणे, सामन्याने जागृत होऊन विद्या संपादन करणे हा होता.

  

जसे संतांचे अभंग हे जनजागृती चे कार्य करित होते त्याचप्रमाणे अखंड हे सुध्दा अभंगाचे आधुनिक रूप असून याची रचना ही वैशिष्ट्यपुर्ण आहे. कर्मकांडे, जातीविषमता, सनातनीपणा, लुबाडणूक, विद्येचे महत्व धर्म, निर्मिक, दिनदुबळ्याची सेवा, इत्यादी विविध विषयावर महात्मा फुले यांनी अखंड रचना केली आहे.


मानव प्राणी सुखी कशाने होईल या प्रश्नाचे 

महात्मा फुले म्हणतात, 

सत्य सर्वाचे आदि घर । सर्व धर्माचे माहेर ॥ 

जगामाजी सुख सारे । खास सत्याची ती पोरे

सत्य सुखाचा आधार । बाकी सर्व अंधकार ॥ 


सत्य हेच अंतिम असून माणसाने नेहमी सत्यवर्तन केले पाहिजे त्यामुळे आपणास सुख प्राप्त होईल. सर्व धर्म ही असेच सांगतात त्यामुळे सत्यवर्तन आवश्यक आहे. धर्माच्या बाबतीत ही त्यांची विचारसारणी ही आधुनिक होती

मानवाचे धर्म नसावे अनेक।  

निर्मिक तो एक ज्योती म्हणे ॥ 


मानवता हाच मानवाचा एकमेव धर्म आहे ईश्वरासाठी ते निर्मिक ही संकल्पना वापरतात. मानवात कोणतेही भेदभाव नसून सर्व मानवप्राणी समान आहेत.सर्वांना जन्मतःच सर्व वस्तूचा उपभोग घेण्याचे अधिकार असून मानवाने उच्च नीच हे भेदभाव तयार केले आहेत. 

सर्वाचा निर्मिक आहे एक धनी 

त्याचे भय मनीं। धरा सर्व ॥ 

न्यायाने वस्तूचा उपभोग घ्यावा 

आनंद करावा । भांडू नये ॥ 

धर्म राज्य भेद मानवा नसावे 

सत्याने वर्तावें । ईशासाठी ॥ 


मानवातील भेदभावावर प्रहार करताना महात्मा फुले अतिशय समर्पक अशी निसर्गातील उदाहरणे देतात.

एक सुर्य सर्वा प्रकाश देती 

उद्योगा लावीतो प्राणीमात्रा॥   

मानवाचा धर्म एकच असावा 

सत्याने वर्तावा ज्योती म्हणे ॥

  

सुर्य, चंद्र, नदी, नाले, तरु हे सर्वांसाठीच आहेत यावर कोणा एकाची मालकी नाही त्यामुळे सर्व मानवाचा धर्म हा एकच आहे. 

सर्वांना आपला उन्नती व उत्कर्ष करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विद्या संपादन करणे. शिक्षण हाच मानवाच्या विकासाचा पाया आहे अशी धारणा महात्मा फुले यांची होती.विद्या नसेल तर काय विपरीत परिणाम होतात हे सांगताना शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाच्या उपोदघातात ते म्हणतात. 

विद्येविना मती गेली। , मतीविना नीति गेली 

नीतीविना गति गेली, गतिविना वित्त गेले 

इतके अनर्थ ऐका अविद्येने केले ॥ 

ही अविद्या आपण आपल्या जीवनातून दूर केली पाहीजे.

 विद्या सर्वां देई । सद्गुणाची हाव 

 करी नित्य कीव । अज्ञान्याची ॥  


विद्या ही व्यक्तीला समृृदध बनवते बलवान बनवते यासाठी आपल्या मुलामुलींना शाळेत घातले पाहिजे

नित्य मुली मुला शाळेत घालावे 

अन्नदान द्यावे । विध्यार्थीस ॥  

यात ही त्यांनी मुली मुला असे दोघे ही म्हटले आहे यापुढे ही जावून मुली हा शब्द प्रथम वापरला आहे.यातूनच महात्मा फुले यांचा स्त्रीयांं प्रती असलेला समतेचा द्रुष्टीकोण दिसून येतो.स्त्री पुरुष दोघेही समसमान असून दोघानी एकत्र येवून सत्यवर्तनाने कष्ट करावे व आपले कुटुंब सुखी ठेवावे यासाठी ते म्हणतात, 

स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे। 

कुटुंबा पोसावे आनंदाने ॥
भोंदूगिरी व अंधश्रद्ध यावर ते कडा प्रहार करतात गोरगरीब जनतेला हे लोक नाडतात व त्यांच्या अज्ञानाचा फायदा उचलतात अंशावर ते आपल्या शब्दातून आसूड ओढतात.
जप अनुष्ठाने स्त्रिया मुले होती।  

दुजा का करिती । मुलासाठी ॥  


सर्व मानव जातीचे कल्याण व्हावे अशी त्यांची धारणा होती यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत दिनदुबळ्यांंची सेवा करणे त्यांना मदत करणे हे माणूस म्हणून आपले आद्य कर्तव्य असले पाहिजे 

रंजले गंजले अनाथ पोसावे। 

प्रितीने वागावे । बंधुपरि ॥ 


आळस हा मानवाचा शत्रू असून लहानपणापासूनच आपल्या मुलामुलींना हे आपण शिकवले पाहिजे असे हे ते सांगतात.

सर्व सद्गुणांचा आळस हा पिता 

बालपणी कित्ता । मुलीमुला ॥


अशाप्रकारे आधुनिकतेला स्पर्श करणारी व मानवी कल्याणाचा विचार करणारी काव्यप्रतिभा महात्मा फुले यांच्या अंगी होती. काळ बदलला तरीही यातील स्त्री पुरुष समानतेचा विचार, वैज्ञानिक दृष्टीकोन, अंधश्रद्धेवर भोंदूगिरीवर प्रहार, धर्माची विधायक चिकित्सा करणारा विचार, शिक्षणाचे मानवी जीवनातील महत्त्व, मानवसेवा हे सर्व काही आजही लागू आहे आणि येणाऱ्या काळातही समाजाला उपयोगी पडणारे असेल. 


प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे, मुंबई

मो: 7738436449

ईमेल: prradipk102@gmail.com

सोमवार, ७ जुलै, २०२५

प्रज्ञा दया पवार - परिचय

प्रज्ञा दया पवार (जन्म ११ फेब्रुवारी, १९६६) यांनी सुरुवातीचे लेखन प्रज्ञा लोखंडे नावाने केले आहे. या मराठी कवयित्री आणि लेखिका आहेत. पाक्षिक 'परिवर्तनाचा वाटसरू'च्या त्या संपादक आहेत. शिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती आणि मराठी संशोधन मंडळ या संस्थांच्या त्या सदस्या आहेत. त्यांनी २०१६मध्ये मुंबई विद्यापीठातून 'गो. पु. देशपांडे यांच्या नाटकांचा चिकित्सक अभ्यास' या विषयावर पीएच्. डी. प्राप्त केली आहे. ख्यातनाम मराठी साहित्यिक पद्मश्री दया पवार यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत. अलीकडेच प्रज्ञा दया पवार यांनी देशातील असहिष्णुता आणि तिरस्काराच्या वाढत्या वातावरणाचा निषेध म्हणून त्यांचे साहित्य पुरस्कार राज्य सरकारला परत केले.

प्रज्ञा दया पवार यांनी लिहिलेली पुस्तके
संपादन
अंतःस्थ (कवितासंग्रह, १९९३, मानसन्मान प्रकाशन, पुणे, २००४, डिंपल प्रकाशन, मुंबई)
अफवा खरी ठरावी म्हणून (कथासंग्रह) (२०१०, शब्द पब्लिकेशन्स, मुंबई) (या संग्रहातील सर्व कथांसह अन्य दोन कथांचा इंग्रजी अनुवाद डॉ. माया पंडित यांनी केला असून तो 'Let The Rumours Be True' या शीर्षकाने ऑथर्स अपफ्रंट या प्रकाशन संस्थेने २०१७ साली प्रसिद्ध केला आहे. कण्व प्रकाशन, बंगलोर या प्रकाशनसंस्थेने प्रस्तुत कथासंग्रहाचा चंद्रकांत पोकळे यांनी केलेला कन्नड अनुवाद 'प्रज्ञा दया पवार कथेगळू' या शीर्षकाने २०१२ साली प्रसिद्ध केला आहे.)
अर्वाचीन आरण (संमिश्र गद्यलेख, २०२०, शब्द पब्लिकेशन्स, मुंबई)
आरपार लयीत प्राणांतिक (दीर्घकविता) (२००९, २०१०, लोकवाड़्मय गृह, मुंबई)
उत्कट जीवघेण्या धगीवर (कवितासंग्रह,२००२, लोकवाड़्मय गृह, मुंबई)
केंद्र आणि परीघ (संग्रहित ललित सदरलेखन, २००४, डिंपल प्रकाशन, मुंबई)
टेहलटिकोरी (संग्रहित ललित सदरलेखन, २०१६, अक्षर प्रकाशन, मुंबई)
दिशा - महाविद्यालयीन कवी - कवयित्रींच्या कविता (सहसंपादन, २००७, प्रकाशन : मुंबई विद्यापीठ)
दृश्यांचा ढोबळ समुद्र (कवितासंग्रह) (२०१३, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई)
धादांत खैरलांजी (नाटक, २००७, प्रतिशब्द प्रकाशन, मुंबई)
मी भयंकराच्या दरवाज्यात उभा आहे - नामदेव ढसाळ यांची निवडक कविता (सहसंपादन, २००७, शब्द पब्लिकेशन्स, मुंबई)
मी भिडवू पहातेय समग्राशी डोळा (कवितासंग्रह, २००७, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई)
विमुक्तांचे स्वातंत्र्य (सहसंपादन, २०१८, परिवर्तनाचा वाटसरू प्रकाशन, ठाणे)
हिल्लोळ हरवून आतबाहेरचा (कवितासंग्रह) (२०२४, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई)
पुरस्कार आणि सन्मान
संपादन
प्रज्ञा दया पवार यांना मिळालेले सन्मान :

मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
बिरसा मुंडा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार
महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार
शांता शेळके पुरस्कार
महाराष्ट्र राज्याचे केशवसुत पुरस्कार, बालकवी पुरस्कार, इंदिरा संत विशेष पुरस्कार आणि ग.ल. ठोकळ विशेष पुरस्कार.
बोधिवर्धन पुरस्कार
वनिता समाज गौरव पुरस्कार
औरंगाबाद येथे आयोजित गुणिजन संमेलनाचे अध्यक्षपद (२०१२)
पाटण (सातारा जिल्हा) येथे आयोजित विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२०१५)
लातूर येथे आयोजित अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२०१७)
विरार (पालघर जिल्हा) येथे आयोजित शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२०२०)
मॉस्को, रशिया येथे झालेल्या वर्ल्ड बुक फेअरमध्ये निमंत्रितांच्या कविसंमेलनात सहभाग (२००९)

गुरुवार, १६ जानेवारी, २०२५

बातमी लेखन

अलीकडील, सद्य घडामोडींविषयी लिहिलेली माहिती म्हणजे बातमी होय. अर्थातच बातमीतील मजकुराला काळाचा संदर्भ असतो. बातमी ही अनेक माध्यमांद्वारे दिली जाते. News या शब्दामध्ये पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चारही दिशामध्ये घडणाऱ्या घटनांचे वार्तांकन म्हणजे बातमी होय. जे नवीन घडले आहे, ते वाचकाला सांगणे म्हणजे बातमी होय. "News Is Everything That Interest People" ज्यामध्ये लोकांना स्वारस्य वाटते, अशी कोणतीही गोष्ट म्हणजे बातमी होय.

बातमी लेखन म्हणजे खासगी वाचनाच्या गोड वाचनाच्या कौशल्याचा उपयोग करून कोणत्याही गोष्टी, समाचार, किंवा घडामोडींची खबरीतली माहितीला तुमच्या वाचनाच्या योग्यपणानुसार लिहिणे. या कामात, तुमच्याकडून दिलेल्या गोष्टीची माहिती प्रमुख आणि उत्तरदायीपणाने व्यक्त करणे महत्त्वाचं आहे.

बातमी लेखन कसे करावे हे सांगताना, तुम्हाला कोणतीही विशिष्ट विषयाची गोष्टी असतील त्याच्या विचारात सुरुवात करूया. त्यानंतर, तुमच्या लेखनाच्या सूक्ष्मतेने अद्ययावत आणि वाचनाच्या नियमानुसार आवश्यक माहिती वाचनार वाचनाच्या कौशल्यानुसार लिहिण्याचा प्रयत्न करा.

एक चांगली बातमी लेखनाची सुरुवात उद्देशित वाचनाच्या साक्षरतेच्या पाठीशी सुरू करून, त्यातल्या गोष्टींची सारांश म्हणजे "5W1H" (Who, What, When, Where, Why How) ह्या प्रश्नांच्या उत्तरांतराची तुमची प्रयत्न करावी. त्यामुळे तुमच्या लेखनात आपल्याला तळब तळब वाचनाच्या असलेल्या वाचनाच्या कौशल्याने त्या गोष्टींची जबाबदारी सुनिश्चित करण्यात मदतीला आणण्याची आवश्यकता आहे.

लेखनाच्या सार्थकतेने, वाचनाच्या आवश्यकता असलेल्या गोष्टींची माहिती पुरेस्कृतपणे व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या बातमी लेखनाच्या माहितीला साक्षरता, तुमच्या वाचनाच्या कौशल्यानुसार सुधारित करण्याचा प्रयत्न केल्यास, तुमचं लेखन सुचलित आणि आकर्षक असेल.

अशाप्रकारे, तुमच्या बातमी लेखनाच्या कौशल्याने तुम्हाला मराठीत वाचनाच्या साक्षरतेच्या साधनेत सहाय्य करू शकतो आणि तुमच्या वाचनाच्या जीवनात अधिक निर्माण देऊ शकतो.

बातमी तयार करण्याचे निकष:

1. शीर्षक - बातमीचा मथळा हा संपूर्ण बातमीचा आरसा असतो.

2. दिनांक, स्थळ, कालावधी संबंधित व्यक्ती यांचा अचूक उल्लेख असावा.

3. बातमी नेहमी भूतकाळात लिहिली जावी. बातमी लिहिताना प्रथम महत्त्वाचा मुद्दा नमूद करून त्यानंतर त्याचा तपशील द्यावा

बुधवार, ८ जानेवारी, २०२५

लेखन कौशल्य

लेखन कौशल्य
भाषिक कौशल्यातील लेखन ही कौशल्य अधिक महत्त्वाचे आहे. मौखिक भाषेचे ते चिन्हांकित रूप असते. अक्षर ओळख असलेली सुशिक्षित व्यक्ती आपले बोलणे विचार अक्षरुपाने प्रकट करते तेव्हा नकळत या लेखन कौशल्याचा ती स्वीकार करते. अध्ययन अध्यापनामध्ये वाचनाप्रमाणेच लेखन कौशल्यही अत्यंत महत्त्वाचे आहे. लेखन कौशल्यासाठी भाषेचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. भाषेतील विविध शब्द, त्यांचे अर्थ रस्व दीर्घ व या उच्चाराप्रमाणे त्यांचे लेखन, व्याकरणिक नियम, अक्षरओळख, शब्दसंग्रह, सुवाच्च लेखन, हस्ताक्षर, मनातील विचार समर्पक शब्दात मांडण्याची क्षमता इत्यादी गोष्टीचा स्वीकार केला म्हणजे या भाषिक क्षमतेचा विकास साधता येतो.

लेखन म्हणजे काय? 
व्यावहारिक जीवनात भाषेचा विविध स्तरावर आपण वापर करतो. पत्रलेखन, कार्यालयीन लेखन, अध्ययन अध्ययन क्षेत्रातील लेखन, वृत्तपत्र लेखन, ग्रंथ लेखन इत्यादी आपल्या परिचयाचे क्षेत्रात त्यांचा आपण अनुभव घेतो. या विविध स्तरावरील भाषिक रचना छापील किंवा मुद्रित स्वरूपात असतात त्यासाठी शुद्धलेखनाचे नियम, व्याकरणिक नियमांचा आधार घेतलेला असतो. त्यामुळे लेखनाला एक वेगळे स्वरूप प्राप्त होते. लेखन हे आपल्या विचाराचे मूर्त स्वरूप असते
लेखनाच्या व्याख्या 
१. आशयाची मूर्त रूपाने केलेली मांडणी म्हणजे लेखन होय. 
२. अक्षराच्या माध्यमातून परस्परांशी साधलेला संवाद म्हणजे लेखन होय. 
३. मनातील विचारांचे अक्षरुप म्हणजे लेखन होय. 
अक्षर-शब्द-वाक्य यांची व्याकरणिक नियमाच्या आधारे मांडणी केलेले लेखन हे ‘शुद्धलेखन’ असल्याचे म्हटले जाते. त्यासाठी मनाची पूर्वतयारी असणे आवश्यक आहे. काय लिहायचे? व कसे लिहावयाचे? हे दोन प्रश्न नेहमी लेखकाच्या मनात निर्माण होतात. त्याची विचारपूर्वक सोडून केली म्हणजे लेखन क्षमतेचा आधार घेऊन मनातील विचार अक्षर रूपाने मांडण्याची प्रेरणा मिळते. त्यातूनच लेखन साकारते.
चांगले लिहिता येणे यासाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत.
१) विषयाचे पूर्ण ज्ञान.
२) काय लिहावयाची याविषयी स्पष्टता. ३) मराठी लेखनविषय नियमाचा परिचय. ४) शब्दसंग्रहाचे विपूलता 
५) समर्पक शब्दांची निवड करण्याची क्षमता.
६) मनाची एकाग्रता
 ७) सुंदर हस्ताक्षर - त्यासाठी लेखनाचा सराव.
८) योग्य पद्धतीने विचार मांडण्याची क्षमता, नेमकेपणा.
९) भाषेवरील प्रभुत्व.
१०) व्याकरणिक नियमांचा परिचय.
वरील गुणांच्या आधारे आपले लेखन कौशल्य जाणीवपूर्वक विकसित करता येते. त्यासाठी मनाची तयारी असणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे आपणा सर्वांना लेखनाचा कंटाळा येतो. याची प्रमुख कारण म्हणजे दैनंदिन जीवनात लेखनाची गरज कमी असते. बोलण्यापेक्षा लिहीण्याचा जास्त वेळ लागतो. चटकन संवाद साधून आपण लेखनाकडे दुर्लक्ष करत होतो. त्यामुळे आपले लेखन क्षमता विकसित होणे थांबते म्हणून लेखनाचा सराव करा,अधिक वाचन करा, त्यावर चिंतन करा, मनातील विचारांचे त्वरित लेखन करा, त्यांचा उपयोग आपल्या लेख शैक्षणिक स्तरावरील अध्ययन अध्यापन प्रक्रियेत होतो. विद्यार्थीदशेतच लेखन कौशल्य आत्मसात केले तर त्यामुळे भविष्यात चांगले जीवन जगता येते.

लेखनासाठी प्राथमिक कौशल्ये

माणसाने आपल्या भाषेला लिपी प्राप्त करून दिल्यानंतर व ती अधिक स्थिरस्थायी आहे हे लक्षात आल्यावर माणसे आपले विचार, मते, कल्पना लेखननिविष्ट करू लागली. लेखन ही 
स्वयं -अध्ययनाची जशी पायरी आहे तसे ते आत्मविष्काराचे, ज्ञानाच्या प्रसाराचेही महत्त्वाचे साधन आहे. औद्योगिकिकरण व जागतिकीकरणामुळे ज्ञानप्रक्रियेला व लेखन प्रक्रियेला गती आली. म्हणून जलद लेखनाचे महत्त्व आहे. त्याचबरोबर लेखन योग्य झाले पाहिजे याचा अभ्यास व्हायला लागला. 
लेखनाची प्राथमिक कौशल्य आपण सात टप्प्यात शिकणार आहोत. प्रथम जलद लेखन कसे करावे ते पाहू. दुसऱ्या भागात लेखनाचे दर्शनी रूप कसे असते ते पाहू. आज्ञेबर हुकूम करावयाच्या लेखनातही उचित शब्द lलेखनाला कसे महत्त्व आहे ते तिसऱ्या व चौथ्या भागात पाहू. संपन्न शब्दसंग्रहाचे महत्त्व काय, शुद्धतेचा परिणाम काय होतो व योग्य शब्दांचा वापर न केल्यास कोणती तोटे होतात ते पुढील भागात पाहू.

लेखनगती
प्रौढपणी आपण अभ्यासास सुरुवात केल्यावर लेखनाला गती येत नाही. कित्येक वर्षात लेखनाचा सराव नसतो. लिहिण्यामुळे हात दुखतात. शब्द नेमका कसा लिहावयाचा ते आठवत नाही. जोडाक्षर लेखन त्रासदायक वाटते. पर्याप्त वेळेपेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे लिहिण्याचा कंटाळा येतो. जलद लिहावे तर अक्षर बिघडते. सावकाश लिहावे तर लवकर संपत नाही अशी द्विधा स्थिती होते. लेखन करताना कोणी अचानक प्रश्न विचारल्यास गती खुंटते. ऐकणे व लिहिणे या क्रिया एकाच वेळी करणे जमत नाही. बोलताना वाक्यक्रम तसेच भाषा याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही; पण लेखनात ते मुद्दाम पाहिले जाते व त्यावर प्रभुत्व नसते म्हणून लेखन नकोसेच वाटते. बोलताना पूर्वतयारी नसली तरी चालते. काही वेळा वेळ मारून नेता येते; पण लिहिण्यासाठी संदर्भ सामग्री असावी लागते. मजकूर कळलाच नसेल तर लिहिता येत नाही. तो पाठ नसेल किंवा तयार नसेल तर एक अक्षर लिहून होत नाही. लेखनविस्तार करता येण्यासाठी अधिक वाचनाची, अभ्यासाची गरज असते. कौशल्यांचे स्थलांतरण करता येण्याची क्षमता असल्यास लेखनाला गती येते.
लेखन गतिमान न होण्याची कारणे 
१) लिहिण्याचा सराव नसणे. 
२) जोडाक्षर लेखन किचकट वाटणे. 
३) लेखन वेळखाऊ साधन मानसिकता. ४) लिहिण्यापेक्षा अक्षर खराब होण्याची भीती.
५) एकाच वेळी ऐकणे-लिहिणे करावे लागणे.
६) लिखित विश्वाची ओळख नसणे. 
७) लेखनासाठी संदर्भ सामग्रीच नसणे. 
८) आकलन स्पष्ट न होणे.
९) लेखन विस्ताराची तंत्रे माहीत नसणे.
१०) लेखन कौशल्य स्थलांतराची सवय नसणे आदी कारणामुळे लेखन गतिमान होत नाही. त्यासाठी काही उपाय सुचविता येतात. सरावाने व प्रयत्नाने लेखन कौशल्य सुधारते. 

लेखन गतिमान करण्यासाठी उपाय 

समर्थ रामदासांनी म्हटलेले आहे, ‘दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंड वाचीत जावे’ लेखनामध्ये नेहमी सातत्य ठेवले की, ते अंगवळणी पडते व त्याचा त्रास वाटत नाही. जोडाक्षरे लिहिण्याचा सराव करावा. शुद्धलेखनावरील पुस्तके पहावित, होत असलेल्या चुकांची दुरुस्ती करावी. लेखनाचे महत्त्व जाणून घ्यावे. प्रथम वेळेत मजकूर संपवणे महत्त्वाचे मानून नंतर सुलेखनाकडे वळावे. ऐकून लिहिण्याचा सक्तीने करण्याचा सराव करावा. खूप चिकित्सक वाचन करावे व ते वाढवित जावे. विषय, हेतू, आराखडा करून संदर्भसामग्री जमा करावी. नेमका आशय समजून घ्यावा. न समजल्यास संकोच न करता मार्गदर्शकाची मदत घेऊन लक्षात घ्यावा. लेखन विस्तारात ज्या तंत्रांची ओळख करून घ्यावी. कौशल्य स्थलांतराची सवय करावी. आंतरक्षत्रिय संबंधाची व्यापकता अनुभवावी व त्याची सवयी लावावी. तंतोतंत लेखन करण्याचा प्रयत्न करावा.
लेखनास गती येण्यासाठी हे करून पहा. 
१. एक छोटा परिच्छेद पाहून लिहा. सुवाच्च, शुद्ध, अचूक व भराभर लिहा. एका दमात पाच-सहा शब्द अथवा एक- दोन ओळी वाचून न पाहता लिहा. परिच्छेद लेखनास किती वेळ लागतो ते नोंदवा. तोच परिच्छेद पुन: पुन्हा लिहा. दुसऱ्या व तिसऱ्या लेखनाला कमी वेळ लागलेला दिसेल.
२. जे लेखन आपणास पाहून लिहावयाचे आहे ते लिहिण्यापूर्वी एकदा वाचून काढा. वाचल्यामुळे आशय, मजकूर ध्यानात येतो. त्याचा परकेपणा नाहीसा होतो. त्यामुळे पाहून लिहिताना आधी वाचल्यामुळे विषयानुरूप शब्द सहज आठवतात व लेखनात गती येते.

सुलेखन 
डोळ्यांना सहज दिसेल असे स्पष्ट, सुटे, मोकळे सुवाच्च लिहिणे म्हणजे सुलेखन होय. असे लेखन करणे प्रत्येकाला शक्य आहे. परंतु त्यासाठी प्रयत्न व सातत्य ठेवणे आवश्यक आहे. 
अनेकांना इंग्रजीतील लपेटीप्रमाणे एकात एक अक्षरे लिहिण्याची काहिंना सवय असते, त्यामुळे एका अक्षरातील मात्रा बऱ्याच वेळा पुढील वा मागील अक्षरावर गेलेली असते. उकार स्पष्ट नसतो अक्षराची गाठ स्पष्ट नसते. अक्षर फारच बारीक असते, त्यामुळे नीट वाचता येत नाही. दोन शब्दात आवश्यक ते आंतर राखलेले नसते. सांकेतिक वर्णाऐवजी दुसऱ्याच वर्णाची योजना केलेली असते. (षहामृग, आमाला) नको तिथे अविष्कार कौशल्य दाखवून अक्षर वाचणे अवघड करून टाकलेले असते. आपण असे काही लिहीत नाही ना? अशी एखादी सवय असल्यास ती घालविण्याचा प्रयत्न करा.
सुलेखनाची संकल्पना केवळ अक्षर लेखनापूर्ती मर्यादित नाही. तर एकंदर टीपण / लेखन टापटीप असावे अशी आहे. शीर्षक, उपशीर्षके देऊन ती अधोरेखित करावीत. सुटे, स्वतंत्र परिच्छेद पाडावेत. परिच्छेदाच्या सुरुवातीचे आद्याक्षर मोठे, प्रत्येक मुद्द्यासाठी स्वतंत्र ओळ, नंतर समाविष्ट करावयाच्या मजकुरासाठी पुरेशी जागा, चोहोबाजुंनी मोकळी जागा ठेवावी. पारिभाषिक शब्द, संकल्पना, व्याख्या यासाठी स्वतंत्र चौकटी कराव्यात.संदिग्ध मजकूर पेन्सिलीने लिहावा. विषय बदलण्यासाठी निरनिराळ्या रंगाचे स्केचपेन वापरावे. अशाप्रकारे लेखन आकर्षक करता येते. अक्षर वळणदार करण्यासाठी सुलेखन पाट्या, कित्तावही यांचाही वापर करता येतो. आज टंकलेखन व संगणकाची सोय झाल्याने सुलेखनाकडे दुर्लक्ष होते. पण टंकलेखन करणारे आपणच असल्याने सुलेखनातील वाईट सवयी त्यातही उतरणार नाहीत का? म्हणून सुवाच्च नीटनेटके लेखन असावायला हवे.

सुलेखनाची वैशिष्ट्ये 
१) वाचता येईल इतपत (सुवाच्च) मोठे अक्षर.
२) सुटे, सरळ एकसारखे अक्षर. 
३) शब्दांत, वाक्यांत, परिच्छेदांत पुरेसे अंतर.
४) सर्व बाजूंनी पुरेसा समास.
५) नवीन माहितीची भर घालण्यासाठी पुरेशी जागा. 
६) आवश्यक तेथे अधोरेखा, अंक, चौकटी, रंगीत पेन यांचा वापर.

शब्दलेखन 

इंग्रजीत शब्दांचे स्पेलिंग चुकीचे असू नये असे म्हटले जाते. त्याप्रमाणे मराठीतही शब्द/ वर्ण /अक्षरे चुकीची वापरू नयेत. मराठी माणसे इंग्रजी लेखनात जितकी काटेकोर व आग्रही असतात तेवढीच ती आपल्याच भाषेतील लेखनात नसतात. ही अनास्था योग्य नव्हे.
पुढील शब्दातील चुका ओळखा व दुरुस्त केलेले शब्द पुन्हा लिहा. 
कृषीप्रधान, पेनटर, तासुन, थुका

आता पुढे दिलेले काही शब्द चुकीच्या पद्धतीने लिहा. 

प्रतिबिंब, श्रेष्ठ, ऑफिस, जनार्दन


चुकीचे लिहिताना काय होते? 
१) संकेत मोडला जातो.
२) अर्थ बदलतो. 
३) अप्रतिष्ठा वाटते.
४) अज्ञान सिद्ध होते.
५) उच्चारातच दोष वाटतो
  म्हणून शब्दलेखन नियमाबर हुकूम व प्रमाणबद्ध असायला हवे.

शब्दसंग्रह 

मोठा शब्दसंग्रह हे कोणत्याही लेखकाचे बळ असते. यासाठी विपुल व चिकित्सक वाचन हवे. एखादा नवा शब्द ऐकल्यास वाचल्यास तो टिपुण, लिहून घेण्याची दृष्टी हवी. असा शब्द मनात पुन: पुन्हा उच्चारावा. घोळवावा. अनेक संदर्भात वापरून पहावा. यामुळे अर्थकक्षा लक्षात येतात व तो आपल्या संग्रही नांदू लागतो.
शब्दसंग्रह वाढविण्यासाठी अन्य भाषकांशी संवाद सहाचर्य वाढवावे. देवाणघेवाण ठेवावी. परभाषेबद्दल कुतूहल व आस्था असावी. त्यांच्या सहवासात हे शब्द उच्चारावेत, वापरावेत, शब्दकोश वाक्यसंप्रदाय कोश, संस्कृती कोश, मराठी विश्वकोश, वाडमय परिभाषा कोश, उत्पत्ती कोश असे कोश कुतूहल म्हणून नेहमी चाळावेत. परभाषेतील भाषणे ऐकावीत. परभाषेतील चित्रपट पाहावेत. जुने नवे साहित्य सतत वाचत राहावे.

शुद्धता 

व्याकरणातील नियमांना अनुसरण निर्दोष लेखन म्हणजे शुद्धलेखन. 
लेखन सुवाच्च, अर्थपूर्ण व परिणामकारक व्हाववयाचे असेल तर विशिष्ट लिपीचा वापर करून लेखन करताना समाजमान्य नियम किंवा संकेत पाळण्याची पद्धती म्हणजे शुद्धता होय. अशुद्ध लेखन गैरसमज, चुकीचा ग्रह होण्यास कारण ठरते. माणूस बोलताना भरपूर स्वातंत्र्य घेतो. उच्चारणाची लकब, स्वरांचा चढ-उतार, आघात, विराम आणि अनुनासिके, उच्चारणाची पद्धती, आवाज वेगवेगळा असतो. पण लेखन एकाच प्रकारचे होण्यासाठी शुद्धतेचे नियम केलेले असतात. यामुळे वाचणाऱ्या सर्व तरेहच्या व्यक्तींना ते समजते.
शुद्धता ही केवळ व्याकरणीच असते असे नाही तर ती अर्थाच्या बाबतीत देखील असते. ‘वारा वाहतो’ - या करता क्रियापद रचनेप्रमाणे ‘रस्ता वाहतो’, ‘माणूस वाहतो’ या रचना व्याकरणिक नियमांनुसार बरोबर आहेत पण रचनेप्रमाणे ‘सुतार वाहतो’, ‘बंगला वाहतो’ या रचना व्यावहारिक अर्थ देत नाहीत. म्हणून अशा रचना अशुद्ध समजाव्यात व लेखनात हे भान ठेवून तसे शब्द वापरावेत, रचना कराव्यात. 

योग्य शब्दांचा वापर 

    ऐकलेल्या व वाचलेल्या मजकुराचे लेखन करताना ते अर्थपूर्ण योग्य व स्पष्ट होईल असे पाहावे. लेखनात शब्दरचनेला (शब्दसिद्धी), शब्दयोजनेला व त्यांच्या स्थानाला फार महत्त्व असते.

शब्दरचना

मराठीत नुसते मूळ शब्द एकापुढे एक ठेवून रचना होत नाही. वाक्य योजनेप्रमाणे शब्दात अनेक बदल करावे लागतात. ही बदल प्रत्यय, सामान्यरूपे, शब्दयोगी अव्यय, वचन, आख्यात प्रत्यय वगैरे लावून होतात. यालाच शब्दरचना म्हणावयाचे.
पुढील वाक्य वाचा. 
नदीला पूर आला आहे; अशाप्रकारे तेथे पाऊस झाला असला पाहिजे. 
आता पुढे दिलेल्या सूचनांप्रमाणे वाक्याचे तपासणी करा. 
१) मूळ वाक्य मोठ्याने वाचा. 
२) कानाला ते कसेसेच वाटत असल्यास अर्थ कायम ठेवून तेच वाक्य पुन्हा लिहा.
३) पहिली वाक्य व दुरुस्त केलेले दुसरे वाक्य यांची तुलना करा.
४) पहिला व पाचवा शब्द यांची रचना पहा चुकीची वाटल्यास दुरुस्त करा. दुरुस्त केलेला व मूळचा शब्द या दोन्हींचा परिणाम पहा. दुरुस्त केलेले दुसरे वाक्य आपणास येथोचित वाटेल यावरून लेखनात शब्दरचलेला किती महत्त्व असते ते स्पष्ट होईल.

शब्दयोजना 

शब्दरचनेत शब्दाला लावण्यात येणारे प्रत्यय, शब्दसिद्धीचे नियम लावण्यात चूक झालेली असते. परंतु शब्दयोजना करताना लेखकाचा हेतू स्पष्ट नसल्याने, मनात संभ्रम असल्याने, शब्दांचा अर्थ चुकीचाच माहीत असल्याने लेखनात उचित शब्द वापरले जात नाहीत. अशावेळी लेखकाचा आपल्यावरील प्रभाव कमी होतो. चुकीचा अर्थ स्मरणात राहतो व माहितीच्या प्रसारणात अडथळा येतो.
पुढील वाक्ये वाचा - ‘हल्ली तुझी बरीच व्याप्ती वाढलीय नाही?’, ‘मला तुझा आजन्मात कधी राग येणार नाही.’या वाक्यात शब्दयोजनेत काही चुका झाल्या आहेत. त्या दुरुस्त करण्यासाठी पुढील दिलेल्या सूचनांचा अवलंब करा.
१) आपल्या हेतूची पुन्हा तपासणी करा. नेमकी काय म्हणावयाचे आहे ते ठरवा. 
२) प्रत्येक शब्दाचा अर्थ शब्दकोशात पहा. संदर्भाने अर्थ निश्चित करा. 
३) अशाच अर्थाचे /रचनेचे इतरांनी लिहिलेले / बोललेले विधान ऐका / पाहा. आपले व त्यांचे विधान ताडून पाहा. मूल्यमापन दुसऱ्याकडून करून घ्या.

शब्दांचे स्थान 

वाक्यात शब्दांच्या स्थानाला / क्रमाला महत्त्व असते. मराठीत काही शब्दांची योजना चुकीच्या स्थानी झाल्यास अर्थ कसा बदलतो ते पाहा. १) ‘आमचे शिक्षक छान मराठी शिकवतात.’ या वाक्यात ‘मराठी’ या शब्दाच्या आधी छान हा शब्द योजल्याने मराठी हा विषय छान आहे, असा अर्थ होईल. येथे त्यांचे शिकवणे छान आहे हे सांगायचे आहे म्हणून हे वाक्य असे हवे - ‘आमचे शिक्षक मराठी छान शिकवतात.’यावरून हे लक्षात येते की, लेखनात शब्दरचना, योजना व स्थान यांना महत्त्व असते.

लेखनाचे घटक

मागील घटकात आपण लेखनाची प्राथमिक कौशल्य कसे आत्मसात करावी हे पाहिल्यानंतर आता प्रत्यक्ष लेखन करताना लेखनाच्या कोणत्या घटकाकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे हे पाहणार आहोत. 
आपणास जीवन व्यवहारात बऱ्याचदा लेखन करावे लागते. सर्वच तोंडी सांगून भागत नाही. असे तोंडी सांगितलेले विचार कितीही महत्त्वाचे असले तरी ते काही काळानंतर विस्मृतीत जातात. पुष्कळदा खूप काही बोलायचे असते पण वेळेच्या अभावी तज्ञ श्रोत्यांअभावी, योग्य जागेअभावी आपण बोलत नाहीत. बोलताना आयत्यावेळी अनेक विचार प्रविष्ट होतात. योजलेले मागे राहतात वा गळून जातात. अनेक बाह्य अडथळ्यांमुळे, श्रोत्यांच्या प्रश्नामुळे, आयत्या वेळेच्या आपत्तीमुळे विषयांतर होते. बोलण्यात प्रवाहित्व असते. भाषेच्या ओघाला, उच्चारणाला श्रोत्यांच्या प्रतिसादाला वाजवीपेक्षा जास्त महत्व दिले जाते. त्यामुळे तत्काळ परिणाम झाला तरी त्यात गंभीर आशय, विचारांची जडता राहू शकत नाही. भाषणात एखादा विचार महत्त्वाचा वाटला, त्यावर अधिक सूक्ष्म विवेचन व्हावे असे वाटले तरी ते सांगितले जात नाही. कारण मागे जाऊन विचार करायला सवड नसते. सवड असली तर श्रोत्यांना कंटाळा येतो. ओघ राहत नाही. यासाठी सुव्यवस्थित लेखनाची गरज आहे काय? आणि कसे लिहावयाचे? याची पूर्वकल्पना आपणास आहेच. आता प्रत्यक्ष लेखन करताना कोणत्या महत्त्वाच्या घटकाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे हे आपणास लक्षात घ्यावयाचे आहे.

मांडणी
        लेखनात मांडणीचे महत्त्व आधार बिंदूसारखे असते. मांडणीचे नियोजन केल्याशिवाय लेखनाचा आवाका ध्यानात येत नाही. कोणतेही नवीन कौशल्य शिकताना सुलभतेकडून कठीणतेकडे असा क्रम ठेवावा लागतो. नवीन पोहायला शिकणारा ज्याप्रमाणे आधार घेतो. त्याप्रमाणे लेखक मांडणीच्या साहाय्याने लेखन करू शकतो. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना निबंध लिहिण्यासाठी आराखडा वा रूपरेषा दिली जाते. त्यामुळे सराईत नसलेल्या विद्यार्थ्यालाही निबंध लिहिणे सोपे वाटते. 
प्रथम लेखकाने काय सांगायचे / लिहायचे ते निश्चित करून आपण कोणासाठी व कशासाठी लिहीत आहोत हे निश्चित करावे. आपल्या लेखनाचा हेतू / उद्देश काय ते ठरवावे. वाचक सामान्यपणे क्रमवार वाचत असतो हे लक्षात ठेवून घटका-घटकात सारखी संगती राखली पाहिजे हे लक्षात घ्यावे. तपशीलवार व संथपणे वाचणाऱ्या वाचकांसाठी आपण जसे लिहितो तसे वेळ कमी असणाऱ्या, वरवर वाचणाऱ्या समारोप सूचीवरून विषयाचा अंदाज व गुणवत्ता लक्षात घेणाऱ्या वाचकांसाठीही लिहावयाचे असते हे लक्षात घ्यावे. म्हणून मुद्द्यांची संख्या महत्त्व व क्रम या घटकाकडे मांडणी करताना लक्ष द्यावे. तसेच प्रत्येक मुद्दा हा स्वतंत्र घटक असून तो एका मोठ्या विषयाचा एक भाग आहे हेही लक्षात घ्यावे.

मुद्द्यांची संख्या
 
एखादा विषय विशद करताना लेखकाने तो अधिकाधिकपणे स्पष्ट केला पाहिजे. एखादी कल्पना विचार गृहीतकृत्ये किंवा तत्व लक्षात आल्यावर ते मांडताना अनुकूल, प्रतिकूल, व्यक्तीसापेक्ष, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक दृष्टिकोन त्यांना असतात हे लक्षात घ्यावे. त्यामुळे विषयाची व्याप्ती स्पष्ट होते. यासाठी संवादाची मूलभूत तंत्रे व कौशल्ये या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुस्तकातील ‘कल्पनास्फोट व प्रविव्याव्यावी’ या तंत्राच्या साह्याने मुद्दे शोधावेत व लिहावेत. पुन्हा पुन्हा मुद्द्यांच्या साह्याने चिकित्सक परीक्षण करावे. 
१. सारखाच आशय / विषय स्पष्ट करणारे मुद्दे कोणते?
२. ते एकमेकात समाविष्ट होऊ शकतील का? कसे? 
३. एखादा मुद्दा इतरांपेक्षा अधिक व्यापक आहे असे आपणास वाटते काय? 
४. संदिग्ध मुद्दा कोणता?
५. त्याचे स्पष्टीकरण कसे कराल? 
६. प्रत्येक मुद्द्यापुढे प्रश्नचिन्ह ठेवून त्याचे उत्तर देता येते का ते पहा. 
७. विषयाच्या विरुद्ध जाणारा मुद्दा कोणता? 
८. मुद्द्यातील व्यक्तीसापेक्षा स्पर्श स्पष्ट करा. 
९. कालसापेक्ष मुद्दा कोणता? 
१०. कालातीतता स्पष्ट करणारा मुद्दा कोणता?
सदरील मुद्दे कोणत्याही विषयाच्या मुद्दे लेखनासाठी वापरता येतील. अशा प्रकारे मुद्द्यांची संख्या आपल्याजवळ जास्त झाल्यावर नियोजित विषयाची व्याप्ती नक्कीच वाढलेली दिसेल.

महत्व 

मुद्दे काढले पण कोणत्या मुद्द्याला अग्रक्रम द्यावा. कोणता दुय्यम, कमी महत्त्वाचा हे ठरवावे. हे लेखकाचा हेतू, वाचकाच्या अपेक्षा, लेखनाच्या गरजा यानुसार ठरत असते. म्हणून लिहिण्यापूर्वी यापैकी एखादी गोष्ट निश्चित करावी. तीनही महत्त्वाच्या वाटत असतील तर त्यात क्रम ठरवावा. नाहीतर लेखनाची रचना तीन भागात करावी.

क्रम 
     क्रमरचनेत मांडणीला महत्त्व असते. क्रम ठरवताना अंधारातून उजेडाकडे, व्यापकतेकडून सूक्ष्मतेकडे, प्रश्नातून उत्तराकडे, संदिग्धरतेकडून स्पष्टतेकडे, विशिष्टाकडून सामान्यतेकडे, अनेकातून एकतेकडे मुद्द्याची दिशा असावी. ही दिशा बोध स्पष्ट होण्यास व्यापक व सूक्ष्म विचार करण्यास मदत करते.
   अशाप्रकारे मुद्दे आणि त्यांच्या महत्त्व नुसार क्रम ठरविल्यावर एकेका घटकाचा स्वतंत्र विचार होणे व मूळ विषयाचा भाग म्हणून होणे आवश्यक असते. यासाठी प्रारंभी व्यापक भूमिका मांडून नंतर एकेका घटकांना न्याय द्यावा या पद्धतीने लेखनाची मांडणी करावी.

अनुक्रम

         प्रत्येक वेळी मांडणी कागदावर उतरलेलीच असते असे नाही. पण अनुक्रम मात्र नोंदवलेला असतो. मांडणी म्हणजे अनुक्रमाचा कच्चा, मनातील आराखडा; तर अनुक्रम म्हणजे मांडणीचा दृश्य, लिखित, संक्षिप्त आराखडा. अनुक्रमणिकेत आपण काय सांगणार आहोत ते तर संबंधिताचा संपूर्ण तपशील तयार झाल्यावरच ठरविता येते. लेखनास सुरुवात करण्यापूर्वी तात्पुरती अनुक्रमणिका आपण गृहीत धरू शकतो; पण प्रत्यक्ष लेखनात त्यात अनेक बदल होतात. मुद्दे-उपमुद्दे यांची भर पडते. घटकाचे विश्लेषण होऊन त्यातून स्वतंत्र घटकांचीही निर्मिती होऊ शकते. प्रत्येक घटक सारख्याच पद्धतीने लिहिला पाहिजे असे बंधन नसते. परिपूर्ण अनुक्रमणिका लेखकाचा अभ्यास, भाषा, तयारी, वेगळेपणा स्पष्ट करीत असते. तपशीलवार अनुक्रमणिका सत्यता, स्पष्टता दाखविते. संक्षिप्त, पुनरुक्त संदिग्ध शब्द अनुक्रमणिकेलाच नव्हे तर लेखनालाही दोषास्पद ठरवितात.
      लेखनात मांडावयाची सर्व विषय अनुक्रमणिकेत स्पष्ट झाले पाहिजेत. जसे- मनोगत, ऋणनिर्देश, भूमिका, प्रास्ताविक, विषय विवेचन, भागश:, घटकश:, प्रकरण:, मांडणी, पूरक माहिती, संदर्भसाधने अशी सर्व अभ्यास सामग्री स्पष्ट झाली पाहिजे. त्यात तार्किकता पाहिजे. सुरुवात व शेवटचे घटक अभ्यासप्रक्रियेचे पूर्णता दाखवतात. जिथून सुरुवात झाली तेथेच येऊन पोहोचले की एका प्रश्नाच्या ठिकाणी किती बाजू असू शकतात ते समजते. किंवा एखादा अस्पष्ट विषय प्रत्येक घटकातून अधिकाधिक स्पष्ट होत जाऊन मन नि:संदिग्ध होते.
उदा. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ या पुस्तकाची अनुक्रमणिका तयार करण्याची तत्वे लक्षात घेऊन पुढीलप्रमाणे करता येईल.
१. मनोगत 
२. प्रास्ताविक 
३. भाषेचा लेखनासाठी नियमाची आवश्यकता
४. भाषेची वर्णमाला व लिपी 
५. अनुस्वारासंबंधीचे नियम
६. रस्वा-दीर्घासंबंधीचे नियम 
७. किरकोळ व इतर नियम 
८. जोडाक्षराचे लेखन लेखनातील विरामचिन्हे 
९. वाक्यरचना
१०. हे शब्द असे लिहा.

स्वाध्यायासाठी -
तुम्हाला ‘प्रभावी व्यक्तिमत्व’ या विषयावर सामान्य वाचकांसाठी एक २५ पृष्ठांची पुस्तिका तयार करावयाची आहे या पुस्तिकेची अनुक्रमणिका कशी कराल?



तर्क संगती
         आपले लेखन तर्कसंगत आहे किंवा नाही याचे प्रत्यंतर अनुक्रमातून येऊ लागते. संगतीही आराखड्यात कशी असायला हवी तशी ती विवेचनातही असायला हवी. तर्क म्हणजे काय? तर अनुमान. हे अनुमान तर्क बुद्धीस पटणारे हवे. ते केव्हा पटेल - तर एखाद्या विषयाचे सूक्ष्म अन्वेषण करून त्याविषयी सामान्य तत्वे निश्चित करून त्यापैकी मूलभूत तत्त्वांचा शोध घेऊन, त्या तत्त्वापासून बाकीच्यांची निष्पत्ती झाली आहे असे सांगू तेव्हा. याचा अर्थ आपले अनुमान साधार व लोकांना पटणारे हवे. हे केव्हा पटेल तर आपण संगतवार सांगू तेव्हा मग संगती म्हणजे काय? तर पुढील भाग मागच्याशी संबंधित असणे व तसा तो जुळवून सांगणे. प्रत्येक भागात एक शिस्त असून तो पद्धतशीर, क्रमाने, समतोलाने, समरूपतेने विचार संगतीने मांडलेला असणे होय. आपण आपल्या लेखनात ही तत्वे कशी सांभाळाल? यासाठी पुढे एक प्रश्न सूची दिली आहे. या सुचीचा वापर करून लेखनात संगती आली आहे किंवा नाही त्याचा पडताळा आपण घेऊ शकतो. 

प्रश्नसूची 

         १. लेखनाचा मुख्य विषय प्रश्न समस्या कोणती? 
२. प्रश्नाच्या उत्तराची संभाव्य, किमान चार व कमाल कितीही उत्तरे शोधा.
३. उत्तराची घरी, दारी, कचेरीत चर्चा करून आपल्या उत्तरास पाठबळ किती आहे ते पहा.
४. उत्तर सखोल असल्याकडे कटाक्ष ठेवा. ५. आपले उत्तर बरोबरच आहे, असे आपणास का वाटते त्याची किमान चार कारणे लिहा.
६. उत्तराचे मूलगामित्व ठरविण्यासाठी शब्दकोश, व्युत्पत्तीकोश, विश्वकोश आणि तज्ज्ञ व्यक्ती यांचे सहाय्य घ्या.
७. आपले लेखन कमीतकमी पण अर्थपूर्ण व वेचक शब्दांत मांडा.   

भाषाविष्कार
                भाषाविष्कार म्हणजे लोकनिहाय भाषिक अभिव्यक्ती होय. एकच आशय व्यक्त करण्यासाठी भाषेत एकापेक्षा अनेक पर्याय उपलब्ध असतात. लेखकाचे वेगळेपण त्याच्या पर्याय निवडीवरच अवलंबून असते. लेखकाने योजलेले शब्द, वापरलेले निवेदन पद्धती, वाक्यरचना, साहाय्यास घेतलेले संदर्भ, दिलेले दृष्टांत, हाताळलेले लेखन प्रकार, केलेली मा

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

लेखन कौशल्य


Monday 4 December 2017
भाषिक कौशल्य क्षमता :- लेखन
A. लेखनाचे महत्व :
१.अक्षर अविनाशी बनविण्याचे कार्य करण्याची क्षमता म्हणजे लेखन क्षमता होय.
२.लेखनाद्वारे भाव,विचाराची अभिव्यक्ती होते.
३.मराठी भाषा संस्कृतमधून आली आहे व तिचे लेखन उच्चारानुसार होते.
४.जीवनात यश संपादन करण्यासाठी लेखन कौशल्य असणे आवश्यक आहे.

B. लेखनाचे सर्वसामान्य उद्दिष्टे :
१.आत्माविष्कार : मनातील भावना,कल्पना,विचार,
लिखित स्वरुपात व्यक्त करणे .
२.प्रचार : आपले विचार, मत दुसऱ्यापर्यंत लेखनाद्वारे पोहचवणे .
३.मन:शांती : मनातील भावना लिहून मनाला शांतता होते.
४.सुसंस्कार : दुसऱ्याला आपले विचार वाचण्यास दिले असता त्या त्या व्यक्तीवर चांगले सुसंस्कार होतात.

C. लेखनातील शिक्षणातील उद्दिष्टे :
१.वहीवर योग्य रेखा आखणे .
२.लेखन व्याकरण शुध्द व समास पाडून करणे.
३.मुख्य मुद्द्याला अधोरेखा मारणे.
४.अक्षरावर शिरोरेषा मारणे.

D. लेखन सिध्दता व ती कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे:
१.पकड : हाताची बोटे व मनगटाच्या बळकटीत ३ से.मी.अंतरावर पेन धरावा .
२.आसनबंध : वि.वयानुसार व उंचीनुसार टेबल खुर्चा असाव्यात .
३.दृष्टी हस्त संयोजन : लेखन करतांना तेथे दृष्टी पोहचेल तिथे हात पोहचावा .

E. सुलेखन :
सुलेखन हे लेखनाचे बाह्यांग आहे.सुवाच्च ,वळणदार,
प्रमाणबद्ध व आकर्षक अक्षरात केलेले लेखन म्हणजे सुलेखन होय.

F. चांगल्या हस्ताक्षराचे वैशिष्टे :
१.लेखनातील स्पष्टता वळण व आकार.
२.दोन शब्द व अक्षरातील आंतर .
३.लेखन शुध्दता व लेखनातील गती.
४.लेखनाचे नियोजन .
५.लेखनातील मुद्याची गुंपण.
६.लेखनातील आटोपशीरपणा.
७.लेखनातील लक्ष अकृट करण्यासाठी वापर लेखन हे व्यक्ती मत्वाचे दर्पण आहे.
८.लेखनातील मुख्य मुद्याला अधोरेख करणे.

G. हस्ताक्षर सुधारण्याच्या पध्दती :
१.वर्णमालेचे तक्ते वापरावे.
२.शब्द पट्ट्या वापराव्यात .
३.चित्राचा वापर करावा उदा-गरुड ‘ग’
४.खादी फलकाचा वापर अक्षर काढण्यासाठी .
५.रेषा,गोल ,अर्धवर्तुळ ,कमान काढून अक्षर शिकवावे.
६.रंगीत खडूचा व रंगीत चित्राचा वापर करावा.
७.विद्यार्थाला वर्णमालेच्या वह्या बाजारातुन उपलब्धता करून देऊन प्रात्यक्षिक द्यावे.
८.हस्ताक्षर स्पर्धा घ्यावे.

H. अनुलेखन ,दृकलेखन ,श्रुतलेखन ,गतीलेखन :
१.अनुलेखन :फळ्यावरचे शिक्षकाचे पाहून लेखन करणे त्यास अनुलेखन म्हणतात.
२.दृकलेखन : शिक्षकाने स्वाध्याय दिल्यास त्या प्रश्नांचे उत्तर पाहण्यासाठी पुस्तकातील पाहून लेखन करणे त्यास दृक लेखन म्हणतात.
३.श्रुतलेखन :शिक्षकाचे एकूण लेखन करणे त्यास श्रुतलेखन म्हणतात .
४.गती लेखन :योग्य वेगाने लेखन करणे त्यास गती लेखन म्हणतात.

I. लेखनातील दोष किंवा उणीवा त्यावर उपाय:
१.खराब अक्षर :हस्ताक्षर सुधारण्याच्या पध्दती .
२.अनुचित गती :रोज श्रुत लेखन देणे.
३.अशुध्द लेखन :ऱ्हस्व दीर्घची ओळख करून देणे.
४.अनुचित शब्दप्रयोग :योग्य शब्द प्रयोग करणे.

J. लेखनासाठी योग्य साहित्य व साधनाची निवड :
१.कागद :एक रेषाची ,दोन रेघी,तीन रेषाचा कागद.
२.कागदाखाली धरावयाचा पुठ्ठा :फळी,
३.लेखन :बॉलपेन ,साईपेन ,पेन्सिल.

K. विविध लेखनाचे प्रकार :
१.निबंधलेखन .
२.पत्र लेखन.
३.कथा व संवाद लेखन .
४.संवाद लेखन .
५.कल्पना विस्तार.
६.सारांश लेखन.
७.दैनंदिनी लेखन.
८.अहवाल लेखन .
९.भावानुवाद.
१०.आकलन.
११.निवेदन .
१२.वार्तालेखन.

१.निबंध लेखनाचे प्रकार :
१.कथनात्मक निबंध :घटना,इतिहास,चारित्र्य ,कथायाचे अनुभव आपल्या शब्दात सांगणे त्यास कथनात्मक निबंध म्हणतात उदा-साने गुरुजी.

२.वर्णनात्मक निबंध :व्यक्ती वस्तु,स्थल,प्रसंग यांचे प्रकृती वर्णन करणे त्यास वर्णनात्मक निबंध म्हणतात .
उदा-माझी शाळा .

३.चारित्र्यात्मक निबंध :व्यक्ती ,पशु,पक्षी स्थलाचे चारित्र्य दर्शन मांडणे त्यास चारित्र्यात्मक निबंध म्हणतात.
उदा-माझा आवडता नेता.

४.कल्पना प्रधान निबंध :आपल्या मनातील कल्पना ,भावना,विचार मांडणे त्यास कल्पना प्रधान निबंध म्हणतात .
उदा-मी पंतप्रधान झाली तर .....

५.रसग्रहण निबंध :कथा ,कविता,कादंबऱ्या ,वाचुन निबंध लेखन करतात त्यास रसग्रहणात्मक निबंध म्हणतात .
उदा-माझे आवडते पुस्तक .

२.पत्र लेखनाचे प्रकार व त्यातील आवश्यक गोष्टी :
१.व्यक्तिगत (घरगुती पत्र )

२.व्यावसायिक (कार्यालयीन पत्र )

३.बातमीपत्र .

त्यातील आवश्यक गोष्टी :
१.स्थळ व तारीख :पत्राच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात लिहावी.
२.मायना (शीर्षक) :ज्याला पत्र लिहिण्याचे आहे त्यासंबधी 
उदा-तीर्थस्वरूप ,प्रिय.
३.आशय (कलेवर ): यात पत्र लिहिण्याचा मुख्य उद्देश लिहिणे आवश्यक आहे.
४.शेवट (समाप्ती ): आपले स्वताचे पत्र पाठवणाराचे नाव लिहावे उदा-तुझा मित्र .
५.पत्ता : ज्याला पत्र पाठवायचे त्याचा पत्ता लिहणे आवश्यक आहे.

३.कथा लेखन :
१.कथा लेखन मुद्याच्या साह्याने करावे.
२.कथेतील घटना तंतोतंत डोळ्या समोर उभी करणे .
३.कथेतील पात्राची व्यक्तीरेखा व स्वभाव रेखा .
४.कथा सांगणे व कथेतील योग्य शीर्षक देणे.

४.संवाद लेखन :
१.व्यक्ती समोरा-समोर बोलत आहे असे लेखन करणे.
२.दोन व्यक्तीचे भावना,कल्पना,विचार लेखनाद्वारे प्रगट करणे.

५.कल्पना विस्तार :
१.कल्पनेचे आकलन होणे आवश्यक आहे.
२.कल्पना,फुलुन,ती पटून देता यावी .
३.सोपी समर्पक उदाहरणे देणे.
४.निबंधापेक्षा कमी ओळीत कल्पना विस्तार असावा.

६.सारांश लेखन :
१.कल्पना विस्ताराच्या उलट प्रकार आहे.
२.गद्य /पद्य १/३ सारांश लिहावा लागतो.
३.पण सर्व मुद्दे यायला हवे.
४.आपल्या शब्दात लेखन करणे.

७.दैनंदिनी लेखन :
१.व्यक्तीने स्वतः स्वतःच्या मनाशी साधलेला संवाद म्हणजे दैनंदिनी होय.
२.दैनंदिनी कामाच्या नियोजनाला यशाशक्ती म्हणतात.
३.रोजच्या व्यवहारात आपण केलेली कार्य लिहून ठेवणे.
४.दैनंदिनीत दिनांक, वार, महिना लिहून ठेवणे.

८.अहवाल लेखन :
१.शाळेत झालेले विविध कार्यक्रमाचा आढावा मोजक्या शब्दात विद्यार्थी आपल्या वहीत लिहून ठेवतात.
२.महत्वाचे मुद्दे गाळू नये.
३.महत्वाच्या व्यक्ती ,घटना याची नोंद ठेवणे.
४.दिनांक ,वार ,महिना लिहिणे.

९.भावानुवाद:
१.मराठीचे इंग्रजीत रुपांतर करणे.
२.इंग्रजीतील लेखनाचे मराठीत रुपांतर करणे.

१०.आकलन :
लेखक त्याची भावना,विचार कल्पना,त्याच्या लेखनाद्वारे व्यक्त करत असतो ती आपण वाचून मनाने लेखन करणे त्यास आकलन म्हणतात.

११.निवेदन :
आपल्या तक्रारी ,सूचना,मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्या समोर मांडण्यासाठी निवेदन लेखन करावे लागते.

१२. वार्तालेखन :
वर्तमान पत्रात कविता,कथा,सुविचार व परिसरातील घटना लिहून पाठवणे त्यास वार्तालेखन म्हणतात.

L. शैलीयुक्त लेखनाची वैशिष्टे :
१.शैली हा लेखनाचा प्राण आहे.
२.अनुभवाशी एक निष्ठ असलेले लेखन म्हणजे शैलीयुक्त लेखन होय.
३.समर्पक शब्द योजना असावी .
४.प्रवाह व लयबध्दता असावी.१३.रसास्वाद परीक्षण (रसग्रहण लेखन )एखाद्या कविचे किंवा पद्य काव्याचे परीक्षण करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
१.शब्द सौदर्य .
२.अर्थ सौदर्य .
३.भाव सौदर्य.
४.कल्पना सौदर्य.
५.अलंकार सौदर्य .
६.विचार सौदर्य .

M. लेखन मूल्यमापन करण्याचे साधने : 
परीक्षा 
1. निरीक्षण : १.अक्षराचे वळण. २.शुध्द लेखन.
2. लेखी परीक्षा : १. दीर्घोत्तरी प्रश्न . २.लघुत्तरी प्रश्न . ३.वस्तुनिष्ठ प्रश्न .
3. प्रात्याक्षिके : १.हस्ताक्षर स्पर्धा, २. वैयक्तिक नोंदी, ३. प्रासंगिक नोंदी, ४. पडताळा सूची

वैचारिक लेखनाचे स्वरूप

आपले विचार,भावना,कल्पना इत्यादींचे आपण लेखन करतो किंवा आपल्या विचारांना आपण लिपीबद्ध करतो.यालाच आपण लेखन म्हणतो.हे एक भाषिक कौशल्य आहे.लेखनाला व्याकरणीक अशी नियमांची चौक असते.लेखन करत असतांना किंवा त्या पूर्वी आपण मानसिक चिंतन करीत असतो,ही एक प्रकारची विचार निर्मितीची प्रक्रिया असते. यात आपण आपल्याला पटलेले वा न पटलेलेही विचार व्यक्त करू शकतो. किंवा इतरांचे विचार,मतेही आपण विचार प्रतिपादनात घेऊ शकतो.

साहित्य हा खूप व्यापक विषय आहे पण इथे आपण भाषेच्या कार्यामागील व वापरामागील हेतूवरून ललित व वैचारिक लेखन असे जे दोन प्रकार मानता येतात असे ललित साहित्य प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहे.

 वैचारिक लेखनाचे स्वरूप व प्रकार
वैचारिक स्वरूपाच्या लेखनात लेखक हा लोकसत्ताक समाजव्यवस्थेत वैचारिक स्वातंत्र्याच्या माध्यमातून स्वतःचे विचार मांडत असतो.या विचार प्रकटिकरणातून कधी तो इतरांचे विचार ग्रहण करतो किंवा कधी त्या विचारांना सभ्यपणे मतभेद देखील व्यक्त करत असतो.भाषेद्वारे जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती,वस्तू,स्तिथीविषयी किंवा इतर कुठल्याही विषयांवर विचार प्रकट करतो,त्या विचारांमधून आपण आपले ज्ञान,अभिरुची,आपली जीवनधारणा,नैतिक भूमिका,आपले व्यक्तिमत्त्व देखील प्रकट करत असतो.
एखाद्या विषयांवरील इतरांच्या मतांना मांडत जात त्यातील उणिवा,त्रुटी दर्शवत स्वतःचे विचार युक्तिवाद कौशल्याने पूरक उदाहरणे,संदर्भ देऊन पटवून देणे अशीही एक पद्धत वैचारिक लेखनात आहे.ज्याला खंडन मंडन असे म्हणतात.

तर्कशुद्ध निष्कर्ष काढून,विषय विवेचन करत साहित्य व कला समीक्षा,वर्तमानपत्रे, ग्रंथ,संशोधन,पाहणी अहवालाचे निष्कर्ष इत्यादी क्षेत्रात वैचारिक लेखन केले जाते. सामान्यतः न्याय व्यवस्था,कलामुल्य मापन,अध्यात्म,वर्तमानपत्र,संस्कृती-इतिहास मीमांसा,तत्वज्ञानात्मक ग्रंथ या क्षेत्रात मोठया प्रमाणात वैचारिक लेखन होत असते.



अग्रलेख 
नियतकालिके वा वर्तमानपत्र यांच्या संपादकांनी लिहलेल्या संपादकीय लेखाला अग्रलेख म्हणतात.जागृती, लोकशिक्षण,जाणीव या प्रेरणेतून हे लेख लिहिले जातात. सद्यस्थितीतील प्रश्न, समस्या,घटना,व्यक्तीच्या कृती अशा विविध जीवनक्षेत्रासंबंधित विषयांवर अग्रलेखातून ठराविक शब्दात विचार मांडल्या जातो.सामान्य माणसाला जागे करणे व विधायक कृतिसाठी प्रेरित करणे हे अग्रलेखाचे उद्दिष्ट असते.संपादकीय लेखणाचे मूळ कार्य हे वर्तमानातील सामाजिक,राजकीय परिस्थितींवर भाष्य करणे असते.अलीकडच्या काळात जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे मुखपृष्ठ असलेले स्वतंत्र असे वर्तमानपत्र आहे.त्यामुळे अग्रलेखातील निष्पक्षपणा(जो असायलाच हवा) वाचायला मिळत नाही.अग्रलेखातील भूमिका ही त्या वर्तमानपत्राची अधिकृत भूमिका असते.


वैचारिक निबंध लेखन :-
आपल्या विचारांची सुसूत्र,तर्कशुद्ध मांडणी वैचारिक निबंध लेखनात केली जाते.हा गांभीर्यपूर्वक लिहलेला तसेच समाजाला उपयुक्त असे विचार,दृष्टिकोन मांडत असतो.निबंध या साहित्य प्रकाराचा उदय विचारप्रतिपादन करण्यासाठी झाला आहे.विचार अनुभूती किंवा कल्पनांची,मुद्यांची सुसूत्र बांधणी येथे अभिप्रेत आहे.निबंध एक प्रकारे सौंदर्यपूर्ण रचनेशी संबंधित आहे.ही रचना विचार,विषय,कल्पना,विषय विश्लेषण यांची असू शकेल.मराठी शब्दकोशात 'निबंध म्हणजे =प्रबंध,नियमबद्ध असणारा लेख,मोठा लेख,नीटपणे पक्का जडलेला लेख' असा अर्थ दिलेला आहे.



स्फुट लेखन
एखाद्या विशिष्ट विषयावर समकालीन संदर्भ देत लिहलेला वर्तमानपत्रातील लेख.यात वैचारिक गांभीर्य राहीलच असे नाही.मनमोकळेपणाने विषय विषयांतरे, विषय वाढवीत नेणे असे करीत एखादा नवा विचार,माहिती चिंतानफल मांडलेले असावे लागते.मर्यादित शब्दात सुत्ररूपाने,संक्षेपाने असे लेखन केले जाते.लेखनात मृत्यू लेख व वैचारिक लेख असे प्रकार देखील आहे.



ललित साहित्याचे प्रकार
प्रथम आपण बघू ललित साहित्य म्हणजे काय

ललित शब्दाचा अर्थ 'सौंदर्य' 'सुरेख' 'मनमोहक' असा आहे.मनाला आनंद देणारे सौंदर्यतत्व या शब्दांमधून सूचित होते.लेखक हे लालित्य भाषेद्वारे निर्माण करीत असतो.आलंकारिक शब्दरचनेतून रसात्मक अनुभव वाचकांंना करून दिल्या जातो.लेखक प्रत्यक्षातल्या माणसावरून,अनुभवावरून कल्पनेच्या साहाय्याने पात्र निर्माण करतो.ती निर्मिती प्रतिभासिक निर्मिती असते. तात्पर्य. प्रत्यक्षातल्या जीवनाचे कल्पनापूर्ण निर्मितीत परिवर्तन घडविण्याची क्रिया म्हणजे साहित्यनिर्मिती होय.

गोष्ट / कथा आणि लघुकथा
गोष्ट हा लोककथेचा एक प्रकार मानावा लागेल.निसर्ग घटकांच्या,माणसांच्या,प्राणांच्या जीवनातल्या घटनांच्या आधारे गोष्ट रचली जाते.गोष्टी या बहुदा रंजन वा उपदेश करणे या प्रेरणेतून निर्माण होतात.

जेव्हापासून मानवाला बोलण्याची कला अवगत झाली तेव्हापासून एकमेकांना गोष्टी सांगण्याची कला ही विकसित झाली.पूर्वी या गोष्टी प्राण्यांच्या(इसापनीती)वैगरे असत.नंतरच्या काळात लोकजीवणाचा व लोकव्यवहाराच्या अनुभवावर आधारित अशा कथा एकमेकांना सांगण्यात येत असत.या कथांमध्ये सांगण्याचे कौशल्य, उत्कंठा,व आकर्षकपणा असे त्यामुळे कथा रंजक बनत असे आणि एकमेकांच्या कथा लोक आवडीने ऐकत असत.विकासाच्या ओघात हळूहळू लिपीचा शोध लागला त्यानंतर लिहिण्याची कथा अस्तित्वात आली.शिलालेख कोरले गेले ताम्रपट व भूर्ज पत्रावर लेखन केले गेले.त्यानंतर कागदाचा शोध लागला. त्यानंतर मुद्रण कलेचा शोध लागला.

मुद्रणकलेच्या शोधानंतर कथा लिखित स्वरूपात साकार झाली आणि वाङ्मय प्रकारात एक महत्त्वाचा प्रकार म्हणून लोकप्रिय ठरली.लघुकथेत मोजकी पात्रे,घटना,प्रसंग यांच्या आधारे जीवनाचे अंगदर्शन घडते.कल्पित माणसे,निसर्ग घटक ही लघुकथेतील पात्रे असतात.कवितेनंतर प्रचंड लोकप्रिय असलेला हा दुसरा साहित्य प्रकार आहे.



आत्मकथन,ललित निबंध,कविता व प्रवासवर्णन
आत्मकथा/बायोग्राफी
स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या ओढीतून आत्मकथन हा साहित्य प्रकार अस्तित्वात आला आहे. स्वतःच्या जीवनातल्या घटना ,भेटलेल्या व्यक्ती,घेतलेले अनुभव, आपल्या भावना याचे स्वतः केलेले कथन म्हणजे आत्मकथा.

आत्मचरित्राच्या वाचकाला नेहमी यशस्वी लोकांच्या आत्मकथेत रस असतो.उद्योगपती,साहित्यिक,मोठा राजकीय नेता,सिलेब्रिटी अभिनेता-अभिनेत्री,सामाजिक कार्यकर्ता,वरिष्ठ पत्रकार,IS/IPS अधिकारी अशा लोकांच्या जीवनातील घटना,त्यांचा अनुभव जाणून घेण्यासाठी आत्मचरित्र वाचल्या जाते.जगभरातील कित्येक मोठया व्यक्तीचें अनुवादित बायोग्राफी आपल्याला आज उपलब्ध आहे.

मराठी साहित्यातील 'आत्मचरित्रा'ला खऱ्या अर्थाने दलित साहित्यिकांच्या आत्मकथनाने समृद्ध केले.दया पवार लिखित 'बलुत' या आत्मकथेने देशातीलच नव्हे तर विदेशातील शोषित-पीडितांना देखील 'आत्मकथा' लिहिण्यास प्रोत्साहित केले.



ललित निबंध
वैचारिक निबंधापेक्षा ललित निबंधाचे स्वरूप वेगळे असते.यात एखादे व्यक्ती चित्र,एखादी घटना,एखादा अनुभव किंवा एखादा क्षण असे काहीही स्व केंद्री भूमिकेतून कथन करणे ही एक रीत आहे.'स्व' ने केलेले चिंतन,'स्व' च्या आठवणी,'स्व' च्या भावावस्था याचे दर्शन ललित निबंधातून घडते.लालित्यपूर्ण चिंतनप्रक्रिया हे याचे वैशिष्ट्य सांगता येईल.विषयाचे बंधन वा मांडणीची शिस्त असे काही न पाळणारा हा मुक्त लेखन प्रकार आहे.अनुभव,घटना किंवा व्यक्तींकडे पाहण्याची दृष्टी ही लेखकाची खास व्यक्तिगत दृष्टी असते म्हणून ललित निबंधाला विविधताही प्राप्त होऊ शकते. घटना-व्यक्ती यांचा विशिष्ट कालानुक्रम गृहीत धरून 'मी' जेव्हा बोलू लागतो तेव्हा त्या बोलण्याला कथनपरता प्राप्त होते व एखादी हकीगतही ल.निबंधात सामावली जाऊ शकते.सोंदर्ययुक्त मूल्यदृष्टीने जीवनानुभव घेणारा 'मी' ललित निबंधातून प्रकट होत असतो.सर्व मानवीमनाचे - स्वभावाचे सर्व रंग प्रकट करण्याचे सामर्थ्य ललित निबंधात असते.



कविता
कविता हा भावनेला महत्व देणारा साहित्य प्रकार आहे.कवीच्या भावनात्मकतेचे सहज,उत्कट व प्रत्ययकारी संक्रमण वाचकांमध्ये होणे आवश्यक मानले जाते. कवीला भावनात्मक अनुभवाची तीव्र, उत्कट अशा अविष्काराची ओढ असते.त्यातूनच तो काव्यशब्द,काव्यभाषा घडवतो.कवितेत भाषिक मोडतोड मोठ्या प्रमाणावर होते,त्यामागे कवीचा सौंदर्यसर्जनाचा हेतू असतो.व्यवहारभाषेची परंपरागत नियमव्यवस्था, संकेतव्यवस्था मोडली गेल्याने वाचक किंवा श्रोता मूळच्या संकेतव्यवस्थेचे स्मरण ठेवीत कविनिर्मित नव्या व्यवस्थेकडे आकर्षित होतो.भाषेच्या लयींचा,नादगुणांचा,दृश्यागुणांचा,दृश्यात्मकतेचा सूचक वापरही कवी करत असतो. भाषेच्या गद्य साहित्य प्रकारांमध्ये भाषा हे बहुदा माध्यम व साधन म्हणून कार्य करते.परंतु कवितेत भाषा हे भावसंप्रेषणाचे माध्यम बनते.



प्रवास वर्णन
प्रवासवर्णनामध्ये प्रवासात भेटलेल्या व्यक्ती,त्या व्यक्तींचे गुण वैशिष्ट्ये,प्रवासात आलेले संमिश्र अनुभव,ज्या ठिकाणी प्रवास घडला त्या ठिकाणचा भूगोल,इतिहास,लोकांच्या रितिभाती,लोकजीवन,स्थळ वैशिष्ट्ये या सर्वांचाच समावेश असावा लागतो.या सर्व गोष्टींची शब्दाच्या माध्यमातून पुर्नरचना प्रवासवर्णनकारास करावी लागते.तेव्हाच ते ललितरुप धारण करते.नाहीतर ते रुक्ष प्रवासवृत ठरू शकते.प्रवासातील कोणत्या घटना,व्यक्ती,प्रदेश व त्यांच्या अनुभूतीचे दर्शन घडवायचे. हे लेखकाने ठरविलेले असते.'निवड' हे तत्व येथे असते.कारण 'काय सांगायचे?' हा लेखकाचा कलामुल्याशी निगडित प्रश्न आहे.भाषिक निवडीएतकीच आशयाची निवड महत्वाची असते.या निवडीमधून 'वर्णन' ही कलात्मक ठरते.प्रवासवर्णन हे केवळ 'वर्णन' असत नाही त्यात संवाद,कथन,भाष्ये यांचाही यथोचित वापर लेखकाने केलेला असतो.भाषिक सर्जनशीलता प्रकट करणारी प्रवासवर्णने ही उत्कट प्रत्ययकारकता निर्माण करतात. असा लेखक वाचकाला आपल्या अनुभवात सहभागी करून घेतो.त्यामुळे भावनिक व सौंदर्यात्मक संक्रमण घडून येते.मराठीत 'पूर्वरंग व 'अपूर्वाई हे पु. ल. देशपांडेंची प्रवासवर्णने सुंदर उदाहरण आहे.

हे काही प्रमुख प्रकार ललित साहित्यात आहे.या व्यतिरिक्त रुपककथा,लोककथा,दृष्टांत कथा हेही ललित साहित्याचा भाग आहे.

शीगवाला / नारायण सुर्वे

क्या लिखतो रे पोरा ! नाही चाचा -- काही हर्फ जुळवतो म्हणता, म्हणता दाऊदचाचा खोलीत शिरतो गोंडेवली तुर्की टोपी काढून गळ्याखालचा घाम पुसून तो ...