मंगळवार, १६ एप्रिल, २०१९

चरित्रे- आत्मचरित्र

मराठी
१) प्रकाशवाटा:- प्रकाश आमटे
२) एकटा जीव :- दादा कोंडके
३) अग्नीपंख:- ए.पी.जे. अब्दुल कलाम
४) झिम्मा :- विजया मेहता
आत्मचरित्र कस असाव याचा ऊत्तम वस्तुपाठ म्हणजे झिम्मा
कुठेही कोणावर दोषारोप नाही; सनासनाटी पनाच्या नावाखाली भड़क पणा नाही . अतिशय संयत भाषेत लिहिलेल / मराठी नाट्य सृष्टिचा महत्वाचा दस्तावेज अशी याची नोंद होईल
५) लमाण :- डॉ श्रीराम लागू
डॉक्टरान्च्या स्वभावाप्रामाणे परखड भाषेचा अनुभव देणार. वेळोवेळि स्वताला काढलेले चिमटे ; भोवतालच्या परिस्थितीचे ऊत्तम आणि अचूक विश्लेषण हे जमेचे मुद्दे
६)स्वतःविषयी :- अनील अवचट
७) सत्याचे प्रयोगः- म. गांधी
८) नाच गं घुमा - माधवी देसाई
९) आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
१०) 'कुणा एकाची भ्रमणगाथा':- गोनिदा
११) कॉलनी :- सिद्धार्थ पारधे.
१२) स्म्रुतीचित्रे:- लक्ष्मीबाई टिळक.
१३) रास :- सुमा करंदीकर.
१४) रांगोळीचे ठीपके:- वासंती गाडगीळ.
१५) झोंबी- आनंद यादव.
१६) आय डेअर- किरण बेदी.
१७) एक झाड दोन पक्षी :- विश्राम बेडेकर.
१८) हृदयस्थ- नीतू मांडके.
१९) जगाच्या पाठीवर :- सुधीर फडके.
२०) एका साळीयाने- लक्ष्मीनारायण बोल्ली.
२१) बंध-अनुबंध - कमल पाध्ये.
२२) समिधा - साधना आमटे.
२३) मास्तरांची सावली - कृष्णा सुर्वे.
२४) वार्ड नं. ५ - डॉ.रवी बापट
२५) मुसाफिर :-अच्च्युत गोडबोले
२६) मी दुर्गा खोटे - श्रीम. दुर्गा खोटे शब्दांकन आहे.
२६) सांगत्ये ऐका - हंसा वाडकर
२७) कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे
२८) एंडे कथा(माझी कथा) - कमला दास. नंतर मुस्लीम धर्म स्वीकारून पै.वासी झालेल्या.
२९) दि लास्ट प्रिन्सेस - गायत्रीदेवी.
३०) अंतर्यामी सूर गवसला - श्रीनिवास खळे
३१) माझा साक्षात्कारी हृदयरोग- अभय बंग ( ह्याला आत्मचरित्र म्हणण्यापेक्षा, हार्ट प्रॉब्लेम आल्यानंतर आलेले अनुभव, त्यातून ते काय शिकले आणि आपली जीवनशैली कशी असावी ह्याबद्दल हे पुस्तक आहे.)
३२) उपरा- लक्ष्मण माने.
३३) उचल्या- लक्ष्मण गायकवाड
३४) बलुतं- दया पवार.
३५) आयदान- उर्मिला पवार.
३६) ताई मी कलेक्टर व्हायनू -राजेश पाटील
३७) ताठ कणा.-डॉ.पी.एस.रामाणी (नाव नक्की नाही)
३८) तराळ-अंतराळ- शंकरराव खरात; अजिबात आक्रस्ताळे न होता दलित आत्मचरित्र लिहिता येते आणि तरीही ते तितकेच दाहक आणि अस्वस्थ करणारे असू शकते याचे कदाचित सर्वोत्कृष्ट उदाहरण.
३९) माय एक्सपेरीमेंट्स विथ ट्रूथ- गांधीजी; हे खरेतर मूळ गुजरातीतूनच वाचले पाहिजे, किमान इंग्रजीतरी; मराठी अनुवाद वाचू नका फार पांचट आहे.
४०) 'परतीचा प्रवास' :-वनमालाबाई
४१) लंडनच्या आजीबाईची कहाणी :- लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य (चरित्र)
४२) स्टुडीओ- सुभाष अवचट
४३) तीन दगडांची चूल- विमल मोरे ( भटक्या जोशी समाजाचे चित्रण).
४४) कोल्हयाटयाचे पोर- किशोर शांताबाई काळे
४५) 'मयादा' हे आत्मचरित्रपण चांगले आहे, मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद आहे. इराकमध्ये सद्दामच्या राजवटीत तुरुंगात गेलेल्या 'मयादा' नावाच्या सुशिक्षित आणि स्वतःची प्रेस असणाऱ्या स्त्रीचे आत्मचरित्र आहे.
४६) 'ईराणमधून पलायन' हापण मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद आहे. ईराणमध्ये जुलमी राजवट आल्यानंतर एका स्त्रीने पलायन केले मुलासह, प्रथम फ्रान्समध्ये आली आणि नंतर कॅनडा येथे स्थायिक झाली.
४७) कुणास्तव कुणीतरी --- यशोदा पाडगावकर
४८) हसरे दु:ख - चाल्री चाप्लीन वरचे पुस्तक
४९) चार नगरातले माझे विश्व - जयंत नारळीकर
५०) ही श्री ची इच्छा -श्रीनिवास ठाणेदार
५१) ईडली ऑर्कीड आणि मी - कामत
५२) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
५३) रेडीयमः- मादाम मेरी क्युरी (शाळेत असताना रेडीयम नामक पुस्तक वाचले होते - मादाम मेरी क्युरी वरचे पुस्तक मला अतिशय आवडले होत...पण नाव नक्की रेडीयम च होते का हे नीट आठवत नाही.)
५४) द्रुष्टीदाता:- ब्रेल लिपी ज्याने शोधली त्याच्यवरचे (नाव नक्की आठवत नाही )
५५) उष:काल:- उषा किरण
५६) उपरा- लक्ष्मण माने.
५७) उचल्या- लक्ष्मण गायकवाड
५८) आमचा बाप आणि आम्ही -नरेंद्र जाधव
५९) 'इनसाइड द गॅस(gas) चेंबर्स' :- 'श्लोमो व्हेनेत्सिया' यांचे अनुभवकथन . सुन्न करणारा अनुभव. संपादन-जीन माउटापा, इंग्रजी अनुवाद- andru brown. मराठी अनुवाद- सुनीती काणे.
६०) राजमाता:- वि स वाळिंबे
६१) "माझंही एक स्वप्न होतं' ( I too had a dream...Vergese Kurien as told by Gauree Salavee):- सुजाता देशमुख यांनी अनुवाद केलेले श्री.व्हर्गीस कुरियन यांचे आत्मचरित्र.खूप स्पष्ट,निर्भीड वाटतेय.
६२) स्मृतीपूजा:- प्रभावती भावे (पु.भा.भावे यांच्या पत्नी)
६३) जेव्हा माणूस जागा होतो :- गोदावरी परुळेकर : हे आत्मकथनपर आहे ,यातला भाग शालेय अभ्यासक्रमात होता. आणखी एक प्रकरण अलीकडेच एका दिवाळी अंकात वाचले.
६४) माझा पोवाडा:- शाहिर साबळे
६५) धाकटी पाती:- सूर्यकांत
६६) टाईमपास:- प्रोतिमा बेदी (कबीर बेदी ची एक्स बायको)
६७) गोष्ट एका मारवाड्याची'- गिरीश जाखोटिया (आत्मचरित्र नव्हे पण बरेचसे तसेही.)
***************************************************************************************************************************************************************
काही इंग्रजी:-
१) 'Iron Lady' :- Margaret Thatcher
२) Madeleine Albright:- Madam Secretary
३) Early days:-Sir Winston Churchill
४) माझा लढा (main kampf) :- हीटलर चा
५) A diary of a young girl:- Anne Frank
६) डेझर्टर- विजय देवधर (एका जर्मन मेसेंजरच्या पलायनाची गोष्ट)
७) सैबेरियातून पलायन (लेखक आठवत नाही, एका जर्मन युद्धकैद्याचे रशियातून पलायन)
८) काळी बाई- ब्राझीलमध्ये झोपडपट्टीत राहणारी भंगार विकणारी बाई, फक्त दुसरी शिकलेली पोर्तुगीजमध्ये पण रोज आपली डायरी लिहायची सवय होती तिला. एका पत्रकाराने तिचे लिखाण प्रसिद्ध केले आणि ती फेमस झाली, तिचे चांगल्या वस्तीत राहून मुलांना वाढवायचे स्वप्न पूर्ण झाले.
९) अँजेलाज अ‍ॅशेस - फ्रँक मॅकोर्ट
१०) Iran Awakening :- Shirin Ebadi:- ह्या पुस्तकाच्या इराण जागा होतोय या नावाने प्रतिमा जोशीनी मराठीत अनुवाद केला आहे
११) Desert Flower :- Waris Dirie
१२) Agony and Ecstasy:- a biography of Michael Angelo by Irving Stone
१३) Clarence Darrow for defense:- biography of Clarence Darrow by Irving Stone
१४) In the line of fire :- Parvez Musharraf
१५) Daughter of Destiny :- Benazeer Bhutto
१६) Sunny Days - Sunil Gavaskar
१७) 4th Part Dashadwar se sopan tak:- Harivanshrai Bachchan
१८) Every Second Counts :- Lance Armstrong
१९) Winning :- Jack Welch
२०) Iacocca :- Lee Iacocca
२१) Open :- Andre Agassi
२२) My Life :- Brett Lee
२३) Made in Japan :- Akio Morita (Sony)
२४) A Double Life :- Alyque Padamsee
२५) Controversially Yours :- Shoaib Akhtar
२६) Genghis Khan and the Making of the Modern World -: Ghenghis Khan (हे चरीत्र आहे)
२७) Jinnah :- By Jaswant Singh
२८) The test of my life:- युवराज सिंग
२९) Out of comfort zone:- स्टिव्ह वॉ
३०) Indian summers :- जॉन राईट
३१) ऑन द लाईन :- सेरेना विल्यम्सचे



वाचावे असे काही...
1. मृत्युंजय
2. छावा
3. बुधभूषण
4. राधेय
5. शिवरायांचे खरे शत्रू कोण
6. श्रीमान योगी
7. म्हणे लढाई संपली
8. शंभूराजे
9. शिवचरित्रातून उद्योगमंत्र
10. शंभूचरित्र
11. राजमाता जिजाऊ
12. छत्रपती शिवाजी महाराज
13. छत्रपती संभाजी महाराज
14. संभाजीराजे सांक्षिप्त जीवनपट
15. झुंज
16. मावळा
17. पावनखिंड
18. युगंधर
19. बजिंद
20. ययाती
21. किल्ले रायगड
22. छत्रपती शिवरायांची अस्सल छायाचित्रे
23. रायगडाची जीवन कथा
24.  तेरा पोवाडे
25. तोरणा
26. दुर्गरत्न
27. पुरंदर
28. प्रतापगड
29. प्रवास गडकोटांचा
30. महाराष्ट्र दर्शन
31. माझा राजा शिवाजी राजा
32. मुरुड जंजिरा
33. राजगड
34. रायगड
35.  लोहगड
36. विजयदुर्ग
37. विशाळगड
38.  शिवनेरी
39. शिवाजी
40. सिंधुदूर्ग..

*तुम्हाला पाहिजे असणारी सर्व पुस्तके खालील लिंक वर आहेत कधीही बघा, वाचा, download करा. महत्वाचे म्हणजे हा message share करा जेणेकरून सर्वाना याचा लाभ घेता येईल*

https://drive.google.com/drive/mobile/folders/1-8PYwGN2D8rTHWNBjgBmVI9vCfrC8Unr

रविवार, १४ एप्रिल, २०१९

भजन -स्वरूप

भजन : टाळ, मृदंग, किंवा पखावज या वाद्यांच्या साथीत ईश्वर गुणवर्णनपर व नामस्मरणपर काव्यरचना गाणे, यास 'भजन' असे म्हणतात. भजन हा भक्तिसंगीतातील व भक्तिमार्गातील एक महत्वपूर्ण प्रकार आहे. ह्या प्रकारचा उद्‌गम सामवेदापासून दिसत असला, तरी याचा स्पष्ट आढळ श्रीमद् भागवताच्या दशम स्कंधात होतो. भागवताचा कालखंड इ.स.पू.३०० असा मानतात. या काळापासून भजनाची परंपरा रुढ आहे. येथून भारतात वेगवेगळ्या प्रांतांत भजन रुढ झाले.

भजनास प्रांरभ करण्यापूर्वी सांप्रदायिक देवतेची प्रतिमा व्यासपीठावर ठेवतात. त्याची यथासांग हळद-कुंकू, बुक्का, गुलाल, हार, धूप-दीप इ. साधनांनी पूजा करतात. पूजा करणारा प्रमुख वीणेकरी असतो. तो देवतेची पूजा झाल्यावर वीणेची हार-फूल, गुलाल-बुक्का यांनी पूजी करतो. इष्टदेवतेचे, कुलदेवतेचे संस्कृत श्लोकात स्मरण करुन मग प्रांतीय भाषेत भजनास आरंभ करतो. काही संप्रदायात संस्कृत श्लोक न म्हणता प्रांतीय भाषेत भजनास सुरुवात करतात. भजनात वीणेकऱ्यास प्रमुख स्थान असते. वीणेकरी हा शुचिर्भुत, कपाळी गंध, मधोमध बुक्क्याचा टिळा व टोपी अथवा लांब केस राखलेला असा असतो. याने भजनाची दीक्षा घ्यावयाची असते, यासाठी संप्रदायिक ग्रंथांचा अभ्यास, सद्‌गुरु-अनुग्रह, सांप्रदायिक व्रतोत्सव हे सर्व पाळण्याची शपथ देवतेसमोर घ्यावयाची असते, तसेच त्या देवतेला अभिषेक करावयाचा असतो. तेव्हापासून तो वीणेकरी होतो. बाकीच्या भजनी मंडळींसाठी हा दीक्षाविधी तितकासा कर्मठ नसतो.

त्तर हिंदुस्तानात भजन करणाऱ्या समूहास 'भजनी मंडली' असे म्हणतात. यात चैतन्य महाप्रभूंचे 'हरि बोल, हरि बोल, हरि हरि बोल' किंवा 'कृष्ण कृष्ण जय कृष्ण' किंवा 'राधा राधेकृष्ण राधा' हे भजन, तर चंडीदासाच्या भजनात 'हरे रामा हरे रामा रामा रामा हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे' हे भजन त्यांच्या पदांसह येते. बंगालमद्ये गौडी-संप्रदायाची भजने म्हणतात. चतुःसंप्रदाय आखाड्यात करताल, मृदंग यांवर तुलसीदसांची सगुण भजने तसेच सूरदास, मीराबाई, कबीर यांची निर्गुण भजने म्हणतात, तर शैव आखाड्यात चिमट्यावर पारंपरिक शैव पदे म्हणतात. वैष्णव भजनात अधूनमधून राम-कृष्णांच्या कथाही येतात. या कथा प्रमुख वीणेकरी किंवा पेटी वाजवणारा निवेदक सांगतो. ही भजनी मंडळी विशिष्ट उत्सवांना त्या त्या तीर्थक्षेत्री उपस्थित असतात. शैव आखाड्यात शिववर्णनपर चिमट्यांची भजने असतात. उत्तर हिंदुस्थानातील भजनात पेटीचा समावेश कालांतराने झाला. शैव भजनात पेटी, टाळ, वीणा नसते. चिमटा, मृदंग किंवा ढोल ही वाद्ये वापरतात. वैष्णव भजनात वीणेकरी अधूनमधून नाचतो; तर शैव भजनात चिमटेकरी अधूनमधून नाचतो.

र्नाटक संगीतामध्ये भजन म्हणणारे 'भागवतर' मृदंग, टाळ, वीणा वा तंवोरा, पेटी या वाद्यांसह भजन म्हणतात. त्यातला प्रमुख भागवतर फेर धरून नाचतो व त्यासोबत बाकीचे भजन म्हणतात. यातील पदे कथानकप्रधान असतात भजन ऐकणारे श्रोतेही त्यांच्याबरोबर पदाचे ध्रुवपद आळवितात. यात गणेश, सरस्वती इ. देवतांची स्तुती, प्रह्लाद, नारद यांचे माहात्म्यपर वर्णन, जयदेवाची 'अष्टपदी' राम-सीता, सुब्रह्मण्य यांचे गुणवर्णन येते. हा भजनाचा पहिला भाग झाला. दुसऱ्या भागात देवतेजवळची समई मधोमध ठेवून त्याभोवती प्रदक्षिणा घालून भजन म्हणण्याची प्रथा आहे. 'उञ्च्छवृत्ती भजनी मंडळ' म्हणून एक फिरते भजनी मंडळ असून ते रस्त्यावर भजन करीत जातात. लोक त्यांना कोरडी मिक्षा घालतात. तंजावर प्रांतात देवतेच्या पालख्यांपुढेही भजने म्हणतात. यात पुरंदरदास, बोधेंद्रगुरूस्वामी, त्यागराज, सदाशिव ब्रह्मेंद्र इत्यादींच्या रचना असतात. गुजरातमधील भजनी संप्रदायाचा नरसी मेहता हा प्रवर्तक होय. या पदरचनेत कृष्णकथा प्रामुख्याने गुंफलेली असते. ओरिसातील भजनी परंपराही रामकृष्णकथांनी युक्त असते. यात कथानिवेदनही वापरतात. प्रमुख वीणेकरी व पेटीवादक हा अधूनमधून कथा सांगत असतो व आपल्याबरोबर सर्वांना भजन म्हणायला सांगतो.

महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून वारकरी संप्रदायाने भजनगायनाची परंपरा नामदेवांच्या काळापासून सुरू केली. यापूर्वी महानुभाव पंथात मठसंगीत होते. पण ते मठापुरते आणि मठातील शिष्यगणांपुरतेच मर्यादित स्वरूपात तसेच चक्रधरांच्या गुणस्तुतीपर कवनांतून उपलब्ध होते. हे भजन सर्वसामान्यांसाठी कधीही नव्हते. वारकरी संप्रदायाने भजन सर्वांना मुक्त केले. नामस्मरणाचा प्रमुख प्रकार म्हणून तसेच नवविघाभक्तीचा एक आविष्कार म्हणून भजन या घटकास वारकरी परंपरेने भक्तिमार्गात प्रमुख व महत्त्वपूर्ण स्थान दिले. वारकरी भजनात खोलगट टाळ, वीणा, पखावज ही तीन वाद्ये असतात. समोर पांडुरंगाची प्रतिमा असते. वीणेकरी मधोमध उभा असतो. त्याच्या डाव्या हाताला पखावजी असतो. भजनाचा आरंभ 'जय जय राम कृष्ण हरी' या नाममंत्राने होतो. 'सुंदर ते ध्यान उभे विटेकरी' हा तुकारामाचा अभंग व 'रूप पाहता लोचनी, सुख जाले वो साजणी' हा ज्ञानदेवाचा अभंग मंगलाचरण म्हणून गातात. यानंतर वीणेला व वीणेकऱ्याला बुक्का, हार घालून पूजा झाली, की मग भजनास आरंभ होतो. यात नामदेव, एकनाथ, तुकाराम, निळाबाराय या संतांच्या नाम-उपदेशपर अभंगांचा प्रमुख्याने समावेश होतो. भजनाचा पूर्वरंग झाल्यावर नाथांच्या गौळणी, भारुडे म्हणतात. भजनाच्या शेवटी विठ्ठल, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम यांच्या आरत्या म्हणतात. पसायदान व नामदेवाचे चिरंजीवपद सामुदायिकपणे म्हणून भजन संपते.

वारकरी भजनांचे 'फड' आहेत. फड म्हणजे वारकरी भजनांचा समूह वारकऱ्याने आयुष्यभर त्या फडाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असा नियम आहे. वासकरबुवांचा फड, गुरवबुवांचा फड, कदमबुवांचा फड, करमरकरबुवांचा फड असे विविध फड पंढरपुरात आहेत. हे विशिष्ट समूह काही निवडक संतांचे अभंग परंपरेने गातात. हे अभंग फडांच्या पूर्वंसूरींनी ठरवून दिलेले असतात. त्याव्यतिरिक्त दुसरा अभंग म्हणावयाचा नसतो. हे फड आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत पंढरपुरात व कार्तिक वद्य प्रतिपदा ते अमावास्येपर्यंत आळंदीस असतात. वारकऱ्यांच्या या दोन प्रमुख वारकऱ्यांना फडांची हजेरी लागते. संतांच्या पालख्या पंढरपुरास येताने काही चक्री भजने करतात. 'चक्री भजन' म्हणजे लागोपाठ भजने म्हणणे. यात कधी कधी भजनाच्या शेवटच्या अक्षरापासून दुसऱ्या अभंगाला सुरूवात करतात. काही विशिष्ट देवभक्तांची सोंगे घेऊन त्यांच्यात अंभगरूपाने होणाऱ्या संवादास 'सोंगी भजन' म्हणतात. सांगली जिल्ह्यातील खुजगाव येथील सोंगी भजनी मंडळी प्रसिद्ध आहेत. 'बारी भंजना'त अधिक सुरेल भजन कोण म्हणतो, याची स्पर्धा असते. 'रिंगण भजना'त तीन वेगळ्या प्रकारची भजनी मंडळी गोलाकार उभी असतात. ते क्रमाने एकेक अभंग म्हणतात. 'भारुड भजना'त केवळ नाथांची भारुढ गातात. ही सर्व विठ्ठलपंथी भजने आहेत.

वारकरी भजनी मंडळे महाराष्ट्रभर आहेत. दत्तपंथी भजनात वारकरी भजन असते, पण त्यात दत्तसंप्रदायातील पारंपरिक पदे नमन म्हणून म्हणतात. दर गुरूवारी भजन करणारी दत्तोपासक भजनी मंडळे महाराष्ट्रात सर्वत्र आहेत. आळंदीच्या वारकरी शिक्षणसंस्थेत खास भजनाचे वर्ग घेतले जातात. काही ठिकाणी बारमाही भजन असते. विठ्ठलपंथी प्रत्येक एकादशीस तर दत्तपंथी दर गुरूवारी भजन करतात. दत्तपंथी भजनात भक्ति-नृत्यही असते. काही भजनी मंडळे एकतारीवर भजने करतात. एकतारीवर भजन म्हणण्याचा प्रघात मांग, महार, कोळी, चाभांर या जमातींत विशेष आढळतो.

जन हा गानपद्धतीनुसार सुगम शास्त्रीय संगीताचा किंवा सुगम संगीताचा प्रकार म्हणता येईल. पारंपरिक संतकवींची भजनरचना धृपद-धमार गायकीच्या अथवा शास्त्रीय रागदारीच्या अंगाने गाईली गेल्यास, त्या रचनेला 'पद' असे म्हणतात. ही रचना सुगम शास्त्रीय संगीताच्या-ठुमरी-दादरा गायकीच्या-अंगाने गाईली गेल्यास 'भजन' म्हणून ओळखली जाते. भजन हे एकच गायक गातो; किंवा समूह स्वरात सामुदायिक रीत्याही म्हटले जाते. सुगम संगीताच्या अथवा लोकगीताच्या अंगाने भजन गाईले गेल्यास एकतारी, झांजा, चिपळ्या ही वाद्ये त्या बरोबर साथीला घेतली जातात. या पद्धतीने भजन म्हणत असताना काव्यार्थाला महत्त्व असल्यामुळे साहित्याची पुनरुक्ती केली, तरी सांगीतिक दृष्टया आळवणे हा भाग त्यात नसतो. याउलट ठुमरी-दादरा गायकीच्या अंगाने भजन गाईले गेल्यास तेथे संगीतदृष्टया कल्पनेचा विलास खूपच आढळतो आणि साहित्याचे महत्त्व कमी न करता पण संगीतदृष्टया विविध त-हांनी आळवून असे भजन गाईले जाते. भजन ज्या गायकीच्या अंगाने भजन गाईले जात असेल, त्यानुसार सोयीप्रमाणे तबला, पखावज, ढोलक इ. तालवाद्ये वापरली जातात. तेव्हा भजन हा गीतप्रकार शास्त्रीय रागदारीपासून ते सुगम तसेच लोकसंगीतापर्यंत वेगवेगळ्या संगीतप्रकारांच्या गायकीची डूब घेऊन भिन्नभिन्न प्रदेश-कालपरत्वे प्रसृत होत गेला आहे, हे दिसून येईल.

भजनात पारंपरिक चालींबरोबर शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेली भजनी पठडी गेल्या काही वर्षांत तयार झाली. यांनी भजन ऐकणारा भाविक आणि शास्त्रीय संगीतची आवड असणारा श्रोतृवर्ग तयार केला. या भजनात पेटीचा समावेश झाला. यात दोन स्वतंत्र पठडया निर्माण झाल्या. एक पारंपरिक चाली वीणा-टाळ-पखावज यांच्या साथीसह गाणारी पारंपरिक पठडी दुसरी पेटी-तबला-तंबोरा-वीणा-पखावज यांच्या साथीसह व रागदारीयुक्त गाणारी नवी पठडी अशा पठडीतील भजनी मंडळे शहरांतून दिसतात. मुंबईतील गिरणी कामगारांच्या भजन स्पर्धा होतात. अशा प्रकारच्या भजनांचे वर्ग प्रसिद्ध भजनकारांमार्फत चालवले जातात. मुंबईचे एकनाथबुवा हातिसकार हे या विठ्ठलपंथी भजनीपठडीतील प्रसिद्ध भजनकार होऊन गेले. नागपूरचे शामसुंदरबुवा भुजाड यांचाही या संदर्भात उल्लेख करता येईल.

रामदासी भजनात समर्थ संप्रदायाची पारंपरिक पदे येतात. यात समर्थगाथेतील भजने म्हटली जातात. तीनचार भजनांपाठोपाठ 'समर्थ सद्‌गुरू माझे आई मजला ठाव द्यावा पायी' असे नामस्मरणही म्हणतात. भजनाच्या शेवटी त्या त्या वाराची 'सवाई' म्हणून भजन संपते. यात पेटी, तबला, टाळ ही वाद्ये असतात. समर्थ रामदासांची प्रतिमा समोर ठेवतात.

क्ती संप्रदायातील भजनात देविस्तुती, 'उदे उदे ग अंबावाई' या रचना मोठया करताळावर म्हणतात. साथीला ढोलके, तुणतुणे ही वाद्ये असतात. मंगळवार, शुक्रवार या दिवशींच्या भजनात मध्यंतरात जोगवाही मागतात. तुकाराम, रामदास यांचे अभंग म्हणतात. यात महालक्ष्मी, रेणुकादेवी, तुळजाभवानी, सप्तृश्रृंगी यांच्या प्रतिमा असतात.

गाणपत्य भजनात गणेशस्तुती नमनात गातात. 'पार्वतीशनंदना मोरया गजानना, सुफलदुरितनाशना येई बा गजानना' हे नामस्मरण करतात. यात एकनाथ, रामदास यांचे अभंग पेटी-टाळ-तबला-तंबोरा या साथीच गातात. यांच्यात दर संकष्टी चतुर्थीला भजन म्हणण्याचा प्रघात आहे.

पाठक, यशवंत; आठवले, वि.रा

सोमवार, ८ एप्रिल, २०१९

पदवी स्तरावरील मराठी भाषा व साहित्य अभ्यासक्रम उपयोगिता

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
बी. ए. सत्र I ऐच्छीक मराठी अभ्यासपत्रिका II
आधुनिक मराठी कविता 
उपयोगीता
१.
२.
३.
४.
बी. ए. सत्र II ऐच्छीक मराठी अभ्यासपत्रिका IV
आधुनिक मराठी कवितेतील प्रवाह IV
उपयोगीता
१.
२.
३.
४.
बी कॉम. सत्र I द्वितीय भाषा मराठी - साहित्यागाथा भाग 1
उपयोगीता
१.
२.
३.
४.
५.
बी कॉम. सत्र II द्वितीय भाषा मराठी - साहित्यागाथा भाग 2
उपयोगीता
१.
२.
३.
४.
५.
बी कॉम. सत्र III द्वितीय भाषा मराठी - साहित्यधारा भाग 1
उपयोगीता
१.
२.
३.
४.
५.
बी कॉम. सत्र IV द्वितीय भाषा मराठी - साहित्यधारा भाग 2
उपयोगीता
१.
२.
३.
४.
५.

पदवी तृतीय वर्ष अभ्यासक्रम - श्रेयांक पद्धतीनुसार CBCS सत्र पद्धती
कौशल्ये विकास SEC - IV। बी.ए. sem.V
अभ्यासपत्रिकेचे नाव : मराठी भाषिक कौशल्ये विकास भाग 1 SEC-  III
उपयोगिता
१. मराठी भाषिक क्षमतांच्या वाढीस मदत
२. मराठी भाषिक कौशल्ये विकासास वाव
३. विविध क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी
४. मराठी भाषेतील ग्रंथ प्रकाशनाचे स्वरूप समजावून घेण्यास मदत
अभ्यासपत्रिकेचे नाव : मराठी भाषिक कौशल्ये विकास भाग 2 SEC-  IV
उपयोगिता
१. विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन
२. देहबोलीच्या वापरातून प्रभावी संभाषण
३. मुद्रितशोधनासाठीचे कौशल्ये विकसन
४. अनुदिनी व पटकथा लेखन कौशल्ये विकसन
५.प्रमाण मराठीच्या नियमांचे लेखनामध्ये उपयोजन
बी.ए. सत्र IV अभ्यासपत्रिकेचे नाव :- मराठी मध्ययुगीन गद्य पद्यांचा अभ्यास -  VIII
उपयोगिता
१. मध्ययुगीन कालखंडातील मराठी वाङ्मय प्रकारांचा परिचय
२. मध्ययुगीन कालखंडातील वाङ्मयातून प्रकट झालेल्या मानवी मूल्यांचे आकलन
३. तत्कालीन भाषिक जाणिवांचे, शैलीचे दर्शन व आकलन
बी.ए. सत्र III अभ्यासपत्रिकेचे नाव :- आधुनिक मराठी वाङ्मय प्रकारचा अभ्यास - आत्मचरित्र  V
उपयोगिता
१. आत्मचरित्र वाङ्मय प्रकाराचा परिचय व आकलन
२. आत्मचरित्र वाङ्मय प्रकारातून प्रकट होणाऱ्या मानवी मूल्यांचे आकलन
३.




मध्ययुगीन गद्य पद्यांचा अभ्यास viii वस्तुनिष्ठ प्रश्न

१. मराठीतील पाहिले भावकवी म्हणून कोणास ओळखले जाते?  संत नामदेव
२. संत ज्ञानेश्वरांनी भगवदगीतेस काय म्हटले आहे?  धर्म कीर्तन
३. सुत्रपाठ हा ग्रंथ कोणी लिहिला?  केसोबास
४. ११४ दृष्टातांचे संपादन केसोबासांनी कोणत्या ग्रंथात केले आहे?  दृष्टांतपाठ
५.निष्ठेने एकाच परमेश्वराची सेवा केली तर उचित फळ मिळते हा विचार तुम्ही अभ्यासलेल्या गद्य उताऱ्यातून येतो? सिंदेराणेयाचा दृष्टांत
६. कान्हेरदेवासोबत लोणार सरोवरास कोण आले होते? रामदेवराय यादव
७. ------म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा साहूकार
८. संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?   आळंदी
९. संत ज्ञानेश्वरांचा जन्म कोठे झाला?  आपेगाव
१०. आज्ञापत्र ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? रामचंद्रपंत अमात्य
११. माझा मराठाचि बोलू कौतुकेl परी अमृतातेही। ----- जिंके   पैजा
१२.मराठी भाषेविषयीचा अभिमान संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या कोणत्या अध्यायातून व्यक्त केलेला आहे?   सहाव्या अध्यायातून
१३. वारकरी पंथाची पताका पंजाबपर्यंत नेण्याचे कार्य कोणी केले?   संत नामदेव
१४. संत नामदेवाचे अभंग ------------ या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत.   गुरुग्रंथसाहेब
१५. कडू वृंदावन साखरे घोळीळे l तरी काय गेलें----------? कडुपण
१६.नामा म्हणे संत सज्जन - - - -। ऐशासही गती काळांतरी । संगती
१७.किर्तन परंपरेचे पाईक म्हणून कोणास ओळखले जाते ? संत नामदेव
१८.संत नामदेवांचे पूर्ण नाव काय आहे? नामदेव दामाशेटी रेळेकर
१९. होनाजी बाळाचे पूर्ण नाव काय आहे? होनाजी सयाजी शिलारखाने
२०. घनश्याम सुंदरा..... ही अजरामर भूपाळी कोणाची आहे?   शाहीर होनाजी बाळा
२१. लखलखाट चकचकाट जैसे दुकान ---------- बोलणे मंजुळ मैनाचे ।। बोहोऱ्याचे
२२. माधव निधान ही प्रसिद्ध रचना कोणाची आहे?   शाहीर अनंत फंदी
२३.बिकट वहिवाट नसावी ------- मार्गा सोडु नको। धोपट
२४. कोणाच्या उपदेशामुळे तमाशाचा त्याग करून अनंत फंदी किर्तनाकडे वळले? अहिल्याबाई होळकर
२५.मोरोपंतांचे पूर्ण नाव काय आहे? मोरोपंत रामचंद्र पराडकर
२६. हंसकाकीख्यान ही कथा कोणी कोणास सांगितली आहे?   शल्याने कर्णास
२७. भाजले ते बीज -------- कदा। न मिळेचि दुधामाजी लोणी।।  अंकुरेना
२८. संत बहिणाबाई ह्या संत--------- च्या शिष्या होत्या.  तुकाराम
२९.संतकृपा झाली इमारत फळा आली ही रचना कोणाची आहे?  संत बहिणाबाई
३०. दासबोध ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? समर्थ रामदास
३१.संत रामदासांचे पूर्ण नाव काय आहे? नारायण सुर्याजीपंत ठोसर
३२.समर्थ संप्रदायाचे प्रवर्तक कोणास मानले जाते? संत रामदास
३३. बरा कुणबी केलों। नाहीं तरि -------असतो मेलो।।  दंभेचि
३४. संसार करितां दगदगले मनीं। ----- विकल्या चौघीजणी।। नंदा
३५. संत एकनाथांचे जन्मगाव कोणते? पैठण
३६. हिंदी भाषिक असूनही मराठी अभंगांची रचना कोणत्या संतांने केली? संत सेना न्हावी
३७. सेना म्हणे ऐशा दांभिका -------। दोघेही जाताती अधोगती।।  भजती
३८. सकल संतगाथेत संत सेना न्हावी यांच्या किती रचना आहेत?   १४३
३९. वारकरी संप्रदायातील कोणत्या संतास काका हे संबोधन सर्व संत वापरतात?  गोरोबा
४०. संत गोरा कुंभार यांनी आपल्या अभंगात कोणत्या संतांचा उल्लेख केलेला आहे?
 संत नामदेव
४१. सारितेचा ओघ -------------आटला । विदेही भेटला मनामन । सागरी
४२. संत कर्ममेळा हा संत चोखामेळा व संत--------- यांचा पुत्र होता.  सोयराबाई
४३. जन्म गेला उष्टे खातां । ----- न ये तुमचे चित्ता ।। लाज
४४. संत गोरोबाकाका यांचे जन्मगाव कोणते?  तेरढोकी
४५. नामयाची दासी जनी हे बिरुद विनम्रपणे कोणती संत कवयित्री लावते? संत जनाबाई
४६. तुझे गेले मढे । तुला पाहून------- रडे ।।  काळ
४७. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे गाव कोणत्या संतांचे जन्मगाव आहे? संत जनाबाई
४८. विठ्ठलाचा एकेरी उल्लेख संत जनाबाई कसा करते? अरे विठ्या विठ्या
४९. ज्ञानेश्वरीचे मूलनाव काय आहे? भावार्थदीपिका
५०. भाऊसाहेबांची बखर या बखरीचे कर्ते कोण आहेत? कृष्णाजी शामराव
५१. शिवकालीन आचारसंहिता म्हणजे ---------- हा ग्रंथ होय. आज्ञापत्र
५२. सुरजमल जाट किती रुपयाची खंडणी धुडकावून लावतो?  एक करोड रुपये
५३. सुरजमल जाट व मराठे यांच्यातील युध्दात कोनास गोळी लागते? खंडेराव होळकर

गुरुवार, ७ मार्च, २०१९

आदिवासी चळवळ आणि स्त्रिया

आदिवासी चळवळ आणि स्त्रिया

आदिवासी जमातींमध्ये भेडसावणारे प्रश्नही अनेक होते.

आदिवासी जमातींमध्ये भेडसावणारे प्रश्नही अनेक होते. जमिनींच्या ताब्याचा प्रश्न तर होताच, पण दारिद्रय़, कुपोषण, अज्ञान, अनारोग्य, बेरोजगारी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धेचा पगडा, पिळवणूक, स्त्रियांवरचे अत्याचार असेही अनेक प्रश्न त्यांचे जीवन कठीण करीत होते.
आदिवासी चळवळींचा इतिहास आपल्याला पार चौदाव्या शतकापर्यंत घेऊन जातो. वेळोवेळी महंमद तुघलक, बिदरचा राजा, बहामनी सरदार यांच्याविरुद्ध एकजूट करून आदिवासींनी आपल्या ताब्यात असलेल्या जमिनी, किल्ले यांचे रक्षण केले होते.
इंग्रजांच्या काळातही त्यांना अनेक वेळा लढावे लागले. त्या काळात इंग्रज अधिकाऱ्यांना आदिवासींच्या जमिनी हडप करण्यासाठी स्थानिक जमीनदार आणि धनिक मदत करीत. १७८८ ते १७९५ या काळात छोटा नागपूर येथे तमाड जमातीने, १८१२ मध्ये राजस्थानात भिल्ल जमातीने, तसेच १८१८ ते १८३० ईशान्यपूर्व भारतात नागा, मिझो, लुशाई, मिशिपी, दफम्त इत्यादी जमातींनी, बिहारमध्ये मुंडा, कोल, खैरनार जमातींनी, १८३२ मध्ये संथालांनी इंग्रजांच्या कारवायांना कडाडून विरोध केला. इंग्रजांच्या निर्दयतेने शेतसारा वसूल करण्याच्या पद्धतीला बिरसा मुंडा याने आदिवासींना ‘शेतीत पेरणीच करू नका’ असे सांगून अभिनव पद्धतीने विरोध नोंदवला होता.
महाराष्ट्रातही आदिवासी चळवळ पहिल्यापासूनच प्रभावी होती, याचे कारण नैसर्गिकपणे त्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनी, किल्ले आणि निसर्गसंपत्तीने संपृक्त जंगले यावर नेहमीच त्या त्या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांचा डोळा असे. जंगलातील कच्चा माल इंग्रज बाहेर नेत असत. त्यापासून स्वत:चे रक्षण करताना या सर्व जमाती लढाऊ बनल्या. त्यातही आदिवासी स्त्रियांचा लढाऊपणा काही औरच होता. अगदी इंग्रजांच्या काळातही दाशरीबेन चौधरी, झलकारी, राणी दुर्गावती, राणी गायदिजनलु, सुदेशा अशा स्त्रियांनी स्वातंत्र्यलढय़ातील आपला वाटा उचलला होता असा उल्लेख डॉ. तुकाराम रोंगटे यांच्या लिखाणात त्यांनी केला आहे.
परंतु, आदिवासी जमातींमध्ये भेडसावणारे प्रश्नही अनेक होते. जमिनींच्या ताब्याचा प्रश्न तर होताच, पण दारिद्रय़, कुपोषण, अज्ञान, अनारोग्य, बेरोजगारी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धेचा पगडा, पिळवणूक, स्त्रियांवरचे अत्याचार असेही अनेक प्रश्न त्यांचे जीवन कठीण करीत होते. या संदर्भात, महाराष्ट्रात मोठे काम उभारले ते कॉ. गोदावरी आणि शामराव परुळेकर यांनी. त्यांच्या ‘माणूस जेव्हा जागा होतो’ हे आत्मचरित्र अत्यंत स्फूर्तिदायक आहे. १९४९ मध्ये किसान सभेच्या स्थापनेपासून वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत त्या डहाणू या दुर्गम आदिवासी भागात काम करीत राहिल्या. त्यांनी वारलींच्या पिळवणुकीचा आणि वेठबिगारीचा प्रश्न हाती घेतला. त्या काळी आदिवासी स्त्रिया म्हणजे जणू जमीनदारांची खासगी मालमत्ता असे. त्यांना उपाशी ठेवणे, मारहाण करणे, नांगराला जुंपणे हे नित्याचे होते. गोदुताईंनी आदिवासींना भयमुक्त होऊन याविरोधात आवाज उठवण्यास शिकविले. आदिवासी समाज जोपर्यंत राजकीयदृष्टय़ा जागृत होत नाही तोपर्यंत क्रांती अशक्य आहे अशी त्यांची भूमिका होती.
त्याचप्रमाणे, ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांनी ठाणे जिल्हय़ात बोर्डी इथे बालशिक्षणाचा पाया घातला. १९४६ मध्ये गांधीजींशी चर्चा करून त्यांनी कामाची दिशा ठरवली. ताराबाईंचे वैशिष्टय़ असे की, त्यांनी परिस्थितीनुसार बालवाडी इत्यादी शिक्षणाचे नमुने तयार केले. आदिवासींसाठी त्यांच्या अंगणातच शाळा सुरू करून ‘अंगणवाडी’, तर गुरे चारणाऱ्या मुलांसाठी ‘कुरणशाळा’, एकाच छपराखाली पाळणाघर, बालवाडी, प्राथमिक शाळा असलेली ‘विकासवाडी’ ही संकल्पना जन्माला घातली.
आजही भारतात अनेक कार्यकर्त्यां स्त्रिया आदिवासींसाठी काम करत आहेत. मध्य प्रदेशात कत्ठीवाडी इथे साधना खोचे स्ट्रय़ुबेल शिक्षणप्रसार, व्यसनमुक्ती, ग्रामसभा घेण्यास बचतगट स्थापण्यास प्रवृत्त करणे असे काम करीत आहेत; तर राजमुंद्रीजवळ अडतीगल्ला या छोटय़ा गावात नफिसा डिसुझा आणि तिचे पती डॉमनिक यांनी तेथील कोंडा रेड्डी, कोया दोरास, कोंडा कामरास या जमातींमध्ये जमिनी हस्तांतरणाच्या, शिक्षणाच्या प्रश्नावर काम केले आहे. स्त्रियांमधून नेतृत्व पुढे यावे, स्त्रियांना किमान मजुरी मिळावी, त्यांना कौशल्याचे शिक्षण द्यावे यासाठी तिने विशेष प्रयत्न केले. याच गावात अरुणा नावाची एक आदिवासी महिला आज मनयसिमा आदिवासी सहकारी बँकेची सीईओ म्हणून आत्मविश्वासाने काम करीत आहे. तसेच, पान्तुरू सूर्यकांता आणि इतर महिलांच्या कहाण्या ‘पाऊल पुढे पडताना’ या पुस्तकात वंदना अत्रे आणि भारती ठाकूर यांनी लिहिल्या आहेत. त्याचप्रमाणे छत्तीसगड बस्तरमध्ये आपल्या जमातीला आपल्या हक्कांविषयी जागृत करणारी गोंड जमातीतील पत्रकार सोनी सोरी, जंगल, जमीन आणि आदिवासींचे हक्क यासाठी लढा देणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आंदोलक झिलाबाई वसावे या आदिवासींसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत.
नर्मदा आणि तापीच्या खोऱ्यात आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढय़ाचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्यावर एक चित्रपटही निघाला आहे. मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, विद्युत भागवत आणि विद्युलता पंडित, मंदा आमटे आणि राणी बंग या बिगरआदिवासी महिलांचे काम स्वतंत्र लेखातच बघावे लागेल इतके व्यापक आहे.
या संदर्भात ज्येष्ठ आदिवासी कार्यकर्ते आणि लेखक, कवी वाहरू सोनावणे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ‘‘आमचा असा अनुभव आहे की, कोणतीही चळवळ स्त्रियांच्या सहभागाशिवाय गतिशील होत नाही. त्या काळात, आमच्या धुळे जिल्हय़ात शहादा तालुक्यात श्रमिक संघटनेने आदिवासींच्या हस्तांतरित जमिनी परत मिळविण्यासाठी चळवळ केली, तेव्हा मोर्चे, सभा यामध्ये महिलांचा सहभाग प्रामुख्याने असायचा. १९७४ मध्ये जरी सातबारा, पीकपाणी, कायदा आदिवासींच्या बाजूने होता तरी हिंमत कोण करणार, असा प्रश्न असायचा, कारण जमिनी धनदांडग्यांच्या हातात होत्या आणि सरकारची त्यांनाच साथ होती. मग काय? एकेका गावातून शंभर-दीडशे स्त्रियांपुढे यायच्या आणि जमिनीचा ताबा घ्यायच्या. कुरुंजी, शिरखेड, भागापूर इत्यादी गावांत अशा चळवळी झाल्या.’’
‘‘श्रमिक संघटनेच्या महिला शिबिरात अंबर महाराज सांगायचे, ‘रथाची दोन्ही चाके मजबूत असतील तरच आपण उद्दिष्टांपर्यंत पोहोचू. तसेच, त्यासाठी आपण निर्दोष असले पाहिजे, दारू इत्यादी व्यसने आपण सोडली पाहिजेत.’ मग महिलांनी पुढाकार घेऊन पुरुषांची दारू सुटण्यासाठी प्रयत्न केले. व्यसनामुळे आपण भूलथापांना बळी पडलो, सर्व जमिनी गमावून बसलो असे त्या सांगत असत.’’ वाहरुजी म्हणाले.

‘‘तसेच त्या केवळ जमिनीच्या प्रश्नांवर नाही, तर जीवनाच्या विविध प्रश्नांवर काम करीत. मजुरी वाढवून मागणे, अन्याय-अत्याचाराविरोधातही त्या पुढे असत,’’ असे ते म्हणाले. १९७६ साली एका मुस्लीम महिलेवर अन्याय झाला तर महिला म्हणाल्या, ‘हा लढा आम्ही बायाच लढणार’ आणि त्यांनी तो व्यवस्थित हाताळला. हजारावर महिला जमा झाल्या. संबंधित पुरुषाला कळले तर तो घाबरून पळून गेला. महिलांना आत्मविश्वास मिळाला. वाहरुजींनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘हे समजल्यावर इतर महिला आपले प्रश्न घेऊन त्यांच्याकडे येऊ लागल्या. महिलांमधून असे नेतृत्व तयार झाले.’’
ठगीबाई, सरोसतीबाई, विमलबाई, भुरीबाई, हिकराना सोनावणे, रुक्माबाई अशा काही महिला चळवळीसाठी गाणी लिहीत, गात असत, असेही वाहरुजींनी सांगितले. आदिवासी महिलांनी साहित्य क्षेत्रातही चांगली कामगिरी केली आहे. नजुबाई गावित या कार्यकर्त्यां तसेच लेखिकापण आहेत. त्याचप्रमाणे, कुसुम आलाम, उषाकिरण आत्राम, कविता आत्राम, शांती किराडे, रंजना पावरा इत्यादी स्त्रिया लेखनामधून आपला दृष्टिकोन व्यक्त करत आहेत, असे ते म्हणाले. वाहरुजी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे सरसचिव आहेत.
आजही आदिवासींचे, आदिवासी स्त्रियांचे प्रश्न सुटलेले नाहीत. स्त्रियांवर होणारे हल्ले आणि लैंगिक हिंसेचे प्रकार वाढलेले आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत, ग्राहकनिष्ठ व्यवस्थेत स्त्रियांचे वस्तुकरण वेगाने होत आहे. त्याचा परिणाम आदिवासी स्त्रियांवरही होत आहे. पर्यावरणाचा वेगाने होणारा नाश आदिवासी भागातील जीववैविधतेचे नुकसान करतो आहे. नष्ट होत चाललेली त्यांची संस्कृती आणि त्यांच्यावर लादलेला भ्रामक विकास, तसेच, त्यांच्यावर लादले जात असलेले धर्मातर हे त्यांच्या समोरचे भीषण प्रश्न आहेत; पण आदिवासी आणि बिगरआदिवासी स्त्रिया या सर्व प्रश्नांना पूर्ण क्षमतेने तोंड देत आहेत, हे महत्त्वाचे आहे.

खरे तर, एका लेखाच्या परिघात कुठलीच चळवळ मावत नाही; पण यानिमित्ताने स्त्रियांच्या योगदानाकडे, त्यांच्या क्षमतेकडे लक्ष वेधले जाते हेच या लिखाणाचे संचित.
– अंजली कुलकर्णी

आदिवासी नायक

विरांगना झलकारीबाई जयंती दिन
     झाशीच्या पळपुट्या राणीऐवजी रणांगणात तिच्या वेशात लढलेली आदीवासी कोरी जमातीत जन्मलेली शुर मुलनिवासी महीला योद्धा…
     लोकगीतांमधे आजवर तिचा गौरवशाली इतिहास आदीवासी बंधुंनी जतन करुन ठेवला नसता तर खोट्या कपोलकल्पीत भाकड कथेला तुम्ही आम्हीही कवटाळून बसलो असतो…
     पण नियतीच्या मनात काही औरच होते…
     लक्षमीबाईला मदतीशिवाय साधे घोड्यावार देखील बसता येत नव्हते, लढणे तर दूरच. तिने किल्ल्याच्या तटावरुन खाली घोड्यावर उडी मारल्याची थाप ब्राम्हणी ईतिहासच मारु शकतो…
     पण ३ महीने इंग्रजांशी किल्ला लढवून प्राणार्पण करणा-या झलकारीबाईचा पराक्रम लिहायला मात्र त्यांच्या हातांना लकवा मारतो. त्यासाठी बहुजनांमध्येच इतिहासकार जन्माला यावा लागतो…
     हा दबलेला आदिवासी इतिहास बाहेर येवूनसुद्धा आज सर्वमान्य नाही. शूर स्त्रीला आजही झलकारीबाईची ऊपमा दिली जात नाही…
    “खुब लडी वो मर्दानी थी
      लक्ष्मी नही झलकारी थी”
     असं म्हणण्याची ही हिम्मत आमच्यात कधी येणार मित्रहो…
जयंती दिनी विरांगना झलकारी बाईंना मानाचा मुजरा…..!!!
“आदिवासींचा इतिहास जगासमोर आणण्याची जबाबदारी आदिवासींची आहे. त्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.”
  -आदिवासी आवाज
image
आद्य आदिवासी क्रांतिकारक….
शूरवीर भागोजी नाईक…..
नाशिक व नगर जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या वतीने राघोजी भांगरे यांनी ब्रिटिशांविरुद्ध पहिला उठाव केला. शेतकर्यांकडून इंग्रज त्याकाळी शेतसारा वसूल करीत असत. त्यामुळे आदिवासी बांधव सरकारविरुद्ध नेहमी बंड करीत. याच काळात इंग्रजांनी आदिवासी समाजाचील युवकांची पोलीस दलात भरती सुरु केली. सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे भागोजी नाईकही पोलीस दलात भरती झाला.
१८५७ च्या काळात भारतभर इंग्रजांविरुद्ध उठाव झाले. भागोजी पोलीस दलात असल्याने आपल्याच बांधवांच्या विरुद्ध लढा द्यायचा, याबद्दल त्याला खेद वाटत होता. याच काळात अकोले, संगमनेर, सिनार, कोपरगाव, निफाड, पेठ या भागातील महादेव कोळी व भिल्ल बंडखोरांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. भागोजींनीही याचवेळी बंडाचा पवित्रा घेऊन नांदूरशिंगोटे-चास दरम्यान असलेल्या खिंडीत पन्नास जणांची तुकडी तैनात करुन त्यांना मार्गदर्शन केले.
भागोजींनी ब्रिटीशांना ’सळो की पळो’ करुन सोडले. चास खिंडीत जेम्स हेन्री याच्या नेतृत्वाखालील सैन्यात व भागोजी नाईक यांच्यात जोरदार लढाई झाली. या लढाईत ४ Oct १८५१ रोजी ब्रिटीश अधिकारी हेन्री मारला गेला. त्यानंतर इंग्रज सरकार भागोजी नाईकच्या मागावर होते.
सिन्नर तालुक्यातील सांगवी, मिठसागरे, पंचाळे या भागात इंग्रजांविरुद्ध भागोजीची शेवटची लढाई झाली. ११ Nov १८५१ रोजी झालेल्या लढाईत फितुरीमुळे भागोजीला वीरमरण आले. तसेच त्यांच्याबरोबर असलेले ५० पैकी ४८ क्रांतिकारक मारले गेले. भागोजी व त्यांचे क्रांतिकारक सहकारी त्याकाळी शरण न जाता सारखे लढत राहिले. नांदूरशिंगोटे येथे सुरु झालेले क्रांतियुद्ध सांगवी येथे संपले.
राम कोणाचा.....? रावण कोणाचा....?

रामायण खरं कि खोटं या विवादात पडण्यापेक्षा रामायण हे महाकाव्य नक्कीच आहे.कवीची उत्तुंग कल्पना म्हणून दाद द्यावीच लागेल.पण एक मात्र सत्य हे आहे की साहित्यातल्या कुठल्याही प्रकारात समकालीन व भूतकालीन मानवी जीवनाचे संदर्भ मात्र नक्कीच जडलेले असतात.या  गृहितावर रामायणाचा अभ्यास केल्यास राम कोणाचा व रावण कोणाचा ह्या प्रश्नाचे उत्तर कळते.

राम हा आर्यांचा (आताचे ब्राह्मण यांचा)सेनापती होता तर रावण हा दक्षिण प्रदेशातील मूलनिवासी आदिवासींचा राजा होता.
मग झालं काय ? रामाला देव म्हणून आदराने पुजले जाते तर  रावणाला राक्षस म्हणून का हिनवले जाते?
यामागे ब्राह्मणांनी नियोजनपूर्वक रावणाला बदनाम करून रामाचे महत्त्व वाढविण्यासाठी खेळलेली ती एक चाल आहे.हे शिकलेल्या स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या आदिवासींच्याही पटकन लक्षात येत नाही.ते स्वतः काहीच वाचत नाहीत.वाचलं तरी समजून घेत नाहीत.जुने विचार त्यांच्या डोक्यातून जात नाहीत.त्यांच्या मेंदूवर ब्राह्मणांनी पूर्ण त्यांच्या पोथ्या ,पुराणे व धार्मिक ग्रंथांतून कब्जा केलेला असल्यामुळे त्यांना सत्य काय अन असत्य काय या भानगडीत पडायचेच नाही.फक्त चालत आलेल्या परंपरा डोळे झाकून श्रद्धेने पाळणे एवढेच आपले काम अशी स्वतःची धारणा त्यांनी करून घेतलेली दिसते.

त्यामुळे रावणाविषयी ,त्याच्या चांगुलपणाविषयी कितीही सांगितले तरी ते मानणार नाहीत.त्यांच्या डोक्यात एकच राम हा देव होता आणि रावण हा राक्षसांचा राजा होता.त्याने रामाची सीता पळवली.त्याचा बदला घेण्यासाठी रामाने रावणाशी युद्ध केले.या पलीकडे जाऊन ते कधीच काही समजून घेणार नाहीत.स्वतः विचारही करणार नाहीत.म्हणून अशा माणसांचा नाद सोडून देऊन खऱ्या आदिवासींच्या अस्तित्वासाठी कार्य करत राहणे हे आदिवासी संघटनांचे उद्दिष्ट हवे.

आदिवासींनी रावणाचे दहन करू नये किंवा दहन करणाऱ्यांच्या कार्यक्रमात जाऊ नये.

रावण हा आदिवासींचा शूर ,वीर,हुशार व कल्याणकारी राजा होता.त्याने देवांशी दुष्मनी केली असे म्हटले जाते.याचा अर्थ त्याने आर्य ब्राह्मणांशी दुष्मनी केली होती.आर्य  साम,दाम,दंड,भेद,नीती या त्यांच्या तत्वाने त्यांचे साम्राज्य वाढवत होते.तर आदिवासी राजे आर्यांच्या आक्रमणापासून आदिवासींचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करत.काही आदिवासी राजे आर्यांवर प्रति आक्रमण करत.रावणानेही तेच केले.त्याने आदिवासींचे रक्षण केले म्हणून त्याला राक्षस म्हटले गेले.बऱ्याच आदिवासी राजांना अशाच प्रकारे राक्षस कल्पिले गेले.राक्षस हे दुष्ट ,अक्राळविक्राळ वगैरे दाखविले गेले.हे फक्त आर्यांच्या फायद्यासाठी.आर्यांनी त्यांचा इतिहास लिहिला.त्यात त्यांनी   त्यांच्या फायद्याच्या गोष्टी लिहिल्या.

रावणाला अतिशय विकृत स्वरूपात त्यांनी दाखविले.खरं म्हणजे रावणाला दहा तोंडे नव्हती.आदिवासी गोंडी भाषेत रावण म्हणजे राजा.आदिवासींत असे पराक्रमी दहा रावण म्हणजे आदिवासींचे राजे होऊन गेले.ज्यांना आर्यांनी चातुर्याने संपविले.म्हणून आर्य ब्राह्मण लोक दहा तोंडी रावणाचा पुतळा जाळतात तर आदिवासी लोक या दहा रावणांचं प्रतीक म्हणून रावणाची ताटी आपल्या भोवड्यांमध्ये नाचवतात.भोवाड्यांमध्ये सगळ्यात आकर्षण व मान हा रावणाच्या ताटीला असतो.

जो लंकापती रावण आहे.ज्याच्यावर आधारित रामायण लिहिले गेले आहे.तो  रावण दुष्ट नव्हता.वाईट नव्हता हे मूळ वाल्मिकीच्या रामायणात होते.परंतु तुलसीदासने लिहिलेल्या रामायणात बरेच नवीन प्रसंग घुसडून रावणाला बदनाम केले आहे.सगळ्या tv मालिका या तुलसीदासने लिहिलेल्या रामायणावर आधारित आहेत.
वाल्मिकी रामायणाच्या सुंदरकांड मध्ये दहावा श्लोक मध्ये रावणाला दहा तोंडे वगैरे काही नव्हती हे स्पष्ट होते.त्या श्लोकात रावण हा रूपवान,रुबाबदार व्यक्तिमत्वाचा होता.असे सांगितले आहे.तसेच 9वे सर्ग श्लोक 68 व 69 मध्यें लिहिले आहे की रावणाच्या राण्यांमध्ये राजर्षी आणि ब्रह्मर्षींची कन्यासुद्धा रावणावर मोहित होऊन रावणाच्या पत्नी झाल्या होत्या.श्लोक 70 मध्ये असे लिहलेले आहे की अशी कोणतीच स्त्री नव्हती की जी रावणाने जबरदस्तीने पळवून आणली होती.

मग खरंच रावणाने सीता पळवली का? रावणाची बहीण जिला सूर्पनखा म्हटले गेले.ती सूर्पनखा नसून सुरूपशिखा होती.तिचे एक नाव सुवर्णरेखा असेही होते.ती रावणासारखीच रुबाबदार व सुंदर होती.लंका हे बेट तेंव्हा भारतीय उपखं डाला प्रवाळ कीटक जे मृत झाल्याने पाण्यावर तरंगतात.कालांतराने त्यांच्या अवशेषांचे खडकात रूपांतर होते.अशा प्रवाळ कीटकांच्या अवशेषांच्या खडकाने जोडलेले होते.आता ते खडक पाण्याखाली आहेत.या खडकांवरून येण्याची तेंव्हा सोय होती.
कोणीतरी वनवासी राम, लक्ष्मण, सीता हे दंडवनात आलेले आहेत असं कळल्यानंतर ही सुरूपशिखा जेंव्हा आली.तेव्हा लक्ष्मण तिच्यावर भाळला व लग्नाची बोलणी करू लागला.तेंव्हा तिने माझ्या भावाला रावणाला विचारून सांगते असे म्हटल्यानंतर लक्ष्मणाला राग आला.रामाने मग सांगितले की ही तुझ्याशी लग्न करत नसेल तर हिचे नाक ,कान कापून टाक.विद्रुप कर.स्वतःला काय समजते.हाच प्रकार उलटा करून सांगितलाय.तिने काय लक्ष्मणावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला काय? म्हणून त्याने तिचे नाक कां कापले?
आजपर्यंत असा इतिहास आहे का, कि एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषावर बलात्कार केला आहे?

सीता पळवणे हे नाटक होते.राम व लक्ष्मणाला सुरूपशीखेची विटंबना करतांना सीतेने पहिले होते.बहिणीच्या विटंबना का केली ह्याचा जाब विचारण्यासाठी   जेंव्हा रावण आला तेंव्हा राम, लक्ष्मण वनात निघून गेले.मग रावण सीतेला म्हणाला मी तुला काहीच करणार नाही.माझ्या बहिणीचा बदला मी तुला विद्रुप करून नाही घेऊ शकत.मला रॅम लक्ष्मण कोण आहेत त्यांना जाब विचारायचा आहे.तू माझ्याबरोबर चल म्हणजे ते तुला शोधत तिकडे येतील.मग मी त्यांना बघेन.
सीताही तयार झाली.स्वखुशीने रावणाबरोबर गेली.कारण तिने त्याच्या बहिणीवरचा अत्याचार बघितला होता.एका स्त्रीत्वाचा अपमान केला होता.

खरं तर रामाचा वनवास हे एक नाटक होतं.रावणाचे राज्य संपवून त्यांना ब्राह्मण धर्म पूर्ण देशात वाढवायचा होता.हे आयतेच कारण त्यांना सापडले.त्यासाठी बारा तेरा वर्ष ते तेथे येऊन राहिले होते.नळ,नीळ, जांभवंत, सुग्रीव, मारुती,बली यांच्याशी दोस्ती करण्याचा प्रयत्न केला.यात सगळे फसले पण बली मात्र फसला नाही.त्याने रामाचा कावा जाणला होता.म्हणून त्याला रामाने झाडाआड लपून बाण मारून मारले.हे सगळे कारस्थान लपून राहावे व रामाचे देवपण लोकांच्या मनात कायम राहावे म्हणून बलीने सुग्रीवची बायको पळवली व राज्य बळकावले असा बनाव केला.तसेच रामाला मदत करणारी सगळी आदिवासी माणसेच होती.ती माकडे नव्हती.पण हे झाकून राहावे म्हणून त्यांना माकडे कल्पिले गेले.रावणाच्या भावालाही आपल्या बाजूला वळवून रावणाला संपविले गेले.रावण आदिवासी धर्मासाठी शहीद झाले.रावणानंतर आदिवासी धर्माचे रक्षण करणारा कोणताच प्रतापी पुरुष उरला नाही.आदिवासींना वाली नसल्याने ते सैर भैर झाले.दऱ्या खोऱ्यात जाऊन राहिले.काही स्वाभिमानी आदिवासींनी आपली संस्कृती मात्र तरीही टिकवून ठेवली.म्हणून आजही रावणाचा पुतळा न जाळता सन्मानाने रावणाची ताटी नाचवली जाते.
जे आदिवासी रावणाचा पुतळा जाळतील ते गद्दार आदिवासी,भटाळलेले आदिवासी म्हणून ओळखले जातील.असे खरे व स्वाभिमानी आदिवासी प्रतिपादन करत आहेत.

जय आदिवासी।    हर हर महादेव।   जय रावण।  
जय भगवान एकलव्या।    जय राघोजी।   जय बिरसा।
 https://marathi.pratilipi.com/story/o1lpa28vx5hf?utm_campaign=Shared&utm_source=whatsapp
बिरसा मुंडा
 बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतीकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. 19 व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींव्दारा इंग्रज सरकार विरूध्द जनआंदोलने केली त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढयात हया आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसामुंडा यांनाच जाते.
आदिवासी जननायक बिरसामुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले गेले आहे. ते एकटेच क्रांतीकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे.
Birsa Munda

आदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा – Birsa Munda History In Marathi

बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्हयातील उलीहातू या गावी झाला. त्यांच्या पालकांचे ते प्रथम अपत्य होते त्यामुळे मुंडा जमातीच्या परंपरेनुसार त्यांचे नामकरण झाले. त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात व्यतीत झाले. त्यांचे वडील जनावरे चारण्याचे काम करायचे ते ही वडीलांसोबत रानात जावून धर्नुविद्या व नेमबाजीचा सराव करायचे.
बालपणीच त्यांचा नेम फार चांगला होता. त्यांचा लगाव ख्रिश्चन मिशनरीशींही होता. त्यांची प्रतिभा पाहुन एका पारधी नेत्यांनी शाळेत टाकण्याचा सल्ला दिला.
परंतू त्यासाठी ख्रिश्चन धर्म स्विकारावा लागणार होता त्यांच्या वडीलांनी त्यांचे धर्मांतरण करून त्याचे नाव डेविड केले त्याचा दाखला जर्मन मिशन स्कुल येथे झाला परंतू तेथे धार्मीक सक्तीमुळे त्यांनी शाळा सोडली व ते प्रसिध्द वैष्णव भक्त आनंदानंद पांडे यांच्या संपर्कात आले.
वाचन व लेखन येत असल्याने त्यांनी महाभारत रामायण व गिता असे अनेक हिन्दू धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. त्यांच्या सोबत राहून इंग्रजांच्या काळया धोरणाचा त्यांना फार तिरस्कार यायचा.
बिरसा मुंडा 1900 मध्ये इंग्रजांविरूध्द विद्रोह करण्याची घोषणा केली व म्हंटले ‘‘ आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वांविरूध्द विद्रोहाची घोषणा करतो. आम्ही कधीच ब्रिटिशांच्या कायदयांना मानणार नाही. आम्ही इंग्रजांचे अधिपत्य स्विकारत नाही. जो ही इंग्रज आमच्या विरूध्द उभा राहील त्यास आम्ही यमसदनी पाठवू. यामुळे संतप्त ब्रिटीश सरकारने आपली सेना पाठवून बिरसा मुंडा यास पकडण्यासाठी पाठविला, बिरसा मुंडास पकडून देणा-यास 500 रूपये बक्षिस जाहीर केले.
बिरसा मुंडा यांनी विविध जमातीच्या गटांना एकत्र आणले त्यांना इंग्रजांविरूध्द लढण्यास प्रेरित केले. इंग्रज सरकारने विद्रोहीचे दमन करण्यासाठी 3 फेब्रुवारी 1900 ला हल्ला करून विद्रोहीचे ठिकाणे उध्वस्त केले व बिरसामुंडा यास अटक केली. त्यांच्या सोबत 460 आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आली.
9 जुन 1900 रोजी रहस्यमयरित्या त्यांचा मृत्यु झाला होता. काहींच्या मते इंग्रजांनी त्यांना फासावर चढवले तसेच इंग्रजांनी त्यांच्या मृत्युचे कारण प्लेग सांगीतले.
3 फेब्रुवारी 1900 रोजी त्यांना इंग्रजांनी अटक केली होती. 15 नोव्हेंबरला बिरसा मुंडाची जयंती साजरी केली जाते. सध्याचे झारखंड राज्यात रांची येथे त्यांचे स्मारक बांधण्यात आले आहे. तेथे दरवर्षी जयंती निमित्त कार्यक्रम होतात.

स्त्रीवाद- चर्चा - प्रवीण बांदेकर- मटा

       महाराष्ट्रातील स्त्री प्रश्नांसह विविध सामाजिक प्रश्नांसाठी आणि स्त्रीला आत्मसन्मान प्राप्त करून देण्यासाठी आपले अवघे आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या आजवरच्या कार्याविषयीची कृतज्ञता ‘निरामय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’च्या विश्वस्त गीताली वि. म. आणि विद्याताईंच्या महाराष्ट्रभर पसरलेल्या सहकाऱ्यांनी एका अभिनव पद्धतीने व्यक्त केली आहे. विद्याताई संपादित करीत असलेल्या ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. हे निमित्त साधून विद्याताई आयुष्यभर ज्या स्त्रीवादी विचारांची गांभीर्याने मांडणी करीत आहेत, त्याच विचारविश्वाची सांगोपांग चर्चा करणारा ‘संदर्भासहित स्त्रीवाद : स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व’ हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. सुमारे ५८० पृष्ठांच्या या बृहद् ग्रंथात जवळपास बावन्न अभ्यासकांनी लिहिलेले स्त्रीवादाशी निगडित विविध विषयांची मांडणी करणारे लेख समाविष्ट करण्यात आलेत.

आपल्याकडे आधुनिक दृष्टीने स्त्रीकडे पाहण्याची सुरुवात पाश्चात्य स्त्रीवादी विचारांमुळेच झाली असे दिसते. स्त्री ही स्त्री म्हणून जन्माला येत नाही तर व्यवस्थेकडून तिला स्त्री बनवले जाते, असे प्रतिपादन करणाऱ्या स्त्रीवादी विचारवंत सिमॉन द बोवा यांच्या स्त्रीच्या विचार व भावविश्वाची पूर्णतः स्वतंत्र व आधुनिक दृष्टीने मांडणी करू पाहणाऱ्या काही संकल्पनांमुळे पाश्चात्य जगतातील स्त्रीला स्वतःकडे नव्याने पाहायला प्रवृत्त केलेले जाणवते. १९७५ मध्ये युनोने जाहीर केलेले आंतरराष्ट्रीय महिला वर्ष व नंतरची स्त्रीदशकाची घोषणा यांमुळे स्त्रीवाद या संकल्पनेची जगभरात चर्चा होऊ लागली. भारतीय संस्कृती आणि समाजव्यवस्थेच्या संदर्भात विचार करताना मात्र आपल्याकडे अशा काही स्त्रीवादी दृष्टिकोनातून स्त्रीच्या अस्तित्त्वाचा, तिच्या प्रश्नांचा विचार करता येऊ शकतो, याची विशेष जाणीव असल्याचे दिसत नाही. अगदी महाराष्ट्राच्याच बाबतीत पाहू गेले तरी, ताराबाई शिंदे यांच्यासारख्या सामाजिक प्रश्नांकडे गंभीरपणे पाहणाऱ्या एखाद्या स्त्रीने लिहिलेल्या स्त्रीपुरुष तुलना यांसारख्या दीर्घ निबंधाचा वा पंडिता रमाबाईंसारख्या विदूषीने लिहिलेल्या स्त्रीधर्मनीतीचा अपवाद वगळता ग्रंथरूपातही स्त्रीवादी जीवनदृष्टी मांडण्याचा प्रयत्न कुणी केल्याचे आढळत नाही. मात्र स्त्री-प्रश्नांचे, स्त्रीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे वा स्त्रीपुरुष समानतेचे वगैरे कसलेही प्रागतिक भान आपल्याकडे आढळत नाही, असे म्हणता येत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच लोकहितवादी, म. जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, महादेव गोविंद रानडे, रमाबाई रानडे, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे, र. धों. कर्वे अशा कृतिप्रवण विचारवंतांनी स्त्रीप्रश्नांकडे आधुनिक विचारांनी पाहण्याची भूमिका आग्रहाने लावून धरलेली दिसून येईल. रुढीपरंपरांच्या जोखडातून स्त्रीला मुक्त करणे, स्त्रीसुधारणांसाठी शिक्षण व कौटुंबिक हक्कांचा आग्रह धरणे, नोकरी व राजकारणात स्त्रीचा सहभाग वाढवणे, स्त्री-पुरुषांमध्ये प्रगल्भ साहचर्य असणे अशा स्वरूपाची मागणी व मांडणी पुढील काही दशकांत स्त्रीसंदर्भातील विचारांमध्ये केंद्रवर्ती राहिली. या अनुषंगाने ‘संदर्भासहित स्त्रीवाद : स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व’ या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेमध्ये वंदना भागवत यांनी भारतीय परिप्रेक्ष्यातून आपल्याकडे रुजलेल्या स्त्रीवादाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. यशवंत सुमंत, गोपाळ गुरू, विद्युत भागवत, राजा दीक्षित, जास्वंदी वांबुरकर यांनीही त्यांच्या लेखांतून आवश्यकतेनुसार कमीअधिक प्रमाणात हा धांडोळा घेतला आहे. विशेषतः आधुनिक भारताच्या राजकीय तत्त्वचिंतनातील स्त्रीप्रश्नाची जाण हा यशवंत सुमंत यांचा दीर्घ लेख या संदर्भात महत्त्वाचा आहे. इंग्रजांच्या राजवटीत भारतात सुरू झालेली वासाहतिक आधुनिकीकरणाची प्रक्रिया, पश्चिमी संस्कृतीशी वाढत गेलेला संवाद, तत्कालीन स्त्रीप्रश्नांच्या संदर्भात सुधारणावादाचे चर्चाविश्व, १९व्या शतकातील धर्म आणि समाजसुधारणा चळवळींचा स्त्रीप्रश्नांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर झालेला परिणाम, फुले-आगरकरांसारख्या विचारवंतांचा समाजमानसावरील प्रभाव, स्त्रीसंघटनांचा उदय, स्त्रीहक्कांच्या चळवळी, अशा विस्तृत मुद्द्यांच्या अनुषंगाने डॉ. सुमंत यांनी चर्चा केली आहे. 
साधारणतः विसाव्या शतकातील ७०-८०व्या दशकापासून आपल्याकडे स्त्रीप्रश्नांकडे पाहताना लिंग, वर्ग, जात, विविधांगी शोषण, सामाजिक व नैतिक बंधने या सगळ्याच्या अनुषंगाने विचार सुरू झालेला दिसतो. स्त्रीसमस्यांची चर्चा करणाऱ्या चळवळी, स्त्रीकेंद्री संस्था, साहित्य, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण व स्त्रीसुधारणाविषयक काही नवे कायदे इत्यादींमुळे आधुनिक स्त्रीलाही आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचे भान येऊ लागले होते. विद्या बाळ यांच्यासारख्या कार्यकर्त्या, स्त्री, मिळून साऱ्याजणी, बायजा, स्त्री उवाच यांसारखी स्त्रीप्रश्नांची चर्चा करणारी नियतकालिके आणि गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे, कविता महाजन, प्रज्ञा दया पवार, नीरजा यांच्यासारख्या लेखिका यांमुळे स्त्रीविश्व आणि एकूणच संस्कृती यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल होऊ लागलेले जाणवतात. स्त्रीकडे नव्या दृष्टीने पाहण्यासाठी प्रवृत्त करणारे हे सर्व कार्यकर्ते सिमॉन बोव्हा, बेटी फ्रिडन अशा पाश्चात्य स्त्रीवादी विचारवंत लेखिकांच्या सम्यक विचारांमुळे प्रभावित झालेले आहेत, हेही जाणवून येते. आधुनिक काळात विविध सामाजिक व राजकीय विचारधारांमध्येही स्त्रीवादी विचारांचा प्रभाव कसा दिसून येतो, याविषयी सविस्तर विवेचन करणारे लेखही या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. ‘दलित स्त्रीवाद आणि स्त्रीवादी दलितत्व’ या लेखात प्रवीण चव्हाण यांनी भारतीय समाजव्यवस्थेचा अपरिहार्य भाग बनलेल्या जातिव्यवस्थेच्या संदर्भात स्त्रीवादाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. दलित स्त्रीवाद ही दलितत्वाची वर्ग जाणीव आणि स्त्रीवादी जाणीव यांच्या एकात्मीकरणातून निर्माण झालेली एकसंध अशा स्वरुपाची जाणीव आहे आणि लिंगभाव जडणघडणीच्या गाभ्याशी असणारी जातजाणीव ही दलित स्त्रीवादाच्या केंद्रस्थानी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. मात्र दलित स्त्रीवादाने जाहीरपणे सैद्धांतिक पातळीवर आणि व्यावहारिक पातळीवर स्त्रीवादी दलितपणाला नाकारले पाहिजे, तसेच पितृसत्ताक व ब्राह्मणी असंवेदनशीलतेबद्दल प्रतिक्रिया नोंदवली पाहिजे, असेही त्यांना वाटते. छाया दातार यांनीही त्यांच्या लेखात स्त्रीमुक्ती चळवळीच्या विविध संकल्पनांचा ऊहापोह करीत मार्क्सवादी स्त्रीवाद, जहाल स्त्रीवाद, दलित स्त्रीवाद, उदारमतवादी स्त्रीवाद, पर्यावरणवादी स्त्रीवाद अशा अंगांची चर्चा केली आहे.

स्त्रीवादाचे यथामूल स्वरूप समजावून घेण्याच्या दृष्टीने या ग्रंथातील जवळ जवळ सर्वच लेख अत्यंत उपयुक्त असे आहेत. लैंगिकतेच्या वा लिंगभानाच्या दृष्टिकोनातून स्त्रीचळवळीतील लैंगिकतेच्या राजकारणाचे बहुसुरी कथन (अनघा तांबे), विज्ञान, लिंगभाव आणि शरीर (चयनिका शहा), स्त्रियांची समलैंगिकता आणि धर्म-पितृसत्तेचे राजकारण (आनंद पवार), लिंगभाव व मानसशास्त्र (साधना नातू) यांसारखे लेख महत्त्वाचे आहेत. तर जात, धर्म, परंपरा, नैतिक बंधने, हिंसा, शोषण, पुरुषी मानसिकता यासंदर्भात स्त्रीवादाची गरज अधोरेखित करणारे हिंसा-अहिंसाः एक तात्त्विक ऊहापोह (दीप्ती गंगावणे), हिंसा आणि स्त्रीजीवन (कल्पना कन्नबिरन), हिंदु धर्म आणि स्त्री (सदानंद मोरे), बहुजन स्त्रीची लैंगिकता आणि जात (संध्या नरे-पवार) हे लेख उल्लेखनीय आहेत. हिंदू धर्माप्रमाणेच जैन, बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम, शीख या धर्मातील स्त्रीप्रश्नांच्या अनुषंगानेही लिहिलेले चिकित्सक लेख यात समाविष्ट आहेत.

आधुनिक मराठी साहित्यामध्ये ऐंशी-नव्वदच्या दशकातील स्त्रियांच्या लेखनामध्ये स्त्रीवादी जाणिवा केंद्रस्थानी आलेल्या दिसतात. विविध सांस्कृतिक व वर्गीय स्तरातील स्त्रियांना आपले अनुभवविश्व लेखनाच्या माध्यमातून व्यक्त करावसे वाटू लागण्यालाही सामाजिक संदर्भात एक प्रतीकात्मक अर्थ आहे. या लेखिकांच्या लेखनामागील प्रेरणा, त्यांतून व्यक्त होणाऱ्या जाणिवा, स्त्रियांचा आत्मशोध, अन्य सांस्कृतिक घटक व त्यांना उपलब्ध असलेले सामाजिक पर्यावरण यांचा, स्त्रियांच्या कथा (बंदना बोकील-कुलकर्णी), कविता (नीलिमा गुंडी), कादंबऱ्या (रेखा इनामदार-साने) व नाटकांच्या (मकरंद साठे) अनुषंगाने धांडोळा घेणारा स्वतंत्र विभाग या ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे. या अंतर्गत प्रज्ञा दया पवार यांचा ‘जात, वर्ग, लिंगभाव आणि दलित साहित्यासमोरील आव्हाने’ हा लेख विशेष महत्त्वाचा आहे.

संदर्भासहित स्त्रीवाद
संपादक : वंदना भागवत, कुमार अनिल, गीताली वि. म.
प्रकाशक : शब्द पब्लिकेशन, मुंबई
पृष्ठे : ५७९, किंमत : ७०० रु.

दलित पँथर ?

पँथर " दलित पँथर म्हणजे काय होते नक्की ? १९७२ नंतरच्या काळात पँथर या नावाचा दरारा का होता ?






 पँथर " दलित पँथर म्हणजे काय होते नक्की ?
१९७२ नंतरच्या काळात पँथर या नावाचा दरारा का होता ?

           पुर्वीचे दलित आताचे अनुसुचित जाती-जमाती यांच्यावर बऱ्याच वर्षानुवर्ष अन्याय अत्याचार होत आला व आताही होत आहे. जातीव्यवस्था -वर्णव्यवस्थामुळे अनुसुचित जाती-जमातीचे नुकसान हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू  महाराज, डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनाजाव्यवस्था -वर्णव्यवस्था
त्रास सहन करावा लागला. व या प्रतेक महापुरुषांनी हि ह्या जातीव्यवस्थेला व वर्णव्यवस्थेचा  विरोध केला. ह्या जाती व्यवस्थेमुळे छत्रपती शिवाजी महाराज्यांचा राज्याभिषेक थांबवला होता.महाराष्ट्रातील कोणताहि भट ह्या राज्याभिषेकाला तयार नव्हता, ह्याच वर्णव्यवस्थेमुळे महात्मा फुलेना व माई सावित्रीबाई फुले यांना शिक्षन देन्यासाठी जात असताना शेनाचे गोळे मारले गेले, छत्रपती शाहु महाराज यांच्या बाबतीत हि काहि वेगळे नव्हते. 
डाँ.बाबासाहेब आंबेडकरांना हि शिक्षनासाठी वर्गाच्या बाहेर बसाव लागल, ह्या अत्याचाराला कंटाळुन अनेकांनी हि व्यवस्था संपवन्याचा पर्यंन्त केला. पण जेवढा हा प्रयंत्न झाला त्या काळात थोड्या काळा पुरता अन्याय कमीहि झाला. पण संपलेला नाहि आजहि बऱ्याच जिल्ह्यात ह्या गोष्टी घडतात.
१९७२ मध्ये काहि चळवळीतील कार्यकर्त्यानी बंड केला व तेव्हा खरा पँथर जन्माला आला. पँथर म्हणजे कोन्ही व्यक्ती नसुन एक संघटना होती तीचा कार्यकाळ अंदाजे १८ महिने  ईतकाच होता पण त्या संघटनेने केलेले कार्य हे त्या काळातील सर्वाच्य कार्य होते व यांची दखल तात्कालीन प्रधानमंत्री असलेल्या दिवंगत इंदिरा गाधी याना घ्यावी लागली होती. दलित पँथर म्हटले कि काहि नेत्या मंडळीच्या बुडाला घाम येत होता. प्रतेक पँथर म्हणजेच एक धगधगता ज्वालामुखी होता. 

         " दलित पँथर" ''लोकशाही मध्यवर्तित्व' हे संघटनेचे प्रमुख तत्त्व उराशी बाळगून जात, धर्म, वर्ण-विरहित, शोषणमुक्त, सुखी, समृद्ध, सुसंस्कृत, असे पायाभूत उद्दिष्ट समोर ठेवून मार्गक्रमण करीत होती. प्रामुख्याने मागास, कष्टकरी, कामगार, भूमिहीन, शेतमजूर, गरीब शेतकरी, भटक्या जाति-जमाती, आदिवासी या घटकांना घेऊन सामाजिक लढा उभारण्यात अग्रणी असणारी संघटना म्हणून समाजात दलित पँथर ओळखली जात होती.

          सन. १९७० च्या आसपास मागासवर्गीय जातींवरील अत्याचारांनी कळस गाठला. पेरुमल समितीने त्याचा स्पष्ट निर्देश केला. हे प्रकरण (मागासवर्गीय जातींवरील अत्याचार) इतके गंभीर बनले की २४ मे १९७२ ला खा.मधु लिमयेंनी लोकसभेत त्याविरूद्ध आवाज उठविला. व चळवळीतील काहि जहाल कार्यकर्त्यानी बंडाचे शस्त्र उभारले. व तेथेच २९ मे १९७२ रोजी काहि कार्यकर्त्यानी एकत्र येउन " दलित पँथर " नामक संघटना उभारली व त्याची पहिली सभा ९ जुलै १९७२ सिध्दार्थ नगर मुंबई येथे करन्यात आली. 
          सन १९६६ मधील अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकाचा प्रेरनास्त्रोत असलेली Black Panther या संघटनेचा फार मोठा प्रभाव दलित पँथर ह्या संघटनेवर होता. व सन.१९७२ मधील काँग्रेस सरकार त्या वेळी जातीय अत्याचार थांबवन्यास असंमर्थ ठरली होती.म्हणुन ९ जुलै च्या सभेत सर्वच दलित समाज्याच्या तंरुनांनी एका झेंड्या खाली एकत्र यावे  "माणूस म्हणून जगणे हा आमचा हक्क आहे आणि म्हणून आम्ही चित्याचा पवित्रा घेऊन त्या हक्कांसाठी लढू" असे आव्हान केले गेले. 

 त्यामधे नामदेव लक्ष्मन ढसाळ ,राजा पिराजी ढाले, जयराम विठ्ठल पवार, भाई संगारे असे नावे पुढे आले पण याचा पुढिल प्रवास अल्पकाळ पण लक्षवेधी होता. त्यांनी या काळात अनेक प्रश्न हाताळले जसे 

१) दलितावरील अत्याचाराच्या विरोधात आंदोलने केले.
२) झोपडपट्टयांचा विस्तार व विकास घडवून आणला. व  झोपडपट्टयांमधील रहिवाशांचे प्रश्न सोडविले.
३) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांवर लढे उभारुन मोठे लढे दिले.
४) मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलने केले.
५) दलितांच्या राखीव जागांच्या प्रश्नावर आंदोलन केले.
६) नवबौद्धांना सवलतीची मागणी केली.
७) बेरोजगारी दूर करण्यासाठी आंदोलने केली.

त्यांची गाजलेली व जश्यास तेसे दिलेले उत्तर म्हणुन काहि आंदोलने.

१) वरळी दंगलीत जशास तशे उत्तर
२) इंदापूरच्या बावड्यातील दलित बहिष्कार विरोधी आंदोलन
अत्याचार निषेधार्थ केलेले गीतादहन आंदोलन
३) इ.स. १९७३ कोल्हापूरला शंकराचार्य मिरवणूकीवर चप्पलफेक आंदोलन
४) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कँपीटेशन फि विरोधी आंदोलन.
५) चौधरी चरणसिंग यांच्या विरोधात संघर्ष व आंदोलन.

       असे बरेच आंदोलन त्या वेळस केले गेले. त्यामुळे विद्यर्थी वर्ग, बेरोजगार,वर्ग, व शिक्षीत वर्ग हा दलित पँथर मध्ये फार मोठ्या प्रमानात सामील झाला. यामुळे अनेक आंदोलने ,मोर्चे मोठ्या संख्येने यशस्वी झाले .
पण दादर भोईवाडा येथील मोर्चाच्या वेळी बाजुच्या ईमारती हुन फेकुन मारलेल्या दगडी पाटा मुळे भागवत जाधवांचा जागीच मृत्यु झाला. त्याच वेळी नेमल्या गेलेल्या वरळी दंगली भस्मे आयोगाने पँथरच्या सर्व शिफारशी मान्य केल्या व काहि काळात दलित पँथर या संघटनेचा दरारा वाढला .
पुढे दलित पँथर हि संघटना गुजरात,पंजाब, दिल्ली,व परदेशात लंडन येथ पर्यंत पोहचली व येथे दलित पँथरच्या शाखा उघडल्या गेल्या.
पँथर हि संघटना प्रतेक अन्याय ग्रस्थाला आपलीशी वाटुलागली. प्रतेक तंरुन पँथरच्या दिशेने वाटचाल करु लागला. व त्यातच एक महत्वाची नवी गोष्ट घडली जी म्हणजे डाँ. बाबासाहेब आंबेडकराचे अप्रकाशीत साहित्या प्रकाशीत करन्यासाठी तातकालीन सरकारला भाग पाडले.पँथरच्या दबावामुळे डाँ. बाबासाहेब आंबेडकराचे २४ खंड, मुखनायक,बहिष्कृत भारत हे साहित्य प्रकाशीत करन्यात आले. 
 मग जर २१ व्या शतकात जर पुन्हा पँथर उभी होत आहे मग रोष का ?

" आजहि बऱ्याचश्या संघटना मागासवर्गीय समाज्यावर (दलितांवर ) होनाऱ्या अन्याया विरुध्द लढतात मग हा लढा तर पँथरचाच ना ? 

 " काहि संघटना विद्यार्थाच्या प्रश्नावर लढतात तर ह्या आगोदर हा लढा पँथरने दिलेला आहे ना मग विरोध का ?

" काहि संघटना नवबुध्दाच्या सवलती साठी लढा देत आहे माझ्या मतो ह्या आगोदर हा लढा पँथरने दिलेला आहे ना मग विरोध का ?

" बेरोजगारी कमी करन्यासाठी आजहि काहि संघटना लढतात मग तर ह्या आगोदर हा लढा पँथरने दिलेला आहे ना मग विरोध का ?

" आज बऱ्याच संघटना मुलभुत गरजासाठी लढतात मग तर ह्या आगोदर हा लढा पँथरने दिलेला आहे ना मग विरोध का ?

 लढा तोच पण वेगवेगळ्या पध्दतीने वेगवेगळे होउन लढला जात आहे. पण राजकिय पक्ष जेव्हा दलित पँथरचे नाव येते तेव्हा आता तो काळ नाहि त्या मुळे दलित पँथरची आज गरज काय ? असा प्रश्न उपस्थीत करतात.
माझे याला एकच उत्तर आहे  पँथर पँथर आणि पँथर.

आंबेडकर चळवळीचा जेव्हा जेव्हा विषय येनार तेव्हा दलित पँथरच्या  नावाशिवाय विषय पुर्ण होनारच नाहि असे माझे मत आहे.


       समता न्युज
        ✍✍✍
    अमोल पो.जगताप 
      9834035397
       ठाणे/बदलापुर

निमित्त कवी दया पवार यांचा कोंडवाडा

नसत्या इंगळ्या डसल्या नसत्या.......

दया पवार (इ.स. १९३५ - सप्टेंबर २०१९९६) हे मराठी साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात.
दया पवार
जन्म नावदगडू मारुती पवार
टोपणनावदया पवार
मृत्यूसप्टेंबर २०१९९६
दिल्लीभारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकादंबरी
चळवळमराठी दलित साहित्य
प्रसिद्ध साहित्यकृतीबलुतं
वडीलमारुती
पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार आहे.जागल्या या टोपणनावानेही त्यांनी लेखन केलेले आहे. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव नावाच्या खेड्यात जन्मले. संगमनेरच्या बोर्डिंगमध्ये राहून ते शिक्षण पूर्ण करीत होते. त्याला किंवा त्याच्या आईला न विचारता दगडूच्या चुलत्याने दगडूचे लग्न ठरवले. त्यामुळे विचलित होऊन पवारमॅट्रिकमध्ये नापास झाले. इंग्लिशमध्ये त्यांना पास होण्यासाठी सात मार्क कमी पडले. त्यांच्या मामा आणि आईच्या धीराने त्यांनी ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा दिली. बोर्डिंगच्या अधिकार्‍यांनी दगडूला अपवाद म्हणून बोर्डिंगमध्ये राहण्याची परवानगी दिली. मुलांच्या चिडवण्याचा त्रास होई म्हणून पवार बोर्डिंगजवळच्या एका कोंबडीच्या खुराडात बसून अभ्यास करू लागलेव इंग्रजीमध्ये ६३ मार्क मिळवले.
मॅट्रिक नापास झालेल्या दया पवार यांना पद्मश्री पुरस्कारमिळाला आहे.
पवार यांच्या ’बलुतं’ या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत. बलुतं हे मराठीतले दलित लेखकाने पहिले प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली.
पवार यांची मुलगी प्रज्ञा ही एक मराठी कवयित्री आणि गद्यलेखक आहे.

प्रकाशित साहित्यसंपादन करा

  • अछूत (बलुतं’चा हिंदी अनुवाद).
  • कोंडवाडा (कवितासंग्रह)
  • चावडी (कथासंग्रह)
  • जागल्या (कथासंग्रह)
  • धम्मपद (कवितासंग्रह)
  • पाणी कुठंवर आलं गं बाई... (वैचारिक)
  • पासंग(कथासंग्रह)
  • बलुतं (आत्मकथन). ’बलुतं’चा जेरी पिंटो यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे.
  • बीस रुपये (’विटाळ’चा हिंदी अनुवाद)
  • विटाळ (वैचारिक)

पुरस्कारसंपादन करा

  • पद्मश्री
  • बलुतं’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयासाठीचा पुरस्कार (१९७९)
दया पवार- अर्थात ’दगडू मारुती पवार’. (१९३५-१९९६). स्वत:च्या ’दगडू’ या नावापासूनच त्यांनी आपल्या अस्तित्वाचा शोध घ्यायला सुरुवात केली. ते दलित साहित्य चळवळीतले एक महत्वपूर्ण लेखक. जन्म धामणगावातला (अकोला). १०वी पर्यंतचं शिक्षण संगमनेर इथल्या शाळेत. नोकरीच्या शोधात त्यांनी मुंबई गाठली. परळ इथल्या पशुवैद्यक महाविद्यालयात त्यांनी सहाय्यक म्हणून काम पहायला सुरुवात केली आणि त्यातून मिळणाऱ्या कमाईवर आपले शिक्षण पुढे चालू ठेवले. anatomy department मधे काम करताना मेलेल्या प्राण्यांची कातडी सोलून त्यांची body preserve करण्यासाठी त्यांच्या शिरांमधे अल्कोहोलचं इंजेक्शन देण्याचं काम त्यांच्या वाट्याला आलं. एका संवेदनशील माणसाला हे काम करताना काय वेदना झाल्या असतील...
त्यांचं बलुतं हे आत्मचरित्र नुकतच वाचून झालं. ’दगडू’नं दयाला सांगितलेलं हे आत्मकथन.जणू स्वतःलाच स्वतःची जुनी ओळख दिल्यासारखं. ”आयुष्यात किमान एकाला तरी घडलेलं सगळं सांगावं” या आईनं दिलेल्या शिकवणीशी प्रामाणिक राहून घडलेलं ’सगळं’ त्यांनी सांगितलं आहे. सगळ्यात शेवट मग ’दया’नं लिहिलेलं एक मनोगत आहे. ही कथा कुण्या ’हिरो’ची नाही. यात आयुष्यात काही ’कर्तबगारी’ करून दाखवलेला कुणी ’पुढारी’सुद्धा नाही. कुठल्याही एकाच कडव्या विचारानं यात बाजी मारलेली नाही. यात एक साधं विश्लेषण आहे. आलेले अनुभव, विचारांचं उठलेलं मोहोळ, जीवनाच्या पटावर भेटलेली टोकाची माणसं.... या साऱ्या भूतकाळाकडे बघणारं एक संवेदनशील मन. स्वतःच्या झालेल्या चुकांवर पांघरूण घालायचा कुठे केविलवाणा प्रयत्न नाही. नरेंद्र जाधव यांनी ”आम्ही आन आमचा बाप” मधे जशी ग्रामीण बोली वापरली आहे तशी बलुतं मधे दया पवारांनी वापरली असती तर ते जास्त जिवंत वाटलं असतं का, असा मनात विचार आला. असो.
आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटत राहतं की या माणसाचं मन इतक्या भयंकर जीवनानुभवानंतरही इतकं संवेदनशील राहिलंच कसं? दारू आणि स्पिरिट च्या व्यसनी लागलेला बाप, काबाडकष्ट करून नवरा गेल्यानंतरही मुलांना शिकवण्यासाठी कष्ट उपसणारी आई, समाजात सतत वाट्याला येणारी उपेक्षा, शिक्षणामुळे येत असलेलं सामाजिक भान पण ते व्यक्त करत असताना होणारी घालमेल, आजूबाजूच्या स्त्रियांचं हलाखीचं जिणं, लहान वयात पाहिलेले, अनुभवलेले भयंकर प्रसंग या सगळ्यात ’दगडू’ हरवला कसा नाही? किंवा तो नावाप्रमाणे ’दगड’ कसा झाला नाही?? आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची सत्वपरीक्षा घेतली गेली जणू. त्यांच्या एका कवितेत ’चिलया’ बाळाच्या कथेचा उल्लेख येतो.
”देव एवढे का दुष्ट असतात..
चिलयाचे रक्त,मांस मागतात...?”

...... दया पवारांनी आयुष्यात कधी चिलया बाळाचे तर कधी त्या चिलया बाळाच्या आई-बापाचे अनुभव घेतले.... या कथेला आपण ”भाकड कथा” का म्हणतो?
बलुतंची पहिली edition १९७८ सालची. त्या काळातलं हे साहित्य ’विद्रोही’ म्हणावं का. खरं पाहता बलुतं ने प्रस्थापिताला धक्का दिला पण तरीही ते ’आत्मकथना’च्या पठडीत जास्त चपखल बसणारं आहे. वाट्याला आलेल्या दुःखाचं त्यात शेअरिंग आहे. दुःखाकडे ’अन्याय’ म्हणून बघण्याची त्यात द्रुष्टी दिसत असली तरी ती तितकी ’विद्रोही’ स्वरूपात व्यक्त मात्र होत नाही. ती खरी व्यक्त झाली आहे त्यांच्या ’कोंडवाडा’ या काव्यसंग्रहामधे. बलुतं च्या निमित्तानं मी कोंडवाडा सुद्धा वाचलं. यातल्या कविता दुःख आणि अन्याय या दोन्ही पातळ्यांवर व्यक्त होणाऱ्या आहेत. आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव, महार समाजाच्या उन्नतीसाठीची आतून व्यक्त होणारी तळमळ, दलित समाजाला, तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे केलेलं आवाहन आणि अंतर्मुख होऊन मांडलेला अनुभवांचा लेखाजोखा; हे सारं त्यांच्या कवितेतून व्यक्त होतं. कोंडवाड्यामधे आणि बलुतं मधे केवळ सामाजिक बाह्य संघर्ष नाही. यात सामाजिक संक्रमणाबरोबर आंतरिक संघर्षही आहे. शिकल्यामुळे होणारं white collar मन आणि त्यातूनच आपल्या समाजापासून तुटल्याची येणारी भावना यात वेळोवेळी व्यक्त झाली आहे.
कोंडवाडाचं मुखप्रुष्ठ बोलकं आहे. त्याचा ३/४ भाग हा दगड-विटांनी बांधलेल्या (एकही खिडकी नसलेल्या) कोंडवाड्याची भिंत आहे. त्या शेजारून एक ठिपक्याएवढा दिसणारा माणूस (ज्याचा चेहरा दिसत नाही. खांद्यावर झोळी आहे. अंगावर कपडे चांगले आहेत) चालला आहे. दया पवार यांची कविता ही त्यांच्या आयुष्याच्या कोंडवाड्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना सापडलेली पायवाट होती. त्यांनी कष्टानं घेतलेलं शिक्षण, केलेलं वाचन एका अर्थानं त्याना मोकळा श्वास घ्यायला शिकवत होतं तर कधी त्यांच्या वेदनांच्या खपल्या उघडणारं होतं. त्यांनी कोंडवाडा कवितेत म्हटलं आहे-

”कशाला झाली पुस्तकांशी ओळख? बरा ओहोळाचा गोटा..
गावची गुरे वळली असती, असल्या इंगळ्या डसल्या नसत्या..”

दया पवारांची कविता वास्तवदर्शी आहे. ”मला निसर्गात रमणं आणि त्यावर कविता करणं कधीच जमलं नाही.” असं त्यानी म्हटलं आहे. किडे-मुंग्यांकडे कौतुकानं बघण्याची त्यांची मानसिकता नव्हती. ते शक्यही नव्हतं. इथे किड्याना खायला रव्याचा दाणा मिळू शकतो पण आमच्यासारख्या माणसांना एक वेळचं खायला मिळेल याची शाश्वती नाही, हे त्यांचं वाक्यच त्यांची मनःस्थिती सांगतं. बलुतं मधे जरी त्यांनी म्हटलं असलं की ही कथा माझ्या पराभवाची आहे तरी तसं पूर्णपणे खरं नाही. ’दगडू’ ते ’दया’ हा प्रवासच मुळी त्यांच्यातला सकारात्मक बदल दाखवतो. कोंडवाडामधे त्या कोंडलेल्या जीवनातून बाहेर येऊन ते म्हणूनच आवाहन करतात-

”प्रखर तेजाने तळपणारा सूर्य केव्हाच अस्तास गेला आहे
ज्या काजव्यांचा तुम्ही जयजयकार केलात
ते केव्हाच निस्तेज झाले आहेत
आता तुम्हीच प्रकाशाचे पुंजके व्हा
अन क्रांतीचा जयजयकार करा.”
सुरक्षित जगात जगलेल्या माझ्यासारख्या मुलीला बलुतं आणि कोंडवाडा हादरवून सोडतं.......

कोंडवाडा निमित्ताने : दया पवार यांचे स्वगत

खुदद संग्रहातील कवितेसंबंधी तसा मी कमी बोलणार आहे. कवितांच्या अंतरंगात शिरण्यापूर्वी तिच्यामागचे अनुभवविश्व, कविता घडण्यापूर्वीची मानसिक अवस्था, घटनांचे क्रम, झालेली विलक्षण घुसमट, याचा शोध घेण्याचा हा एक प्रयत्न.
संग्रहात सामावलेल्या कविता सोडुन, तसे मुबलक कविता-लेखन मी केलेले आहे. त्यातील एकही कविता या संग्रहात घालण्याची इच्छा होत नाही. यामागील कारणमीमांसा कोणती, कवितेच्या संदर्भात माझ्या जाणिवा कशा बदलत गेल्या, वेळोवेळी मी ज्याने प्रभावित झालो; ते नेमके अस्सल होते की नक्कल, हे पाहणे महत्त्वाचे वाटते.
मी पहिली कविता केव्हा लिहिली असावी? हे शोधण्यापूर्वी, कवितेची जाणीव तरी कशी निर्माण झाली हे तपासायला हवे. बालपणात माझ्या वाट्याला नेमके कोणते संस्कार आले, सांस्कृतिक जीवन कोणते होते, हे सारे पाहिले म्हणजेच माझ्या आजच्या कवितेची वीण व तिची पाळेमुळे कुठवर पोहोचलीत हे समजू शकेल.
मी तसा घाटावरचा. तालुक्यात सह्याद्रीच्या रांगेतील फाटा गेलेला, उंच असे कळसूबाईचे शिखर, तिथून मुंबई बेट टळटळीत दिसणारे. जन्मगावापासून जवळच अमृतवाहिनी प्रवरा दुर्थडी भरून वाहणारी. गाव तर डोंगराच्या कुशीत वसलेले, अशा निसर्गपरिसरात गावकुसाबाहेर कोंडवाड्यात' माझा जन्म झाला.
माझ्या जन्मामुळे कोणत्याही दिशेला तारा निखळला नाही किंवा मला सूर्यबिंब फळासारखे वाटले नाही. जमिनीवर पाय ठेवूनच मी चालू लागलो. कळू लागले, तेव्हापासून वास्तवतेच्या दाहक चटक्यांनी होरपळलो, भोवताली पसरलेला समृद्ध निसर्ग कोट्यासारखा बोचू लागला. मला एकही निसर्ग कविता लिहिता आली नाही त्याचे नेमके कारण हेच असावे. मराठी कवींनी आपल्या कवितांमधून चितारलेला निसर्ग केव्हाच मनाला रिझवू शकला नाही. या देशातील जातिजातीची मडक्यांची उतरंड, नुसती श्रमाची विभागणी नाही; तर श्रमिकांची विभागणी. एक जात नेमकी दुसन्या जातीच्या तोंडावर बसलेली. त्यामुळे गुदमरलेली अवस्था. आपण तर अगदी कॅळचे मडके, त्यातही रांडकीचं रांड प्वारे पाणलोटाने कचरा किना-याला लोटावा, तसं आपलं आयुष्य,
बामनाघरी 'लिव्हणं, कुणब्याघरी दाणं, महाराघरी गाणं. ही म्हण लहानपणापासून ऐकत असू. गाणंबजावणं करणं म्हणजे हिणकस धंदा करणं हा त्यात सूर होता, सवर्णाच्या घरी गाणं आणि महाराघरी गाणं यात सांस्कृतिकदृष्ट्या एकच पातळी नव्हती. केवळ बनृत्यासाठी किंवा पाच-दहा रुपयांसाठी ह्या गाण्यामुळे आपले पूर्वज कोणाचे मनोरंजन करीत होते? या गाण्यातून त्यांनी दु:खाचा शोध घेतलाय काय? तसे जर झाले असते, तर किती मोठा सांस्कृतिक ठेवा आपल्याला मिळाला असता. लिव्हणं आणि दाणं हे आपल्या वाट्याला की नव्हतं? दाणं नसेल, तर गाणं कसं सुचेल? दाणं मिळवण्यासाठी वाजंत्र्याच्या ताफ्यात किंवा ढोलकं तुणतुणं घेऊन आपण तालेवाराच्या पुढं गाणं का गायचं? असे प्रश्न लहान वयातही सुचत होते. ज्या लहान वयात मराठीतले आजचे उच्चवर्णीय कवी ज्ञानेश्वर, तुकाराम, रामायण, महाभारत यांवर कवितेची जाणीव पोसतात, त्या वयात माझ्यापुढे काय ताट वाटून ठेवले होते?
लहानपणी पाहिलेला महारवाडा स्वच्छ दिसतो आहे. दहाबारा वर्षाचे वय असावे. स्वातंत्र्याची जिलबी वर्गात मिळाल्याची आठवण आहे. शाळा सुटली म्हणजे महारवाड्यातील आम्ही मुले चावडीत जमायचो. यातील काही गुरांकडे जाणारी होती. आमच्यापैकी एखाद्या चुणचुणीत पोराला लुगडं नेसवायचं. पायात बाभळीच्या शेंगा चाळ म्हणून बांधल्या जायच्या. इफेडी, डबे यांच्या साथीत 'तमाशा' उभा राहायचा. अगंबयो: शेर ताटीमें लांडगा गयोस्स! सोडा लिंबू बाटलीमध्ये | पोरी दम धर ग छातीमध्ये अशा गाण्यांना झिलक-याच्या साथीत जोर चढायचा, हा सारा प्रकार त्या काळी कुणालाच अश्लील वाटत नव्हता हे विशेष. या प्रतिमांच्या पाठीमागे वेगळेच विश्वे दडलेले आहे हे कळण्यास बराच काळ जावा लागला. | वडिलांचा वाजंत्र्याचा ताफा होता. लग्नसराईत त्यांना भाव यायचा. ताफ्यात वडील कांड' वाजवीत, कधीकधी मी त्यांच्याबरोबर जात असे. संबळ वाजायला लागला की, माझाही देह भारावून जायचा. फावल्या वेळात माझ्या वयाची मुले त्यांचे अनुकरण करीत, तोंडातूनं आवाज काढून सारा ताफा हुबेहूब उभा करीत. फावल्या वेळात तो 'दम' शिकतं. सरमाडाची काडी पोकळ करून इबेड.अगर पाण्यात बुडवून 'दम' घेत, कांड किंवा सूर शिकण्याआधीची ती पूर्वतयारी होती. " पुढे मी शाळकरी झालो, वाजंत्रीपणा शिकणे म्हणजे घाणेरड.ए काम करणे, ही जाव प्रबळ झाली. वाजंत्र्यांच्या पत्रावळ्या उकिरड्यावर. ठायी ठायी मानहानी. हा धंदा गुलामगिरीचे जोखड वाटायचे. आज मला कोणतेच वाद्य वाजविता येत नाही. खरं म्हणजे संगीत घरात पिकत होतं. आपण त्याकडे जाणूनबुजून पाठ फिरवली.
यात आपला किती दोष? हा आनंद कोणी नासवून टाकला? आज एखाद्या सुखवस्तू घराण्यातील पोरगं गॅलरीत बसून अलगूज वाजवताना मी पाहतो, तेव्हा मॅला त्याचा हेवा वाटतो. लहान वयातच कलेकडे पाहण्याची ही दृष्टी! समाजव्यवस्था याला जबाबदार. | वडिलांना लावण्यांचा छंद, खुटीला ढोलकी आणि तुणतुणे टांगलेले. थकून भागून वडील आले म्हणजे, अंगणात जोडीदाराबरोबर ढाल्या सुरात ढोलकीच्या साथींत ते गात. 'तू ग ऐक नंदाच्या नारी.स.' गावात तमाशा आला म्हणजे, तो नेमका आमच्या घरी उतरायचा. त्याची गंमत वाटायची. त्याच्यातला सरदार खाजगीतही खूप शुद्ध बोलतोय असे वाटायचे. रात्रीला ते राजा आणि प्रधान व्हायचे, पण सकाळ उजाडली म्हणजे, विडीला ह्यांच्याजवळ पैसा नसायचा. पावसाळ्यात अळ्यांसारखे तडफडायचे. त्यांच्यात मास्तर नावाचा प्राणी असायचा, नाचणारणीच्या घोळक्यात तो लावण्या बांधायचा. गांजाची चिलीम झोकली म्हणजे त्या तारेत तो शब्द जुळवायचा. मछुम छणाणा | उभी राहून बोल ग जरा |' किंवा 'ये माझ्या लाडक्या छबिल्यो| मैशी बोल |ऽ' अकस्मात मास्तरला ....
....
सदा सर्वदा मी विद्रोही' कविता लिहितो असे काही नाही. अंतर्मुख होऊन माझ्या समाजाचे अंतरंग तपासावे वाटते. अशा वेळी सभा' सुचते. ही निवडणूक चालू असते, तेव्हा मी साक्षी असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडेकरांनंतर त्यांच्या अनयांयात आलेले अराजक, बौदध धम्म घेतलेला पण त्याचा डॉ. आंबेडकरांनी सांगितलेला नवा संदर्भ लक्षात न घेता, दुकान तेच पण पाटी बदललेली हा प्रकार. सांस्कृतिक मने एवढी मागासलेली, की साधा अध्यक्षही निवडणे कठीण, सारा समूह खोट्या प्रतिष्ठेला बळी पडलेला. कोते, स्वार्थी पुढारपण, शिव्यागाळ्या, भांडणे व मारामाच्या यांना ऊत आलेला. देशातील लोकशाहीचेही चित्र पाहिलेले. कवितेला हळूहळू मोठा कॅनव्हॉस मिळतो. जिल्हावाद, प्रांतवाद, बोकाळलेला, कवितेच्या शेवटी गरोदर बाईच्या बाळंतपणातून हे अराजक संपणार आहे, नवे नेतृत्व येणार आहे असा आशावाद. | मराठी वाचक ह्या कवितेचे स्वागत कसे करील सांगता येत नाही. गेली काही वर्षे वेगवेगळ्या पातळ्यांवरील श्रोत्यांच्या समूहापूढे कविता वाचण्याची संधी मिळाली. त्यामुळे काही अनुमान काढू शकतो. ग्राण पातळीवर नवा सुशिक्षित वर्ग मोठ्या संख्येने येतो आहे. तेथील हायस्कूल कॉलेजच्या पातळीवर माझा कविता-वाचन हा तर न विसरणारा अनुभव. पहिली रात्र, सभा अशा कविता श्रोत्यांनी डोक्यावर घेतलेल्या. त्याचबरोबर काही निराशाजनकही अनुभव. मराठीचा प्राध्यापकवर्ग नाक मुरडतो आहे; तर पवई येथील आय.आय.टी. च्या विद्याथ्र्यांपुढे ही कविता वाचताना थंड गोळ्यासारखे वाटते आहे, बर्फावर सुरी फिरवावी तसा हा अनुभव | भारतीय सांस्कृतिक जीवनात ही दरी आहे याची जाणीव पुन्हा प्रकर्षाने येते. हे| सांस्कृतिक दवंदवं नाहीसे करण्याकरिता माझी कविता बळी पडली, तरी चालेल या भूमिकेशी मी आलो आहे. मरण या कवितेत मी लिहितो आहे.
धारदार सुळ्यांच्या दरवाजाला हत्ती जसे चिपा होतात तसं आपण हसत मरावं.
-- दया पवार  

शीगवाला / नारायण सुर्वे

क्या लिखतो रे पोरा ! नाही चाचा -- काही हर्फ जुळवतो म्हणता, म्हणता दाऊदचाचा खोलीत शिरतो गोंडेवली तुर्की टोपी काढून गळ्याखालचा घाम पुसून तो ...